Education : राज्यातील ‘या’ विद्यार्थीनींना उच्च शिक्षणात मिळणार संपूर्ण फी माफी; मंत्री चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील मुलींसाठी एक आनंदाची (Education) बातमी आहे. 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न गटातील कुटुंबातील विद्यार्थीनींना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी देण्याचा निर्णय शिंदे सरकारकडून घेण्यात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. पूर्ण शैक्षणिक वर्षासाठी मुलींच्या शुल्कात माफी देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त मुली उच्च शिक्षणात याव्यात यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकार संबंधीत शैक्षणिक संस्थांना या खर्चाची परतफेड करणार आहे.

मंत्री चंद्रकात पाटील यांनी कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीत या (Education) निर्णयाची घोषणा केली. सध्या मुलींना शैक्षणिक वर्षात ५० टक्के शुल्क माफी होती. आता ही शुक्लमाफी १०० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शिकण्याची तळमळ असणाऱ्या होतकरु विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलींना फायदा होणार आहे. त्यामुळे मुलींची विद्यापीठातील प्रवेश संख्या वाढण्याची शक्यता आहे.

कुलगुरुंच्या बैठकीला राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते. यावेळी (Education) त्यांनी वेळेवर निकाला लावण्याच्या सूचना विद्यापीठांना दिल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष चुकू नये किंवा नोकरीची संधी हातची जाऊ नये यासाठी वेळेवर निकाल लागणे आवश्यक आहे, असं ते म्हणाले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com