औरंगाबाद विभागात आता दरवर्षी सैन्य भरती होणार – मेजर जनरल विजय पिंगळे
औरंगाबाद विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यासाठी दरवर्षी सैन्य भरती होणार आहे.त्यासाठी परभणी,जळगाव आणि औरंगाबाद हे केंद्र राहणार असुन प्रत्येक केंद्रावर दर तिन वर्षाला भरती होणार आहे. अशी माहिती भारतीय सैन्यदलातील मेजर जनरल विजय पिंगळे यांनी दिली. ते काल परभणी विद्यापीठांमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.