Home Blog Page 864

MPSC परीक्षा होणारच पण आरक्षणाच्या निर्णयानंतर निकाल

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चासह अन्य राजकीय नेतेमंडळींसह विद्यार्थी संघटनांनी केली आहे. मात्र, परीक्षा ठरल्याप्रमाणे 11 ऑक्‍टोबरलाच होणार असून राज्यातील अडीच लाख विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रही वितरीत करण्यात आले आहेत. तत्पूर्वी, आयोगाने 16 सप्टेंबरला परीक्षेबाबत सरकारला विचारणा केल्यानंतर सरकारच्या निर्णयानंतरच परीक्षेचे नियोजन करण्यात आल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, परीक्षेचा निकाल मराठा आरक्षणावरील निर्णयानंतर जाहीर केला जाणार आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव तथा संसर्ग वाढला आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आरक्षणावरील निर्णयानंतर आणि कोरोनावरील लस निघाल्यानंतरच परीक्षा घ्यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. दुसरीकडे आज राज्यसेवेची पूर्व परीक्षा पुढे ढकलावी, या मागणीसाठी ” बाहेर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आयोगाने सरकारचा अभिप्राय घेऊन परीक्षेचे फेरनियोजन केले. त्यानुसार 11 ऑक्‍टोबर ही तारीख निश्‍चित करण्यात आली. त्यानंतर आयोगाने विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्रही वितरीत करुन परीक्षा केंद्रांवर सॅनिटायझिंगही करुन घेतले. त्यामुळे आता परीक्षा रद्द तथा पुढे ढकलणे अशक्‍य असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सुनिल आवताडे यांनी स्पष्ट केले की ‘एमपीएससी’ची राज्य सेवेची पूर्व परीक्षा कधीपर्यंत घ्यावी, याबद्दल आयोगाने 16 सप्टेंबरला सरकारकडे विचारणा केली होती. त्यानुसार आयोगाने 11 ऑक्‍टोबरला परीक्षा घेण्याचे नियोजन केले. अडीच लाख विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेशपत्रही वितरीत करण्यात आले आहेत. सरकारच्या निर्णयानुसार परीक्षा झाली तरीही आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत निकाल जाहीर केला जाणार नाही.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

मराठा तरुणांचे नुकसान टाळण्यासाठी MPSC परीक्षा उधळून लावू नका! मराठा परीक्षार्थींचं आंदोलकांना आवाहन

मुंबई । सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज चांगलाच संतप्त झालेला आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत राज्यातील स्पर्धा परीक्षा घेतल्यास उधळून लावू अशी धमकी मराठा संघटनांनी दिली आहे. याला आता मराठा समाजातील परीक्षार्थी मुलांनीच विरोध केला आहे. मराठा तरुणांचे नुकसान टाळण्यासाठी मराठा मोर्चाने MPSC परीक्षा उधळू नये, असं आवाहन मराठा समजतील परीक्षांर्थींनी केली आहे. मराठा समाजातील वयोमर्यादा उलटून जाणाऱ्या मुलांचे नुकसान होणार असल्याने परीक्षा रद्द न करता ती होऊ द्यावी अशी मागणी या मुलांनी केली आहे.

राज्यसेवा पदांच्या भरतीची परीक्षा पहिल्यांदा 4 एप्रिल रोजी होणार होती. यासाठीचे पेपर जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले असून हॉल तिकीटही बनली होती. पुन्हा ती 26 एप्रिलपर्यंत लांबली त्यानंतर 20 सप्टेंबरपर्यंत लाभल्यावर शेवटी 11 ऑक्टोबर ही परीक्षेची तारीख निश्चित झाली आहे. या परीक्षेसाठी गेल्या 2 ते 3 वर्षांपासून जवळपास 3 लाख मराठा समाजातील तरुण दिवसरात्र तयारी करीत असून आता ही 200 जागांसाठी असलेली परीक्षा होणे गरजेचे असल्याचे संदीप बाड या विद्यार्थ्याचे म्हणणे आहे.

मराठा आरक्षण समाजातील तरुणांना हवे आहे मात्र ही परीक्षा रद्द झाल्यास या परीक्षेसाठी तयारी करणारे आणि ज्यांची वयोमर्यादा उलटून जाणाऱ्या हजारो तरुणांना यापुढे राज्यसेवेची परीक्षा देता येणार नसल्याने मराठा संघटनांनी परीक्षा होऊ द्याव्यात. मात्र भरती प्रक्रिया सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयानंतर घेण्याची मागणी करावी अशी भूमिका घेतली आहे. येत्या रविवारी ही परीक्षा होणार असून सकल मराठा मोर्चाने ही परीक्षा रद्द न केल्यास उधळून लावण्याची धमकी दिल्यानंतर हे तरुण अस्वस्थ झाले आहेत.

 

मराठा आरक्षणासाठी उद्या दोन्ही छत्रपती एकाच स्टेजवर; MPSC परिक्षेला स्थगिती मिळणार?

मुंबई । सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज चांगलाच संतप्त झालेला आहे. मराठी क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. कधी काळी लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंच्या विरोधात लढणारे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आता दोन्ही राजेंना एकाच व्यासपीठावर आणणार आहेत. उद्या सकाळी ११ वाजता माथाडी कामगार भवनात दोन्ही छत्रपतींच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रातील सर्व संघटना एकत्र बसणार आहोत. १० सप्टेंबरपूर्वीचा मराठ्यांचा कोटा अबाधित ठेवला पाहिजे, अन्यथा आम्ही निर्णय घेऊ आणि महाराष्ट्रात मराठा समाजाची काय ताकद आहे ते दाखवून देऊ, असंही माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील म्हणाले आहेत.

नरेंद्र पाटील म्हणतात, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आमच्या बऱ्याच संघटनांच्या बैठका झाल्या आहेत. एक बैठक आमची छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये झाली. कोल्हापूरमध्येही आमच्या भाऊबंधांनी बैठक घेतली. पुण्यात आमदार विनायक मेटेंनी बैठक घेतली. त्या बैठकीला छत्रपती उदयनराजे जाणार असं समजलं. 1980ला माझ्या वडिलांनी आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं, अशी मागणी केली होती. मोठ्या प्रमाणात माथाडी कामगार आणि विदर्भातील शेतकरी आरक्षणापासून वंचित राहत होता. पण आता तसं होऊ देणार नसल्याचंही नरेंद्र पाटील म्हणाले आहेत.

आमच्यात जर मतभेद किंवा मनभेद असतील, तर ते सर्व मिटवावेत. दोन्ही छत्रपतींच्या माध्यमातून आम्हाला वेगळं काही तरी करता येईल. जेणेकरून राज्य सरकार आमच्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणार नाही. त्यामुळेच मी पुढाकार घेतला, मी छत्रपती संभाजी महाराजांशी वैयक्तिक बोललो. उदयनराजे भोसले साहेबांशीही आम्ही बोललो. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या गादीचे प्रमुख उदयनराजे भोसले आहेत. ते त्यांचं नेतृत्व करतात. तसेच कोल्हापूरची जी गादी आहे छत्रपती शाहू महाराजांची, त्याचं नेतृत्व संभाजीराजे करत आहेत.

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला अन्यथा..
दोन्ही छत्रपती जर एकत्र आले, तर महाराष्ट्रातील कुठल्याही मराठा समाजावर अन्याय होईल, असं मला वाटत नाही. एमपीएससी परीक्षा १० तारखेला होणार असल्यानं मराठी मुलांचं शैक्षणिक आणि नोकरीमध्ये फार मोठं नुकसान होणार आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण यांची अधिकाऱ्यांबरोबर संयुक्त बैठक झाली. त्या बैठकीला छत्रपती संभाजी महाराजही होते. देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आरक्षण कुठे तरी अडचणीत येताना दिसत आहे. उद्या सकाळी ११ वाजता माथाडी कामगार भवनात दोन्ही छत्रपतींच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रातील सर्व संघटना एकत्र बसणार आहोत. १० सप्टेंबरपूर्वीचा मराठ्यांचा कोटा अबाधित ठेवला पाहिजे. त्यामुळं राज्य सरकारने एमपीएससी परीक्षा स्थगित करावी किंवा पुढे ढकलावी. अन्यथा आम्ही निर्णय घेऊ आणि महाराष्ट्रात मराठा समाजाची काय ताकद आहे ते दाखवून देऊ, असंही माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील म्हणाले आहेत.

 

उस्मानाबाद नगर परिषदेमध्ये ३२ जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।उस्मानाबाद नगर परिषदेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://osmanabad.gov.in/

Osmanabad Nagar Parishad Bharti 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

1) Physician –  1

2) MO MBBS – 4

3) MO BAMS –  6

4) Coordinator – 2

5) Staff Nurse / Ward Boy –  12

6) Cleaning Servant – 4

7) Lab Technician -1

8) Receptionist – 2

पात्रता

1) Physician –  MD Medicine

2) MO MBBS –  MBBS

3) MO BAMS –  BHMS / BAMS

4) Coordinator -Any graduates

5) Staff Nurse / Ward Boy –  B. Sc Nursing / ANM / GNM

6) Cleaning Servant – SSC

7) Lab Technician – DMLT

8) Receptionist – Any graduates

नोकरीचे ठिकाण – उस्मानाबाद    Osmanabad Nagar Parishad Bharti 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरातPDF     (www.Careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://osmanabad.gov.in/

अर्ज करण्याचा पत्ता – मुख्यधिकारी नगर परिषद उस्मानाबाद 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Pune Mahanagarpalika Bharti 2020| 150 जागांसाठी भरती,१९ हजार रुपये पगार

Bombay High Court Recruitment 2020 | 111 जागांसाठी भरती

भारती विद्यापीठामध्ये ‘प्रोफेसर’ पदांसाठी भरती

मोठी बातमी! 15 ऑक्टोबर पासून देशात सर्वत्र शाळा होणार सुरु; महाराष्ट्राचं काय?

करिअरनामा ऑनलाईन । कोरोनाचे संकट पाहता अद्याप राज्यातील शाळा सुरु करण्यात आल्या नाही आहेत. नुकतेच राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा १ नोव्हेंबर पासून सुरु करणार असल्याचे सांगितले आहे. आता केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनीही देशात १५ ऑक्टोबर पासून शाळा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. कोरोनाच्या संकटपार्श्वभूमीवर प्रत्येक राज्य सरकारला त्यांच्या राज्याची परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याबबात निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असणार आहे.  अशी माहिती समोर आली आहे.  शाळा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. विविध राज्यांच्या शालेय शिक्षणमंत्र्यांना त्याची अंमलबजावणी करायची आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी स्पष्ट केले आहे.  केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जेईई आणि नीट या प्रवेश परीक्षा यशस्वीपणे राबवल्याचा उल्लेखही यावेळी रमेश पोखरियाल यांनी केला. लाखोच्या संख्येने विद्यार्थ्यांनी नियमानुसार परीक्षा दिल्या. तसेच विविध राज्यांमध्ये आता महाविद्यालयीन अंतिम वर्षांच्या परीक्षाही सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. शाळा सुरू करण्यापूर्वी पालक आणि शाळांनाही विश्वासात घेण्याची सूचना देण्यात आली आहे. सुरक्षा आणि शिक्षण हे दोन्ही गरजेचं असून याचा समतोल राखत मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करा असे आवाहन केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी केले आहे.

महाराष्ट्रात याआधीच शालेय शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. मात्र, त्यासाठी काही नियम-अटीही घोषित करण्यात आल्या आहेत. “विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण भागातील आणि शहरांपासून दूरवरील शाळा प्रत्यक्ष सुरु कराव्यात. तसंच, दुसरीकडे ऑनलाईन, डिजिटल पद्धत पायलट प्रॉजेक्ट म्हणून तातडीने राबवावी,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. ज्या ठिकाणी शाळा प्रत्यक्ष सुरु होत आहेत, तिथे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्री म्हणाले होते. आता लवकरच शाळा सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत.

९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरु करणार – बच्चू कडू

टाॅप माॅडेल अन् मिस इंडिया फायनलिस्ट अशी झाली IAS; देशात 93 वा नंबर

नववी नापास झालेल्या मराठमोळ्या मुलाच्या यशाची कथा नववीच्याच पाठपुस्तकात

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा(https://careernama.com)

Bombay High Court Recruitment 2020 | 111 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/

Bombay High Court Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

वरिष्ठ यंत्रणा अधिकारी – 31 जागा

यंत्रणा अधिकारी – 80 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी

वयाची अट – 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र  Bombay High Court Recruitment 2020

वेतन – 46000 रुपये

अर्ज पध्दती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑक्टोबर 2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा(https://careernama.com)

Ordnance Factory Ambernath Recruitment 2020|’अप्रेंटीस’ पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय सेनासामग्री कारखाना अंबरनाथ, ठाणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.ofbindia.gov.in/

Ordnance Factory Ambernath Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – अप्रेंटीस

पद संख्या – 23 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – ठाणे  Ordnance Factory Ambernath Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 ऑक्टोबर 2020 

मूळ जाहिरात – PDF     (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://www.ofbindia.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महावव्यस्थापक , सेनासामग्री कारखाना, अंबरनाथ, जि. ठाणे

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा(https://careernama.com)

ICAR Recruitment 2020 | कांदा, लसूण संशोधन संचालनालयामध्ये भरती

कर्मचारी बाल विकास संस्थेंतर्गत विविध पदांसाठी भरती

भारती विद्यापीठामध्ये ‘प्रोफेसर’ पदांसाठी भरती

JEE Advanced Result 2020 | जेईईचा निकाल जाहीर; असे पहा तुमचे गुणपत्रक

करिअरनामा ऑनलाईन | जेईई अ‍ॅडव्हान्स 2020 चा निकाल (JEE Advanced Result 2020) 5 ऑक्टोबर दिवशी जाहीर केला जाणार आहे. यंदा कोरोनाच्या सावटाखाली पार पडलेल्या या परीक्षेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची उत्सुकता आहे. आयआयटी दिल्लीने यंदा जेईईचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच jeeadv.nic.in वर जाहीर होणार असल्याची माहिती दिली आहे. JEE Advanced Cut Off 2020 त्यामुळे यंदा विद्यार्थी या अधिकृत संकेतस्थळावर आपले मार्क्स पाहू शकणार आहेत. देशभर कोरोना व्हायरसचा फैलाव होत असतानादेखील पुरेशी खबरदारी घेत देशभर विविध परीक्षाकेंद्रांवर 27 सप्टेंबर दिवशी ही परीक्षा पार पडली आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी JEE Advanced Result 2020 परीक्षा दिली आहे, ते आपला रिझल्ट ऑनलाईन jeeadv.ac.in वर पाहू शकणार आहेत. यावर्षी JEE Advanced 2020 exam साठी एकूण 1.6 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यापैकी 96 टक्के विद्यार्थ्यांनी 27 सप्टेंबर रोजी देशभरातील वेग-वेगळ्या सेंटर्सवर परीक्षा दिली होती.

कसे पहाल तुमचे जेईई अ‍ॅडव्हान्स 2020 चे मार्क्स ?

  • jeeadv.ac.in या वेबसाईटवर जा
  • होम पेजवर देण्यात आलेल्या JEE Advanced result 2020 link वर क्लिक करा
  • स्क्रिनवर एक नवीन पेज ओपन होईल
  • त्यानंतर सांगितलेले डिटेल्स भरुन लॉग इन करा
  • JEE Advanced result स्क्रिनवर दिसेल
  • रिझल्ट डाऊनलोड करुन सेव्ह करा आणि त्याची प्रिंटआऊटही काढा.

इंजिनियरिंग प्रवेशासाठी अत्यावश्यक असणार्‍या या परिक्षेच्या माध्यमातून सुरूवातीला विद्यार्थी जेईई मेन्सची परीक्षा देतात. त्यामधून पहिले अडीच लाख रॅन्क होल्डर्स जेईई अ‍ॅडव्हान परीक्षा देतात. JEE Advanced Cut Off 2020 यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर अवघ्या 1.6 लाख विद्यार्थ्यांनी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केले. आता जेईई अ‍ॅडव्हान्सचा निकाल JEE Advanced Result 2020 लागल्यानंतर देशातील 23 आयआय टीमध्ये यंदाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहेत.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा(https://careernama.com)

९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरु करणार – बच्चू कडू

IAS की IPS? कोण आहे सर्वाधिक पाॅवरफुल? जाणुन घ्या पगार अन् सुविधांबाबत सर्वकाही

टाॅप माॅडेल अन् मिस इंडिया फायनलिस्ट अशी झाली IAS; देशात 93 वा नंबर

ICAR Recruitment 2020 | कांदा, लसूण संशोधन संचालनालयामध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन । कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ईमेल ) पद्धतीने करायचा आहे. आज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://dogr.icar.gov.in/index.php?lang=en

ICAR Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

1) Young Professional – I – 6 जागा

पात्रता –  B. Sc (Agr)

वेतन –   15,000 रुपये

2)Young Professional – II – 5 जागा

पात्रता –  M. Sc (Agr) / PG in Computer science and application OR ME / M. Tech

 वेतन  –  25,000 रुपये

3) Jr. Research Fellow – 1 जागा

पात्रता –  M. Sc (Agr) with Specialization in Biotechnology / Genetics OR M. Sc / M. Tech

पात्रता –  31,000 रुपये

4) Senior Research Fellow – 1 जागा

पात्रता –  Master degree in Genetics and Plant Breeding / Vegetable Science / Horticulture          / Seed Science

वेतन – 31,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – पुणे  ICAR Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ईमेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)

ईमेल – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://dogr.icar.gov.in/index.php?lang=en

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा(https://careernama.com)

भारती विद्यापीठामध्ये ‘प्रोफेसर’ पदांसाठी भरती

SBI Recruitment 2020 | ८१ जागांसाठी भरती, ४५ हजार पगार

Indian Navy Recruitment 2020| 12वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी

 

 

कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत ‘कार्यालय सहाय्यक’ पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 16-10-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.dbskkv.org/index.html

Dr.Balasaheb Sawant Krishi Vidyapeeth Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

पदाचे नाव – कार्यालय सहाय्यक, फील्ड सहाय्यक

पद संख्या – 2 जागा

 पात्रता

कार्यालय सहाय्यक – कोणत्याही विषयातील पदवीधर

फील्ड सहाय्यक – B.sc (Agriculture/Horticulture)

वयाची अट – 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – रत्नागिरी  Dr.Balasaheb Sawant Krishi Vidyapeeth Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16-10-2020 

मूळ जाहिरात –PDF        (www.careernama.com)

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://www.dbskkv.org/index.html

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – (https://careernama.com)

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत 57 पदांसाठी भरती

धुळे महानगरपालिकेंतर्गत 110 जागांसाठी भरती