Breaking News : 10 वी ची परीक्षा रद्द तर 12 वी च्या परीक्षा होणार; शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांची माहिती

Independent channel of Balbharati

मुंबई : सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे १० वी आणि १२ वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर अखेर कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला. अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तर बारावीची बोर्डाची परीक्षा होणार आहे असे त्यांनी जाहीर केले … Read more

10 वी, 12 वी परिक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा; पहा महत्वाचे मुद्दे

मुंबई | कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर दहावी, बारावीच्या परिक्षा कशा होणार याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही संभ्रम अवस्था आहे. यावर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. दहावी, बारावीच्या परिक्षा आॅफलाईन पद्धतीनेच घेतल्या जाणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे. बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान तर इयत्ता बारावीच्या परीक्षा … Read more

10 वी, 12 वी परीक्षा Offline होणार ! शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची विधानसभेत माहिती

मुंबई | दहावी व बारावीच्या परीक्षा आँनलाईन होणार की आँफलाईन? या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. विधानसभा सदस्यांनी या संदर्भात आज सभागृहात प्रश्न उपस्थीत केला होता. यावेळी विधानसभेत सभागृहात शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी या परीक्षा आँफलाईन होणार आहेत असे जाहीर केले. Covid-19 च्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा ऑनलाईन होतील की ऑफलाईन यावर … Read more

राज्यातील शाळा पुन्हा बंद? कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री निर्णय घेण्याची शक्यता

मुंबई | राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. यापार्श्वभुमीवर राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शासन दरबारी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत सोमवारी निर्णय घेण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे या जिल्ह्यांतील शाळा अद्याप सुरुच झालेल्या नाहीत. तसेच अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील … Read more

पालकांना मिळणार दिलासा ! शालेय फी संदर्भात राज्य शासनाचा मोठा निर्णय

Big decision of the state government regarding school fees.

करिअरनामा ऑनलाईन । शालेय फी संदर्भात राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. शालेय फी कशा प्रकारे कमी करता येईल याबाबत कायदेशीर बाबी तपासून शासनास अहवाल सादर करण्यासाठी शिक्षण तज्ञ अधिकार्यांची शासन स्तरावर एक समिती स्थापन करण्यासाठीकरण्याचा निर्णय घेतला आहे. यावर अतिंम निर्णय काय असणार हे बघणे अधिक महत्वाचे असणार आहे. लॉकडाऊनच्या काळातही काही संस्था … Read more

आजपासून राज्यातील 5 वी ते 8 वी च्या शाळा सुरु; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांनी शेयर केला खास व्हिडिओ

करिअरनामा आॅनलाईन | कोरोना महामारिमुळे बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने आता सुुर होत आहेत. आजपासून राज्यातील 5 वी ते 8 वी च्या शाळा सुरु होत आहेत. यापार्श्वभुमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एक खास व्हिडिओ शेयर करत विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याचं आवाहन केलंय. https://twitter.com/VarshaEGaikwad/status/1354281409494577154 बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा नव्या उत्साहाने शाळा सुरू होत असताना विद्यार्थ्यांचा आनंद, शाळांची … Read more

10 वी बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी बोर्डाकडून पुन्हा मुदतवाढ; 2 फेब्रुवारीपर्यंत मुदत

करिअरनामा ऑनलाईन । दहावी बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी बोर्डाकडून मुदतवाढ देण्यात आली. आता विद्यार्थी 2 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरु शकतील. बोर्डाकडून अर्ज भरण्यासाठीच्या मुदतवाढीबाबत परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. दहावी बोर्ड परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी २५ जानेवारी ही अंतिम मुदत होती. आता ही अवधी 2 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी … Read more

पुण्यातील ५ वी ते ८ वी वर्गांच्या शाळा १ फेब्रुवारीपासून सुरु होणार; महापालिका आयुक्तांनी काढलं पत्रक

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दीर्घकाळ बंद असलेल्या शाळा सुरु करण्याला आता मुहूर्त मिळाला आहे. नववी ते बारावीच्या शाळा जानेवारी महिन्यात सुरु करण्याचे निर्देश याआधी प्रशासनाने दिले होते. आता पाचवी ते आठवीचे वर्गही योग्य ती खबरदारी घेऊन १ फेब्रुवारीपासून सुरु करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दिले आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या … Read more

Breaking News : 10 वी, 12 वी च्या परिक्षा ‘या’ तारखेला होणार; शिक्षणमंत्र्यांची माहिती

मुंबई | राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली आहे. त्याप्रमाणे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीची लेखी परीक्षा दि. 23 एप्रिल 2021 ते 29 मे 2021 या दरम्यान होणार असल्याचे जाहीर झाले आहे. तर दुसरीकडे दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल2021 ते 31 मे 2021 … Read more

Breaking News : राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग 27 जानेवारीपासून सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांची माहिती

मुंबई | राज्यात कोरोनामुळे लाॅकडाऊन जाहीत झाल्यापासून सर्व शाळा बंद होत्या. यानंतर काही दिवसांपूर्वी नववी, दहावी, बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले होते. आता येत्या 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्गही सुरु करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत २७ जानेवारीपासून सुरू … Read more