Home Blog Page 344

GK Updates : चंद्राचा किती % भाग आपणास दिसू शकत नाही? मुलाखतीत विचारले जाणारे 7 प्रश्न

GK Updates 17 Mar

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षा ही सर्वात अनिश्चित परीक्षा (GK Updates) मानली जाते. या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याची कल्पना करणे कठीणच. UPSCची परीक्षा प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते. मुलाखतीत व्यक्तिमत्व चाचणी संदर्भातील प्रश्न विचारले जातात. मुलाखतीत चांगली कामगिरी केल्यास निवड होण्याची शक्यता जास्त असते. आम्ही तुम्हाला MPSC, UPSC तसेच कोणत्याही सरकारी भरतीच्या मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते; आणि तुमच्या ज्ञानात भर पडू शकते. चला तर मग पाहूया असे काही प्रश्न आणि त्याची उत्तरे…

प्रश्न 1 : जपान या देशाच्या संसद गृहास काय म्हणतात?
उत्तर : डायट

प्रश्न 2 : विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला असतो?
उत्तर : राज्यपाल (GK Updates)

प्रश्न 3 : चुंबकीय वेधशाळा कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर : अलिबाग (रायगड)

प्रश्न 4 : चंद्राचा किती % भाग आपणास दिसू शकत नाही?
उत्तर : ४१% (GK Updates)

प्रश्न 5 : नागार्जुन सागर धारण प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
उत्तर : कृष्णा नदी

प्रश्न 6 : (GK Updates) भारतीय रेल्वेचा डबे निर्मिती कारखाना कुठे आहे?
उत्तर : पेराम्बूर

प्रश्न 7 : भारताचा सर्वात मोठा नोटांचा छापखाना कोठे आहे?
उत्तर : इंडिया सेक्युरिटी प्रेस, नाशिक (GK Updates)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

B.Ed. College Audit : बी. एड. कॉलेजेसचे बिंग फुटणार; उच्च शिक्षण संचालनायाच्या सूचनेनुसार होणार ऑडिट

B.Ed. College Audit

करिअरनामा ऑनलाईन । उच्च शिक्षण संचालनालयामार्फत (B.Ed. College Audit) राज्यभरातील सर्व शिक्षणशास्त्र महाविद्यालयांची (बीएड) तपासणी करण्याची सूचना विद्यापीठांना देण्यात आली आहे. या सूचनेनुसार विद्यापीठांना संलग्न बीएड महाविद्यालयांचे अॅकॅडमिक अँड अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑडिट करून त्याचा अहवाल उच्च शिक्षण संचालनालयाला सादर करावा लागणार आहे. या रिपोर्टमुळे शिक्षणशास्त्र महाविद्यालयांमधील अनेक असुविधांचे पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे.

राज्यातील अनेक शिक्षणशास्त्र महाविद्यालये सुविधांपासून वंचित असून, बहुतांश महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकनही केलेले नाही. सातत्याने सूचना देऊनही नॅकबाबत ही महाविद्यालये उदासीन असून, आता खुद्द शिक्षण संचालनालयानेच त्यांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. याबाबत राज्यातील (B.Ed. College Audit) सर्व विद्यापीठांना शिक्षणशास्त्र महाविद्यालयांचे अॅकॅडमिक अँड अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑडिट करण्याची सूचना शिक्षण संचालनालयाने दिली आहे. ही तपासणी महाविद्यालयांच्या शैक्षणिक तसेच व्यवस्थापकीय गोष्टींशी निगडीत असल्यामुळे या तपासणीअंती अनेक शिक्षणशास्त्र महाविद्यालयांची पोलखोल होणार आहे.

‘या’ महाविद्यालयांचा समावेश (B.Ed. College Audit)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत या तपासणीसाठी शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना २० मार्चपर्यंत महाविद्यालयांबाबतची माहिती ऑनलाइन भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर विद्यापीठ एका कमिटीच्या माध्यमातून ही तपासणी करणार आहेत. नाशिक जिल्ह्यात (B.Ed. College Audit) जवळपास २० शिक्षणशास्त्र महाविद्यालये असून, त्यांना या तपासणीला सामोरे जावे लागणार आहे. नियमाप्रमाणे भरती किंवा सुविधा नसल्यास संबंधित महाविद्यालयाची संलग्नता काढून घेण्याचा अधिकार विद्यापीठाला आहे. महाविद्यालय विकास अनुदान न देण्याचा निर्णयही विद्यापीठाच्या हातात आहे.

शारीरिक शिक्षणाच्या कॉलेजांची होणार तपासणी

विद्यापीठाने संलग्नता नाकारल्यास त्याचा परिणाम पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेवर होणार असून, संलग्नतेआभावी महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रिया राबविता येणार (B.Ed. College Audit) नाही. परिणामी, या तपासणीनंतर त्रुटी आढळल्यास अनेक महाविद्यालयांना तातडीने त्याची पूर्तता करावी लागणार आहे. शिक्षणशास्त्र महाविद्यालयांप्रमाणे शारीरिक शिक्षणाच्या महाविद्यालयांचीही विद्यापीठामार्फत तपासणी केली जाणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : कोणत्याही कोचिंगशिवाय देशातील सर्वात मोठ्या परीक्षेत केलं टॉप; अशी होती इशिताची अभ्यासाची रणनिती

UPSC Success Story of IAS Ishita Rathi

करिअरनामा ऑनलाईन । इशिता राठी या तरुणीने जून 2022 मध्ये (UPSC Success Story) जाहीर झालेल्या UPSC परिक्षेच्या निकालात  संपूर्ण भारतातून 8 वा क्रमांक मिळवला आहे. इशिताने कोणत्याही विषयासाठी कोचिंग क्लास न लावता केवळ सेल्फ स्टडीवर भर देवून परीक्षेमध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे. अभ्यास करण्यासाठी इशिताने कोणती रणनिती अवलंबली आहे; याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

UPSC Success Story of IAS Ishita Rathi

वडील हेड कॉन्स्टेबल अन् आई ASI

इशिताचे कुटुंब दिल्लीतील छतरपूर गावात राहते. इशिताचे वडील दिल्ली पोलिसात हेड कॉन्स्टेबल असून तिची आई एएसआय आहे. आई-वडिलांचे कार्य पाहून (UPSC Success Story) तिने देशसेवेचे स्वप्न पाहिले आणि UPSC परीक्षा देवून देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. या दृष्टीने इशिताचे प्रयत्न सुरु झाले.  UPSC ची परीक्षा देत असताना अवघ्या तिसऱ्या प्रयत्नातच इशिता पास झाली आणि तिने संपूर्ण भारतातून 8 वी रॅंक मिळवली. “मला इतक्या चांगल्या रँकची अपेक्षा नव्हती. मी फायनलमध्ये पोहोचेन की नाही याची मला खात्री नव्हती पण मी ते केले आणि हे माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे;” असं इशिता सांगते.

UPSC Success Story of IAS Ishita Rathi

अर्थशास्त्रात केले PG (UPSC Success Story)

इशिताने मद्रास स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. अभासाच्या तयारीबद्दल बोलताना ती म्हणते की, “मी या परीक्षेसाठी (UPSC Success Story) कोणतेही कोचिंग घेतले नाही. पण माझ्या अर्थशास्त्र या ऐच्छिक विषयासाठी मी मेंटॉरिंग घेतले आहे. सध्या अभ्यासासाठी बरेच विनामूल्य साहित्य उपलब्ध आहे ज्याची मदत घेऊन विद्यार्थी परीक्षेची तयारी करू शकतात.”

UPSC Success Story of IAS Ishita Rathi

अशी होती अभ्यासाची रणनिती

UPSC परीक्षेची तयारी सुरू करण्यापूर्वी इशिताने संपूर्ण अभ्यासक्रमाची माहिती घेतली होती. सेल्फ स्टडीवर अधिक भर दिला. ती स्वतः तयारी करू शकते हे लक्षात आल्यावर तिने त्यानुसार अभ्यासाचे नियोजन केले. इशिताची अभ्यासाची रणनिती कशी होती याबद्दल विचारले (UPSC Success Story) असता ती सांगते; “मी मागील वर्षांतील टॉपर्स उमेदवारांचे ऐकून अभ्यासाचे नियोजन केले. भूगोल आणि राजकारण यासारख्या काही विषयांसाठी NCERT पुस्तके वाचली.  वर्तमानपत्रे आणि चालू घडामोडी वाचनावर भर दिला. मी राजकारणासाठी लक्ष्मीकांत आणि इतिहासासाठी स्पेक्ट्रमसह लोकप्रिय UPSC तयारी पुस्तकांचीही मदत घेतली.”

UPSC Success Story of IAS Ishita Rathi

उमेदवारांनी वेळेवर तयारी करण्याचा दिला सल्ला

या परीक्षेत इशिता दोनदा नापास झाल्यानंतर, मात्र तिसऱ्या प्रयत्नात तिला यश मिळाले. तिला स्वतःला खात्री नव्हती की ती इतकी चांगली रँक मिळवेल. IAS इशिता राठीने UPSC परीक्षेत 2021 मध्ये 8वी रँक मिळवली. UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या इच्छूकांसाठी ती म्हणते; “ही एक अशी (UPSC Success Story) परीक्षा आहे जिथे उमेदवारांना सर्व विषयांची माहिती असणे आवश्यक आहे तसेच वेळेवर तयारी करणे आवश्यक आहे. आत्मविश्वासाने आणि सकारात्मक विचाराने तयारी करणे ही यशाची गुरुकिल्ली आहे.” इशिता राठी तिच्या यशाचे श्रेय तिच्या आई-वडील आणि मित्रांना देते. त्यांच्या पाठबळामुळेच ती इथपर्यंत पोहोचू शकली असे ती म्हणते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

HSC SSC Board Results : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका; 10 वी/12 वीच्या 75 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून; निकाल लांबणार?

HSC SSC Board Results (1)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या (HSC SSC Board Results) मान्य करण्यासाठी संप पुकारून सामान्य जनतेला वेठीस धरले आहे. आज संपाचा सलग चौथा दिवस आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचारी मंगळवारपासून संपावर आहेत. एकीकडे रुग्णालयांमध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे अतोनात हाल होत आहेत तर दुसरीकडे संप कायम राहिल्यास दहावी बारावी बोर्डाचा निकाल लांबण्याची शक्यता आहे. दहावी बारावी परीक्षेच्या 75 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत 30 लाख उत्तर पत्रिका तपासणी विना पडून राहतील. त्यामुळे निकाल आठवडाभराहून अधिक लांबण्याची शक्यता आहे, अशी माहिती बोर्डाच्या सूत्रांनी दिली आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघटनांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. त्यामुळे आता दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर संकट ओढवले आहे. या (HSC SSC Board Results) संप काळात उत्तरपत्रिका न तपासण्याचा शिक्षक संघटनांनी पवित्रा घेतला आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षा संपत आल्या आहेत. तर दहावी बोर्ड परीक्षेचे आणखी तीन पेपर बाकी आहेत. आणखी आठवडाभर हा संप सुरु राहिल्यास दहावी बोर्ड परीक्षेच्या 30 लाख उत्तर पत्रिका तपासणी विना पडून राहणार आहेत. परीक्षेचा निकाल वेळेत जाहीर व्हावा, या दृष्टिकोनातून संपासंदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे.

निकाल किती दिवस लांबणार? (HSC SSC Board Results)

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी संप सुरु झाल्यानंतर गणित भाग 2, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2, सामाजिक शास्त्र पेपर 1, सामाजिक शास्त्र पेपर 2 या पाच विषयांचे पेपर बाकी होते. त्यामुळे आता या परीक्षा झाल्यानंतर या उत्तरपत्रिका तपासणी विना पडून राहणार आहेत. दरवर्षीच्या नियोजनाप्रमाणे बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात (HSC SSC Board Results) आणि दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल हा जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणे अपेक्षित असतं मात्र जर असाच संप सुरु राहिला तर या निकालामध्ये एक आठवड्याचा विलंब होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

केवळ बारावीच्या परीक्षाविषयक काम करण्याचा शिक्षक संघटनेचा निर्णय

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी तसेच अकरावीच्या परीक्षा, मूल्यमापन, अध्यापन करणार नसल्याची भूमिका स्पष्ट करत जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी (HSC SSC Board Results) राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या 14 मार्चपासून सुरु होणाऱ्या संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे शिक्षक केवळ बारावीच्या परीक्षा विषयक कार्य करतील आणि इतर कोणतेही कार्य करणार नाहीत. महाविद्यालयाची कोणतीही कामं करणार नाहीत, हे महासंघाने स्पष्ट केलं आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Agniveer Recruitment 2023 : 12 वी पास असणाऱ्यांसाठी Indian Air Force मध्ये भरती सुरु; मे महिन्यात होणार परीक्षा

Agniveer Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । ज्या उमेदवारांना भारतीय संरक्षण दलात भरती (Agniveer Recruitment 2023) होण्याची इच्छा आहे अशा उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. भारतीय हवाई दलाने ‘अग्निवीर वायू’ भरतीसाठी नवीन अधिसूचना जरी केली आहे. या प्रक्रियेत 20 मे 2023 रोजी अग्निवीर वायू भरती परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे. अविवाहित तरुण आणि तरुणी या भरतीसाठी पात्र असतील. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.

संस्था – भारतीय हवाई दल (Indian Air Force)

भरले जाणारे पद – ‘अग्निवीर वायु’

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Intermidiate/10+2/ Equivalent

वय मर्यादा – 21 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Agniveer Recruitment 2023)

(a) Science Subjects
Candidates should have passed the Intermediate/10+2/ Equivalent examination with Mathematics, Physics and English from an Education Board listed as COBSE member with minimum 50% marks in aggregate and 50% marks in English.

OR

Passed Three years Diploma Course in Engineering (Mechanical Electrical Electronics / Automobile Computer Science Instrumentation Technology Information Technology) from a Government recognized Polytechnic institute with 50% marks in aggregate and 50% marks in English in diploma course (or in intermediate / Matriculation, English is not a subject in Diploma Course) OR (Agniveer Recruitment 2023)

Passed Two years Vocational course with non-vocational subject viz. Physics and Mathematics tom State Education Boards Councils which are listed in COBSE with 50% marks in aggregate and 50% marks in English in vocational course (or in intermediate Matriculation. If English is not a subject in vocational course)

(b) Other than Science Subjects

Passed Intermediate / 10-2 Equivalent Examination in any subjects approved by Central State Education Boards listed as COBSE member with minimum 50% marks in aggregate and 50% marks in English OR

Passed two years’ vocational course from (Agniveer Recruitment 2023) Education Boards listed as COBSE member with minimum 50% marks in aggregate and 50% marks in English in vocational course or in intermediate / Matriculation English is not a subject in Vocational Course

भरती संदर्भात महत्वाचे –

  1. अग्निपथ योजनेअंतर्गत तरुणांना हवाई दलात अर्ज करण्याची संधी दिली जाईल.
  2. या योजनेंतर्गत तरुणांना चार वर्षे हवाई दलात सेवेची संधी मिळणार आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर उमेदवारांना मोठी रक्कम दिली जाईल. याशिवाय त्यांना अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. (Agniveer Recruitment 2023)
  3. अग्निवीरांना दरवर्षी सेवेदरम्यान 30 दिवसांची रजाही दिली जाईल.
  4. तसेच त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार आजारी रजा दिली जाईल.

पात्रता निकष –

  1. तुम्हाला बारावीमध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजीमध्ये किमान 50% गुण असावेत.
  2. इंजिनीअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.

मिळणारे वेतन –

  1. अधिसूचनेनुसार सेवेच्या पहिल्या वर्षी 30 हजार रुपये पगार आणि भत्ते दिले जातील.
  2. दुसऱ्या वर्षी 33 हजार रुपये पगार आणि भत्ते दिले जातील.
  3. तिसऱ्या वर्षी 36,500 रुपये पगार आणि भत्ते आणि दिले जातील. (Agniveer Recruitment 2023)
  4. चौथ्या वर्षी 40 हजार रुपये पगार आणि भत्ते दिले जातील.
  5. चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांना सेवा निधी पॅकेज, अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र आणि इयत्ता बारावी समकक्ष पात्रता प्रमाणपत्र देखील मिळेल.
  6. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना चार वर्षांनंतर बारावी समकक्ष प्रमाणपत्र देखील मिळेल.

Indian Air Force Agniveer Bharti 2022

असा करा अर्ज –

  1. अग्निवीर वायु भरतीसाठी केवळ ऑनलाइन नोंदणीकृत अर्ज स्वीकारले जातील.
  2. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे. (Agniveer Recruitment 2023)
  3. उमेदवारांना प्रथम साइन इन करावे लागेल. साइन अप केल्यानंतर तुम्हाला लॉगिन आणि पासवर्ड मिळेल.
  4. तुम्हाला लॉगिन-पासवर्डद्वारे अर्ज भरावा लागेल.
  5. शेवटी अर्जाची फी भरून फॉर्म सबमिट करा.
  6. अर्जाची फी 250 रुपये आहे आणि ती डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंगद्वारे भरली जाऊ शकते.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.

निवड प्रक्रिया –

  1. Online Test
  2. Physical Fitness Test (PET)
  3. Adaptability Test-I and Test-II
  4. Document Verification
  5. Medical Examination

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – indianairforce.nic.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Maharashtra Police Bharti : राज्यात प्रथमच तृतीय पंथीयांची पोलीस भरती साताऱ्यात; 3 उमेदवारांनी दिली मैदानी चाचणी

Maharashtra Police Bharti (1)

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारच्यावतीने संपूर्ण राज्यभर (Maharashtra Police Bharti) पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी हजारो तरुण-तरुणींनी उत्साह दाखवला आहे. विशेष म्हणजे या वर्षीपासून प्रथमच तृतीयपंथीयांना पोलीस भरती प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे. या भरतीसाठी राज्यभरातून 73 तृतीयपंथीयांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यानुसार साताऱ्यात तृतीयपंथीयांची आज पहिली पोलीस भरती पार पडली असून यामध्ये आर्या पुजारी, भूषण शिंदे आणि सतीश पाटील यांची मैदानी चाचणी घेण्यात आली.

सातारा जिल्ह्यात पार पडत असलेल्या पोलीस भरतीसाठी तृतीयपंथीयांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानुसार तीन तृतीय पंथीयांची मैदानी चाचणी घेण्यात आली. साताऱ्याच्या (Maharashtra Police Bharti) आर्या पुजारी यांनी पोलीस भरतीमध्ये तृतीयपंथीयांसाठी जागा उपलब्ध करावी यासाठी न्यायालयीन लढा दिला होता. त्याला यश मिळाले आहे.

अशी झाली मैदानी चाचणी – (Maharashtra Police Bharti)

साताऱ्यात या तीन जणांच्या भरतीसाठी 70 हून अधिक पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. यादरम्यान 100 मीटर धावणे, 800 मीटर धावणे, गोळा फेक अशी मैदानी चाचणी (Maharashtra Police Bharti) या तीन तृतीय पंथीय उमेदवारांची घेण्यात आली. या मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षा होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी दिली आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CRPF Recruitment 2023 : 10 वी पास उमेदवारांना नोकरीची लॉटरी; CRPF मध्ये तब्बल 9212 जागांवर होणार बंपर भरती

CRPF Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत रिक्त (CRPF Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हवालदार पदांच्या एकूण 9212 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 27 मार्च 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2023 आहे.

संस्था – केंद्रीय राखीव पोलीस दल

भरले जाणारे पद – कॉन्स्टेबल

1. Constable (Male) 9105 Posts
2. Constable (Female) 107 Posts

पद संख्या – 9212 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 27 मार्च 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल 2023 (CRPF Recruitment 2023)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –  उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा – 18 ते 27 वर्षे

अर्ज फी – रु. 100/-

Gen/ OBC/ EWS Rs. 100/-

SC/ ST/ ESM/ Female Rs. 0/-

काही महत्वाच्या तारखा – (CRPF Recruitment 2023)

CRPF Bharti 2023

मिळणारे वेतन – Rs. 21,700/- ते 69,100/- (Level-3) दरमहा

असा करा अर्ज –

  1. सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे.
  3. तपशीलवार सूचना CRPF वेबसाइट http://www.crpf.gov.in वर उपलब्ध असेल.
  4. ऑनलाईन अर्जाची लिंक २७ मार्च २०२३ पासून सुरु होणार आहे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२३ आहे.

आवश्यक कागदपत्रे –

1) आधार कार्ड (Aadhar card
2) जातीचा दाखला (Caste certificate)
3) फोटो,सही
4) ईमेल आयडी, मोबाईल नंबर
5) 10 वी मार्कशीट (CRPF Recruitment 2023)

निवड प्रक्रिया –

  1. Computer Based Test
  2. Skill Test (Skill Test will be conducted in English and Hindi only)
  3. Physical Standard Test
  4. Documents verification (CRPF Recruitment 2023)
  5. Medical Test.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.crpf.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : असा कोणता देश आहे जिथं मुलीचं लग्न झाल्यावर सरकारी नोकरी मिळते? UPSC मुलाखतीतील लक्षवेधी प्रश्न

GK Updates 16 Mar

करिअरनामा ऑनलाईन । यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये यश (GK Updates) मिळविण्यासाठी तुम्हाला देश आणि जगाविषयी माहिती असणं आवश्यक आहे. मुलाखतीत तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो. यासाठी उमेदवारांनी मानसिक तयारी करणं अत्यंत गरजेचं आहे. जे उमेदवार मुलाखतीत अधिक आत्मविश्वासानं उत्तर देतात, त्यांना अपेक्षित यश मिळतं. अनेकदा असे प्रश्नही मुलाखतीत विचारले जातात, जे ऐकून उमेदवार आश्चर्यचकित होतात. आज आपण अशाच काही प्रश्नांची माहिती आणि त्यांची उत्तरं जाणून घेणार आहोत.

1. कोणत्या देशात सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे फ्री आहे?

उत्तर- लक्झमबर्ग

2. असं कोणतं दुकान आहे की जिथं ग्राहक पैसेही देतो आणि स्वत:ची वस्तूही देतो?

उत्तर- सलून

3. कोणत्या देशात एकही नदी नाही?

उत्तर- सौदी अरेबिया (GK Updates)

4. असा कोणता देश आहे जिथं मुलीचं लग्न झाल्यावर सरकारी नोकरी मिळते?

उत्तर- (GK Updates) आइसलँड

5. कोणत्या प्राण्याचं रक्त निळं असतं?

उत्तर- गोगलगाय, कोळी आणि ऑक्टोपस

6. अशी कोणती गोष्ट आहे की जी खाण्यासाठी खरेदी केली जाते पण ती खाता येत नाही?

उत्तर- जेवणाची भांडी

7. माणूस 8 दिवस झोपल्याशिवाय जिवंत राहू शकतो का?

उत्तर- होय, कोणतीही व्यक्ती रात्री झोपू शकते आणि 8 दिवस जिवंत राहू शकते.

8. पृथ्वीवरील कोणत्या देशात एकही रेल्वे ट्रॅक नाही? (GK Updates)

उत्तर- भूतान, सायप्रस, आइसलँड इत्यादी असे देश आहेत की जिथं एकही रेल्वे ट्रॅक नाही.

9. ताजमहालची निर्मिती मुमताजच्या मृत्यू आधी झाली की नंतर?

उत्तर- मुमताज यांचं निधन बुरहानपूर येथे 17 जून 1631 रोजी झालं होतं. त्यानंतर ताजमहालची निर्मिती झाली ज्याचं काम 1634 साली पूर्ण झालं.

10. (GK Updates) एका माणसाला फाशीची शिक्षा झाली. त्याला तीन खोल्या दाखविण्यात आल्या. पहिल्या खोलीत आग लागली आहे, दुसऱ्यामध्ये रायफल हाती घेऊन असलेला गुंड उभा आहे, तर तिसऱ्या खोलीत वाघ आहे, ज्यानं तीन वर्षांपासून काही खाल्लेलं नाही. त्यानं काय निवडावं?

उत्तर- तिसऱ्या क्रमांची खोली कारण, वाघ तीन वर्षांपासून भुकेला असेल तर त्याचा इतक्यात मृत्यू झाला असेल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahavitaran Recruitment : 10 वी पास तरुणांसाठी महावितरणमध्ये नोकरीची संधी; इथे करा Apply

Mahavitaran Recruitment (4)

करिअरनामा ऑनलाईन । 10वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी (Mahavitaran Recruitment) आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, जालना अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 70 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, जालना

भरली जाणारी पदे – (Mahavitaran Recruitment)

शिकाऊ उमेदवार अप्रेंटिसची

पद संख्या – 70 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – 6000/- ते 7000/- रुपये दरमाह

असा करा अर्ज –

  1. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  2. 30 मार्च 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (Mahavitaran Recruitment)
  3. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  4. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स – (Mahavitaran Recruitment)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

RBI Recruitment 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेत ‘या’ पदावर भरती सुरु; असा करा Apply

RBI Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय रिझर्व्ह बँकेत नोकरी करण्याची (RBI Recruitment 2023) मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून रिक्त पदाच्या एकूण 2 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2023 आहे.

संस्था – भारतीय रिझर्व्ह बँक

भरले जाणारे पद –

ऑक्युपेशनल थेरपिस्ट (OT)/ फिजिओथेरपिस्ट (PT) / Occupational Therapist (OT)/ Physiotherapist (PT)

पद संख्या – 2 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 एप्रिल 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (RBI Recruitment 2023)

01) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची व्यावसायिक थेरपी / फिजिओथेरपीमध्ये बॅचलर किंवा पदव्युत्तर पदवी सह मस्कुलोस्केलेटल मध्ये विशेषीकरण एर्गोनॉमिक्स आणि बायोमेकॅनिक्सचे विज्ञान आणि ज्ञान
व्यावसायिक थेरपी / फिजिओथेरपी मध्ये पदव्युत्तर पदवी प्राधान्य दिले जाईल. तसेच उमेदवाराकडे 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक.

परीक्षा फी – फी नाही (RBI Recruitment 2023)

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

GM-i-C, Reserve Bank of India, Human Resource Management Department (Training and Development Division), Shahid Bhagat Singh road, Fort Mumbai – 400001.

काही महत्वाच्या लिंक्स – (RBI Recruitment 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – Advertise

अधिकृत वेबसाईट – https://www.rbi.org.in/

Application Form – CLICK

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com