Education : प्रत्येक शाळेत निनादणार नवा सुर; प्रार्थनेच्या तासाला ‘हे’ नवे गीत गायले जाणार

करिअरनामा ऑनलाईन । शालेय वयातच विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची (Education) गौरवगाथा समजावी यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अध्यादेश काढण्यात आला आहे. “जय जय महाराष्ट्र माझा…” हे राज्यगीत आता शाळांमध्ये नियमितपणे म्हटले जाणार आहे. या गीतास राज्यगीताचा दर्जा महाराष्ट्र शासनाने दिला आहे. यामुळे बालपणीच विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची गौरवगाथा या गीताच्या माध्यमातून समजणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी मागणी केली होती.

शाळांमध्ये प्रार्थना, प्रतिज्ञा नियमित होत असतात. मुलांमध्ये चांगले संस्कार निर्माण व्हावे, देशभक्ती निर्माण व्हावी, भारतीय संस्कृतीची त्यांना माहिती व्हावी, यासाठी (Education) नियमित राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा होत असते. आता राज्य सरकारकडून आणखी एका गीताचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. “जय जय महाराष्ट्र माझा…” हे राज्यगीत आता शाळांमध्ये नियमितपणे म्हटले जाणार आहे. यासंदर्भात शासनाकडून आदेश काढण्यात आला आहे.

“जय जय महाराष्ट्र माझा…” गीतास राज्यगीताचा दर्जा (Education)
“जय जय महाराष्ट्र माझा…” या गीतास राज्यगीताचा दर्जा राज्य सरकारने दिला आहे. वर्षभरापूर्वी हे गीत राज्यगीत झाले आहे. हा दर्जा मिळाल्यानंतर या गीताला त्याचा उचित सन्मान मिळत नव्हता. कोणत्याही शैक्षणिक संस्थेत आपलं हे राज्यगीत गायलं वा वाजवलं जात नव्हतं त्यामुळे या गोष्टीची दाखल घेवून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. प्रत्येक शैक्षणिक संस्थेत राज्यगीत वाजविले अन् गायिले जावे अशी आग्रही मागणी यावेळी त्यांनी व्यक्त केली होती.

परिपत्रकात काय म्हटलंय
अमित ठाकरे यांच्या या पत्राचा सकारात्मक परिणाम शासन दरबारी झाला. पत्रानंतर तीन आठवड्यांच्या आतच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने एक परिपत्रक काढले आहे. या (Education) परिपत्रकानुसार सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या प्रत्येक शाळेत दररोजचे वर्ग सुरू होताना राष्ट्रगीत आणि प्रार्थनेसोबत राज्यगीत वाजवले तसेच गायले जाईल, याची दक्षता शाळा व्यवस्थापनाने घ्यायची आहे. या सूचनेचे पालन होत आहे की नाही याची दक्षता सर्व विभागीय शालेय शिक्षण उपसंचालकांनी घ्यायची आहे; असे पत्रकात म्हटले आहे. अमित ठाकरे यांनी पुढाकार घेतल्यामुळे आता यापुढे प्रत्येक शाळेत “जय जय महाराष्ट्र माझा…” चे सुर घुमणार आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com