Home Blog Page 121

Top 10 MBA Colleges in India : भारतातील टॉप 10 MBA इन्स्टिट्यूट; इथून डिग्री घ्याल तर नशीब उजळेल

Top 10 MBA Colleges in India
xr:d:DAF2TZni6GE:1408,j:8278040321077216038,t:24040808

करिअरनामा ऑनलाईन । एखाद्या नामांकित शिक्षण संस्थेतून डिग्री (Top 10 MBA Colleges in India) मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते जेणेकरून इथून शिक्षण घेतल्यानंतर त्यांना चांगली नोकरी आणि पगाराचे समाधानकारक पॅकेज मिळू शकेल. जर तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केले असेल आणि उच्च शिक्षणासाठी एमबीए करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आपल्या देशात अशा काही संस्था आहेत जिथून एमबीए केल्यानंतर, विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण होताच लाखोत पगाराचे पॅकेज मिळते. आज आपण इथे देशातील काही टॉप MBA शिक्षण देणाऱ्या संस्थांची यादी पाहणार आहोत.

देशातील टॉप MBA शिक्षण देणाऱ्या संस्था (Top 10 MBA Colleges in India)
नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) ने देशातील टॉप कॉलेजेसची यादी जाहीर केली आहे. जर तुम्ही या टॉप इन्स्टिट्यूटमधून एमबीए शिक्षण पूर्ण केले तर तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नोकरीत नक्कीच चांगले पॅकेज मिळू शकते. कधी-कधी हे पॅकेज ५० लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचते. देशातील टॉप 10 संस्थांची यादी खालीलप्रमाणे आहे…

1. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद (IIMA)
2. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बेंगळुरू (IIMB)
3. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोझिकोड (IIMK)
4. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोलकाता
5. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली
6. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, लखनौ (Top 10 MBA Colleges in India)
7. राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई
8. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंदूर
9. एक्सएलआरआय-झेवियर स्कूल ऑफ मॅनेजमेंट, जमशेदपूर
10. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई

प्रवेश कसा मिळवायचा?
एमबीएच्या प्रवेशासाठी उमेदवारांनी पदवी (Top 10 MBA Colleges in India) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे. पदवी धारक विद्यार्थी देशभरातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या CAT, MAT, GMAT, XAT, CMAT परीक्षांमध्ये सहभागी होऊ शकतात. या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांनी परीक्षेत चांगली कामगिरी करून चांगली रँक मिळवणे आवश्यक आहे तरच तुम्हाला येथे प्रवेश मिळू शकतो हे लक्षात घ्यायला हवं.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : दुबईतील केमिकल इंजिनिअरची नोकरी सोडून सुरू केला अनोखा व्यवसाय; आता करतो पगाराच्या दुप्पट कमाई

Career Success Story of Zaki Imam
xr:d:DAF2TZni6GE:1400,j:5408121455726725106,t:24040807

करिअरनामा ऑनलाईन । अलिकडच्या काळात तरुण नोकरी सोडून (Career Success Story) शेती आणि शेतीपूरक व्यवसायाकडे वळत आहेत. अशाच एका तरुणाने वेगळा प्रयोग केला आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण ही खरं आहे. बिहारमधील एका तरुणाने परदेशातील नोकरीला राम राम करत मायदेशी येवून मधाचा व्यवसाय सुरू केला आहे. पटना येथील रहिवासी असलेल्या झाकी इमाम यांना दुबईत तगड्या पॅकेजची नोकरी होती. या तरुणाने ही नोकरी सोडून मधाच्या क्षेत्रात स्टार्टअप सुरू केले आहे. परदेशातील दीड लाख रुपयांची नोकरी सोडल्यानंतर आता तो महिन्याला तीन लाख रुपयांहून अधिक म्हणजेच पगाराच्या दुप्पट कमावत आहे.

मोठ्या भावासोबत करतो व्यवसाय
मध उत्पादनात बिहार आघाडीवर असलेले राज्य आहे. आज ग्रामीण आणि शहरी भागातील तरुण मधमाशी पालनाशी जोडून आपले उत्पन्न वाढवत आहेत. त्याचबरोबर काही तरुण असेही आहेत, जे परदेशात चांगली पॅकेजेस घेऊन आपली नोकरी सोडून मध व्यवसायात उतरत आहेत. सरकारी मदतीतून या भागात (Career Success Story) स्टार्टअप सुरू केले जात आहेत. पाटण्यातील रहिवासी झाकी इमामची कथाही अशीच आहे. तो दुबई आणि ओमानमध्ये काम करायचा. मात्र गेल्या काही वर्षांपासून पाटणा, बिहारला आपली कर्मभूमी बनवून तो आपल्या मोठ्या भावासोबत मधाचा व्यवसाय करत आहे.

इमाम ब्रदर्स नावाने सुरू केला स्टार्टअप
झाकी इमाम यांचा भाऊ फजल इमाम याने बिहार सरकारच्या स्टार्टअप धोरणाच्या मदतीने इमाम ब्रदर्स कंपनीच्या नावाने एक स्टार्टअप सुरू केला आहे. झाकी हे या कंपनीचे संचालक आहेत. सुमारे दोन वर्षांपासून मध व्यवसायाशी ते संबंधित आहेत. या स्टार्टअप मधून विविध प्रकारचे मध गोळा करण्याबरोबरच मधापासून अनेक प्रकारचे पदार्थही बनवले जात आहेत. नैसर्गिक उत्पादने लोकांना उपलब्ध करून देण्याचे त्यांचे ध्येय असल्याचे झाकी सांगतात.

कोरोना काळानंतर सुरु केला मध व्यवसाय, कंपनीचे मूल्य आहे 40 लाख
झाकी इमाम हे बिहारच्या पाटणा शहरातील फुलवारी शरीफ भागातील मुळ रहिवासी आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर झाकी दुबई आणि ओमानमध्ये केमिकल इंजिनिअर म्हणून काम करत होते. पाच वर्षे दुबईत नोकरी केल्यानंतर झाकी हे कोविडच्या काळात घरी परतले. मायदेशी प्रतल्यानंतर झाकी हे (Career Success Story) मधाच्या व्यवसायात गुंतले. काही महिने त्यांनी मधाचा व्यवसाय केला. पण कोरोना संपल्यानंतर ते पुन्हा एकदा ओमानला गेले. मात्र, दोन महिने काम करुन ते पुन्हा मायदेशी परतले. यानंतर त्यांनी मधाचा व्यवसाय सुरु केला. फेब्रुवारी 2022 मध्ये स्टार्टअप म्हणून मधाचा व्यवसाय सुरू करण्यात आला. या स्टार्टअपला काही दिवसांपूर्वी बिहार सरकारच्या उद्योग विभागाकडून ग्रीन सिग्नलही मिळाला आहे. गेल्या नऊ महिन्यांत कंपनीचे मूल्य 40 लाखांवर पोहोचले आहे.

मध व्यवसाय हा कमाईचा उत्तम पर्याय (Career Success Story)
आज मध व्यवसाय हा कमाईसाठी चांगला पर्याय आहे. त्यासाठी फक्त लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. कधी कधी आमच्या या निर्णयाचा वडिलांना खूप राग यायचा पण आज आम्ही व्यवसायात केलेली प्रगती पाहून वडिलांना आमचा अभिमान वाटतो. आज तो माझे ऑफिस नातेवाईकांना आणि इतर लोकांना आवर्जून दाखवतात.

स्टार्ट अपमधून तयार केली जातात अनेक हर्बल उत्पादने
झाकी इमाम सांगतात; “मधाच्या क्षेत्रात बऱ्याच गोष्टी करता येतात. त्याबद्दल फक्त लोकांना माहिती देण्याची गरज आहे. ते शेतकऱ्यांकडून ब्लॅकबेरी, तुळस, लिची आणि ड्रमस्टिकपासून मिळणारा मध विकत घेतात. यासोबतच त्यापासून अतिरिक्त पदार्थही बनवले जातात. आवळा मुरब्ब्यात साखरेऐवजी मध (Career Success Story) घालून बाजारात विकला जातो. यासोबतच आल्यामध्ये मध आणि हळद मिसळून विकले जाते. आम्ही अशा प्रकारची हर्बल उत्पादने बाजारात उपलब्ध करून देत आहोत. पन्नासहून अधिक शेतकरी आमच्यासोबत काम करत आहेत. यासोबतच आम्ही या व्यवसायातून अनेक लोकांना रोजगार देत आहोत.” एकेकाळी परदेशात दरमहा दीड लाख रुपये पगार घेणारे झाकी आता मध व्यवसायात उतरून दर महिन्याला पगारापेक्षा दुप्पट कमाई करत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Update : PSI होण्यासाठी तृतीयपंथी उमेदवारांच्या शारीरिक चाचणीसाठी अशी असतील नवीन मानके

MPSC Update
xr:d:DAF2TZni6GE:1386,j:3335339655997870432,t:24040714

करिअरनामा ऑनलाईन । पोलीस भरती संदर्भात महत्वाची अपडेट आहे. स्वतःची (MPSC Update) लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता आणि स्वतःची लिंग ओळख महिला/तृतीयपंथी अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता शारीरिक चाचणीची मानके व गुण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत.

स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता शारीरिक चाचणीचा तपशील
1. गोळा फेक- वजन- ७.२६० कि.ग्रॅ. कमाल गुण- १५
2. पुलअप्स- कमाल गुण – २० (MPSC Update)
3. लांब उडी- कमाल गुण- १५ (MPSC Update)
4. धावणे (८०० मीटर)- कमाल गुण – ५०

स्वतःची लिंग ओळख महिला/तृतीयपंथी अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता शारीरिक चाचणीचा तपशील
1. गोळा फेक- वजन- ४ कि.ग्रॅ.- कमाल गुण- २०
2. धावणे (४०० मीटर) – कमाल गुण- ५०
3. लांब उडी- कमाल गुण- ३०

मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक गुण (सन 2022 परीक्षा)
शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी करण्यात आले असून, शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ६० टक्के म्हणजे ६० गुण मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता/अंतिम निवडीकरिता विचार होणार नाही.

शारीरिक चाचणीत पात्र होण्यासाठी आवश्यक गुण (MPSC Update)
शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ७० टक्के म्हणजे ७० गुण मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता/अंतिम निवडीकरिता विचार होणार नाही. तृतीयपंथी उमेदवारास त्यांची पुरुष, महिला किंवा तृतीयपंथी अशी स्वतःची लिंग ओळख निश्चित करणे आवश्यक राहील व यासंदर्भात विहित सक्षम प्राधिका-याने दिलेले विहित नमुन्यातील प्रमाणपत्र शारीरिक चाचणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. सदर माहिती आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Supreme Court Of India Recruitment 2024 : देशाच्या सर्वोच्च न्यायालयात ‘या’ पदावर नोकरीची उत्तम संधी

Supreme Court Of India Recruitment 2024
xr:d:DAF2TZni6GE:1380,j:5549984765047426219,t:24040713

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत (Supreme Court Of India Recruitment 2024) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक निबंधक पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.

संस्था – भारतीय सर्वोच्च न्यायालय
भरले जाणारे पद – सहाय्यक निबंधक
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Supreme Court Of India Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, टिळक मार्ग, नवी दिल्ली-110001

आवश्यक शैक्षणिक पात्रता – कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये मास्टर्स किंवा बॅचलर डिग्री किंवा B.E. संगणक किंवा आयटी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून संगणकात बी.टेक किंवा समकक्ष शिक्षण.
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मार्च 2024 रोजी, 56 वर्षे असावे.
मिळणारे वेतन – 1,48,586/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – दिल्ली

काही महत्वाच्या लिंक्स – (Supreme Court Of India Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.sci.gov.in

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : अर्ज न करता थेट द्या मुलाखत!! गोखले एज्युकेशन सोसायटी अंतर्गत टीचिंग/नॉन टीचिंग स्टाफची मोठी भरती

Job Alert
xr:d:DAF2TZni6GE:1375,j:5803312240826111225,t:24040712

करिअरनामा ऑनलाईन । गोखले एज्युकेशन सोसायटी (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ पदांच्या एकूण 105 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे.

नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटी ही राज्यातील नामांकित शिक्षण संस्था आहे. सध्या या संस्थेत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठी भरती होत आहे. या भरतीच्या (Job Alert) माध्यमातून एकूण 105 उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा नाही; कारण इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने केली जाणार असून मुलाखतीची तारीख 12, 13 आणि 15, 16 एप्रिल 2024 आहे. पाहूया भरती प्रक्रियेविषयी सविस्तर…

संस्था – गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक
भरले जाणारे पद – टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ
पद संख्या – 105 पदे (Job Alert)
नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक
अर्ज फी – Rs.200/-
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – सर डॉ. एम.एस. गोसावी इन्स्टिट्यूट फॉर आंत्रप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, प्रि. टी. ए. कुलकर्णी विद्यानगर, नाशिक-५
मुलाखतीची तारीख – 12, 13 आणि 15, 16 एप्रिल 2024

भरतीचा तपशील – (Job Alert)

पदपद संख्या 
टीचिंग स्टाफ64
नॉन टीचिंग स्टाफ41
Vacancy Details
Post NameTotal Qualification
Teacher (Pre-Primary)13Montessori Course (English Medium & Marathi Medium)
Head Master04D.T.Ed/ B.Ed
Teacher (Primary)16D.T.Ed/ B.Ed (English Medium & Marathi Medium)
Drawing Teacher04A.T.D
Computer Teacher04B.Sc (Computers)
Teacher (Secondary)22B.Sc,B.Ed /B.A,B.Ed (Relevant Subject)
Physical Education Teacher03B,P.Ed
Librarian03B.Lid
Jr Clerks09B.Com
Laboratory Asst0212th Pass (Science)
Peons099th Class
Aaya134th Class
Helper/Sweeper054th Class

अशी होणार निवड –
1. या भरतीसाठी उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहेत.
2. इच्छुक आणि पात्र (Job Alert) उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
3. मुलाखतीची तारीख 12, 13 आणि 15, 16 एप्रिल 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
अधिकृत वेबसाईट – https://gesociety.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CLW Recruitment 2024 : 10 वी पाससाठी मोठी बातमी!! चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स अंतर्गत 492 पदावर भरती सुरू

CLW Recruitment 2024
xr:d:DAF2TZni6GE:1369,j:3470447629793092101,t:24040711

करिअरनामा ऑनलाईन । चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स अंतर्गत (CLW Recruitment 2024) भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कंपनीने या भरतीबाबत नुकतीच अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून फिटर, टर्नर, मशीनिस्ट, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, पेंटररेफ या पदांच्या एकूण 492 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 आहे.

संस्था – चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स
भरले जाणारे पद –
1. अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
पद संख्या – 492 पदे
भरतीचा तपशील – (CLW Recruitment 2024)
१. फिटर – २०० पदे
२. टर्नर – २० पदे
३. मशीनिस्ट – ५६ पदे
४. वेल्डर (G&E) – ८८ पदे
५. इलेक्ट्रिशियन – ११२ पदे
६. रेफ. & AC – ०४ पदे
७. पेंटर – १२ पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी आणि ITI पास असणे आवश्यक आहे.
अर्ज फी – नाही
वय मर्यादा – (CLW Recruitment 2024)
1. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २४ वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
2. एसी, एसटी उमेदवारांना पाच वर्षे आणि ओबीसी उमेदवारांना तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://clw.indianrailways.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : टॉपर्सच्या मुलाखती ऐकून अभ्यासाची रणनीती ठरवली; कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC

Career Success Story of IAS Laghima Tiwari
xr:d:DAF2TZni6GE:1364,j:4561444630971294327,t:24040709

करिअरनामा ऑनलाईन । UPSC असो की कोणतीही स्पर्धा परीक्षा.. यामध्ये (Career Success Story) यश मिळवण्यासाठी उमेदवार रात्रंदिवस मेहनत करतात. योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी ते कोचिंग क्लासकडे वळतात, जिथे ते तयारीसाठी प्रचंड फी ही खर्च करतात. पण आज आपण आशा IAS अधिकाऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत, त्यांनी कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय ही परीक्षा पास केली आहे. हे यश अजून एका कारणाने विशेष ठरते कारण कोणतेही प्रशिक्षण न घेता अगदी पहिल्याच प्रयत्नात या उमेदवाराने सर्वात कठीण समजली जाणारी परीक्षा पास केली आहे. लघिमा तिवारी असं या अधिकारी महिलेचं नाव आहे. तिची कहाणी जाणून घेऊया…

टॉपर्सच्या मुलाखती ऐकून अभ्यासाची रणनीती ठरवली
आयएएस अधिकारी लघिमा तिवारी या राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. यानंतर लघिमा यांनी यूपीएससी सिव्हिल (Career Success Story) सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू केली. मात्र, यासाठी त्यांनी कोणत्याही कोचिंगची मदत घेतली नाही. त्यासाठी लघिमा यांनी मागील वर्षांतील टॉपर्सच्या मुलाखती ऐकून स्वतःची अभ्यासाची रणनीती ठरवली आणि त्या दृष्टीने परीक्षेची तयार केली.

पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर केली UPSC ची तयारी
राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या लघिमा तिवारी यांनी आपले प्राथमिक शिक्षण राजस्थान येथूनच पूर्ण केले. यानंतर त्यांनी दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पदवी पूर्ण केली. पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर, त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगद्वारे (UPSC) आयोजित नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. ही परीक्षा देताना त्यांनी कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही. परीक्षेचा पॅटर्न समजून घेण्यापासून ते प्रत्यक्षात परीक्षेची तयारी करण्यापर्यंत त्यांनी यूट्यूबवर टॉपर्सच्या मुलाखती पाहून अभ्यासाची रणनीती ठरवली.

पहिल्याच प्रयत्नात मिळवली 19 वी रॅंक (Career Success Story)
लघिमा तिवारी यांनी परीक्षेसाठी आखलेली रणनीती इतकी अचूक होती की त्यांनी पहिल्याच प्रयत्नात परीक्षा क्रॅक केली आणि त्यांनी संपूर्ण भारतात 19 वा क्रमांक मिळवला आहे. ही रँक मिळवून त्या आयएएस अधिकारी बनल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार लघिमा यांनी लेखी परीक्षेत 853 आणि व्यक्तिमत्व चाचणीत 180 गुण मिळवले होते. त्यांचा परीक्षेतील एकूण स्कोअर 1033 होता. त्या त्यांच्या यशाचे संपूर्ण श्रेय त्यांच्या पालकांना देतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career After 10th : 10 वी पास झाल्यानंतर ‘या’ क्षेत्रात मिळेल सरकारी नोकरी; पगारही मिळेल शानदार

Career After 10th
xr:d:DAF2TZni6GE:1360,j:8278040217962588106,t:24040708

करिअरनामा ऑनलाईन । आपल्या देशात प्रत्येकाला सरकारी नोकरी (Career After 10th) मिळवायची असते, पण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी पात्रता असणं खूप गरजेचं आहे ज्यामध्ये प्रत्येकजण बसू शकत नाही. येथे आम्ही अशाच काही सरकारी नोकऱ्यांबद्दल माहिती देणार ​​आहोत ज्यासाठी तुम्ही 10वी पास झाल्यानंतर सहभागी होऊ शकता. 10 वी पास झाल्यानंतर तुम्हाला रेल्वे, भारतीय पोस्ट, भारतीय सैन्य इत्यादींमध्ये नोकरी मिळू शकते. जाणून घेवूया सविस्तर….

भारतात अनेक कारणांसाठी सरकारी नोकरीचा पर्याय (Career After 10th) सर्वोत्तम मानला जातो. सरकारी नोकरीमुळे समाजात वेगळीच प्रसिद्धी मिळते. सरकारी सुविधांसोबतच चांगला पगारही मिळतो. त्यामुळे प्रत्येकजण सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण आम्ही तुम्हाला अशाच काही सरकारी नोकऱ्यांबद्दल सांगत आहोत ज्यामध्ये तुम्ही 10वी उत्तीर्ण झाल्यावरच सहभागी होऊ शकता. 10वी पास झालेल्या उमेदवारांसाठी विविध क्षेत्रांमध्ये तसेच सैन्यात नोकऱ्या उपलब्ध आहेत. यामध्ये सहभागी होऊन तुम्हाला सरकारी नोकरीबरोबरच देशसेवेचीही संधी मिळू शकते.

पोस्टल सेवेतील नोकरी
तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही भारतीय पोस्टमधील नोकरीमध्ये सहभागी होऊ शकता. यामध्ये पोस्टल असिस्टंट, शॉर्टनिंग असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ यासह अनेक पदांवर भरती केली जाते; ज्यामध्ये तुम्ही 10वी पास झाल्यानंतर अर्ज करू शकता.
पोलीस हवालदार (Career After 10th)
अनेक राज्यांमध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी दहावी पास असणे आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही पोलिस खात्यातही सरकारी नोकरीसाठी पात्र ठरू शकता.

रेल्वे विभाग
10वी उत्तीर्णांसाठी भारतीय रेल्वेमध्ये अनेक पदांवर सरकारी नोकऱ्या उपलब्ध आहेत. ट्रॅकमन, गेटमन, पॉइंट्समन, हेल्पर, पोर्टर इत्यादींसह इतर अनेक पदे आहेत. यासोबतच रेल्वेमध्ये 10वी पाससाठी शिकाऊ पदांसाठी वेळोवेळी भरतीच्या जाहिराती सोडल्या जातात.
वन रक्षक विभाग
आपल्या देशात अशी अनेक राज्ये आहेत जिथे (Career After 10th) वनरक्षक पदांसाठी सरकारी नोकऱ्या वेळोवेळी येत राहतात. अनेक राज्यांमध्ये या पदासाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी उत्तीर्ण अशी आहे. त्यामुळे दहावीनंतर या पदावर सरकारी नोकरी मिळू शकते.

आर्म्ड फोर्समधील नोकऱ्या
10वी पास उमेदवारांसाठी सशस्त्र दलातही (Career After 10th) सरकारी नोकऱ्या उपलब्ध असतात. यामध्ये तुम्ही आर्मी, इंडियन नेव्ही किंवा इंडियन एअर फोर्समधील विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज करू शकता. यामध्ये सामील होऊन तुम्हाला नोकरी सह देशसेवेची संधी मिळते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

D Pharma Exit Exam 2024 : डी फार्मसी एक्झिट परीक्षांची तारीख जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

D Pharma Exit Exam 2024
xr:d:DAF2TZni6GE:1355,j:1497870977830081152,t:24040707

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन (D Pharma Exit Exam 2024) मेडिकल सायन्सेस ने अनेक दिवसांपासून बहुप्रतिक्षित असलेल्या डी फार्मा एक्झिट परीक्षा 2024च्या तारखा जाहीर केल्या आहेत. 5 आणि 6 ऑक्टोबर 2024 रोजी या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यावर्षी प्रथमच घेण्यात येणाऱ्या या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची धांदल उडणार आहे. यापुर्वी डी फार्मसी पास झाले की, मेडीकल लायसन्स मिळायचे मात्र, या पुढील काळात विद्यार्थ्यांना एक्झिट परीक्षा पास होणे देखील अनिवार्य असणार आहे.

डी फार्मा एक्झिट परीक्षेच्या तयारीमध्ये सामान्यत: कठोर अभ्यास, पुनरावृत्ती आणि सराव चाचण्यांचा समावेश असतो ज्यामध्ये फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकोलॉजी, फार्मास्युटिक्स, फार्माकोग्नोसी (D Pharma Exit Exam 2024) आणि फार्मसी सराव यासह विस्तृत विषयांचा समावेश होतो. परीक्षेची रचना केवळ सैद्धांतिक ज्ञानच नाही तर फार्मास्युटिकल व्यवसायातील यशासाठी आवश्यक असलेले व्यावहारिक उपयोग आणि गंभीर विचार कौशल्ये यांचेही मूल्यांकन करण्यासाठी केली गेली आहे.

बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी, डी फार्मा एक्झिट परीक्षा ही त्यांच्या फार्मसी क्षेत्रातील शैक्षणिक आणि व्यावसायिक उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्यासाठी अनेक वर्षांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि चिकाटी दर्शवते. या परीक्षेतील यशामुळे पुढील शिक्षण, करिअर प्रगती आणि फार्मास्युटिकल उद्योगाच्या विविध क्षेत्रांमध्ये प्रवेशाच्या संधी खुल्या होतात ज्यामध्ये समुदाय फार्मसी, हॉस्पिटल फार्मसी, फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग, संशोधन आणि विकास, नियामक घडामोडी आणि शैक्षणिक क्षेत्र यांचा समावेश होतो.

डी फार्मा एक्झिट परीक्षा एक महत्त्वाचा टप्पा (D Pharma Exit Exam 2024)
NBEMS ने म्हटले आहे की, डिप्लोमा इन फार्मसी (डी फार्मा) अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डी फार्मा एक्झिट परीक्षा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे विविध फार्मास्युटिकल डोमेनमधील त्यांचे ज्ञान, कौशल्ये आणि सक्षमतेचे सर्वसमावेशक मूल्यांकन म्हणून काम करते. ही परीक्षा फार्मास्युटिकल क्षेत्रातील त्यांच्या व्यावसायिक प्रवासाला सुरुवात करण्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : जर तुम्ही या प्रश्नांची उत्तरे दिलीत तर समजेल तुम्ही किती बुध्दिमान आहात…

GK Updates
xr:d:DAF2TZni6GE:1352,j:5417128478004160214,t:24040614

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न- लाइफ टाईम अचिव्हमेंटसाठी ऑस्कर पुरस्कार विजेत्याचे नाव?
(अ) सत्यजित रे
(ब) भानू अथैया
(क) रवींद्रनाथ टागोर
(डी) किरण बेदी (GK Updates)
उत्तर – (अ) लाइफ टाईम अचिव्हमेंटसाठी ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे होते.
प्रश्न- भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे?
अ) चंदीगड
(ब) मिझोराम
(क) सिक्कीम
(ड) गोवा
उत्तर – (क) सिक्कीम हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे. 2011 च्या लोकसंख्येनुसार, सिक्कीम हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य आहे. येथील एकूण लोकसंख्या 6,10,577 इतकी आहे.

प्रश्न- भारताच्या केंद्र सरकारच्या पहिल्या महिला मंत्री? (GK Updates)
(अ) शन्नो देवी
(ब) बी. एस. रमा देवी
(क) राजकुमारी अमृत कौर
(ड) प्रिया हिमोरानी
उत्तर – (क) राजकुमारी अमृत कौर
प्रश्न- भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री?
(अ) इंदिरा गांधी
(ब) अमृता प्रीतम
(क) सरोजिनी नायडू
(ड) सुचेता कृपलानी
उत्तर – (डी) भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी होत्या, त्यांनी 1963 ते 1967 पर्यंत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून काम केले.

प्रश्न- भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती?
(अ) प्रतिभा पाटील
(ब) सुचेता कृपलानी
(क) इंदिरा गांधी (GK Updates)
(ड) इतर
उत्तर – (अ) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपतींचे नाव प्रतिभा पाटील आहे. त्यांनी 25 जुलै 2007 रोजी देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.
प्रश्न- भारताचे पहिले व्हाईसरॉय?
(अ) सर जॉन शोर
(ब) लॉर्ड कॅनिंग
(क) लॉर्ड विल्यम बेंटिक
(ड) अर्ल कॉर्नवॉलिस
उत्तर – (ब) लॉर्ड कॅनिंग
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com