Home Blog Page 355

Google Courses : गुगल ने लॉंच केले 4 फ्री कोर्सेस; घरबसल्या मिळवा तगड्या पागाराची नोकरी

Google Courses

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धेच्या युगात हजारो तरुणांचे शिक्षण (Google Courses) पूर्ण होत आहे मात्र नोकऱ्या मोजक्याच तरुणांना मिळत आहेत. अनेक तरुण नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असतात.

मात्र आजच्या युगात स्पर्धा खूप आहे. सरकारी सोडाच पण खासगी क्षेत्रातही नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी गुगलने असे 4 विनामूल्य कोर्स आणले आहेत जे कोर्स तुम्हाला हमखास नोकरी देवू शकतात.

गुगलने लॉंच केले 4 मोफत ऑनलाइन फ्री कोर्सेस

जगातील सर्वात मोठी कंपनी गुगलने तरुणांसाठी खास ऑनलाइन (Google Courses) कोर्सेस आणले आहेत. तरुण वर्ग यापैकी एक कोर्स करून नोकरी मिळवू शकतो. हे कोर्स विनामूल्य केले जाऊ शकतात. तसेच कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र देखील देण्यात येते.

गुगलकडून मिळालेल्या प्रमाणपत्रामुळे तुम्हाला देश-विदेशातील मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते. त्यामुळे गुगलकडून तरुणांना नोकरी मिळवण्याची एक चांगली संधी निर्माण झाली आहे.

गुगलकडून या 4 मोफत ऑनलाइन अभ्यासक्रमांमध्ये डिजिटल मार्केटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि व्यवसायाशी संबंधित अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

1. डिजिटल मार्केटिंग कोर्स (Google Courses)

आजकाल सर्व जगच डिजिटल झालं आहे. गुगलकडून तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्स करण्याची संधी दिली जात आहे. या कोर्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. हा कोर्स कोणत्याही शिक्षण संस्थेकडून करायचा झाल्यास त्यासाठ लाखो रुपये द्यावे लागतात.

मात्र गुगलकडून डिजिटल मार्केटिंग कोर्स पूर्णपणे मोफत दिला जात आहे. तुम्ही घरबसल्या हा डिजिटल मार्केटिंग कोर्स तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या मदतीने पूर्ण करू शकता. हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला गुगलकडून प्रमाणपत्र दिले जाईल.

2. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्स

येणारा काळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा आहे आणि सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप वेगाने वाढत आहे. आज आर्टिफिशियल इंटेलिजेंस एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने (Google Courses) बहुतेक काम पूर्ण केले जात आहे. चॅटजीपीटी हे त्याचे प्रमुख उदाहरण आहे.

Google स्वतः आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) तंत्रज्ञानावर काम करत आहे, नुकतेच Google ने Google Bard नावाचे स्वतःचे AI टूल देखील आणले आहे. तुम्हालाही आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मध्ये स्वारस्य असल्यास, तुम्ही Google ने ऑनलाइन सुरू केलेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्स विनामूल्य करू शकता.

3. मशीन लर्निंग कोर्स

हा कोर्स गुगलकडून पूर्णपणे मोफत दिला जात आहे. मशीन लर्निंग कोर्स तुम्ही हा कोर्स केल्यास तुम्हाला भारतातील आणि परदेशातील विविध कंपन्यांमध्ये फ्रीलांसर किंवा पूर्णवेळ कर्मचारी म्हणून नोकरी मिळू शकते.

या कोर्सनंतर तुम्हाला घरबसल्या कोणत्याही खाजगी (Google Courses) कंपनीत नोकरी मिळू शकते. तसेच तुम्हाला नोकरी मिळाल्यानंतर लाखो रुपये पगार मिळू शकतो.

4. व्यवसाय अभ्यासक्रम (Google Courses)

सध्या सर्व व्यवसाय ऑनलाइन होत आहेत. सर्व कंपन्या D2C (डायरेक्ट-टू-कंझ्युमर) द्वारे त्यांची उत्पादने विकत आहेत. त्यामुळे ऑनलाइन व्यवसायात मोठी भर पडली आहे.

अशा परिस्थितीत, गुगल फ्री बिझनेस कोर्समध्ये (Google Courses) तुम्हाला बिझनेस स्ट्रॅटेजी, लोकल मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग, ई कॉमर्स, डी2सी या सर्व गोष्टी शिकवल्या जातात.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : वडील तुरुंगात,आई चिंतेत, पण मुलीने मानली नाही हार.. लॉ करुन सुरभी झाली सुप्रीम कोर्टात वकील

Success Story Surabhi Anand

करिअरनामा ऑनलाईन। तुमच्यात एखादी गोष्ट मिळवण्याची इच्छाशक्ती (Success Story) असेल, तर वाटेतील अडचणी तुमचे नुकसान करू शकत नाहीत. तुम्ही निश्चित ध्येयापर्यंत पोहचाल यात वाद नाही. बिहारचे माजी खासदार बाहुबली आनंद मोहन सिंग यांची मुलगी सुरभी आनंदचीही अशीच कहाणी आहे. सुरभीचे वडील तुरुंगात असतानाही सुरभी आनंदसमोर अडचणी काही कमी नव्हत्या. वडील तुरुंगात असल्याने घरात आई काळजीत होती आणि अशा परिस्थितीत सुरभिला  तिचा अभ्यास पूर्ण करायचा होता, चला तर मग जाणून घेऊया सुरभीने कशी मिळवली कायद्याची पदवी….

Success Story Surabhi Anand

स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबातील सुरभी (Success Story)

सुरभी आनंद ही सर्वोच्च न्यायालयात वकील आहे. ती स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबातील आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ‘कोसीचे गांधी’ म्हणून प्रसिद्ध असलेले तिचे पणजोबा राम बहादूर सिंह, आजोबा माणिक प्रसाद सिंह आणि मोठे आजोबा ब्रह्मचारी बाबू यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Success Story Surabhi Anand

पुण्यात घेतलं शिक्षण

सुरभी आनंदने पुण्याच्या सिम्बायोसिस लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी घेतली आहे. तिचे पती राजहंस सिंग आणि सुरभी आनंद यांचे कुटुंबीय एकमेकांना (Success Story) अनेक वर्षांपासून ओळखतात. राजहंस आणि सुरभीचा भाऊ चेतन आनंद चांगले मित्र आहेत.

 

 

Success Story Surabhi Anand

वडील तुरुंगात… आईने दिले शिक्षण

सुरभी आनंद भारताच्या सर्वोच्च न्यायालयात कायद्याचे प्रॅक्टिस करते. कायद्याच्या विश्वातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व राम जेठमलानी यांच्याकडून तिने कायद्याचे बारकावे शिकले (Success Story) आहेत. सुरभी आनंदच्या इंस्टाग्राम पोस्टनुसार ती सध्या पाटणा हायकोर्टात प्रॅक्टिस करत आहे. वडील आनंद मोहन तुरुंगात गेल्यानंतर, सुरभी आणि तिच्या भावाचे पालनपोषण आणि शिक्षण तिची आई लवली आनंद यांनी केले.

शाही विवाहाची चर्चा (Success Story)

सुरभी आनंद ही बिहारच्या पॉवरफूल नेते आनंद मोहन आणि माजी खासदार लवली सिंग यांची मुलगी आहे. IRTS अधिकारी राजहंस सिंह याच्या सोबतच्या शाही विवाहामुळे सुरभी खूप चर्चेत होती. सुरभी आनंद सिंगची हळद, मेहंदी आणि लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. तिने घरातील चिंतित वातावरणावर मात करत आपले शिक्षण पूर्ण केले. आज आपण तिच्या करिअरविषयी जाणून घेऊया.

Success Story Surabhi Anand

सुरभी आनंद आणि राजहंस सिंह यांच्या लग्नाची चांगलीच चर्चा होती. त्यांच्या लग्नासाठी सुमारे 15 हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या शाही लग्नात बिहारचे (Success Story) मुख्यमंत्री नितीश कुमार हे वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले होते. सुरभी आनंद-राजहंस सिंहचे लग्न बैरिया कर्णपुरा गावातील विश्वनाथ फार्म हाऊसमध्ये झाले आहे. या लग्नासाठी सुरभी आनंदचे वडील आनंद मोहन पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आले होते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : 200, 500 आणि 2000 च्या नोटा छापण्यासाठी किती खर्च येतो?

GK Updates 26 Feb

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षा ही सर्वात अनिश्चित परीक्षा (GK Updates) मानली जाते. या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याची कल्पना करणे कठीणच. UPSCची परीक्षा प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते. मुलाखतीत व्यक्तिमत्व चाचणी संदर्भातील प्रश्न विचारले जातात. मुलाखतीत चांगली कामगिरी केल्यास निवड होण्याची शक्यता जास्त असते. आम्ही तुम्हाला MPSC तसेच UPSC च्या मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते; आणि तुमच्या ज्ञानात भर पडू शकते. चला तर मग पाहूया…

1. पुरुषांमध्ये वाढणारी अशी कोणती गोष्ट आहे जी महिलांमध्ये नाही?

उत्तर – दाढी / मिश्या

2. 200, 500 आणि 2000 च्या नोटा छापण्यासाठी किती खर्च येतो?

उत्तर – रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार 200 रुपयांची नोट छापण्याची किंमत 2.93 रुपये आहे तर 500 ची नोट छापण्याची किंमत 2.94 रुपये आणि 2000 ची नोट छापण्याची 3.54 रुपये खरच येतो.

3. अशी कोणती वस्तू आहे जो परिधान करणारा स्वत:साठी खरेदी करु शकत नाही?

उत्तर – कफन

4. मानवी शरीराचा कोणता भाग दर दोन महिन्यांनी बदलतो?

उत्तर – मेंदू

5. 404 Error म्हणजे काय? यामध्ये 404 असे का लिहीले जाते ?

उत्तर – वेब पेज न उघडले गेल्यास सर्व सर्च इंजिनमध्ये एरर दाखवण्यासाठी 404 नंबरला मान्यता देण्यात आलीय.

6. विमानात प्रवासादरम्यान बाळाचा जन्म झाल्यास त्याचे नागरिकत्व काय असेल?

उत्तर – (GK Updates) भारताच्या नागरिकत्व नियमानुसार जर मुलाच्या पालकांचे नागरिकत्व भारतीय असेल तर मूल जरी भारताबाहेर जन्माला आले तरीसुद्धा मूल भारतीयच असेल.

7. कोणाचा जन्मदिन दरवर्षी साजरा होत नाही?

उत्तर – 29 फेब्रुवारी रोजी जन्मलेली व्यक्ती

8. व्हिटॅमिनचा शोध कोणाला लावला? (GK Updates)

उत्तर – Casimir Funk या शास्त्रज्ञाने फळे आणि भाज्यांमध्ये जीवनसत्त्वांचा शोध लावला.

9. कोणत्या प्राण्याचे दूध गुलाबी रंगाचे आहे?

उत्तर – हिप्पो

10. कोंबडीने भारत-पाकिस्तान बॉर्डरवर अंडे दिले तर ते अंडे कोणाचे असेल ?

उत्तर – कोंबडीचे (GK Updates)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Pilot Career : 12वी नंतर Air Force मध्ये Pilot होण्यासाठी ‘या’ परीक्षा द्या; तुमचा जॉब फिक्स समजा

Pilot Career

करिअरनामा ऑनलाईन । पायलट होणं हे भारतीय हवाई दलातील सर्वात (Pilot Career) प्रतिष्ठित पद आहे. भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून सामील होण्यासाठी अनेक मार्ग आहेत. आजच्या या पोस्टमधून आम्ही तुम्हाला भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रवेश, पात्रता आणि पात्रता निकष सांगणार आहोत.

1. NDA परीक्षा

16.5 ते 19.5 वर्षे वयोगटातील तरुण पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी UPSC द्वारे NDA परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. भारतीय हवाई दलाचे वैमानिक होण्यासाठी पात्र ठरलेले (Pilot Career) उमेदवार NDA मध्ये कायमस्वरूपी कमीशन अधिकारी म्हणून प्रशिक्षण घेतल्यानंतर हवाई दल अकादमीमध्ये प्रशिक्षणासाठी जातात.

निकष – अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवार

वय मर्यादा – 16.5 वर्षे ते 19.5 वर्षे

शिक्षण – उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण किंवा उत्तीर्ण झालेला असावा.

2. CDS परीक्षा (Pilot Career)

UPSC द्वारे CDS परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. जे उमेदवार एअर फोर्स अकादमी (AFA) साठी या परीक्षेत पात्र ठरतात ते प्रशिक्षण प्रक्रियेतून जातात. प्रशिक्षणानंतर, त्यांना कोणत्याही IAF स्टेशनवर कायमस्वरूपी कमीशन अधिकारी म्हणून नियुक्त केले जाते.

निकष – केवळ अविवाहित पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात.

वय मर्यादा – 20 ते 24 वर्षे

शिक्षण – उमेदवाराकडे पदवी (10+2 स्तरावर भौतिकशास्त्र आणि गणितासह) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकीमध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे.

अंतिम वर्ष/सेमिस्टर पदवी अभ्यासक्रमात शिकणारे आणि अंतिम वर्ष पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार देखील CDS परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. त्यांच्याकडे शेवटच्या सेमिस्टर/वर्षापर्यंत कोणताही वर्तमान अनुशेष नसावा ज्याचा निकाल अर्ज सादर करताना घोषित करण्यात आला आहे. त्यांना अभ्यासक्रम सुरू करताना पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. (Pilot Career)

3. NCC परीक्षा

आता एनसीसी स्पेशल एंट्रीसाठी येत आहे, ती फक्त एअर विंग सीनियर डिव्हिजन ‘सी’ प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांसाठी आहे. डायरेक्टरेट जनरल नॅशनल कॅडेट कॉर्प्स किंवा तुमच्या संबंधित एनसीसी एअर स्क्वाड्रनद्वारे सामील होणे शक्य आहे.

निकष –

1. अविवाहित पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात.

2. कायमस्वरूपी कमिशन हे पुरुष उमेदवारांसाठी आहे आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशन पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवारांसाठी आहे.

वय मर्यादा – 20 ते 24 वर्षे (Pilot Career)

शिक्षण –

उमेदवारांनी भौतिकशास्त्र आणि गणितात किमान 50% गुणांसह 10+2 स्तर उत्तीर्ण केलेला असावा.

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून भौतिकशास्त्र आणि गणितात किमान 60% गुणांसह तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रमासह BE/B.Tech पूर्ण केलेले असावे.

उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स (इंडिया) / एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या असोसिएट मेंबरशिपची A आणि B परीक्षा 60% किंवा समतुल्य गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.

4. AFCAT परीक्षा

एएफसीएटी परीक्षेत पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवारांना परवानगी आहे. ही परीक्षा IAF द्वारे 14 वर्षांच्या कालावधीसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड ऑफिसरसाठी वर्षातून दोनदा घेतली जाते. भारतीय हवाई दलात वैमानिक होण्यासाठी उमेदवारांना तांत्रिक आणि ग्राउंड ड्युटी शाखांसाठी भरती केली जाते.

वय मर्यादा – 20 ते 24 वर्षे

DGCA (भारत) द्वारे जारी केलेले व्यावसायिक पायलट परवाना असलेल्या उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादा 26 वर्षांपर्यंत (कोर्स सुरू होण्याच्या वेळी) शिथिल आहे.

शिक्षण – उमेदवाराला 10+2 स्तरावर गणित आणि (Pilot Career) भौतिकशास्त्रात प्रत्येकी 60% गुण असणे आवश्यक आहे. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर (तीन वर्षांचा अभ्यासक्रम) असणे आवश्यक आहे आणि किमान 60% गुण किंवा त्याच्या समकक्ष किंवा उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून BE/B.Tech (चार वर्षांचा कोर्स) किमान 60% गुणांसह किंवा त्याच्या समकक्ष असणे आवश्यक आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Talathi Bharti : तलाठी भरतीची प्रतीक्षा संपली; ‘या’ तारखेपासून सुरु होणार भरती प्रक्रिया

Talathi Bharti

करिअरनामा ऑनलाईन। तलाठी भरतीची बरेच जण आतुरतेने वाट पाहत (Talathi Bharti) आहेत. त्याविषयीचे वेगवेगळे अपडेट्स सतत वाचायला मिळत असतात. या भरतीच्या माध्यमातून सुमारे साडे तीन ते साडे चार हजार पदे भरली जाणार आहेत. अधिकृत शासन निर्णयानुसार ही पदे भरण्यासाठीची जाहिरात काही अद्याप प्रसिद्ध झाली नाही. ही जाहिरात जानेवारी अखेरपर्यंत येणं अपेक्षित होतं. पण अंतर्गत व शासकीय कामांमुळे जाहीरात येण्यास उशीर होत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तलाठी भरती ऑगस्ट 2023 पर्यंत पुर्ण होणार आहे. यासंदर्भातील अधिकृत जाहिरात मार्च महिन्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भरतीसाठी इच्छुकांनी अभ्यासासाची तयारी करणे अपेक्षित आहे.

कोणत्या विभागात किती पदे –

  1. नाशिक – 803 पदे
  2. औरंगाबाद – 799 पदे
  3. कोकण – 641 पदे
  4. नागपूर – 550 पदे
  5. अमरावती – 124 पदे
  6. पुणे – 702 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Talathi Bharti)

  1. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
  2. MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
  3. मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.

वय मर्यादा –

  1. 18 ते 35 वर्षे
  2. खेळाडूंना 5 वर्षे सूट (Talathi Bharti)
  3. प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/अपंग यांच्यासाठी 7 वर्षे सूट असेल.

मिळणारे वेतन – 

विविध जिल्ह्यांतील तलाठी (Talathi)- 5,200/- ते रु. 20,200/-.रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. शाळा सोडल्याचा दाखला (Talathi Bharti)
  2. 10 वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट
  3. 12 वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट
  4. पदवी प्रमाणपत्र
  5. पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र
  6. इतर शैक्षणिक कागदपत्रे
  7. अधिवास प्रमाणपत्र
  8. राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
  9. जातीचा दाखला
  10. नॉन क्रिमिलियर
  11. जात वैधता प्रमाणपत्र

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Recruitment 2023 : MPSC ने 673 जागांवर जाहीर केली नवीन भरती; वाचा कोणती पदे भरली जाणार

MPSC Recruitment 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (MPSC Recruitment 2023) राज्यातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 673 पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र लोकसेवा आयोग

भरली जाणारी पदे – (MPSC Recruitment 2023)

  1. सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ
  2. उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब
  3. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ
  4. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा
  5. महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा, गट-ब
  6. निरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब
  7. अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा, गट-ब

पद संख्या – 673 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ

01) सांविधिक विदयापीठाची, किमान 55 टक्क्यांसह वाणिज्य शाखेची स्नातक पदवी, किंवा 02) इन्स्टिटयुट ऑफ चार्टर्ड अकांऊटस ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा 03) इन्स्टिटयुट ऑफ कॉस्ट अॅण्ड वर्क्स अकांऊटस यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा 04) सांविधिक विदयापीठाची वाणिज्य मधील पदव्युतर पदवी, किंवा 05) अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञतेसह पदवी (एम.बी.ए).

2) उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब
शैक्षणिक पात्रता : 01) सांविधिक विदयापीठाची अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना (MPSC Recruitment 2023) इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा 02) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.

3) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ
शैक्षणिक पात्रता : 01) यांत्रिकी किंवा स्वयंचलित्र (ऑटोमोबाईल) अभियांत्रिकीमधील किमान 4 वर्षांची पदवी 02) मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला, गिअर्स, हलकी मोटार वाहने आणि परिवहन वाहने (अवजड मालवाहू वाहने व अवजड प्रवासी वाहने) यांसह मोटार सायकल चालविण्यासाठी प्राधिकृत करणाऱ्या सक्षम प्राधिकरणाने दिलेले वाहन चालविण्याचे वैध लायसन आवश्यक.

4) स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्या पदवीशी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता 02) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी 03) बी.ई. / बी.टेक.

5) महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा, गट-ब
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकीमधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता. 02) विद्युत अभियांत्रिकी पदवी. 03) बी.ई. / बी.टेक.

6) निरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब
शैक्षणिक पात्रता : सांविधानीक विद्यापीठाची मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्पुटर इंजिनिअरींग मधील पदवी किंवा विज्ञान शाखेची (ज्यामधील एक विषय भौतिक शास्त्र असेल) पदवी

7) अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा, गट-ब (MPSC Recruitment 2023)
शैक्षणिक पात्रता : 01) अन्न तंत्रज्ञान किंवा डेअरी तंत्रज्ञान किंवा जैव तंत्रज्ञान किंवा तेल तंत्रज्ञान किंवा कृषि शास्त्र किंवा पशु वैद्यकीय शास्त्र किंवा जैव रसायन किंवा सुक्ष्मजीवशास्त्र किंवा रसायन शास्त्र किंवा वैद्यकशास्त्र या विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, पदव्युत्तर पदवी किंवा डॉक्टरेट (Doctorate). 02) केंद्रशासनाच्या मान्यतेचे अन्न प्राधिकरणाने अधिसूचित केलेल्या समतुल्य किंवा मान्यताप्राप्त अर्हता.

वय मर्यादा –

  1. 01 एप्रिल 2023 रोजी [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ – 05 वर्षे सूट]
  2. खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे
  3. मागास प्रवर्ग – 18 ते 43 वर्षे
  4. खेळाडू – 18 ते 43 वर्षे
  5. दिव्यांग – 18 ते 45 वर्षे

परीक्षा फी –

394/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/ दिव्यांग – 294/- रुपये]

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा दिनांक – 04 जून 2023 रोजी

काही महत्वाच्या लिंक्स – (MPSC Recruitment 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.mpsc.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : वाहनांचे टायर काळेच का असतात? कारणही तसंच आहे; जाणून घ्या सविस्तर

GK Updates 25 Feb

करिअरनामा ऑनलाईन । रस्त्यावर तुम्ही दुचाकी, तीन चाकी, चार चाकी एवढच (GK Updates) नव्हे तर उंच उडणाऱ्या विमानाची  चाके पाहिली असतील. पण सर्व वाहनांचे टायर नेहमी काळे का असतात हा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? लहान कार असो वा मोठा ट्रक, सर्व प्रकारच्या वाहनांचे टायर काळेच असतात. जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल तर यामागील विज्ञान आज आपण जाणून घेऊया.

काय आहे वैज्ञानिक कारण (GK Updates)

तुम्हाला माहित असेलच की, कारचे टायर रबराचे असतात. रबराचा रंग राखाडी असला तरी रबर टायर बनवण्याच्या प्रक्रियेत त्याचा रंग काळा होतो.

काळे टायर जास्त काळ टिकतात, त्यामुळे टायरचा रंग काळा असतो. वास्तविक, टायर बनवण्यासाठी रबरमध्ये ब्लॅक कार्बन (black carbon) आणि सल्फर (sulphur) मिसळले जातात. यामुळे (GK Updates) टायरचा रंग काळा होतो.

नैसर्गिक रबर खूप मऊ आहे. टायर बनवण्यासाठी ते कडक केले जाते. कार्बन आणि सल्फर फक्त कडक करण्यासाठी त्यात मिसळले जाते. यामुळेच टायरचा रंग काळा असतो.

जर रबरमध्ये कार्बन आणि सल्फर मिसळले नाही, तर त्यापासून बनवलेले टायर अत्यंत निकृष्ट दर्जाचे असतील. त्याच वेळी, कमी वापरामुळे हे टायर झिजतात आणि (GK Updates) खराब होतात. यामुळेच टायर रंगीत नसून काळ्या रंगाचे असतात.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Salary Increment : जागतिक मंदीची ऐशी तैशी!! भारतीयांसाठी गुड न्यूज; कंपन्या तुमचा पगार वाढवणार; वाचा किती?

Salary Increment

करिअरनामा ऑनलाईन । 2023 चे आर्थिक वर्ष लवकरच संपणार आहे (Salary Increment) आणि कंपन्यांनी पगार वाढीची प्रक्रिया सुरु केली आहे. जागतिक पातळीवर अस्थिरता असली तरी यंदा भारतीयांच्या पगारात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. विविध क्षेत्रातील कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ करु शकतात. त्यामुळे यंदा कर्मचाऱ्यांची बल्ले बल्ले होणार आहे. आता कर्मचाऱ्यांना प्रश्न पडला असेल की, त्यांच्या पगारात किती वाढ होईल? काही एजन्सीज दरवर्षी अनेक कंपन्यांमध्ये सर्व्हे करतात. त्याआधारे कोणत्या क्षेत्रातील कंपन्या किती पगारवाढ करणार आहेत याचा अंदाज बांधण्यात येतो. व्यावसायिक सेवा देणारी संस्था एओन इंडियाने (Aon India) याविषयीचा अंदाज वर्तविला आहे. कंपनीच्या मते, यंदा भारतीय कंपन्या सरासरी 10.3 टक्क्यांची पगारवाढ देतील. जागतिक मंदीचे कारण असले तरी भारतीयांना चांगले इन्क्रिमेंट मिळेल. कोणत्याही परिस्थितीत कंपन्या ब्रेन ड्रेन होणार नाही, चांगले कर्मचारी पगारासाठी दुसरीकडे जाणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल.

कर्मचाऱ्यांची पळवापळवी

काही कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची 21.4 टक्के पळवापळवी झाली आहे. टॅलेंट स्ट्रॅटेजीमध्ये मोठा बदल झाला आहे. पुरवठा साखळीत तफावत झाल्यामुळे कंपन्यांनी दुहेरी अंकी वेतनवाढ केली आहे. त्यामुळे कंपन्यांमध्ये दोन अंकी पगारवाढ होईल, असा दावा एओन इंडियाने केला आहे.

वाढती आर्थिक अनिश्चितता, आर्थिक अस्थिरता यामुळे गेल्या दोन वर्षांपासून पगारवाढीचा मुद्दा ऐरणीवर नव्हता. यंदाही या बाबींचा इन्क्रिमेंटवर परिणाम होईल. अशा परिस्थितीत (Salary Increment) मागील दोन वर्षांत भारतीय कंपन्यांनी चांगली पगार वाढ दिली होती. तर काही कंपन्यांना वाढत्या खर्चाला आळा घालायचा होता. वर्ष 2020 आणि 2021 मध्ये कोरोना महामारीमुळे पगार वाढ देण्यात आली नाही.

दोन अंकी पगारवाढ (Salary Increment)

एओनच्या रिपोर्टनुसार, जवळपास 46 टक्के भारतीय कंपन्या कर्मचाऱ्यांना दोन अंकी पगार वाढ देण्याच्या तयारीत आहेत. 2022 मध्ये कंपन्या सरासरी 10.6 टक्के पगारवाढ देण्यात आली होती. त्यामुळे कर्मचारी जाम खूश झाले होते. यंदाही कर्मचाऱ्यांना जोरदार वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. महागाईशी सामना करण्यासाठी ही रक्कम बुस्टर डोस ठरणार आहे. त्यामुळे महागाईपासून सूटकेसाठी ही पगारवाढ फायद्याची ठरणार आहे.

सर्व्हे काय सांगतो

एओनने या अभ्यासासाठी 40 क्षेत्रातील जवळपास 1400 कंपन्यांच्या आकड्यांचे विश्लेषण केले. एचआर आणि व्यवस्थापनातील दिग्गजांशी, तज्ज्ञांशी (Salary Increment) चर्चा केली. सर्व्हेनुसार, टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म्स आणि प्रोडक्टस तयार करणाऱ्या कंपन्या यावर्षी सरासरी 10.9 टक्के इन्क्रिमेंट करतील. कुशल मनुष्यबळ टिकवून ठेवण्यावर कंपन्या जोर देत आहेत. तसेच त्यांना कर्मचारी प्रतिस्पर्धी कंपन्यांकडे जाऊ द्यायचे नाहीत.

‘या’ क्षेत्रात चांगल्या पगारवाढीची शक्यता

या रिपोर्टनुसार, तंत्रज्ञान आणि उत्पादनांशी संबंधित कंपन्याकडून 2023 मध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यात येणार आहे. या क्षेत्रातील पगार सरासरी 10.9 टक्क्यांनी (Salary Increment) वाढतील. अलीकडेच विप्रोने फ्रेशर्सना दिलेली पगाराची ऑफर कमी केल्यावर हा रिपोर्च समोर आला आहे. घरी बसण्यापेक्षा कमी पगारात काम करण्याची ऑफर विप्रो कंपनीने फ्रेशर्सना दिली. कंपनीने वार्षिक ऑफर 6.5 लाख रुपयांवरून 3.5 लाख रुपये करण्यात आली आहे.

काही कंपन्यांनी इन्क्रिमेंटच्या पंरपरेला फाटा दिला आहे. फ्लिपकार्टसह काही कर्मचाऱ्यांना पगार वाढीला यंदा नकारघंटा दिली आहे. तर काही कंपन्यांनी मोठी पगारवाढ न (Salary Increment) देता मध्यममार्ग निवडला आहे. या कंपन्या इतर सोयी-सुविधा वाढविण्यावर भर देत आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MahaBeej Recruitment 2023 : राज्याच्या बियाणे महामंडळात भरती सुरु; मिळवा लाखोत पगार आणि इतर सुविधा

MahaBeej Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित,अकोला (MahaBeej Recruitment 2023) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 मार्च 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला

पद संख्या – 04 पदे

रिक्त पदाचे नाव आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MahaBeej Recruitment 2023)

1. महाव्यवस्थापक (विपणन) / General Manager (Marketing) – 01 पद

उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त कृषी विभाग विद्यापीठ / कृषी संस्थामधून बी.एस्सी. (कृषी/ फलोत्पादन/) मध्ये पदवीधर कृषी व्यवसाय व्यवस्थापन/वनीकरण) आणि नामांकित संस्थापासून व्यवसाय व्यवस्थापन (मार्केटिंग) मध्ये पदव्युत्तर पदवी घेतली असणे आवश्यक आहे. तसेच 08 वर्षे अनुभव आवश्यक.

2. उपमहाव्यवस्थापक (वित्त आणि लेखा) / Deputy General Manager (Finance & Accounts) – 01 पद

उमेदवाराकडे  चार्टर्ड अकाउंटंट / इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड/ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट ऑफ इंडियाचे सदस्यत्व असलेले कॉस्ट अकाउंटंट असणे आवश्यक. (MahaBeej Recruitment 2023)

3. उपमहाव्यवस्थापक (प्रोसेसिंग) / Deputy General Manager (Processing) – 01 पद

उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त कृषी विभागातून विद्यापीठ/ कृषी संस्था/ अभियांत्रिकी संस्थापासून (कृषी अभियांत्रिकीमध्ये) बी.टेक. पूर्ण केले असावे. तसेच 05 वर्षे अनुभव आवश्यक.

4. उपमहाव्यवस्थापक (उत्पादन) / Deputy General Manager (Production) – 01 पद

उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठ/कृषीकडील तंत्रज्ञान संस्थामधून कृषीशास्त्र / वनस्पती प्रजनन / अनुवांशिक / वनस्पतिशास्त्र आणि बियाणे मध्ये पदव्युत्तर (MahaBeej Recruitment 2023) पदवीपर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक. तसेच 06 वर्षे अनुभव असणे आवश्यक.

वय मर्यादा –

13 मार्च 2023 रोजी, 40 ते 50 वर्षापर्यंत

परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन – (MahaBeej Recruitment 2023)

  1. महाव्यवस्थापक (विपणन) – Rs. 1,23,100-2,15,900 /- दरमहा
  2. उपमहाव्यवस्थापक (वित्त आणि लेखा) – Rs. 71,100-2,19,100 /- दरमहा
  3. उपमहाव्यवस्थापक (प्रोसेसिंग) – Rs. 71100-219100/- दरमहा
  4. उपमहाव्यवस्थापक (उत्पादन) – Rs. 71100-219100/- दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – अकोला (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 13 मार्च 2023 (MahaBeej Recruitment 2023)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – “The General Manager (Admin), Maharashtra State Seeds Corporation Limited, Mahabeej Bhavan, Krishi Nagar, Akola (MS) 444 104.”

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – mahabeej.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Air India : एअर इंडियाकडून टॅलेंटेड युवकांना नोकरीचा चान्स; 900 पायलट आणि 4,200 केबीन क्रू पदाची बंपर भरती

Air India

करिअरनामा ऑनलाईन । एअर इंडियामध्ये नोकरी करु इच्छिणाऱ्या (Air India) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एअर इंडिया यंदा 9000 वैमानिक आणि 4,200 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. कंपनीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सेवेचा विस्तार करण्याची योजना आखली असून त्याचाच भाग म्हणून ही भरती केली जाणार आहे.

वैमानिकांबरोबरच देखभाल अभियंत्यांचीही मोठय़ा प्रमाणात भरती केली जाणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे, करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच एअर इंडियाने बोईंग आणि एअरबस या कंपन्यांकडून 70 मोठय़ा विमानांसह 470 विमाने खरेदी करण्याचे जाहीर केले होते. त्याशिवाय 36 विमाने (Air India) भाडय़ाने घेतली जाणार आहेत. त्यापैकी दोन ‘777-200 एलआर’ विमाने एअर इंडियाच्या ताफ्यात दाखलही झाली आहेत. टाटा समूहाने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये तोटय़ातील एअर इंडिया 18 हजार कोटींना खरेदी केली होती. त्यानंतर कंपनीने आपला आकार आणि सेवा या दोन्हींचा विस्तार करण्याची योजना आखली. त्याअंतर्गत मे-2022 ते फेब्रुवारी 2023 या काळात एअर इंडियाने 1,900 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती केली आणि 1,100 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले, अशी माहिती कंपनीतर्फे देण्यात आली. टॅलेंटेड युवकांना संधी दिल्याने एअर इंडियाच्या सांस्कृतिक परिवर्तनाचा वेग वाढेल, असे कंपनीने म्हटले आहे.

प्रशिक्षणात काय शिकाल (Air India)

एअर इंडियामध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना 15 आठवडय़ांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यामध्ये त्यांना सुरक्षा आणि सेवा कौशल्ये शिकवली जातील. तसेच त्यांना भारतीय आदरातिथ्य आणि टाटा समूहाची संस्कृती यांचा सर्वोत्तम मिलाफ घडवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली.

हजारो पायलट्सची गरज

‘एअर इंडिया’ आणि ‘विस्तारा’ तसेच ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ आणि ‘एअरएशिया इंडिया’च्या विलीनीकरणानंतर एअर इंडिया समूहाला आपल्या विस्तारित विमान ताफ्यासाठी (Air India) हजारो वैमानिकांची आवश्यकता आहे. काही वृत्तांनुसार कंपनीला 6500 हून अधिक वैमानिकांची आवश्यकता असल्याचे म्हटले जाते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com