Home Blog Page 275

RCFL Recruitment 2023 : डिप्लोमा/ग्रॅज्युएशन/BE/ B.Tech उमेदवारांसाठी सरकारी नोकरी!! RCFL अंतर्गत 124 पदांवर भरती

RCFL Recruitment 2023 (7)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय केमिकल्स (RCFL Recruitment 2023) अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 124 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई
भरले जाणारे पद – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 124 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 ऑगस्ट 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 27 वर्षे

अर्ज फी – रु. 1000/-
निवड प्रक्रिया – मुलाखत
काही महत्वाच्या तारखा – (RCFL Recruitment 2023)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Diploma, BE/ B.Tech, Graduation
मिळणारे वेतन – Rs.30, 000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून (RCFL Recruitment 2023) आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://www.rcfltd.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Jalsampada Vibhag Bharti 2023 : राज्याच्या जलसंपदा विभागात होणार मेगाभरती; 16,185 रिक्त पदे भरणार

Jalsampada Vibhag Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी (Jalsampada Vibhag Bharti 2023) मोठी अपडेट हाती आली आहे. महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागात लवकरच मोठ्या प्रमाणावर पद भरती होणार आहे. अनेक वर्षांपासून जलसंपदा विभागातील नोकर भरती रखडली होती. 2013 मध्ये म्हणजे तब्बल 10 वर्षापूर्वी या विभागात पदभरती झाली होती. आता पुन्हा पद भरती होण्याची शक्यता आहे. पुढील महिना त्यादृष्टीने महत्वाचा ठरणार आहे. या महिन्यात पदभरती होऊ शकते. त्यामुळे तरुणांनी आतापासूनच या पद भरतीची तयारी करणे फायद्याचे ठरणार आहे. राज्य शासनाने याविषयीची अधिकृत माहिती दिली नसली तरी, जलसंपदा विभागात पद भरती होण्याची चर्चा आहे.

अनेक दिवसांपासून होतेय चर्चा
राज्य सरकारच्या जलसंपदा विभागात अनेक दिवसांपासून पद भरती होण्याची चर्चा सुरु आहे. मध्यंतरी कोरोना काळात सर्वच प्रक्रिया थंडावल्या होत्या. पण आता निवडणुकांचा लवकरच (Jalsampada Vibhag Bharti 2023) हंगाम सुरु होईल. त्याअगोदर राज्य सरकार तरुणांना सरकारी नोकरी देण्याची तयारी करु शकते. यासंबंधीची अधिकृत कोणतीही माहिती नसली तरी नोकरी भरतीची चर्चा रंगली आहे.

इतकी पदे आहेत रिक्त 
राज्याच्या जलसंपदा विभागात एकूण 16,185 जागांसाठी नोकर भरती होण्याची शक्यता आहे. 15 ऑगस्ट 2023 पूर्वी  याविषयीची अधिसूचना जारी होऊ शकते. जलसंपदा (Jalsampada Vibhag Bharti 2023) विभागात गट क संवर्गात सरळसेवा पध्दतीने भरती होईल. एकूण 8,014 जागा सरळसेवा पद्धतीने भरण्यात येतील. तर पदोन्नतीने 3,163 जागांची भरती करण्यात येणार आहे. एकूण 16,185 जागांसाठी नोकर भरती करण्यात येणार आहे.

WRD Maharashtra Bharti 2023

गट ड पदासाठी भरती (Jalsampada Vibhag Bharti 2023)
गट ड संवर्गातील जागा सरळसेवा पद्धतीने भरण्यात येतील. एकूण 4,702 जागा थेट पद्धतीने भरता येईल. 306 जागा पदोन्नतीने भरता येतील. एकूण 5,008 पदे भरण्यात येणार आहेत. गट क आणि ड संवर्गातील मिळून सुमारे 16,185 जागांसाठी मेगा नोकर भरती करण्यात येईल. जलसंपदा विभागात 2013 पासून कोणतीही नोकर भरती झालेली नाही. त्यामुळे या विभागात रिक्त पदांचा अनुशेष वाढला आहे. लवकरच हा अनुशेष दूर करण्यात येईल, अशी शक्यता आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Top Colleges in Pune for Commerce : पुण्यातील टॉप 5 कॉमर्स कॉलेजेस कोणते? पहा संपूर्ण यादी 

Commerce Colleges in Pune

Top Colleges in Pune for Commerce । कॉमर्स शिकण्यासाठी कॉलेज  निवडण्याबाबत संभ्रमात आहात? तर मग तुमच्या समस्यांचे निराकरण आम्ही करणार आहोत. पुण्यातील सर्वोत्तम 5 वाणिज्य महाविद्यालयांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. दरवर्षी पदवी शिक्षणासाठी देशभरातून विद्यार्थी पुण्यात येतात. उच्च दर्जाच्या शिक्षणाबरोबर सुंदर हिल स्टेशन्स, नाईटलाइफ आणि अस्सल महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीबद्दल आकर्षणापोटी  महाराष्ट्रासह देशातील अनेक विद्यार्थी पुण्यात शिक्षण घेण्यासाठी आग्रही असतात.

कॉमर्स हे अभ्यासाच्या सर्वात वैविध्यपूर्ण क्षेत्रांपैकी एक आहे ज्यामध्ये अनेक नोकऱ्या आणि करिअर पर्यायांचा समावेश आहे. वाणिज्य क्षेत्रातील हा व्यापक दृष्टीकोन विद्यार्थ्यांना आकर्षित करतो कारण त्यात व्यवसाय विपणन, स्टॉक, वित्त, जाहिरात, संप्रेषण यासारख्या क्षेत्रांचा समावेश होतो. पुण्यामध्ये अनेक महविद्यालये आहेत; पण यामध्ये वाणिज्य शाखेत टॉप चे शिक्षण देणाऱ्या 5 महाविद्यालयांपैकी आज आपण जाणून घेणार आहोत.

Brihan Maharashtra College of Commerce (BMMC College, Pune)
BMCC College Pune

Sir Parshurambhau College (SP College, Pune)

SP College Pune

FC College Pune

Ness Wadia College of Commerce

Ness Wadia College of Commerce Pune

MMCC college pune

mmcc college pune

Agriculture Courses After 12th : कृषी क्षेत्रात शिक्षण घेऊन करा करिअर; लाखात मिळणार पगार!! जाणून घ्या ‘या’ खास अभ्यासक्रमांबद्दल

Agriculture Courses After 12th

करिअरनामा ऑनलाईन । आधुनिकीकरणाच्या या (Agriculture Courses After 12th) युगात जास्तीत जास्त तरुण कृषी क्षेत्राकडे वळत आहेत. आधुनिक शेती तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवीन संधी उपलब्ध करुन देत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने शेतीमध्ये नवनवीन कल्पना जन्माला आल्या आहेत आणि त्याबरोबर अधिक प्रमाणात तरुणांचा कल शेतीकडे वळला आहे. आजकाल कृषी विषयातील अनेक अभ्यासक्रम टॉप ट्रेंडमध्ये आहेत. या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून तरुणांना शेतीशी संबंधित उत्तम माहिती मिळणार आहे. ज्याच्या जोरावर तरुणांना नवीन क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळणार आहे. या क्षेत्रात तरुणांना लाखो नोकऱ्या सहज मिळू शकतात; याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत….

शेतीमधील करिअरमधून होईल लाखोंची कमाई
वैज्ञानिक शेतीमुळे देशातील शेतकरी स्वावलंबी होत आहेत. आधुनिक पद्धतीची शेती उत्पादनात वाढ करत असतानाच जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठीही प्रभावी ठरत आहे. त्यामुळेच आता शेतकरी आपल्या शेतातील मातीची चाचणी करून खतांचे प्रमाण ठरवू शकतात. अशा (Agriculture Courses After 12th) परिस्थितीत कृषी, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, वनीकरण, फलोत्पादन, अन्न आणि गृहविज्ञान यासारख्या क्षेत्रांमध्ये अभ्यास करून तुम्ही तुमचे भविष्य आजमावू शकता. कृषी क्षेत्रात मार्केटिंग आणि मॅनेजमेंट क्षेत्रातही अप्रतिम करिअर करता येते.

कृषी क्षेत्रात करिअर करण्यासाठी हे आहेत विशेष अभ्यासक्रम
1. कृषी भौतिकशास्त्र
2. शेती व्यवसाय
3. वनस्पती पॅथॉलॉजी
4. वनस्पती प्रजनन आणि आनुवंशिकी
5. वृक्षारोपण व्यवस्थापन

पात्रता आणि प्रवेश प्रक्रिया (Agriculture Courses After 12th)
या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी तुम्ही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा जीवशास्त्र या विषयांसह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कृषी शास्त्रज्ञ होण्यासाठी B.E. किंवा कृषी पदविका करणे आवश्यक आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्याकडे संबंधित विषयात स्पेशलायझेशन असावे.

कृषी क्षेत्रात नोकरीच्या संधी
देशातील तरुणांना दरवर्षी ICAR (भारतीय कृषी संशोधन परिषद) मध्ये नोकरीची संधी मिळते. UPSC मार्फत कृषी तज्ञांच्या नियुक्तीसाठी परीक्षा देखील घेतली जाते. अनेक खासगी कंपन्या कृषी पदवीधरांना नोकऱ्याही देतात. हे पदवीधर शेतकर्‍यांना बँकेतील किसान क्रेडिट कार्ड, कर्ज आदी (Agriculture Courses After 12th) कामात मदत करू शकतात. बँकेच्या फिल्ड ऑफिसरच्या नोकरीसाठी कृषी क्षेत्रातील अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाते.

इथे करा कोर्स
1. भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली
2. भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था
3. राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था
4. इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ
5. अलाहाबाद कृषी संस्था
6. जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठ
7. भारतीय कृषी संशोधन संस्था
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Digital Marketing Career : डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करण्यासाठी ‘हे’ आहेत सर्वोत्तम पर्याय; झटक्यात मिळवा तगड्या पगाराची नोकरी

Digital Marketing Career

करिअरनामा ऑनलाईन ।  सध्या प्रत्येकाला अशा (Digital Marketing Career) क्षेत्रात जायचे आहे, ज्यामध्ये मागणीसोबतच चांगले पॅकेजही मिळू शकते. तुम्हालाही असे सुरक्षित करिअर हवे असेल तर डिजिटल मार्केटिंगचे क्षेत्र तुमच्यासाठी अधिक चांगले ठरू शकते. सध्या वेगाने डिजिटलायझेशन होत आहे, त्यामुळे या क्षेत्रातील व्यावसायिकांची मागणी वाढत आहे.
मार्केटिंग इंडस्ट्री हा असा उद्योग मानला जातो ज्यामध्ये सहज कमाई करता येते, त्यासाठी फक्त तुमच्यातील कौशल्याची गरज असते. काळानुसार मार्केटिंग बदलले आहे आणि लोकांनी मार्केटिंगची डिजिटल आवृत्ती स्वीकारली आहे. डिजिटल मार्केटिंगमुळे या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. जर तुम्हालाही डिजिटल मार्केटिंगमध्ये तुमचे करिअर घडवून चांगला पगार हवा असेल, तर आज आम्ही येथे असे काही पर्याय सांगत आहोत ज्यामध्ये तुम्हाला मागणी असेल आणि इथे तुम्हाला चांगला पगारही मिळेल.

1. मार्केटिंग मॅनेजर (Marketing Manager)
कोणत्याही कंपनीच्या यशस्वी व्यवस्थापनासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती विपणन व्यवस्थापकाची. मार्केटिंग मॅनेजर कंपनीला किंवा एखाद्या संस्थेला पुढे नेण्यासाठी त्या कंपनी अथवा संस्थेची जाहिरात करतो. कोणत्याही कंपनीच्या वाढीसाठी मार्केटिंग महत्त्वाचे असते, त्यामुळे या भूमिकेला (Digital Marketing Career) नेहमीच मागणी असते. या पोस्टवर, उमेदवारांना वार्षिक 6 ते 7 लाखांचा प्रारंभिक पगार मिळू शकतो. अनुभवानुसार तुमचा पगार वाढू शकतो.
2. व्यवस्थापन सल्लागार (Management Consultant)
व्यवस्थापन क्षेत्रात व्यवस्थापन सल्लागार महत्त्वाची भूमिका बजावतात. जर तुम्हालाही बाजाराची ओळख असेल आणि त्यातील बदलांची नेहमीच जाणीव असेल, तर हे क्षेत्र फक्त तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही कंपनीला नवीन कल्पना घेऊन त्याचा व्यवसाय नवीन उंचीवर नेऊ शकत असाल तर तुम्हाला या क्षेत्रात नेहमीच मागणी असेल. या पदासाठी तुम्हाला 10 लाख ते 30 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळू शकते.

3. सोशल मीडिया व्यवस्थापक (Social Media Manager)
सध्याच्या काळात सोशल मीडिया कंपनीच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावते. सोशल मीडिया मॅनेजरचे काम सोशल मीडिया ट्रेंड आणि त्यावर होत असलेल्या उपक्रमांकडे लक्ष देणे आणि कंपनीला पुढे नेण्यासाठी त्यानुसार कार्य करणे असे आहे. जर तुम्हाला मार्केटिंग क्षेत्रात वापरल्या (Digital Marketing Career) जाणार्‍या टूल्सचीही चांगली माहिती असेल तर तुम्ही या क्षेत्रात नोकरी करू शकता. भारतात सोशल मीडिया मॅनेजरचा सरासरी पगार 30 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. तो वेळ आणि अनुभवानुसार वाढत जातो.

4. काही अन्य पर्याय (Digital Marketing Career)
याशिवाय, मार्केटिंग क्षेत्रात करिअरचे आणखी काही पर्याय आहेत, ज्यामध्ये SEO डायरेक्टर, ईमेल मार्केटिंग मॅनेजर, डिजिटल अॅडव्हर्टायझिंग मॅनेजर, सर्च इंजिन मार्केटिंग डायरेक्टर, व्हिडिओ मार्केटिंग मॅनेजर अशा सर्व पदांना बाजारात सतत मागणी असते, त्यामुळे या क्षेत्रात उत्तम पगारही मिळवता येतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Pench Tiger Reserve Recruitment 2023 : 10 वी पास ते ग्रॅज्युएट्सना नोकरीचा गोल्डन चान्स!! पेंच व्याघ्र प्रकल्पात ‘ही’ पदे रिक्त

Pench Tiger Reserve Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । पेंच व्याघ्र प्रकल्प (Pench Tiger Reserve Recruitment 2023) संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर अंतर्गत भरतीची नवीन जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून जीवशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, निसर्ग पर्यटन व्यवस्थापक, सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक, उपजीविका तज्ञ, सर्वेक्षण सहाय्यक, GIS तज्ञ, ग्राफिक डिझायनर, सिव्हिल इंजिनियर, बचाव मदत टीम पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी 05 ऑगस्ट 2023 रोजी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

संस्था – पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर
भरली जाणारी पदे –
1. जीवशास्त्रज्ञ – 01 पद
2. पशुवैद्यकीय अधिकारी – 01 पद
3. निसर्ग पर्यटन व्यवस्थापक – 02 पदे
4. सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक – 02 पदे
5. उपजीविका तज्ञ – 02 पदे
6. सर्वेक्षण सहाय्यक – 01 पद
7. GIS तज्ञ – 01 पद (Pench Tiger Reserve Recruitment 2023)
8. ग्राफिक डिझायनर – 01 पद
9. सिव्हिल इंजिनियर – 01 पद
10. बचाव मदत टीम – 04 पदे
पद संख्या – 16 पदे

निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 05 ऑगस्ट 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नाव आवश्यक शैक्षणिक पात्रता
जीवशास्त्रज्ञ वन्यजीवन विज्ञान / प्राणीशास्त्र / वानिकी / वनस्पतिशास्त्र / पर्यावरणशास्त्रामध्ये पदव्युत्तर किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण व पीएचडी.
पशुवैद्यकीय अधिकारी स्नातकोत्तरमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी. वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी (एम.व्ही.एस.सी) ला प्राधान्य देण्यात येईल.
निसर्ग पर्यटन व्यवस्थापक कोणत्याही शाखेतील पदवीधर, हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका
सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक कोणत्याही शाखेतील पदवीधर, हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका
उपजीविका तज्ञ सामाजिक कार्य शाखेत पदव्युत्तर पदवी (MSW) / ग्रामीण व्यवस्थापनात / कृषी व्यवस्थापनात एमबीए ग्रामीण क्षेत्रात उपजिवीका तज्ञ म्हणुन किमान २ वर्षाचा अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर व उपजिवीका तज्ञ या कामाचा कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव.
सर्वेक्षण सहाय्यक कोणत्याही शाखेतील पदवीधर, टंकलेखन वेग इंग्रजी ४० शप्रमी, मराठी ३० शप्रमी. सर्वेक्षण / जमीन विषयक / जीआयएस मध्ये अनुभव.
GIS तज्ञ विज्ञान पदवी किंवा भूगोल विषयात बी. ए. व जीआयएस विषयाचा कमीत कमी ३ वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव.
ग्राफिक डिझायनर कोणत्याही शाखेतील पदवीधर, ग्राफिक डिझायनिंग मध्ये पदवी किंवा पदविका.
सिव्हिल इंजिनियर Civil Engineer पदवीधर, सदर क्षेत्रात काम केल्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव
बचाव मदत टीम किमान SSC उत्तीर्ण, MS-CIT उत्तीर्ण, उमेदवारास वन विभागात प्रत्यक्ष वन्यप्राणी बचाव / रेस्क्यु कार्य मोहीमेचा अनुभव
प्रमाणपत्र

 

मिळणारे वेतन – (Pench Tiger Reserve Recruitment 2023)

पदाचे नाव दरमहा वेतन 
जीवशास्त्रज्ञ रु. 30,000/-
पशुवैद्यकीय अधिकारी रु. 50,000/-
निसर्ग पर्यटन व्यवस्थापक रु. 25,000/-
सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक रु. 15,000/-
उपजीविका तज्ञ रु. 30,000/-
सर्वेक्षण सहाय्यक रु. 15,000/-
GIS तज्ञ रु. 30,000/-
ग्राफिक डिझायनर रु. 20,000/-
सिव्हिल इंजिनियर रु. 30,000/-
बचाव मदत टीम रु. 10,000/-

 

महत्वाच्या सूचना –
1. सर्व पदांसाठी मराठीचे पुरेसे ज्ञान (वाचन, लिहीणे, बोलणे) अत्यावश्यक आहे.
2. वरील तक्त्यातील दर्शविलेल्या मुख्यालया व्यतीरिक्त निवड झालेल्या उमेदवारास कार्यकारी संचालक, पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर यांचे आदेशानुसार त्यांचे कार्यक्षेत्रा मधील ईतर कोणत्याही ठिकाणी काम करावे लागेल.
3. पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर पदभरती (कंत्राटी पध्दतीवर) मधील पदाकरिता Resume व अर्ज तसेच वरील प्रमाणे दर्शविलेल्या शैक्षणिक व अतिरिक्त पात्रता बाबतचे दस्ताऐवज मुलाखतीच्या वेळेस दाखविण्यात यावे.
4. उमेदवार हा कोणत्याही इतर शासकिय, निमशासकिय अशासकीय संस्था किंवा संघटना यांचा पदाधिकरी असता कामा नये.
5. सदर पदे ही पूर्णवेळ असल्याने या काळात (Pench Tiger Reserve Recruitment 2023) उमेदवाराला इतरत्र काम किंवा प्रॅक्टीस करता येणार नाही.
6. नियुक्ती झालेल्या जलद बचाव गट सदस्यास २४ तास सेवे करीता तत्पर राहणे बंधनकारक राहील. वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर यांचे आदेशान्वये पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यक्षेत्रा बाहेर व कोणत्याही ठिकाणी जलद बचाव गटाचे कार्य करावे लागेल.
7. वरिल सर्व पदांसाठी उमेदवराकडे संगणकाचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Professor Jobs : प्राध्यापकांसाठी खुषखबर!! भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत नवीन भरती; लगेच करा APPLY

Professor Jobs

करिअरनामा ऑनलाईन । भारती विद्यापीठ, पुणे अंतर्गत रिक्त (Professor Jobs) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या 36 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – भारती विद्यापीठ, पुणे
भरले जाणारे पद –
1. प्राध्यापक – 1 पद
2. सहयोगी प्राध्यापक – 6 पदे
3. सहायक प्राध्यापक – 29 पदे
पद संख्या – 36 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑगस्ट 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Professor Jobs)
1. प्राध्यापक – Ph.D. degree in relevant field and first class or equivalent at either Bachelor’s or Master’s level in the relevant branch and minimum of 10 years of experience in teaching / research / industry out of which at least 3 years shall be at a post equivalent to that of an Associate Professor and at least 6 research publications at the level of Associate Professor in SCI journals / UGC / AICTE approved list of journals and at least 2 successful Ph.D. guided as Supervisor / Co-supervisor till the date of eligibility of promotion or at least 10 research publications at the level of Associate Professor in SCI journals / UGC / AICTE approved list of journals till be date of eligibility of promotion.
2. सहयोगी प्राध्यापक – Ph.D. degree in the relevant field and first class or equivalent at either Bachelor’s or Master’s level in the relevant branch and at least total 6 research publications in SCI journals / UGC / AICTE approved list of journals and minimum of 8 years of experience in teaching / research / industry out of which at least 2 years shall be Post Ph.D. experience.
3. सहायक प्राध्यापक – M.E. / M.Tech. in relevant subject with first class or equivalent either in B.E. / B.Tech. or M.E. / M.Tech. with first class and (Professor Jobs) minimum five years teaching experience.Desirable Ph.D. Degree in appropriate discipline from approved University / Institute. For Assistant Professor in Physics, Mathematics & Statistics subjects details regarding qualifications and experience etc. for the above post will be as prescribed by UGC,. and Bharati Vidyapeeth (Deemed to be University), Pune. A Masters degree with 55% marks (or its equivalent grade in a point- scale wherever the grading system is followed) in the relevant subject or an equivalent degree from an Indian/ foreign University.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावा. (Professor Jobs)
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स – (Professor Jobs)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – bvp.bharatividyapeeth.edu
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Business Success Story : मस्तीखोर आशुतोषमुळे आई हैराण; लहानपणी पाहिलं श्रीमंत व्हायचं स्वप्न; काही महिन्यातच कमावले कोट्यवधी रुपये

Business Success Story of Ashutoh Pratihast

करिअरनामा ऑनलाईन । आशुतोष प्रतिहस्त या तरुणाची कौटुंबिक (Business Success Story) पार्श्वभूमी पहिल्यापासून चांगली होती त्यामुळे त्याच्या वडिलांनी कधीही नोकरी केली नाही. आशुतोष त्याच्या गावातील सर्वात मस्तीखोर मुलांपैकी एक होता. गावातील अनेकजण आशुतोषच्या आईला तुमचा मुलगा वाया गेल्याचं सांगायचे. तो आयुष्यात पुढे काहीही करू शकत नाही असंही गावकरी म्हणायचे. त्यामुळे आशुतोषची आई खचून जायची. आईचे नैराश्य बघून आशुतोषने काहीतरी करण्याचा निर्धार केला अन् त्याने तसं करुनही दाखवलं. आशुतोष आता कोट्यवधींचा व्यवसाय करतोय. त्याची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. तो लहान असताना इतका मस्तीखोर होता, की त्याच्या मस्तीमुळे त्याच्या शेजारचे तसंच त्याचे आई-वडिलही खूप त्रस्त होते. त्यांचं काहीही भविष्य नसल्याचं अनेकजण म्हणायचे; पण याच आशुतोषची कहाणी तुम्हाला प्रेरणा देणार आहे.

Business Success Story of Ashutoh Pratihast

आशुतोषच्या मस्तीमुळे आई नैराश्येत
आशुतोष प्रतिहस्त बिहारच्या सीतामढीतील रहिवासी आहे. आशुतोषची आई त्याच्यामुळे नैराश्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना या नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी येथील वातावरणातून बाहेर पडण्यास सांगितलं. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर आशुतोषच्या वडिलांनी 2005 मध्ये दिल्लीत जाण्याचा निर्णय घेतला. तिथे गेल्यानंतर त्यांनी काही काळ काम केलं. त्यानंतर त्यांनी संपूर्ण कुटुंबाला दिल्लीत बोलावलं. आशुतोषचा दिल्लीत आल्यानंतरही मस्तीखोरपणा तसाच होता. त्याच्या मनात जे येईल ते तो करायचा. त्याच्यामुळे त्याच्या वडिलांना अनेकदा आर्थिक नुकसान सोसावं लागलं आहे.

 

Business Success Story of Ashutoh Pratihast

पैशांची किंमत कळू लागली
दिल्लीत आल्यानंतर आशुतोषला आसाममधील एका केंद्रीय विद्यालयात पाठवण्यात आलं. कारण तिथे फी कमी होती. त्यावेळी आशुतोषच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. आसामला (Business Success Story) गेल्यानंतर आशुतोषला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. तो हिंदी बोलायचा, तर त्याच्या आजूबाजूचे लोक आसामची भाषा बोलत होते. त्यामुळे त्याचे मित्र त्याची खिल्ली उडवायचे. इथे एक वर्ष घालवल्यानंतर तो पुन्हा दिल्लीत आला. यादरम्याच्या काळात आषुतोषला पैशांची किंमत कळायला लागली होती.

Business Success Story of Ashutoh Pratihast

‘श्रीमंत कसं बनायचं?’
आसाममधून दिल्लीत आल्यानंतर तो आई-वडिलांना श्रीमंत कसं बनायचं असा प्रश्न सतत विचारायचा. त्यावेळी त्याच्या आई-वडिलांनी त्याला श्रीमंत बनण्यासाठी चांगला अभ्यास करावा लागेल असं सांगितलं आणि त्यानंतर आशुतोषने  शिक्षणात मन रमवले. सातवीत असताना त्याला चांगले गुण (Business Success Story) मिळाले आणि त्याच्याशी मैत्री न करणारे त्याचे मित्र त्याच्या जवळ आले. इथूनच त्याला शिक्षणाचे महत्व समजू लागले. त्याने 10 वीतदेखील चांगले गुण मिळवले आहेत तर 12 वीत त्याने 92 टक्के गुणांची कमाई केली आहे.

Business Success Story of Ashutoh Pratihast

अचानक वडिलांची नोकरी गेली
10 वीत चांगले गुण मिळाल्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी त्याला गिटार घेऊन दिलं होतं. त्याला काही दिवसांत गिटार वाजवायला येऊ लागलं. त्याचदरम्यान आशुतोषच्या वडिलांची नोकरी गेली. त्यांची परिस्थिती इतकी खराब झाली, की त्यांना कर्ज घेऊन घर चालवावं लागत होतं.
आर्थिक कमाईसाठी घेतले गिटार क्लास 
आशुतोषला आपलं घर सावरायचं होतं. कुटुंबाला आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्याचं त्याने ठरवलं. तोपर्यंत तो उत्तमप्रकारे गिटार वाजवायला शिकला होता. त्याने कुटुंबाला (Business Success Story) आर्थिक मदत करण्यासाठी गिटारचे क्लास घेण्यास सुरुवात केली. त्या क्लासमधून तो महिन्याला 6 हजार रुपये कमाई करत होता. त्यानंतर त्याने 12वीचं शिक्षण पूर्ण केलं. त्याला 12वीत 92 टक्के मिळाले. बारावीनंतर त्याने दिल्ली विद्यापीठाच्या मोतीलाल नेहरू कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
Business Success Story of Ashutoh Pratihast

स्वत:च्या स्टार्टअप मधून कोट्यावधी कमावले
आशुतोषवर अनेक जबाबदाऱ्या होत्या. त्यामुळे पैसे कमावण्यासाठी त्याने कॉल सेंटरपासून ते इतर अनेक ठिकाणी नोकरी केली. श्रीमंत बनण्याचं लहानपणीचं त्याचं स्वप्न आजही कायम होतं. आशुतोषने कॉलेजनंतर एज्युकेशन – टेक्नोलॉजी प्लॅटफॉर्म सुरु केला. याचं नाव ‘IDigitalPreneur’ असं आहे. स्टार्टअप सुरु केल्यापासून केवळ 11 महिन्यातच त्याची ही कंपनी कोट्यवधींची झाली आणि त्याचं लहानपणीचं स्वप्न सत्यात उतरलं.

Business Success Story of Ashutoh Pratihast

काय आहे ‘IDigitalPreneur’चे काम (Business Success Story)
आशुतोष त्याच्या ‘IDigitalPreneur’ प्लॅटफॉर्मवर अशा स्किल्स शिकवतो ज्या आपण आपल्या प्रोफेशनल लाइफमध्ये वापरु शकतो. तसंच हे स्किल्स शिकून सर्वसामान्य लोक त्यातून पैसेही कमावू शकतात. हे सर्व स्किल्स तो अतिशय कमी किमतीत शिकवतो. त्याशिवाय आशुतोषचं प्रतिहस्त नावाने एक यूट्यूब चॅनलही आहे. या चॅनलवर तो फायनेंशियल एज्युकेशनसंबंधीत व्हिडिओ शेअर करतो; या व्हिडिओजना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MU Exam : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ‘या’ तारखांना; अतिवृष्टीमुळे रद्द झाल्या होत्या परीक्षा

MU Exam

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी (MU Exam) एक मोठी बातमी हाती आली आहे. मुंबई आणि परिसराला पावसाने झोडपून काढले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या 20 जुलै रोजी होणाऱ्या परीक्षा अतिवृष्टीमुळे रद्द करण्यात आल्या होत्या. सध्या या परीक्षांसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

ही आहे परीक्षेची तारीख (MU Exam)
मुंबई, ठाणे, पालघर , रायगड , रत्नागिरी व सिंधुदुर्ग या मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात 20 जुलै 2023 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या शासन आदेशानुसार आणि रायगड, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार मुंबई विद्यापीठाच्या दिनांक 20 जुलैच्या सर्व 9 परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यातील तृतीय वर्ष बीए सत्र 5 च्या परीक्षा 26 जुलै 2023 रोजी घेण्यात येणार आहेत. या परीक्षा त्याच परीक्षा केंद्रावर घेण्यात येतील; याची (MU Exam) विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे.
तसेच एमएससी (फायनान्स) सत्र 2, एमएससी व एमएमसी ( रिसर्च ) सत्र 2, एमएससी आयटी व सीएस (60:40 आणि 75:5), एमएससी गणित (80:20) सत्र 2, एमएससी आणि एमएमसी ( रिसर्च ) सत्र 3, एमसीए सत्र 1, एमए (ऑनर्स) आणि एम कॉम (60:40) सत्र 4 या अभ्यासक्रमाच्या परीक्षा दिनांक 31 जुलै 2023 रोजी घेण्यात येणार आहेत. या परीक्षा त्याच परीक्षा केंद्रावर घेण्यात येतील.

तृतीय वर्ष बीए सत्र 5 च्या 26 जुलैच्या परीक्षा 28 जुलै रोजी होणार आहेत. तृतीय वर्ष बीए सत्र 5 मधील प्रोग्राम क्रमांक 3A00135 आणि 3A00145 च्या दिनांक 26 जुलै 2023 च्या (MU Exam) सर्व परीक्षा काही तांत्रिक कारणास्तव दिनांक 28 जुलै रोजी होणार आहेत. मुंबई विद्यापीठाचे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Police Bharati : मुंबई पोलीस दलात 3 हजार पदे भरण्याचा निर्णय; आता पोलीस भरतीही कंत्राटी होणार? कारण…

Police Bharati (2)

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई पोलीस दलात तीन हजार (Police Bharati) कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्याच्या गृह खात्याने घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार असून अशा प्रकारचा हा पहिलाच निर्णय आहे. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असल्याने पोलीस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी सेवेत कंत्राटी भरतीवरून वाद झाला असतानाच आता पोलीस दलातही कंत्राटी भरती केली जाणार आहे. मुंबई पोलीस दलासाठी शिपाई ते सहाय्यक निरीक्षक यांची 40,623 पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी 10 हजार पदे रिक्त असल्याने दैनंदिन कामकाजासाठी मनुष्यबळाची कमतरता आहे.

पोलीस खात्यात अपुरे मनुष्यबळ
पोलीस दलात मनुष्यबळाची तीव्र टंचाई आहे. राजकीय नेत्यांच्या संरक्षणामुळे आणखी मनुष्यबळाची गरज आहे. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी अशा (Police Bharati) सणासुदीच्या काळात बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची गरज भासते. त्यामुळे कंत्राटी पोलीस भरती करण्याचा पोलीस आयुक्तांचा आग्रह होता, असे गृह खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

भरतीची गरज कशासाठी? (Police Bharati)
राज्य सरकारने २१ जानेवारी २०२१ रोजी ७,०७६ शिपाई आणि ९९४ वाहनचालकांच्या भरतीला मंजुरी दिली आहे.
ही भरती प्रक्रिया आणि या शिपायांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन हे मनुष्यबळ दाखल होण्यास दोन वर्षे लागणार आहेत.
तोपर्यंत कंत्राटी पोलिसांची ११ महिन्यांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. संजय पांडे पोलीस आयुक्तपदी असताना त्यांनी तीन ते चार हजार पोलिसांना बदलीवर मुंबईबाहेर जाऊ दिले होते. त्यामुळे मोठी मनुष्यबळ पोकळी निर्माण झाली होती. आताही अनेक पोलिसांची मुंबईबाहेर बदली झाली आहे. त्यांना तेथे रुजू व्हायचे आहे. परंतु मुंबईतील मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे त्यांना जाऊ दिले जात नाही, असे सांगण्यात येते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com