मोठी बातमी! राज्यात या तारखेपासून शाळा सुरु; सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर

मुंबई | राज्यात कोरोना आणि त्याच्या प्रादुर्भावाने धुमाकूळ घातला आहे. अशा परिस्थितीत सोमवारपासून ऑनलाइन शाळा सुरू केल्या जाणार आहेत. मात्र त्याला कडाडून विरोध सुरू होत असतानाच आज शालेय शिक्षण विभागाने शाळा जुलै महिन्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला असून यासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा असल्याचे सांगितले जात आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या नवीन निर्णयानुसार नववी, दहावी आणि बारावीची प्रत्यक्ष शाळा आणि त्यांचे वर्ग जुलै महिन्यापासून सुरू केले जाणार आहेत. सहावी ते आठवीचे वर्ग हे ऑगस्टपासून भरवले जाणार आहेत. मुख्य म्हणजे ज्या भागात कोरोनाचे रुग्ण नाहीत त्याच भागातील शाळा सुरू करण्यात येणार आहे.

काय आहेत मार्गदर्शक तत्त्व?

– शाळा सुरू करण्यापूर्वी एक महिना सदर गावात कोरोनाच्या एकही रुग्ण नसेल याची खात्री करून शाळा सुरू होणार

– जिथे महिनाभरात एकही रुग्ण आढळला नाही तिथले नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग १ जुलैपासून सुरू करण्याची तयारी

– सरसकट शाळा सुरू होणार नाहीत

– सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टपासून सुरू करण्याची तयारी

– पहिली ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरपासून सुरू करण्याची तयारी

– अकरावीचे वर्ग दहावीचा निकाल लागल्यानंतर आधी प्रवेश प्रक्रिया होणार.

ती पूर्ण झाल्यावर वर्ग सुरू करण्याची तयारी

– विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी एक दिवस आड वर्ग भरवण्याचीही मुभा

– शाळा सुरू करण्यापूर्वी त्यांनी सॅनिटायझेशन करणे बंधनकारक

– प्रत्येक बेंचवर एकच विद्यार्थी बसवण्याची अट

– शिक्षक विद्यार्थ्यांना मास्क घालण्याची अट

– शिक्षण विभागाचं हे वेळापत्रक संभाव्य स्वरुपाचं असून स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन त्याप्रमाणे शाळा सुरू करण्याचं नियोजन करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

शाळा सुरु करण्यासंदर्भातील वेळापत्रक

इयत्ता दिनांक

नववी, दहावी, बारावी जुलै २०२० पासून

सहावी ते आठवी ऑगस्ट २०२० पासून

पहिली ते पाचवी सप्टेंबर २०२० पासून

अकरावी दहावीच्या निकालावर आधारित अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com