Home Blog Page 857

NIASM Recruitment 2020 | 19 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एबियोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.niam.res.in/

NIASM Recruitment 2020

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – यंग प्रोफेशनल -I, यंग प्रोफेशनल – II

पद संख्या – 19 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 21 – 45 वर्ष

नोकरी ठिकाण – पुणे.  NIASM Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://www.niam.res.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ECIL Recruitment 2020 | 65 जागांसाठी भरती

SFIO Recruitment 2020 |’सचिव’ पदासाठी भरती

महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत विविध पदांसाठी भरती

UPSC अंतर्गत सहाय्यक संचालक पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।संघ लोक सेवा आयोग अंतर्गत सहाय्यक संचालक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सहाय्यक संचालक

पद संख्या – 2 जागा

 पात्रता – Bachelor’s Degree

वयोमर्यादा – 56 वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2020

मूळ जाहिरातPDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री  आलोक कुमार दीक्षित, अवर सचिव (प्रशासक II), कक्ष क्र. 424 B, चतुर्थ मजला, आयुष स्वच्छतालय, युनियन पबली सर्व्हिस कमिशन, धौलपूर हाऊस, शाहजहां रोड, नवी दिल्ली – 110069

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ECIL Recruitment 2020 | 65 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर  2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.ecil.co.in/

ECIL Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

1) Technical Officer – 24 जागा 

पात्रता – Engineering Degree in Electronic & Communication / Electrical & Electronic / Electronic & Instrumentation

वयाची अट – 30 वर्ष

वेतन – 23,000 रुपये

2) Scientific Assistant – 13 जागा 

पात्रता -Diploma in Electronic & Communication / Electrical & Electronic / Electronic & Instrumentation

वयाची अट -25 वर्ष

वेतन – 19,865 रुपये

3) Junior Artisan – 28 जागा 

पात्रता – ITI in Electronic / Electrical / Computer / Instrumentation / Radio & TV / Electronic & Mechanical / Electronic System

वयाची अट -25 वर्ष

वेतन –  18,070 रुपये

नोकरीचे ठिकाण – मुंबई ,हैद्राबाद .  ECIL Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख2 नोव्हेंबर  2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.ecil.co.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Army Recruitment 2020 | पशु चिकित्सा कोअरमध्ये विविध पदांसाठी भरती

NSD Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती; १८ हजार रुपये पगार

HEMRL Pune Bharti 2020 | 46,000 पगार

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये ‘संशोधन सहाय्यक’ पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथे संशोधन सहाय्यक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.nlunagpur.ac.in/

MNLU Nagpur Bharti 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – संशोधन सहाय्यक

पद संख्या – 2 जागा

 पात्रता –  Postgraduate Degree in Law (LL.M.) or with Ph.D. in Law

वेतन – 50,000 रुपये

नोकरी ठिकाण – नागपूर.    MNLU Nagpur Bharti 2020

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 23 ऑक्टोबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.nlunagpur.ac.in/

मुलाखतीचा पत्ता – महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर, मोरज डिझाईन अँड डेकोरेटर्स (डीएनडी) इमारत, मिहान फ्लायओव्हरला लागून, ओआयएल डेपो जवळ, खापरी, वर्धा रोड, नागपूर – 441108

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

इंजिनिअरिंग कॉलेज 01 डिसेंबर पासून होणार सुरू, AICTE ने जारी केले वेळापत्रक

करिअरनामा । अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. वेळापत्रकानुसार प्रथम वर्षाचे अभ्यासक्रम एक डिसेंबरपासून सुरू होणार आहेत, तर ३० नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतील.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई)  शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी सदर सुधारित वेळापत्रक जारी केले आहे.

परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार इंजिनिअरिंग पदवी आणि पदविका प्रवेशांसाठीची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. त्यामुळे प्रथम वर्षांचे वर्ग १ डिसेंबरपासूनच सुरू होतील.


‘स्कॅम 1992’ – कहाणी, भारतीय अर्थव्यवस्थेला 5 हजार कोटींचा चुना लावणाऱ्या हर्षद मेहताची

करिअरनामा । प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांची स्कॅम १९९२ ही  वेबसिरीज सध्या खूप चर्चेत आहे. ही सत्यघटनेवर आधारित वेबसिरीज स्टॉक मार्केटचा अमिताभ बच्चन समजल्या जाणाऱ्या हर्षद मेहता याच्यावर आधारित आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा त्याचे नाव प्रकाशझोतात आले आहे. आपल्याकडच्या आलिशान कार मुळे, भरमसाठ संपत्तीमुळे आणि पंतप्रधानांवर लाच घेतल्याचा आरोप केल्यामुळे नेहमीच विशेष चर्चेत असणाऱ्या हर्षद मेहताला स्टॉक मार्केटचा बादशहा म्हंटले जायचे. हर्षद शांतीलाल मेहता  खऱ्या अर्थाने सर्वांच्या निदर्शनास आले ते १९९२ च्या स्कॅम घोटाळ्यानंतर होय. हा घोटाळा इतका मोठा होता की यानंतर शेअर मार्केटचे नियमन करण्यासाठी सेवी नावाची एक नियामक संस्था निर्माण करण्यात आली होती.

Harshad Mehta Scam- How one man deceived entire Dalal Street?

२९ जुलै १९५४ साली गुजरातच्या राजकोट मध्ये जन्मलेल्या हर्षद मेहता यांनी काही काळ छत्तीसगडच्या रायपूर मध्ये देखील व्यतीत केला. पण त्यानंतर ते आले त्यावेळी बॉम्बे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आताच्या मुंबई शहरात होय. बी.कॉम झाल्यानंतर त्याने एका विमा कंपनीत सेल्स मध्ये काम केले. पण फार काळ ते तिथे राहिले नाहीत त्यांनी नंतर एका ब्रोकरेज फर्म मध्ये नोकरी केली. या फर्मचे सर्वेसर्वा प्रसन्न परीजीवन दास यांना गुरु मानले आणि स्टॉक मार्केटचे छोटे छोटे हातखंडे शिकायला त्यांनी सुरुवात केली. १९८४ मध्ये स्वतःची कंपनी सुरु करत त्यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे सभासदत्व घेतले.  त्यानंतर मात्र हर्षद यांचे नाव सर्वत्र प्रसिद्ध झाले. जवळपास अनेक मासिकांमध्ये त्यांचे लेख येत होते. मोठमोठ्या लोकांना त्यांच्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.

हर्षद मेहता या नावाचे स्टॉक मार्केट कुतुहूल मोठ्या प्रमाणात वाढले त्याचे कारण म्हणजे ज्या कोणत्या शेअर मध्ये ते हात घालायचे त्या शेअरची किंमत मोठ्या प्रमाणात वाढायची. त्यामुळे त्यांना स्टॉक मार्केटमधला कोहिनुर देखील म्हंटले जायचे. तर काहीजण त्यांना पारसमणी म्हणायचे जो ज्या शेअर ला हात लावतो त्याचे सोने होऊन जाते. एसीसी चे शेअर हर्षद मेहता यांनी घेतले होते, तेव्हा त्याची किंमत २०० रु होती पण यानंतर त्याची किंमत ९ हजार च्या वर गेली. हर्षद असे काय करतो की  अचानक शेअर एवढे वाढतात हे सर्वांनाच जाणून घ्यायचे होते. त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियाच्या पत्रकार सुचेता दलाल यांनी या सगळ्या प्रकरणावरचा पडदा उघडत हर्षद मेहता यांचे सत्य जगासमोर आणले होते. आणि हे सत्य समोर आल्यावर भल्याभल्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. सुचेता यांनी देबाशिष बासू यांच्यासोबत मिळून द स्कॅम नावाचे एक पुस्तकही लिहिले होते.

Harshad Mehta securities scam to be made into a 10 webisode series - The Digital Hash - The Digital Hash

सुचेता बऱ्याच कालावधीपासून हर्षद यांच्या कामाचे सत्य शोधण्यात व्यस्त होत्या. पण १९९२ साली त्यांना यामध्ये यश आले. हर्षद बँकेकडून १५ दिवसांसाठी कर्ज घेतात आणि १५ दिवसांनी ते परत करतात असे त्यांना समजले. पण कोणतीच बँक १५ दिवसांसाठी कर्ज देत नाही. पण हर्षद यांनी सुरुवातीच्या काळात घेतलेल्या प्रशिक्षणाचा इथे फायदा होत होता. बँकांना जेव्हा रोख रकमेची गरज असते तेव्हा त्या सरकारी करार दुसऱ्या बँकांकडे गहाण  ठेवून पैसे काढत असतात. पण कराराची देवाणघेवाण न होता एका पावतीवर हे काम होत असते. आणि या कामासाठी मध्यस्थी असतात. आपल्या बँकिंग क्षेत्रातील ओळखीच्या मदतीने मेहता यांनी नेमकी हीच नस ओळखत  हा पैसा शेअर बाजारात लावत कोट्यावधी रुपयांचा नफा कमावला.

१९९२ साली देशाची अर्थव्यवस्था एका वेगळ्या वळणावर पोहोचली होती. खाजगीकरण आणि परदेशी गुंतवणूक यामध्ये वाढ होत होती. शेअर मार्केट मध्ये देखील वाढ होत होती. पर्यायाने हर्षद मेहता यांच्या प्रगतीतही  वाढ होत होती. पण अचानक शेअर मार्केट कोसळले आणि हर्षद मेहता यांचे सत्य समोर आले. शेअर मार्केट कोसळल्यामुळे मेहता बँकांचे पैसे परत करू शकले नाहीत. ही  घटना समोर येऊन याची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी झाल्यावर यावरच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती तयार करण्यात आली. सीबीआयने हर्षद सोबत त्यांचे दोन्ही भाऊ अश्विन आणि सुधीर यांनाही अटक केली. ७२ गुन्हे प्रकरणे आणि ६०० हुन अधिक दिवाणी प्रकरणे हर्षद यांच्या विरोधात दाखल करण्यात आले होते. याच वेळेला हर्षद यांनी एक पत्रकार परिषद बोलावून त्याने पंतप्रधान नरसिंह राव यांना एक कोटी रुपयांची लाच दिली असल्याचा खुलासा केला होता.

हर्षद यांना या प्रकरणात जामीन मिळाल्यावर त्यांनी पुन्हा त्यांचा व्यवसाय सुरु केला. हळूहळू अनेक प्रकरणांमधून त्यांची सुटका होत होती. पण २००१ साली त्यांना पुन्हा अटक झाली. ३१ डिसेंबर २००१ ला त्यांचा ह्रदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. आर बी आय यांच्या एका अहवालानुसार १९९२ चा हा घोटाळा ४ हजार २५ कोटी रुपयांचा होता. हर्षद मेहता यांना नेहमीच आपणच या मार्केटचे राजा आहोत असे वाटत आले मात्र वेळेने त्यांचा हा भ्रम दूर केला. पैशाच्या अति लालसेपायी मेहता यांनी सर्व सीमा पार केल्या. ते कोर्टात सुनावणीसाठी जायचे तेव्हा लोक त्यांच्या पक्षात घोषणा देत गर्दी करत असत. या सर्व प्रकरणाचा आपल्या लेखणीने  पर्दाफाश  करणाऱ्या सुचेता यांना २००६ साली पदमश्री देण्यात आला होता.

Harshad Mehta, Family, Son, Wife photos, wiki and biography | F - Newshub

 

नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, दिवाळीपूर्वी सरकार जाहीर करणार नवीन योजना

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासमवेत अर्थ राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूरही कोरोना विषाणूच्या साथीने पीडित अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते म्हणाले आहेत की, केंद्र सरकार अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यास तयार आहे. खाजगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांनाही लवकरच LTC (Leave Travel Allowances) लाभाविषयीचे चित्र स्पष्ट केले जाईल, असे संकेत दिले. नुकत्याच जाहीर झालेल्या प्रोत्साहन (Stimulus) विषयी ते म्हणाले की, वंचित आणि गरीब वर्गाला आवश्यक ती मदत करणे हा सरकारचा मानस आहे. हे पॅकेज सरकारी कर्मचार्‍यांसाठी जाहीर केले गेले असले तरी हे खर्च काही वस्तूंवर होणार आहेत, ज्याचा थेट फायदा छोट्या उद्योगांना होईल.

खासगी क्षेत्रासाठीच्या LTA वरचे चित्र केव्हा स्पष्ट होईल?
खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांना LTA चा लाभ देण्याबाबत ते म्हणाले की, ज्यांनी नवीन टॅक्स सिस्टमचा अवलंब केला आहे किंवा ज्यांनी आधीच LTA चा लाभ घेतला आहे अशा कर्मचार्‍यांना लवकरच याबाबत स्पष्टीकरण दिले जाईल. याविषयीचे स्पष्टीकरण येत्या आठवड्यातही सुरूच राहू शकेल.

80 कोटी लोकांना मोफत धान्य देणारा एकमेव देश
इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अनुराग ठाकूर यांनी प्रोत्साहन पॅकेज आणि अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामाबद्दल सांगितले की, आपल्याला मोठे चित्र पहाण्याची गरज आहे. टीका स्वाभाविकच होईल. भारत हा एकमेव असा देश आहे जिथे 8 महिन्यांसाठी 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात आले. त्याशिवाय 68,000 कोटी रुपये गरीब वर्गाच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. त्याशिवाय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठीही अनेक पावले उचलली गेली आहेत.

ग्रामीण अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत
ग्रामीण अर्थव्यवस्थेबद्दल ठाकूर यांनी या मुलाखतीत सांगितले की, ग्रामीण अर्थव्यवस्थेची स्थिती जास्त चांगली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेत फक्त मनरेगा किंवा शेती हा विषय नाही आहे. येथे इथे पायाभूत सुविधा पातळीवर काम केले जात आहे, यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. ग्रामीण भागात ट्रॅक्टर, मोटारसायकल, चारचाकी वाहने व घरांची मागणी वाढत आहे. आता लोकांनी यावर खर्च करण्यास सुरवात केली आहे.

 

Mumbai Central Railway Bharti 2020। 52,000 रुपये पगार; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । मध्य रेल्वे मुंबई येथे इंटिव्हिव्हिस्ट पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. Mumbai Central Railway Bharti 2020 पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – cr.indianrailways.gov.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – इंटिव्हिव्हिस्ट

पद संख्या – 1 जागा

 पात्रता – Post Graduate Degree in Pulmonary Medicine

वयाची अट – 30 ते 64 वर्ष

वेतन – 52,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – मुंबई Mumbai Central Railway Bharti 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – cr.indianrailways.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय संचालक कार्यालय, डॉ बी.ए.एम. हॉस्पिटल, मध्य रेल्वे, भायखळा, मुंबई – 27

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी भरती

Indian Army Recruitment 2020 | पशु चिकित्सा कोअरमध्ये विविध पदांसाठी भरती

Palghar NHM Bharti 2020 | 121 जागांसाठी भरती

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विभागांतर्गत विधी अधिकारी पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विभागांतर्गत विधी अधिकारी (Law Officer Job) पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://pcpc.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – विधी अधिकारी (Law Officer)

पदसंख्या – 2 जागा

पात्रता –

उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असने आवश्यक.

विधी अधिकारी पदासाठी वकिली व्यवसायचा किमान 5 वर्ष अनुभव आवश्यक राहील.

वयाची अट – 40 वर्षा पेक्षा जास्त नसावे Law Officer Job

वेतन -20,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड, पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://pcpc.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस आयुक्त,पिंपरी चिंचवड पुणे -411011 Law Officer Job

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

बी.एड. सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष परीक्षेचा पर्याय

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षांतर्गत २१ ते २३ ऑक्टोबरला परीक्षा होणार आहे.याच दरम्यान राज्यातील कृषी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षाही सुरु आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र,अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाद्वारे विशेष परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. त्यामुळे बी.एड. सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांचे कुठलेही नुकसान होणार नसून त्यांना विशेष परीक्षेमध्ये त्या दिवसाचा पेपर देता येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयानंतर राज्यातील सर्व विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षांचे आयोजन केले आहे.२१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान बी.एड. सीईटी परीक्षा होणार आहे. या ऑनलाईन परीक्षेसाठी सकाळी १० व दुपारी २ वाजता अशा दोन सत्रामध्ये परीक्षा होणार आहे.याच दरम्यान पदव्युत्तर व पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाच्या परीक्षा आहेत.

बी.एड. सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी हे पदवी अंतिम वर्षाचे असतात,तर काही विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला असतानाही बी.एड. सीईटी देत असतात, मात्र अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाद्वारे विशेष परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.त्यामुळे बी.एड. सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना ओळखपत्र दाखून विशेष परीक्षेसाठी आपल्या महाविद्यालयाकडे अर्ज करता येईल. काही विद्यापीठामध्ये या विद्यार्थ्यांची ऑनलाईन तर काही विद्यापीठामध्ये ऑफलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे कुठलेही नुकसान होणार नसून त्यांनी गोंधळून जाऊ नये, असे नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्याकंन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com