Home Blog Page 225

ITEP Course : भावी शिक्षकांनो…. आता फक्त B.Ed करुन भागणार नाही; ‘हा’ कोर्स करणंही आहे आवश्यक

ITEP Course

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षक होण्यासाठी (ITEP Course) आता केवळ B.Ed कोर्स करुन चालणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारी शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी B.Ed कोर्सला आता अभ्यासक्रमाचा दर्जा राहणार नाही. या कोर्स ऐवजी आता ITEP प्रोग्रॅम असणार आहे. नॅशनल काऊंसिल फॉर टीचर एज्युकेशनने हा प्रोग्रॅम तयार केला आहे. या प्रोग्रॅमला ITEP असं नावं देण्यात आलं आहे. हा कोर्स चार वर्षांचा असणार आहे. 2030 नंतर ITEP (Integrated Teacher Education Programme) कोर्सअंतर्गत शिक्षक भरती केली जाणार आहे.

वास्तविक पाहता B.Ed कोर्स यापुढेही सुरु राहाणार आहे. पण तो केवळ शैक्षणिक भाग असेल. यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PHd करता येणार आहे. पुढच्या काही वर्षात जवळपास सर्व B.Ed महाविद्यालयात ITEP (Integrated Teacher Education Programme) कोर्सचा पर्याय सुरु होईल.
उच्च शिक्षणापासून प्राथमिक शिक्षणापर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केलं जाणार आहे. याअंतर्गत शैक्षणिक क्षेत्रात नवे बदल होणार आहेत. यानुसार 2030 पासून चार वर्षांचा बीएड किंवा चार वर्षांचा एकात्मिक शिक्षक कार्यक्रम पदवी अनिवार्य करण्याची तयारी सुरू आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बालवाडी ते इयत्ता 12 वी पर्यंत शिक्षकांची (ITEP Course) किमान पात्रता निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये B. A.-B.Ed, B.Sc-B.Ed आणि B.Com-B.Ed यांचा समावेश आहे. सध्या 2023-24 या शैक्षणिक सत्रापासून 41 विद्यापीठांमध्ये प्रायोगिक तत्तावर चार वर्षांचा बीएड (B.Ed) कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी पुढील आठवड्यात या राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सुरु करेल. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCETE) NEP 2020 च्या शिफारशींनुसार चार वर्षांचा B.Ed कार्यक्रम सुरू केला जाणार आहे.

प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारावर अभ्यासक्रमात प्रवेश दिला जाईल. सत्र 2024-25 पासून आयटीईपी या 4 वर्षांच्या एकात्मिक शिक्षण कार्यक्रमाच्या पायलट प्रोजेक्टसाठी विद्यापीठांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आता हा नवीन B.Ed कार्यक्रम नवीन शिक्षण (ITEP Course) मॉडेलनुसार मुलांना शिकवण्यासाठी तयार केला जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांमध्ये प्राध्यापक पदांसाठी भरती प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक मोठे पाऊल उचललं आहे. UGC ने सेंट्रल युनिव्हर्सिटी फॅकल्टी रिक्रूटमेंट पोर्टल CU-ही निवड सुरू केली आहे. या पोर्टलच्या मदतीने विद्यापीठांमध्ये सहायक प्राध्यापकांसह प्राध्यापक पदांसाठी अर्ज करणे सोपे होणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC HSC Exam : 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट; ‘या’ तारखेला होणार परीक्षा

SSC HSC Exam (3)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी (SSC HSC Exam) एक मोठी अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ फेब्रुवारी आणि मार्चमध्ये इयत्ता 12वी आणि 10वीच्या परीक्षा घेणार आहे. महाराष्ट्र बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, इयत्ता बारावीची  परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च या कालावधीत होणार आहे. तर 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 19 मार्चपर्यंत चालणार आहे.

महाराष्ट्र बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, बारावीची म्हणजेच इयत्ता 10वीची परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च या कालावधीत होणार आहे. तर 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 19 मार्चपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र बोर्डाची दहावी आणि बारावीची परीक्षा सकाळी 11 ते 2 आणि दुपारी 3 ते 6 या वेळेत होणार आहे.

हॉल तिकिटविषयी….
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12वी आणि 10वीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. मात्र, यासंदर्भात (SSC HSC Exam) सध्या कोणतीही अधिकृत माहिती हाती आली नाही. प्रवेशपत्र असल्याशिवाय तुम्हाला परीक्षेला बसू दिले जाणार नाही.

1. सर्वप्रथम महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
2. त्यानंतर 10वी आणि 12वी वेळापत्रक 2024 च्या लिंकवर क्लिक करा.
3. आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
4. विद्यार्थी ही PDF चेक करू शकतात आणि डाउनलोड करू शकतात.

उत्तीर्ण होण्यासाठी इतके गुण आवश्यक (SSC HSC Exam)
महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान 35 टक्के गुण मिळवणे बंधनकारक असेल. यापेक्षा कमी गुण मिळाल्यास त्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी मिळेल. परीक्षेविषयी वेळोवेळी माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देत रहा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : जगातील पहिला मानव कोठे जन्माला आला? कोणतं फळ आहे ज्याचे बी फळाच्या बाहेर असते? पहा भन्नाट प्रश्न आणि त्याची उत्तरे

GK Updates 17 Oct.

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1– तिरंदाजी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे?
उत्तर – तिरंदाजी हा भूतानचा राष्ट्रीय खेळ आहे.
प्रश्न 2 – कोणते फळ आहे ज्याचे बीज फळाच्या बाहेर आहे?
उत्तर – स्ट्रॉबेरीचे बी फळांच्या बाहेर असतात.
प्रश्न 3 – जगातील सर्वात जास्त महिला वैमानिक कोणत्या देशात आहेत?
उत्तर – महिला वैमानिकांच्या संख्येत भारत जगात आघाडीवर आहे. म्हणजेच पायलट म्हणून करिअर निवडण्यात आज भारतातील महिला इतर देशापेक्षा पुढे आहेत.

प्रश्न 4 – जगातील पहिला मानव कोणत्या देशात जन्माला आला?
उत्तर – जगातील पहिला मानव आफ्रिकेत जन्माला आला.
प्रश्न 5 – जगातील सर्वात जुने शहर कोणते?
उत्तर- दमास्कस हे जगातील 11,000 वर्षे जुने शहर आहे.

प्रश्न 6 – (GK Updates) नारळाचे पाणी कोणता रोग कमी करते?
उत्तर – नारळाचे पाणी रक्तदाब कमी करते.
प्रश्न 7 – भारतातील सर्वात जुने शहर कोणते?
उत्तर – शहरे आणि गावांमध्ये आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे वाराणसी हे आशियातील सर्वात जुने शहर मानले जाते. त्यातील लोकांच्या वास्तव्याचे पुरावे 3000 वर्षांहून अधिक जुने आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Shikshak Bharti 2023 : शिक्षकांच्या 30 हजार पदांच्या भरतीसाठी लवकरच जाहिरात निघणार; काय म्हणाले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर?

Shikshak Bharti 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात लवकरच शिक्षकांच्या 30 हजार (Shikshak Bharti 2023) पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. आतापर्यंत बिंदूनामावली आणि अन्य तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेल्या 23 जिल्ह्यातील रिक्त पदांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

राज्यात रखडलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला असून 23 जिल्ह्यांतील रिक्त पदांच्या शिक्षक भरतीसाठी लवकरच जाहीरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. यासंदर्भात तारीख जरी निश्चित करण्यात आलेली नसली, तरी यासंदर्भात तातडीची पावलं राज्य सरकारकडून उचलण्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

राज्यातील लाखो उमेदवारांचं लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदांच्या जाहीरातीकडे लागलं आहे. अशातच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर शिक्षण (Shikshak Bharti 2023) परिषदेसाठी पुण्यात आले होते. त्याचवेळी त्यांच्याकडून शिक्षक भरतीबाबत दिलासा देणारं वक्तव्य करण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या शिक्षण भरती प्रक्रियेसंदर्भाती घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.
आतापर्यंत बिंदूनामावली सोबतच इतर काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती मंत्री दीपक केसरकरांनी दिली आहे. तसेच, राज्यातील शिक्षण भरती प्रक्रियेसंदर्भातील संकेतस्थळ असलेल्या पवित्र संकेतस्थळामार्फत प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहितीही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : राज्याच्या ‘या’ बँकेत मॅनेजर पदावर नोकरीची संधी; ताबडतोब करा अर्ज

Job Alert (74)

करिअरनामा ऑनलाईन । नागपूर नागरिक सहकारी बँक लिमिटेड (Job Alert) अंतर्गत शाखा व्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2023 आहे.

बँक – नागपूर नागरिक सहकारी बँक लिमिटेड, नागपूर
भरले जाणारे पद – शाखा व्यवस्थापक
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – नागपूर नागरीक सहकारी बँक लि., नागपूर 79, डॉ. आंबेडकर स्क्वे., सेंट्रल एव्हेन्यू, नागपूर – 440008
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर (Job Alert)

वय मर्यादा – 40 ते 55 वर्षे
अर्ज फी – Rs. 1,000/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता – JAIIB/CAIIB/ MBA/CA/ICWA – Will Be Accredited Accordingly
असा करा अर्ज – (Job Alert)

1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जाचा नमुना व सविस्तर माहिती nnsbank.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.nnsbank.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : इंजिनियर्ससाठी खुषखबर!! शासनाच्या जलसंपदा विभाग अंतर्गत नवीन भरती जाहीर

Government Job (18)

करिअरनामा ऑनलाईन । शासनाच्या जलसंपदा विभागा (Government Job) अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक अभियंता, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय अभियंता या पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन
भरली जाणारी पदे – कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहाय्यक अभियंता, उपविभागीय अधिकारी/उपविभागीय अभियंता
पद संख्या – 11 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – PDF पहा
वय मर्यादा – 65 वर्षे

भरतीचा तपशील – (Government Job)

पद पद संख्या 
कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहाय्यक अभियंता १० पदे
उपविभागीय अधिकारी/उपविभागीय अभियंता ०१ पदे

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. सर्व आवश्यक पात्रता (Government Job) अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Banking Job : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ‘या’ पदावर नोकरीची संधी!! लगेच करा APPLY

Banking Job (14)

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ महाराष्ट्र, जळगाव (Banking Job) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वास्तुविशारद, कंत्राटदार पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे.

बँक – बँक ऑफ महाराष्ट्र, जळगाव
भरले जाणारे पद –
1. वास्तुविशारद
2. कंत्राटदार
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभागीय कार्यालय, जळगाव प्लॉट नं 264 TPS III सागर पार्क जवळ, जिल्हा रोड जळगाव 425001

नोकरी करण्याचे ठिकाण – जळगाव
असा करा अर्ज – (Banking Job)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
काही महत्वाच्या लिंक्स – (Banking Job)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.bankofmaharashtra.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MRVC Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु; अर्ज करा E-Mail

MRVC Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई (MRVC Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई
भरले जाणारे पद – सहाय्यक व्यवस्थापक
पद संख्या – 15 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 60 वर्षे (MRVC Recruitment 2023)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
अर्ज पाठविण्याचा E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 नोव्हेंबर 2023

असा करा अर्ज – (MRVC Recruitment 2023)
1. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
3. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – mrvc.indianrailways.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Success Story : वडिलांची इच्छा होती प्राध्यापक व्हावं; पण तिने MPSC देवून कमालच केली; संसार सांभाळत तीन वेळा झाली अधिकारी!!

MPSC Success Story of Aishwarya Naik Dubal

करिअरनामा ऑनलाईन । लग्नानंतर मुलीला माहेरचे तिचे (MPSC Success Story) उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी पाठिंबा देतातच पण जर माहेरच्या लोकांप्रमाणे सासरच्या लोकांचा पाठिंबा मिळाला तर मुलगी खूप काही करु शकते. ऐश्वर्याच्या बाबतीत हे सिध्द झालं आहे. ऐश्वर्या नाईक–डुबल हिने एकदा नव्हे; तर तीनवेळा अधिकारी पदाला गवसणी घातली आहे.
ऐश्वर्याही करवीर तालुक्यातील हळदी गावची रहिवासी. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तिची विविध पदांवर तीनदा निवड झाली आहे. मुली लग्न झालं की संसाराच्या रहाटगाड्यात अडकतात आणि आपलं अस्तित्व हरवून जातात. पण ऐश्वर्याच्या बाबतीत असं घडलं नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देवून तिला अधिकारी बनायचं होतं. आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याची तिची जिद्द होती. या जिद्दीला तिच्या माहेरच्या बरोबरच सासरचाही पाठिंबा मिळाला आणि २०२१ च्या राज्य सेवा परीक्षेच्या अंतिम निकालात ऐश्वर्याची अधिकारी पदावर वर्णी लागली. ऐश्वर्या सध्या नोकरी निमित्त सांगली येथे वास्तव्यास आहे.

ऐश्वर्याचे वडील क्रीडा संचालक आहेत तर आई गृहिणी आहे. लहानपणापासूनच तिच्या घरात खेळाचे वातावरण असल्याने ती एक राष्ट्रीय पातळीवर खेळणारी उत्कृष्ट अ‍ॅथलेटिक्स व स्विमिंगमधील खेळाडू आहे .ऐश्वर्याने आपले प्राथमिक शिक्षण गावातीलच शाळेत पुर्ण केले आणि पुढे कोल्हापूरातील (MPSC Success Story) पद्माराजे हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेऊन न्यू कॉलेजमधून पदवी मिळविली. लहानपणापासूनच शालेय जीवनात ती हुशार होती शिवाय उत्कृष्ट खेळाडू देखील होती.

ग्रॅज्युएशन करत असताना केली MPSC ची तयारी (MPSC Success Story)
ऐश्वर्याच्या वडिलांची इच्छा होती की आपल्या मुलीने SET परीक्षा देवून प्राध्यापक व्हावे; पण तिचं ध्येय वेगळंच होतं. ऐश्वर्याला प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याची इच्छा होती त्यामुळे तिने पदवीचे शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. मात्र कोरोना काळात परिक्षांना विलंब झाल्यामुळे मधल्या काळात तिने अर्थशास्त्र विषयातून सेट (SET) परिक्षा दिली आणि ती टामध्ये पास देखील झाली. पण अधिकारी होण्याचे स्वप्न तिला स्वस्थ बसू देत नव्हते. जाहिरात निघल्यानंतर तिने MPSC चा फॉर्म भरला आणि परीक्षा दिली. या परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात ऐश्वर्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपनिरीक्षकपदी निवड झाली तर दुसऱ्या प्रयत्नात उप-अधिक्षक भूमिअभिलेख अधिकारीपदी निवड झाली.x

सलग तीनवेळा झाली अधिकारी
ऐश्वर्याचे लग्न झाले होते. पण तिने संसार सांभाळत अभ्यास सुरूच ठेवला होता. ती घेत असलेल्या कष्टाला तिच्या माहेर आणि सासरच्या लोकांची जोड मिळाली. तिने घेतलेल्या प्रयत्नांना (MPSC Success Story) यश मिळालं आणि तिची नगरपालिका मुख्याधिकारी पदी निवड झाली. ऐश्वर्याचे पती संग्राम डुबल हे सुध्दा मंत्रालय कक्ष अधिकारी आहेत. तर, सासरे उदयराव डुबल हे डीवायएसपी आहेत. घरातच करिअरच्या बाबतीत सुदृढ वातावरण असल्याने तिला सतत पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. 2 वेळा अधिकारी पद मिळाल्यानंतरही तिने पुन्हा परीक्षा दिली आणि तिसऱ्या वेळेस तिची नगरपालिका मुख्याधिकारी पदी निवड झाली आहे. ती सध्या सांगली येथे कार्यरत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

TCS Careers : TCS कडून नोकऱ्यांची खैरात!! तब्बल 40 हजार लोकांना मिळणार नोकरी

TCS Careers

करिअरनामा ऑनलाईन । एकीकडे मंदीचं सावट घोंगावतंय (TCS Careers) तर दुसरीकडे तरुण वर्ग नोकरीच्या शोधात धडपडताना दिसतोय. मंदीच्या वातावरणात अनेकांनी हातातल्या नोकऱ्या गमावल्या आहेत, आणि अनेकांवर यापुढे नोकऱ्या गमावण्याची भीती कायम आहे. अशातच नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण वर्गासाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठी IT कंपनी टाटा कन्सलटन्सीने ही बातमी दिली आहे.  एकीकडे अनेक IT कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढलेलं असताना टाटा कंपनीकडून नवीन भरती सुरु झाली आहे.

हल्लीच टाटा कंपनीकडून (TCS) 40,000 नवीन नोकऱ्यांची भरती सुरु झाली आहे. कंपनीचे CEO एन. गणपती सुब्रामाण्याम यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितलं कि कंपनी यंदा नवीन नोकरदारांच्या शोधात आहे व कंपनी 35,000 ते 40,000 नवीन लोकांना संधी देऊ पाहत आहे. गेल्यावर्षी देखील टाटा कंपनीने 50,000 नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. जगभरातून कंपन्या आपल्या कर्मचारी वर्गाला हटवत असताना टाटाने दिलेली हि माहिती अनेकांना सुखावणारी आहे.

दरम्यान, सोमवारच्या शेअर बाजारात कंपनीच्या (TCS Careers) शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली होती. कामकाजाच्या वेळी टाटाचे शेअर्स 3541 रुपयांवर व्यवहार करत होते. कंपनीचा Contract Volume जरी स्थिर वाटत नसला तरीही त्यांची महसूल वाढ उत्तम आहे. TCS चा ब्रिटनमधील व्यवसाय देखील जोमाने सुरु आहे. मागच्या दोन तीन वर्षात कंपनीने जवळपास 2लाख तरुणांना नोकरी दिली होती, मात्र काही कर्मचारी अजूनही कार्यालयात आलेले नाहीत असे CEO सुब्रामाण्याम यांचे म्हणणे आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com