Maharashtra Police Bharti : राज्यात प्रथमच तृतीय पंथीयांची पोलीस भरती साताऱ्यात; 3 उमेदवारांनी दिली मैदानी चाचणी

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारच्यावतीने संपूर्ण राज्यभर (Maharashtra Police Bharti) पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी हजारो तरुण-तरुणींनी उत्साह दाखवला आहे. विशेष म्हणजे या वर्षीपासून प्रथमच तृतीयपंथीयांना पोलीस भरती प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे. या भरतीसाठी राज्यभरातून 73 तृतीयपंथीयांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यानुसार साताऱ्यात तृतीयपंथीयांची आज पहिली पोलीस भरती पार पडली असून यामध्ये आर्या पुजारी, भूषण शिंदे आणि सतीश पाटील यांची मैदानी चाचणी घेण्यात आली.

सातारा जिल्ह्यात पार पडत असलेल्या पोलीस भरतीसाठी तृतीयपंथीयांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानुसार तीन तृतीय पंथीयांची मैदानी चाचणी घेण्यात आली. साताऱ्याच्या (Maharashtra Police Bharti) आर्या पुजारी यांनी पोलीस भरतीमध्ये तृतीयपंथीयांसाठी जागा उपलब्ध करावी यासाठी न्यायालयीन लढा दिला होता. त्याला यश मिळाले आहे.

अशी झाली मैदानी चाचणी – (Maharashtra Police Bharti)

साताऱ्यात या तीन जणांच्या भरतीसाठी 70 हून अधिक पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. यादरम्यान 100 मीटर धावणे, 800 मीटर धावणे, गोळा फेक अशी मैदानी चाचणी (Maharashtra Police Bharti) या तीन तृतीय पंथीय उमेदवारांची घेण्यात आली. या मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षा होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी दिली आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com