GK Updates : कागदाचा शोध कोठे लागला? TV चा शोध कोणी लावला? सोपे वाटणारे प्रश्न ऐनवेळी गोंधळ उडवतात

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 : आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?
उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती
प्रश्न 2 : पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे?
उत्तर : गुरुमुखी
प्रश्न 3 : भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कोणता आहे?
उत्तर : कन्याकुमारी (GK Updates)
प्रश्न 4 : भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?
उत्तर : अरुणाचल प्रदेश
प्रश्न 5 : भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?
उत्तर : विल्यम बेंटिक

प्रश्न 6 : कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला?
उत्तर : चीन
प्रश्न 7 : गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होते?
उत्तर : सिद्धार्थ
प्रश्न 8 (GK Updates) : टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला?
उत्तर : जॉन लोगी बेअर्ड
प्रश्न 9 : नुकतेच ‘बॅन थुओंग’ हे कोणत्या देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत?
उत्तर : व्हिएतनाम.
प्रश्‍न 10 : आशिया खेळाडू बुद्धिबळ महासंघातर्फे नुकताच वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
उत्तर : डी गुकेश.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com