GK Updates : कोणत्या देशाला साखरेचा वाडगा म्हणून ओळखले जाते? भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न – ते फळ कोणते आहे, जे अर्धे कापले की भाजीचे नाव होते?
उत्तर – ते फळ म्हणजे आलू बुखारा आहे; जे अर्धे कापल्यावर भाजीचे नाव बनते.
प्रश्न – जगातील (GK Updates) सर्वात लहान नदी कोणती आहे?
उत्तर – रो नदी ही जगातील सर्वात लहान नदी आहे, जी अमेरिकेत आहे.

प्रश्न – महात्मा गांधी कोणत्या गोलमेज परिषदेत सहभागी झाले होते?
उत्तर – महात्मा गांधींनी 1931 मध्ये आयोजित केलेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेतला होता.
प्रश्न – कोणत्या देशाला साखरेचा वाडगा म्हणून ओळखले जाते?
उत्तर – (GK Updates) क्युबा हा एक देश आहे जो साखरेचा वाडगा म्हणून ओळखला जातो.

प्रश्न – भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
उत्तर – भारतातील सर्वात मोठा जिल्हा कच्छ आहे, जो गुजरात राज्यात येतो.
प्रश्न – भारतातील कोणते (GK Updates) शहर हाय-टेक सिटी म्हणून ओळखले जाते?
उत्तर – हैदराबाद हे शहर हाय-टेक सिटी म्हणून ओळखले जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com