आता बारावीच्या विद्यार्थ्यांना नापास होण्याची भीती नाही ! कारण…
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे. आता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील नापास शेरा पुसला जाणार आहे. तसेच या नापास विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर पुन:परिक्षेसाठी पात्र किंवा कौशल्यविकासासाठी पात्र असा शेरा देण्यात येणार आहे.