Home Blog Page 257

ZP Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी राज्याच्या ‘या’ जिल्हा परिषदेत होणार नवीन उमेदवारांची निवड; लगेच करा APPLY

ZP Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, बीड अंतर्गत रिक्त (ZP Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विधिज्ञ पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – जिल्हा परिषद, बीड
भरले जाणारे पद – विधिज्ञ
पद संख्या – 25 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – बीड
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 सप्टेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड

असा करा अर्ज – (ZP Recruitment 2023)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023 आहे.

भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – zpbeed.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु; त्वरा करा 

Government Job (6)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (Government Job) अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत IFC ब्लॉक अँकर पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन/ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, गडचिरोली
भरले जाणारे पद – IFC ब्लॉक अँकर
पद संख्या – 04 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन/ ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 सप्टेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – गडचिरोली

निवड प्रक्रिया –
1.लेखी परीक्षा
2. तोंडी परीक्षा
वय मर्यादा – 43 वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – (Government Job)
1. तालुका अभियान व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती, आरमोरी जि. गडचिरोली.
2. तालुका अभियान व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती, धानोरा जि. गडचिरोली.
3. तालुका अभियान व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती, कुरखेडा जि. गडचिरोली.
4. तालुका अभियान व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाचे खाली, गडचिरोली जि. गडचिरोली.

E Mail ID –
1. [email protected].
2. [email protected]
3. [email protected]
4. [email protected]

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद  आवश्यक शैक्षणिक पात्रता
IFC ब्लॉक अँकर Bachelor of science in Agriculture or Bachelor of Science in Horticulture or B.Tech.in Agriculture or Bachelor of science in Fishery, Bachelor of science in Forestry, Bachelor of Veterinary Science & Bachelor of Science in Animal Husbandry, Bachelor of Business Administration

मिळणारे वेतन –
IFC ब्लॉक अँकर – रु. 20,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
3. इच्छुक उमेदवारांनी (Government Job) अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.zpgadchiroli.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Ratan Tata : रतन टाटांनीही नोकरीसाठी लिहला होता Resume; जिथे केली नोकरी त्याच कंपनीचे झाले President

Ratan Tata

करिअरनामा ऑनलाईन । उद्योगपती रतन नवल टाटा कोणाला (Ratan Tata) माहित नाहीत? त्यांनी टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून उत्तुंग कामगिरी केली आहे आणि अजूनही ते त्यांच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख आहेत. रतन टाटा यांना 2008 मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार,पद्म विभूषण, आणि 2000 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नुकतंच त्यांना महाराष्ट्र सरकारने उद्योगरत्न पुरस्कार देवून गौरवलं आहे. आता सोशल मीडियावर एक कथा समोर आली आहे आणि ती इंटरनेटवर चांगलीच व्हायरल झाली आहे. अनेकांना माहीत नाही पण 1960 च्या दशकात, रतन टाटा कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केल्यानंतर लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक होण्यास तयार होते. मात्र त्यांच्या आजीची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना भारतात परतावे लागले होते.

जेव्हा ते भारतात परतले तेव्हा त्यांना IBM कडून नोकरीची ऑफर मिळाली. भारतात परत आल्यानंतर रतन टाटा यांनी IBM मध्ये नोकरी सुरू केली पण त्यांचे गुरू जेआरडी टाटा त्यांच्या (Ratan Tata) या निर्णयावर खुष नव्हते. जुन्या आठवणींना उलगडा देताना रतन टाटांनी सांगितले; “त्यांनी मला एके दिवशी फोन केला आणि म्हणाले की तू इथे भारतात IBM साठी काम करू शकत नाहीस.” . तसेच टाटा ग्रुपमध्ये नोकरी मिळवण्यासाठी रतन टाटा यांना त्यांचा Resume जेआरडी टाटा यांच्यासोबत शेअर करावा लागला आणि त्यांनी तो अतिशय आकर्षक पद्धतीने बनवला.

अशा प्रकारे त्यांनी टाटा इंडस्ट्रीजमध्ये नोकरी मिळवली (Ratan Tata)
टाटा समूहात नोकरी करण्यासाठी रतन टाटा यांनाही JRD टाटांना Resume पाठवावा लागला होता. टाटा ग्रुपमध्ये नोकरी मिळवण्यासाठी रतन टाटा यांनी आयबीएम ऑफिसमधील एका इलेक्ट्रिक टाइपरायटरवर त्यांचा Resume तयार केला. रतन टाता सांगतात; “मी IBM ऑफिसमध्ये होतो आणि मला आठवते की त्यांनी (JRD टाटा) मला Resume मागितला, जो माझ्याकडे नव्हता. त्यावेळी ऑफिसमध्ये इलेक्ट्रिक टाइपरायटर होता म्हणून मी एका संध्याकाळी बसलो आणि त्यांच्या टाइपरायटरवर CV टाईप केला आणि तो जेआरडी टाटा यांना दिला.”

आणि अशा प्रकारे टाटा यांना १९६२ मध्ये टाटा इंडस्ट्रीजमध्ये नोकरीची ऑफर मिळाली. वर्षाच्या उत्तरार्धात त्यांनी टाटा इंजिनिअरिंग आणि लोकोमोटिव्ह (टाटा मोटर्स) कंपनीच्या जमशेदपूर प्लांटमध्ये सहा महिने प्रशिक्षण घेतले. तर 1963 मध्ये ते टाटा आयर्न अँड स्टील कंपनी किंवा टिस्को (आता टाटा स्टील) मध्ये जमशेदपूर येथे प्रशिक्षण घेण्यासाठी गेले.

टाटा समूहात रतन टाटांचा प्रवास कसा होता
रतन टाटा यांनी 1969 मध्ये ऑस्ट्रेलियात टाटा समूहाचे निवासी प्रतिनिधी म्हणून काम केल्यावर 1970 मध्ये ते भारतात परतले आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये रुजू झाले. पुढच्या (Ratan Tata) वर्षी त्यांना नॅशनल रेडिओ आणि इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक-प्रभारी (नेल्को) म्हणून नियुक्त करण्यात आले. तर 1974 मध्ये रतन टाटा यांना टाटा सन्सच्या बोर्डात संचालक म्हणून सामील करण्यात आले. IBM ची नोकरी सोडल्यानंतर जवळपास तीन दशकांनंतर रतन टाटांनी 1991 मध्ये जेआरडी टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : वाचायलाच हवे असे सामान्य ज्ञान वाढवणारे 10 प्रश्न 

GK Updates 29 Aug

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

1. राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 12 जानेवारी (GK Updates)
2. राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 28 फेब्रुवारी
3. राष्ट्रीय पक्षी दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 12 नोव्हेंबर

4. वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते?
उत्तर : नायट्रोजन
5. ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता?
उत्तर : सूर्य
6. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला?
उत्तर : न्यूटन

7. सूर्य किरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो?
उत्तर : 8 मिनिटे 20 सेकंद
8. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात?
उत्तर : टंगस्टन
9. (GK Updates) डायलिसिस उपचार कोणत्या आजारामध्ये करतात?
उत्तर : मूत्रपिंडाचे आजार
10. मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात?
उत्तर : पांढऱ्या पेशी
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Maharashtra State Board Exams Schedule : पुढील वर्षी होणाऱ्या 10वी 12वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर!! पहा कोणत्या दिवशी होणार पेपर

Maharashtra State Board Exams Schedule

करिअरनामा ऑनलाईन । पुढील वर्षी 2024 मध्ये (Maharashtra State Board Exams Schedule) होणाऱ्या 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढील वर्षी फेब्रुवारी – मार्चमध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार बारावी बोर्डाच्या परीक्षा दि. 21 फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहेत, तर दहावी बोर्डाच्या परीक्षा दि. 1 मार्च पासून सुरु होतील.
शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे यासाठी या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार 12 वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे, तर दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च 2024 या कालावधीत होणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ), अमरावती, कोल्हापूर लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत 10वी आणि 12वीच्या बोर्ड (SSC HSC Exams) परीक्षा घेतल्या जातात. विद्यार्थ्यांना परीक्षांचे वेळापत्रक माहिती असेल तर (Maharashtra State Board Exams Schedule) अभ्यासाची तयारी करण्याचे नियोजन करता येतात. त्यामुळेच पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्च या कालावधीत होणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे.

बोर्ड 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची वर्षातून दोनदा परीक्षा घेते. पुढील वर्षी होणाऱ्या मुख्य परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील बोर्डाने सांगितली आहे. 12वीसाठी (HSC) सुमारे 14 लाख विद्यार्थी बसू शकतात आणि 10वीसाठी (SSC) बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 17 लाख आहे. पुरवणी परीक्षेसाठी सुमारे दहावी आणि बारावी मिळून 6 लाख विद्यार्थी अपेक्षित असल्याचे बोर्डाने म्हटले आहे. राज्यात सुमारे 21,000 शाळा (SSC) आणि 7000 माध्यमिक, ज्युनियर महाविद्यालये (HSC) विद्यार्थी आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही शिक्षण मंडळाच्या https://mahahsscboard.in/ या वेबसाईटला भेट देऊ शकता.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Health Department Recruitment : आरोग्य विभागात जम्बो भरती!! 11 हजार पदांसाठी निघाली जाहिरात

Health Department Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून (Health Department Recruitment) रखडलेल्या राज्याच्या आरोग्य विभागातील सुमारे 11 हजार पदांसाठीची जाहिरात आज (मंगळवारी) जारी झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. ठाण्यात एकाच दिवशी 18 जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आल्यानंतर आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेला आता वेग आला आहे.

राज्यातील आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया ही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना या भरती प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. पण काही दिवसांपूर्वी ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकारने यामध्ये लक्ष घातलं आणि या भरती प्रक्रियेला सुरूवात केली. गेल्या आठवड्यामध्ये ही भरती सुरू होणार असे संकेत देण्यात आले होते. आता त्यासंबंधित जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

10,949 जागांसाठी निघाली  जाहिरात
आरोग्य विभागाच्या ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील 10,949 जागांसाठी ही जाहिरात निघाली आहे. आरोग्य सेवकांच्या ‘क’ आणि ‘ड’ वर्गासाठी होणारी ही भरती MPSC, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत केली जाणार आहे. ‘क’ वर्गातील 55 प्रकारची विविध पदे, तसेच ‘ड’ वर्गातील 5 प्रकारची विविध पदे भरली जाणार आहेत, अशी एकूण 10 हजार 949 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे

2011 साली ही भरती प्रक्रिया सुरू असताना पेपर फुटीचा घोटाळा झाला होता, त्यानंतर ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती, आता पुन्हा आरोग्यमंत्री डॉ सावंत यांच्या पुढाकाराने ही भरती पुन्हा सुरु होणार आहे.

या पदांचा समावेश (Health Department Recruitment)
गट ‘क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक,वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर गट ‘ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ पदे रिक्त असल्याने त्याचा अतिरिक्त ताण कनिष्ठ अधिकाऱ्यांवर पडत आहे. या कार्यपद्धतीवर अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे ही रखडलेली नोकर भरती पूर्ण करण्यासाठी वेग आलेला पाहायला मिळत आहे.

ठाण्यातील रुग्णालयामध्ये एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू
ठाणे पालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवसात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी (Health Department Recruitment) आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेनंतर सर्व स्तरांतून टीका करण्यात येत होती. विरोधकांनीही यावरून प्रशासनाकडे उत्तर मागितलं होतं. त्यामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला होता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Rozgar Melava : पंतप्रधान मोदींनी 51 हजार युवकांना दिली सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे

Rozgar Melava

करिअरनामा ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी (Rozgar Melava) आज आयोजित केलेल्या रोजगार मेळावा या कार्यक्रमाच्या माध्यमातून 51,000 युवकांना नियुक्तीपत्रे दिली आहेत. हा मेळावा ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडला. भारतातील विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशातील युवकांना या कार्यक्रमाद्वारे ही नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.

पोलीस दलातील नियुक्त्या
या कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतातून 45 वेगवेगळ्या स्थानांवरुन हे नवीन कर्मचारी उपस्थित होते. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून प्रामुख्याने पोलीस दलातील नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), सीमा सुरक्षा दल (BSF) आणि सशस्त्र सीमा बल (SSB) यासह विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFS) नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. देशभरातून निवडलेले नवीन उमेदवार, MHA अंतर्गत विविध संस्थांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी), सब-इन्स्पेक्टर (जनरल ड्यूटी) आणि नॉन-जनरल ड्यूटी कॅडर पोस्ट अशा विविध पदांवर लवकरच रुजू होतील.

पोर्टलच्या माध्यमातून दिलं जाणार ऑनलाईन प्रशिक्षण (Rozgar Melava)
नियुक्ती देण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना IGOT- कर्मयोगी पोर्टलच्या माध्यमातून ‘कर्मयोगी प्रारंभ’ च्या अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध असेल. हे कर्मचारी ह्या पोर्टलच्या माध्यमातून कुठेही बसून आपले प्रशिक्षण पुर्ण करू शकतील अशी सुविधा पोर्टलच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या युवकांचे अभिनंदन केले. पोलीस दलात नियुक्ती मिळालेल्या सर्वांना आपण ‘अमृतरक्षक’ आहात असे देखील संबोधले. सरकार युवकांना (Rozgar Melava) सरकारी सेवेत दाखल करून घेण्यासाठी करत असलेल्या चांगल्या बदलांबद्दल त्यांनी माहिती दिली. रोजगार मेळाव्यामार्फत करण्यात आलेल्या नियुक्तीमुळे पोलीस दलाला अधिक बल मिळून पोलीस दल अधिक सक्षम होईल; असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ICG Recruitment 2023 : 12 वी पास उमेदवारांसाठी खुषखबर!! देशाच्या तटरक्षक दलात होणार नवीन उमेदवारांची निवड

ICG Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (ICG Recruitment 2023) उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट हाती आली आहे.  भारतीय तटरक्षक दल अंतर्गत सामान्य कर्तव्य, व्यावसायिक पायलट परवाना, तांत्रिक, कायदा प्रवेश पदांच्या एकूण 46 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ते 15 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard)
भरले जाणारे पद –
1. सामान्य कर्तव्य – 25 पदे
2. व्यावसायिक पायलट परवाना –  —
3. तांत्रिक – 20 पदे
4. कायदा प्रवेश – 01 पद
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 ते 15 सप्टेंबर 2023
पद संख्या – 46 पेक्षा जास्त

परीक्षा फी – रुपये 250/-
वय मर्यादा – (ICG Recruitment 2023)
1. सामान्य कर्तव्य 21 ते 25 वर्ष
2. व्यावसायिक पायलट परवाना 19 ते 25 वर्ष
3. तांत्रिक – 21 ते 45 वर्ष
4. कायदा प्रवेश – 21 – 30 वर्ष
Indian Coast Guard Vacancy 2023

पद  पद संख्या 
सामान्य कर्तव्य 25 पदे
व्यावसायिक पायलट परवाना
तांत्रिक 20 पदे
कायदा प्रवेश 01 पद

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
सामान्य कर्तव्य 12th, Degree
व्यावसायिक पायलट परवाना 12th, Degree
तांत्रिक 12th, Degree
कायदा प्रवेश Degree, LLB

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज  करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे.
4. अपूर्ण अर्ज (ICG Recruitment 2023) नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ते 15 सप्टेंबर 2023 आहे.

भरतीचा तपशील –
ICG Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.indiancoastguard.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MTDC Recruitment 2023 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ देतंय नोकरीची संधी; ‘या’ पदासाठी करा अर्ज

MTDC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत (MTDC Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विशेष कार्य अधिकारी आणि सल्लागार पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (Maharashtra Tourism Development Corporation)
भरले जाणारे पद –
1. विशेष कार्य अधिकारी
2. सल्लागार
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 सप्टेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्यालय, मफतलाल हाऊस, १ ला माळा, एच टी पारेख मार्ग, १६९, बॅकबे रिक्लेमेशन, चर्चगेट, मुंबई ४०००२०.

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
असा करा अर्ज – (MTDC Recruitment 2023)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – (MTDC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – mtdc.co
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC HSC Supplementary Exam Result : 10 वी, 12 वी च्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; असा पहा निकाल

SSC HSC Supplementary Exam Result

करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थ्यांना प्रतिक्षा लागून (SSC HSC Supplementary Exam Result) राहिलेल्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल शिक्षण मंडळाच्या या mahresult.nic.in अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. दहावीची परिक्षा दि. 10 जुलै ते 1 ऑगस्ट 2023 या कालावधीत परीक्षा घेण्यात आली होती; तर बारावीची परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आली होती.

असा पहा निकाल – (SSC HSC Supplementary Exam Result)
1. दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला आहे.
2. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या ‌www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. या माध्यमातून  विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.
3. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल Download तसेच प्रिंट करता येणार आहे.

महत्वाचे – विद्यार्थ्यांना गुण पडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकन या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी दि. 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतील.

उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी काय कराल?
विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करता येणार आहे. जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात आलेल्या पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथमतः ऑनलाईन (SSC HSC Supplementary Exam Result) पद्धतीने अर्ज करुन उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असणार आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पुढील पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यापद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com