Home Blog Page 408

Bhagat Singh Koshyari : वादग्रस्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेमके कितवी शिकले? राजकारणात येण्याआधी केली शिक्षकाची नोकरी

Bhagat Singh Koshyari

करिअरनामा ऑनलाईन। आपल्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असणारे (Bhagat Singh Koshyari) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे टिकेचे धनी झाले आहेत. सध्या अनेक नेत्यांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. दरम्यान त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दिवषयी आपण जाणून घेऊया.

राजकारणात येण्यापूर्वी महाविद्यालयात शिक्षक

भगतसिंह कोश्यारी यांना प्रेमाने ‘भगत दा’ म्हटले जाते. भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंड भाजपच्या दिग्गज आणि ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक ते महाराष्ट्राचे राज्यपाल असा प्रवास केला आहे. कोश्यारी यांचा हा राजकीय प्रवास चढ-उतारांनी भरलेला आहे. राजकारणात येण्यापूर्वी ते महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) पूर्णवेळ सदस्य झाले आणि आरएसएस स्वयंसेवक असण्यासोबतच भाजपच्या राजकारणात सक्रिय राहिले.

हयातसिंग असा झाला भगतसिंग (Bhagat Singh Koshyari)

भगतसिंग कोश्यारी यांचा जन्म 17 जून 1942 रोजी बागेश्वर जिल्ह्यातील (पूर्वीचा अल्मोडा जिल्हा) कपकोट ब्लॉकमधील एका गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोपाल सिंह कोश्यारी आणि आईचे नाव मोतिमा देवी होते. ते त्याच्या पालकांच्या 11 मुलांपैकी 9 वे पुत्र आहेत. त्यांच्या आधी 8 बहिणींचा जन्म झाला. भगतसिंग यांच्या आई-वडिलांनी त्यांचे नाव हयात सिंग ठेवले होते. पण त्यांच्या चुलत भावाचे नाव हयात सिंग असल्याने त्यांच्या पालकांनी पुढे त्यांचे नाव हयात सिंग ऐवजी भगत सिंग ठेवले.

अल्मोडा येथे घेतले उच्च शिक्षण 

भगतसिंग कोश्यारी यांचे सुरुवातीचे शिक्षण गावाजवळच्या (Bhagat Singh Koshyari) शाळेत झाले. यानंतर त्यांनी कपकोटच्या शाळेतून दहावी आणि पिथौरागढच्या शाळेतून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर ते उच्च शिक्षणासाठी अल्मोडा येथे गेले आणि येथून त्यांनी इंग्रजीमध्ये मास्टर्स केले.

एटाच्या इंटर कॉलेजमध्ये केली नोकरी 

इंग्रजीमध्ये मास्टर्स केल्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांनी अध्यापनाच्या क्षेत्रात भविष्य घडवण्याचा प्रयत्न केला. ज्या अंतर्गत त्यांनी 1964 मध्ये एटा येथील राजाराम इंटर कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम सुरू केले आणि काही वर्षे अध्यापन केले. यानंतर 1966 मध्ये ते आरएसएसच्या संपर्कात आले आणि पूर्णवेळ स्वयंसेवक झाले. यानंतर त्यांनी प्रवक्त्याची नोकरी सोडली आणि पिथौरागढला परतले आणि पिथौरागढला त्यांचे कार्यस्थान बनवले.

सरस्वती शिशु मंदिराची स्थापना 

पिथौरागढला परत आल्यावर, भगतसिंग कोश्यारी यांनी 1977 मध्ये जिल्ह्यात सरस्वती शिशु मंदिराची स्थापना केली आणि या शाळेत प्रदीर्घ काळ शिक्षक म्हणूनही (Bhagat Singh Koshyari) काम केले. यासोबतच त्यांनी पर्वत पियुष नावाचे साप्ताहिक वृत्तपत्र संपादित करून प्रकाशित केले. ज्यामध्ये ते जनतेच्या चिंतेचे मुद्दे मांडत राहिले. आणीबाणीच्या काळात जवळपास दोन वर्षे ते फतेहगड तुरुंगातही होते.

2019 पासून महाराष्ट्राच्या राज्यपालपदी विराजमान 

भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडमधील कपकोट विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिले आहेत. तेथे असताना त्यांनी २०१४ मध्ये नैनिताल मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. ज्यात ते जिंकले. यानंतर ते 2019 च्या लोकसभा निवडणुकीपासून दुरावले. 2019 मध्ये मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यावर 31 ऑगस्ट 2019 रोजी सरकारने त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Police Bharati : तृतीय पंथीयांचं सरकारला साकडं; ‘पोलीस दलात भरती करा अन्यथा कोर्टात जावू…’

Police Bharati

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात महाराष्ट्र पोलीस भरतीची घोषणा (Police Bharati) करण्यात आली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल अठरा हजार जागांसाठी ही पोलीस भरतो होणार आहे. राज्यातील तरुण तरुणींना यामध्ये अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. या भरतीसाठी अधिसूचना आणि अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र आता या पदभरतीमध्ये कोणताही लिंगभेद न मानता तृतीय पंथीयांनाही संधी देण्यात यावी; अशी मागणी करण्यात आली आहे.

तृतीयपंथीयांना नेहमीच कोणत्याही नोकरी किंवा आरक्षणात डावललं  जात अशी तक्रार नेहमीच असते. कोणत्याही नोकरीमध्ये सामावून घेण्यास त्यांच्यामध्ये मतभेद (Police Bharati) केला जातो. मात्र सरकारी नोकरीमध्ये आपल्याला संधी देण्यात यावी; अशी त्यांची अपेक्षा असते. म्हणूनच राज्याच्या पोलीस भरतीमध्ये कुठलाही लिंगभेद न मानता सहभागी होण्याची संधी मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ही मागणी मान्य करण्यात आली नाही तर न्यायलयात धाव घेवू; असा इशारा तृतीयपंथीयांनी दिला आहे.

मुखमंत्र्यांकडे घेतली धाव (Police Bharati)

न्यायालयानं दिलेल्या एका आदेशानुसार तृतीय पंथियांना देखील भरती प्रक्रियेत संधी देणं गरजेचं असल्याच विधी तज्ञांनी  म्हटलं आहे. मात्र पोलीस भरतीमध्ये सहभागी होण्यासाठीचा अर्ज भरण्याची मुदत केवळ 30 नोव्हेंबर पर्यंतच असल्याने यां तृतीयपंथियांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि पोलीस भरतीमध्ये संधी देण्यासाठी विनंती केली आहे.

पोलीस अधिकारी सकारात्मक

राज्यातील माजी पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर आणि अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी तृतीय पंथीयांना पोलीस दलात स्थान मिळावं म्हणून सकारात्मकता दर्शवली आहे. छत्तीसगडमध्ये (Police Bharati) पोलीस दलात तृतीय पंथीयांची भरती केली आहे. या पार्श्वभूमीवर पुरोगामी महाराष्ट्रात केवळ लिंगभेद करून तृतीय पंथीयांना त्यांच्या हक्कापासून वंचीत ठेवले जावू नये; असं या अधिकाऱ्यांचं मत आहे.  तृतीयपंथीयांनी केलेल्या मागणी बाबत राज्य सरकार काय निर्णय घेतं याकडे सर्वांचे लक्ष आहे.

तृतीय पंथीयांकडून अभ्यास आणि सरावास सुरुवात

इतकंच नाहीतर अनेक तृतीय पंथीयांनी पोलिस भरतीसाठी सरावही सुरु केला आहे. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत सुरक्षा रक्षक पदी नेमणूक झालेली राज्यातील पहिली तृतीय (Police Bharati) पंथीय आहे. निकिता प्रमाणेच तिचे इतर चार साथीदार देखील सुरक्षा रक्षकपदी आपलं कर्तव्य बजावत आहेत. मात्र आता या सगळ्यांची जिज्ञासा वाढली आहे. बरेच होतकरू तृतीय पंथीय पोलीस बनण्याचं स्वप्न बघत आहेत. या भरतीसाठी अनेकांनी मैदानी सराव आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास  सुरु केला आहे. म्हणूनच आता या पदभरतीमध्ये कुठलाही लिंगभेद न मानता सहभागी होण्याची संधी मिळावी; अशी मागणी जोर धरत आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Chanakya Niti for Students : भविष्य उज्वल करण्यासाठी मुलांना ‘या’ गोष्टींपासून दूर ठेवा; काय सांगतात आचार्य चाणक्य

Chanakya Niti for Students

करिअरनामा ऑनलाईन। आचार्य चाणक्यांनी मुलांबाबत अनेक गोष्टी (Chanakya Niti for Students) सांगितल्या आहेत. चाणक्यांनी मुलांना त्यांच्या आयुष्यात सुरुवातीपासूनच काही गोष्टींची सवय लावण्यास सांगितल्या आहेत. त्यांच्यामुळे संपूर्ण जीवन परिपूर्ण होईल. पालकांनी मुलांच्या चुकीच्या सवयींकडे दुर्लक्ष केले तर अशी मुले संस्कारहीन होतात. म्हणूनच आचार्य चाणक्य
यांनी मुलांच्या संस्कारांवर भर दिला आहे. आचार्य कौटिल्य हे एक महान शिक्षक होते आणि त्यांना मुलांच्या शिक्षणासोबतच संस्काराचे महत्त्व चांगलेच माहीत होते. चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले आहे की, पालकांनी आपल्या मुलांच्या या वाईट सवयींकडे कधीही दुर्लक्ष करू नये.

1. खोटे बोलण्याच्या सवयीकडे करू नका दुर्लक्ष (Chanakya Niti for Students)

चाणक्य नीतीनुसार, जर एखाद्या पालकाची मुले खोटे बोलत असतील तर अशा पालकांनी ताबडतोब सावध झाले पाहिजे. अशा वेळी मुलांना प्रेमाने समजावले पाहिजे. मुलांनी खरे बोलले पाहिजे आणि या दिशेने काम केले पाहिजे. कारण मुलांची खोटं बोलण्याची सवय त्यांना पुढे चुकीच्या मार्गावर नेऊ शकते.

2. जेव्हा मुले तुमचे ऐकत नाहीत

मुलांचा स्वभाव खेळकर आणि खोडकर असतो. अशा स्थितीत अनेकवेळा त्यांना बरोबर चूक कळत नाही. मुलांना योग्य आणि अयोग्य याचा अर्थ शिकवणे हे पालकांचे (Chanakya Niti for Students) कर्तव्य आहे. जर मुले तुमचे बोलणे ऐकत नसतील तर तुम्ही त्यांना प्रेमाने समजावून सांगावे आणि त्यांची ही सवय दूर करण्याचा प्रयत्न करावा.

3. महापुरुषांच्या कथा ऐकवा 

चाणक्याच्या मते मुलांना महापुरुषांच्या कथा सांगाव्यात. कारण मुले कथा फार लक्षपूर्वक ऐकतात. अशा वेळी मुलं जेव्हा महापुरुषांच्या कथा ऐकतात तेव्हा त्यांच्या मनात चांगले विचार रुजतात. ते महापुरुषांच्या जीवनातून प्रेरित होऊन त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतील. महान पुरुष त्यांचे खरे आदर्श असतील.

या गोष्टी लक्षात ठेवा

मुलांचे हृदय कोमल असते. ते नक्कीच खोडकर आहेत. जर त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट सवय निर्माण होत असेल तर तुम्ही त्यांना प्रेमाने समजावून सांगावे. आपण (Chanakya Niti for Students) मुलांवर कधीही हात उचलू नये. चाणक्यांच्या मते लहान मुले ही कच्च्या मातीसारखी असतात. त्यांना दिशा देण्याचे पहिले काम हे पालकांचे असते. लहानपणापासूनच मुलाला चांगले संस्कार दिले जातात. पालकांनी सुरुवातीपासूनच जागरूक राहून आपले कर्तव्य बजावले, तरच मूल योग्य होईल. यासाठी मुलांच्या शिक्षणासोबतच त्यांना सुरुवातीपासूनच चांगले संस्कार देणे गरजेचे आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : जर कोणी अंतराळात गेला अन् त्याला ढेकर आला तर काय होईल?

GK Updates

करिअरनामा ऑनलाईन। कोणतीही स्पर्धा परीक्षा देताना तुमचे (GK Updates) सामान्य ज्ञान चांगले असणे गरजेचे आहे. तुमची IQ लेव्हल खूपचं चांगली आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हे प्रश्न एकदा नक्की पहा…

प्रश्न – जर कोणी अंतराळात (Space) गेला अन् त्याला जर ढेकर आला तर काय होईल ?

उत्तर – (GK Updates)

या प्रश्नाच्या उत्तरावर तुमचीही बोलती बंद होईल परंतु या प्रश्नाचं उत्तर खूप सोप्प आहे. तसं पाहिलं तर अंतराळात (Space) गुरुत्वाकर्षण नसतं, त्यामुळे अंतराळात ढेकर येऊच शकत नाहीत. कारण, गुरुत्वाकर्षण नसल्याने अंतराळात पोटातील गॅसपासून लिक्विड वेगळं होतं. त्यामुळे अंतराळात ढेकरचं येऊ शकत नाही.

प्रश्न – असा कोणता जीव आहे, जो एकावेळी 2 हजार फुग्यांएवढा श्वास घेतो अन् तेवढाच सोडतो ?

उत्तर – ब्लू व्हेल हा असा जीव आहे, जो एकावेळी दोन हजार फुग्यांएवढा श्वास घेतो आणि तेवढाच श्वास सोडतो.

प्रश्न – जगातला असा कोणता देश आहे, ज्याचा ध्वज आयाताकृती नाही अन् चौकोनीही नाही ?

उत्तर – जर तुमच्याकडे देश आणि जगाची माहिती असेल तर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर सहज देऊ शकता. जर उत्तर येत नसेल तर त्याच उत्तर ‘नेपाळ देश’ आहे ज्याचा ध्वज आयाताकृती नाही अन् चौकोनीही नाही. (GK Updates)

प्रश्न – आपल्या शरीराचा असा कोणता भाग आहे, जिथे रक्ताचा एक अंशही पोहचत नाही?

उत्तर – कॉर्निया (डोळ्याचा पारदर्शक भाग) हा आपल्या शरीरातील एकमेव भाग आहे जिथे रक्तपुरवठा होत नाही. हा एक अवयव आहे जो थेट हवेतून ऑक्सिजन घेतो.

प्रश्न – दात पाहून घोडा आहे की घोडी हे सांगता येईल का ?

उत्तर – हा प्रश्न ऐकून तुम्हाला तर घाम फुटू शकतो. परंतु हे खरे आहे, दात पाहून घोडा आहे की घोडी हे तुम्ही सांगू शकता. घोड्यामध्ये 40 दात आढळतात, तर घोडीमध्ये 36 दात आढळतात.

प्रश्न – इंग्रजीतला असा कोणता शब्द आहे, ज्या शब्दाची (GK Updates) शेवटची चार अक्षरे काढून टाकली तर त्याच्या उच्चारात काही फरक पडणार नाही ?

उत्तर – होय, इंग्रजीला तो शब्द आहे Queue. हा एकमेव शब्द आहे ज्या शब्दाची शेवटची चार अक्षरे काढून टाकल्यानंतर उच्चार सारखाच राहतो, विश्वास बसत नसेल तर तुम्ही उच्चार करून पहा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Twitter Elon Musk : Layoff नंतर ट्विटरने उघडली दारे; एलॉन मस्क यांनी केली ‘ही’ अजब घोषणा

Twitter Elon Musk

करिअरनामा ऑनलाईन। जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ति एलॉन मस्क यांनी (Twitter Elon Musk) ट्विटरची मालकी मिळविल्यानंतर जो काही गोंधळ घातला की, अनेकांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने ते बेरोजगार झाले. ट्विटरमध्ये तर काही जणांनी तर अवघ्या काही दिवसांची सेवा बजावली होती. पण मस्क यांनी बऱ्याच कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखव ला. त्याच मस्क यांनी आता ट्विटरचे दरवाजे पुन्हा उघडले आहेत..

तर मस्क यांच्या निर्णयामुळे ट्विटरमधील 7500 कर्मचाऱ्यांपैकी 2700 कर्मचारीच उरले. हा ताण असह्य होत असल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी एका मीटिंगमध्ये सामुहिक राजीनामे (Twitter Elon Musk) दिले. त्यामुळे मस्क यांचा पारा एकदम उतरला.

मस्क यांनी ट्विटरचा डोलारा सांभाळण्यासाठी कर्मचारी भरतीला हिरवा कंदिल दाखविला आहे. मस्क यांनी कंपनीत एंट्री केल्यापासून मोठ्या पदावरील अनेक दिग्गजांना फटका बसलेला असताना, आता मस्क यांनी कर्मचारी भरतीचा बिगूल वाजवला आहे.

मीडिया अहवालानुसार, सोमवारी मस्क यांनी ट्विटरच्या कर्मचाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. त्यानुसार इंजिनिअरिंग आणि मार्केटिंग पदासाठी कर्मचारी भरती केली जाणार आहे. सध्याच्या कर्मचाऱ्यांना या पदासाठी मित्रांच्या नावाची शिफारसही करता येणार आहे.

अजून भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली (Twitter Elon Musk) नाही. ट्विटरच्या संकेतस्थळावर या भरतीविषयीची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, कर्मचाऱ्यांमध्ये या भरतीची माहिती देण्यात आल्याचे वृत्त आहे.

मस्क हे ट्विटरचे मुख्य कार्यालय टेक्सासमध्ये सुरु करण्याची शक्यता आहे. यापूर्वी त्यांनी टेस्ला कंपनीच्या बाबतीत हाच निर्णय घेतला होता. त्यानंतर आता ट्विटरच्या कार्यालयाविषयी हा निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NCCS Recruitment 2022 : ग्रॅज्युएटसाठी ‘या’ नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्समध्ये भरती सुरु; असा करा Apply

NCCS Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे येथे (NCCS Recruitment 2022) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संशोधन सहयोगी, कनिष्ठ संशोधन फेलो, प्रकल्प सहयोगी ही पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे

भरली जाणारी पदे – 

संशोधन सहयोगी – 1 पद

कनिष्ठ संशोधन फेलो – 2 पदे

प्रकल्प सहयोगी – II – 2 पदे

प्रकल्प सहयोगी – I – 3 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 डिसेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NCCS Recruitment 2022)

१) संशोधन सहयोगी – I / Research Associate – I ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) पीएच.डी / एमडी / एमएस / एमडीएस / एमव्हीएस्सी / एम.फार्म / एमई / एम.टेक किंवा समकक्ष पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव

२) कनिष्ठ संशोधन फेलो / Junior Research Fellow ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) मूलभूत विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमात पदवी/पदव्युत्तर पदवी ०२) अनुभव असल्यास प्राधान्य

३) प्रकल्प सहयोगी – II / Project Associate – II ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून (NCCS Recruitment 2022) नैसर्गिक किंवा कृषी विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी / MVSc किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा औषध मध्ये बॅचलर पदवी किंवा समकक्ष ०२) ०२ वर्षे अनुभव

४) प्रकल्प सहयोगी – I / Project Associate – I ०३
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून नैसर्गिक किंवा कृषी विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी / MVSc किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा औषध मध्ये बॅचलर पदवी किंवा समकक्ष ०२) अनुभव असल्यास प्राधान्य

वय मर्यादा – अट : ०९ डिसेंबर २०२२ रोजी [SC/ST/PH – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन –

संशोधन सहयोगी – 47,000/- दरमहा

कनिष्ठ संशोधन फेलो- 31,000 ते 35,000/- दरमहा

प्रकल्प सहयोगी- 28,000/- दरमहा (NCCS Recruitment 2022)

प्रकल्प सहयोगी – 25000/- दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – THE DIRECTOR, NATIONAL CENTRE FOR CELL SCIENCE (NCCS), S. P. Pune University Campus, Post – Ganeshkhind, Pune – 411007, Maharashtra, India”.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.nccs.res.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Forest Recruitment 2022 : महाराष्ट्र वन विभाग भरतीचे वेळापत्रक जाहीर; पहा महत्वाच्या तारखा 

Forest Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही महाराष्ट्र वन विभागमध्ये भरतीची (Forest Recruitment 2022) तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र वन विभाग भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार या भरतीची जाहिरात २० डिसेंबर २०२२ पूर्वी प्रसिद्ध केली जाऊ शकते. अर्ज प्रक्रिया तेव्हापासून लगेच सुरु होईल. या भरतीसंदर्भातील शासन निर्णय सुद्धा प्रकाशित झाला असून या मध्ये उल्लेख केल्यानुसार ही भरती TCS आणि IBPS द्वारे घेण्यात येणार आहे. तसेच हि पदे लवकरात लवकर भरण्यात यावी असा सुद्धा उल्लेख या परिपत्रकात करण्यात आला आहे.

भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना सामान्य प्रशासन विभागाने दि. ४/५/२०२२ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित केलेल्या आहेत. आता सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय दिनांक २१/११/२०२२ अन्वये भुतपूर्व (Forest Recruitment 2022) दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याताना यापुढे स्पर्धा परिक्षा टि.सी.एस.- आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेक) व आय.बी.पी.एस. (इंस्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनीमार्फत ऑनलाईन पध्दतीने घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार ऑनलाईन पध्दतीने स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी यापैकी कोणत्याही एका कंपनीची आवश्यकतेनुसार निवड करावयाची आहे. तसेच सदर शासन निर्णयान्वये परीक्षा शुल्क, कंपनीशी करावयाचा सामंजस्य करार याबाबतच्या सुधारीत तरतुदी दिलेल्या आहेत.

त्यानुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २१/११/२०२२ च्या शासन निर्णयातील कार्यपध्दती / तरतुदी यांची तपासणी करुन भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड (Forest Recruitment 2022) संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याबाबत आवश्यक कार्यवाही करणेबाबत शासनाने संदर्भ ३ वरील पत्रान्वये सुचीत केले आहे.

उपरोक्त सुचनांचे अनुषंगाने कळविण्यात येते की, वनविभागातील सरळसेवेने भरती करावयाच्या पदांची यादी यासोबत जोडली आहे. सदर पदांपैकी ज्या संवर्गाची बिंदूनामावली मुख्य वनसंरक्षक (प्रा.) / वनसंरक्षक (प्रा.) किंवा त्यांचे अधिनस्त वनविभाग स्तरावर आहे त्या संवर्गाची भरती प्रक्रिया सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ४/५/२०२२ व दिनांक २१/११/२०२२ मधील सुचनांचे अनुषंगाने राबविणेकरीता खालीलप्रमाणे कालबध्द कार्यक्रम आखून देण्यात येत आहे.

उपरोक्त सुचनांचे अनुषंगाने कळविण्यात येते की, वनविभागातील सरळसेवेने भरती करावयाच्या पदांची यादी यासोबत जोडली आहे. सदर पदांपैकी ज्या संवर्गाची बिंदूनामावली मुख्य वनसंरक्षक (प्रा.) / वनसंरक्षक (प्रा.) किंवा त्यांचे अधिनस्त वनविभाग स्तरावर आहे त्या संवर्गाची भरती प्रक्रिया सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ४/५/२०२२ व दिनांक २१/११/२०२२ मधील सुचनांचे अनुषंगाने राबविणेकरीता खालीलप्रमाणे कालबध्द कार्यक्रम आखून देण्यात येत आहे.

गट-क मधील लिपीक-नि-टंकलेखक संवर्गाची भरती प्रक्रिया ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येणार असल्याने सदर पदाची भरती प्रक्रिया आपले स्तरावर राबविण्यात येवू नये. याबाबत यापूर्वी कळविल्याप्रमाणे मागणीपत्र तात्काळ या कार्यालयास सादर करावे.

पूर्वी पेसा क्षेत्रात वनरक्षकांची १००% पदे ही स्थानिक अनुसूचित जमातीकरीता राखीव होती. मा. राज्यपाल यांचेकडील अधिसूचना दि. २९/८/२०१९ अन्वये पेसा क्षेत्रातील पदे अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येनुसार १००%, ५०% व २५% याप्रमाणे राखीव करण्यात आली आहे. सदर अधिसूचना (Forest Recruitment 2022) वनविभागात कशाप्रकारे अंमलात आणावी याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे. त्यामुळे पेसा क्षेत्रातील वनरक्षक पदांबाबत वेगळ्याने सुचना निर्गमित करण्यात येतील. वनरक्षक भरती प्रक्रिया ही महसूल व वनविभाग शासन निर्णय दिनांक २८/८/२०१८ अन्वये ठरवून दिलेल्या कार्यपध्दतीनुसार राबवावयाची आहे. त्यानुसार बिगर पेसा क्षेत्रातील वनरक्षक भरतीकरीता वरीलप्रमाणे कालबध्द कार्यक्रम राबवून प्रक्रिया पूर्ण करावी.

दरम्यान 25 मार्च 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वनविभागाच्या 1762 जागा पहिल्या टप्प्यात भरण्याचे व उरलेल्या 1000 जागा दुसऱ्या टप्यात सप्टेंबर महिन्यात भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

image

काही महत्वाच्या लिंक्स –

फॉरेस्ट भरतीचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे CLICK करा – CLICK

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Recruitment 2022 : UPSC अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरू; काय आहे पात्रता?

UPSC Recruitment 2022 (1)

करिअरनामा ऑनलाईन। संघ लोक सेवा आयोग अंतर्गत रिक्त पदांच्या (UPSC Recruitment 2022) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक कृषी विपणन सल्लागार, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, स्पेशलिस्ट ग्रेड III, कनिष्ठ खाण भूवैज्ञानिक, सहाय्यक खाण भूवैज्ञानिक, रसायनशास्त्रज्ञ पदांच्या एकूण 43 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2022 आहे.

आयोग – संघ लोकसेवा आयोग

भरली जाणारी पदे –

सहायक कृषी विपणन सल्लागार

वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक

स्पेशलिस्ट ग्रेड III

कनिष्ठ खाण भूवैज्ञानिक

सहाय्यक खाण भूवैज्ञानिक

रसायनशास्त्रज्ञ

पद संख्या – 43 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचा.)

वय मर्यादा –(UPSC Recruitment 2022)

सहायक कृषी विपणन सल्लागार – 40 वर्षे

वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक – 30 वर्षे

स्पेशलिस्ट ग्रेड III – 40 वर्षे

कनिष्ठ खाण भूवैज्ञानिक – 35 वर्षे

सहाय्यक खाण भूवैज्ञानिक – 30 वर्षे

रसायनशास्त्रज्ञ – 35 वर्षे

अर्ज फी – Rs. 25/-

निवड प्रक्रिया – मुलाखत

भरतीचा तपशील –

सहायक कृषी विपणन सल्लागार – 05 पदे
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (एरोनॉटिकल) – 02 पदे
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल) – 01 पद
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स) – 02 पदे (UPSC Recruitment 2022)
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (केमिकल) – 03 पदे
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (संगणक) – 03 पदे
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (मेकॅनिकल – 02 पदे
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (मेटलर्जी) – 03 पदे
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (टेक्सटाईल) – 02 पदे
स्पेशलिस्ट ग्रेड III – 04 पदे
कनिष्ठ खाण भूवैज्ञानिक – 07 पदे
सहाय्यक खाण भूवैज्ञानिक – 06 पदे
रसायनशास्त्रज्ञ – 03 पदे

आवश्यक कागदपत्रे –

  1. Matriculation/10th Standard or equivalent certificate indicating date of birth, or mark sheet
  2. Degree/Diploma certificate as proof of educational qualification
  3. Caste certificate
  4. Certificate of Disability
  5. Experience Certificate

असा करा अर्ज –

  1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर सादर करावे.
  3. अर्जा सोबत आवश्यक (UPSC Recruitment 2022) कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  4. अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2022 आहे.

निवड प्रक्रिया –

  • या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Start Up Maharashtra : ‘चला उद्योजक होऊया’; उद्योजक होण्यासाठी मोफत प्रशिक्षण; असा घ्या लाभ

Start Up Maharashtra

करिअरनामा ऑनलाईन। सह्याद्री फार्म्स आणि टाटा स्ट्राईव्ह स्किल (Start Up Maharashtra) डेव्हलपमेंट सेंटर यांच्यातर्फे समुदाय उद्योजकता कार्यक्रम अंतर्गत ‘चला उद्योजक होऊया’ या उद्योजकता प्रशिक्षणाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी,नाशिक जिल्हा कौशल्य विकास केंद्र यांच्या सहकाऱ्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. व्यवसाय सुरु करु ईच्छिणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील युवक-युवतींनी या प्रशिक्षणासाठी संपर्क साधावा असे आवाहन ‘सह्याद्री फार्म्स’ यांच्याकडून करण्यात आले आहे.

सह्याद्री फार्म्स आणि टाटा स्ट्राईव्ह कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी तरुणांसाठी मागील तीन वर्षात 700 पेक्षा जास्त तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. मागील वर्षांपासून पासून ‘समुदाय उद्योजकता कार्यक्रम’ प्रकल्प टाटा कॅपिटलच्या सहकार्याने राबविण्याचे निश्‍चित झाले आणि आज तो प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील एकूण 61 नवद्योजकांना मोफत प्रशिक्षण आणि भांडवल उपलब्ध करून दिले आहे. 61 होतकरू उद्योजकांना टाटा कॅपिटल यांचेकडून 23.5 लक्ष भांडवल उपलब्ध करून दिले आहे.

समुदाय उद्योजकता कार्यक्रमाच्या’ माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांनी निवड प्रक्रियेत सहभागी होऊन आपला व्यवसाय आराखडा सादर (Start Up Maharashtra) करणे गरजेचे असते. त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे त्यांची निवड करून मग 10 दिवसांचे निवासी प्रशिक्षण दिले जाते. त्या प्रशिक्षणानंतर परत त्यांचे सादरीकरण पाहून त्यांना भांडवल उपलब्ध केले जाते.

जानेवारी 2021 ते 30 सप्टेंबर 2021 दरम्यान प्रशिक्षण घेतलेल्या 3 बॅचमधील एकूण 61 नवउद्योजक प्रशिक्षण घेऊन स्वतःच व्यवसाय सुरू केला आहे. कोरोनामुळे बऱ्याच तरुणांना आपली नोकरी गेल्यामुळे गावी परतावे लागले. अशा तरुणांना आपला स्वतःचा व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ग्रामीण भागातील तरुणांनी कुक्कुटपालन, शेळीपान, किराणा दुकान, गॅरेज, मत्स्यपालन, ब्युटीपार्लर अशा क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे, अशी माहिती सह्याद्री फार्मचे विलास शिंदे यांनी दिली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक – (Start Up Maharashtra)

8698411288 / 92846 51041

या लिंक वर अर्ज करा –

https://forms.gle/1qxq8bu5fPvFMwkT9

प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये –

1) स्थानिक व्यावसायिक संधी नुसार प्रशिक्षण

2) व्यवसायाला अनुरूप मार्गदर्शन

3) पात्र प्रशिक्षणार्थिना आर्थिक सहाय्य

4) व्यवसायातील तज्ञांकडून मार्गदर्शन

5) 10 दिवसांचे निवासी प्रशिक्षण

6) तंत्रज्ञान मार्गदर्शन

ग्रामीण भागातील तरुणांमध्ये उद्योजकता वाढावी या हेतूने या उपक्रमाची सुरुवात केली आहे. तरुणांमधील उद्योजकीय कौशल्यांना वाव मिळावा यासाठी हे प्रशिक्षण (Start Up Maharashtra) उपयुक्त ठरणार आहे. तरी जास्तीत जास्त तरुणांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहनही सह्याद्री फार्मचे विलास शिंदे यांनी केले आहे.

संपर्क पत्ता –

मोहाडी,तालुका – दिंडोरी,जिल्हा – नाशिक

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Tips : धोनीकडून शिका ‘या’ 5 गोष्टी…स्पर्धा परीक्षांची तयारी होईल सोप्पी!!

Success Tips

करिअरनामा ऑनलाईन। कॅप्टन कूल धोनी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी (Success Tips) करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच साम्य दिसून येतं. धोनीकडून सर्वांनीच शिकण्यासारखं बरंच काही आहे. परंतु त्यातल्या त्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय शिकायला हवं हे आज आपण या लेखातून जाणून घेवूया..

Success Tips

1. एकाग्रता (Concentration)

कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करताना एकाग्रता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो. धोनीकडून हि एकाग्रता शिकण्यासारखी आहे. एकदा मैदानावर उतरल्यावर क्रिकेट (Success Tips) व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच गोष्टींचा तो विचार करत नाही. एम. एस. धोनी या त्याच्यावर निघालेल्या बायोपीकमध्ये देखील आपण हे पहिले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतांना तुम्हाला आपल्या व्यक्तिगत जीवनातील गोष्टी बाजूला ठेवता आल्या पाहिजेत. अभ्यासाच्या वेळी फक्त अभ्यासच केला पाहिजे.

Success Tips

2. जबाबदारी स्वीकारा (Accept responsibility)

2011 चा विश्वचषक तुम्हाला लक्षात असेलच… विश्वचषकाच्या महत्त्वाच्या अंतिम सामन्यात धोनी वरच्या क्रमांकावर फलंदाजीला लवकर आला होता. धोनीला हे माहिती होते की, त्याच्याकडून छोटीशी जरी चूक झाली तर सामना हातातून जाऊ शकतो व त्याला सर्वांच्या टिकेला सामोरे जावे (Success Tips) लागते. पण, धोनीचा स्वतःवर आत्मविश्वास होता. त्यामुळेच भारताला 2011 चा विश्वचषक जिंकण्यात यश आले होते. यामुळे आत्मविश्वासाने नवीन जबादारी स्वीकारा. जीवनात आपण मोठे ध्येय साध्य करायच या उद्देशातून स्पर्धा परीक्षांकडे वळले आहोत तर साहजिकच जास्त कष्ट घेणे ही आपली अपरिहार्य जबाबदारीच आहे आणि त्यात आपण 100% योगदान देऊ, तेव्हाच यश तुमचे असेल.

Success Tips

3) दबावात चांगला परफॉर्मन्स देण्याची कला (Performs even better under pressure)

खरं तर जेव्हा खेळाडूंवर जास्त दबाव येतो, तेव्हा त्याचे स्वत:वरचे नियंत्रण सुटते आणि तो काही तरी चूक करतो. पण, धोनीचे या उलट होते. धोनीवर जितका अधिक दबाव तितका त्याचा खेळ अजून खुलून उठतो. यासाठीच धोनी जगप्रसिद्ध आहे. धोनीकडून आपण हे शिकायलाच हवं. ठराविक वेळेत आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात. यात सुरवातीला थोडी चूक झाली कि आपण पुढे संपूर्ण परीक्षेत चुका करत बसतो. हे प्रकर्षाने टाळणे आवश्यक आहे.

या सोबतच ऐन परीक्षेच्या वेळी कमी दिवसात Final Revision करणे ही बाब सारखीच नाही का? या वरच पुष्कळदा तुमचं यश अवलंबून असते हे विसरता कामा नये.

Success Tips

4) खचू नका (Don’t get tired) (Success Tips)

आज धोनीचे सर्वत्र कौतुक होत असेल पण त्याचा सुरवातीचा काळ असा नव्हता. भारतीय संघात आपले स्थान भक्कम करण्यासाठी सुरवातीच्या काळात त्याला फारच मेहनत घ्यावी लागली आहे. तसे पाहिले तर धोनीने अनेकवेळा पराभवाचा सामना केला आहे. पण, त्याने त्याच्या पराभवाचा स्वत:वर आणि संघाच्या कामगिरीवर प्रभाव पडू दिला नाही. आपल्या पराभवाचाही त्याने खंबीरतेने स्विकार केला आणि त्यातून नव्या गोष्टी शिकल्या असल्याचे आपण पहिले आहे. याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांमध्ये अनेकांना अपयश येत असते. पण या अपयशाने खचून न जाता अधिक जोमाने पुढील परीक्षेच्या तयारीला आपण लागले पाहिजे.

 

 

Success Tips

5) सर्वांचा सन्मान करा (Respect Everyone)

धोनी कायमच इतरांशी सन्मानाने वागत आलाय. इतकं प्रचंड यश मिळवल्यावरही धोनीच्या वागण्यात विनम्रता आहे. त्याच्या याच स्वभावामुळे सचिन तेंडुलकर, विरेंद्र (Success Tips) सेहवाग आणि युवराज सिंगसारखे दिग्गज खेळाडू त्याच्या नेतृत्वाखाली खेळू शकले. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतांना आपल्या सिनियर्स प्रमाणे ज्युनियर विद्यार्थ्यांशी देखील विनम्रतेनेच वागा. यश मिळाले तर लगेच हवेत न जाता पाय जमिनीवरच राहू द्या.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com