Home Blog Page 144

Shivaji University : शिवाजी विद्यापीठाची मोठी घोषणा!! ‘या’ विद्यार्थ्यांना फी मध्ये भरघोस सवलत अन् वसतिगृहात मिळणार मोफत प्रवेश

Shivaji University

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठाने एक मोठी घोषणा (Shivaji University) केली आहे. येत्या शैक्षणिक वर्षात कला, वाणिज्य, विज्ञान यांसारख्या पदव्युत्तर विभागात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातून प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून खास सवलत देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात 100 टक्के सूट तसेच अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक शुल्कात 25 टक्के सवलत तर वसतिगृहात मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम वगळता इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा विद्यापीठ स्तरावर घेतल्या जातात. याबाबत संबंधित विद्यार्थ्यांना वेळीच सूचना देण्यात येईल. विद्यापीठात डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजींतर्गत बी.टेक., एम.टेक. तसेच पीएचडी हे इंजिनिअरिंगमधील अभ्यासक्रम राबवले जात असतात. यापैकी बी.टेक. व एम. टेक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी महाराष्ट्र सरकारची एमएचटी-सीईटी सेल ही प्रकिया राबविण्यात येते.

865 गावातील विद्यार्थ्यांना होणार लाभ (Shivaji University)
विशेषतः बी.टेक.प्रवेशाकरिता एमएचटी-सीईटीमार्फत प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. प्रवेश परीक्षेच्या आधारावर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील विद्यार्थ्यांना डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळेल. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील विद्यार्थ्यांनी पीयुसी गणितसह विज्ञान (बारावी) परीक्षार्थ्यांनी महाराष्ट्र सरकारची एमएचटी-सीईटी परीक्षा देणे गरजेचे (अनिवार्य) आहे.

या परीक्षेचा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत दि. १ मार्च २०२४ आहे. अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा असून संबंधित विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी करावी. नाव नोंदणीसाठी पुढील (Shivaji University) लिंकचा वापर करावा. http://surl.li/qrevw MHT-CET परीक्षा फॉर्म भरताना काही अडचणी आल्यास विद्यापीठ प्रशासनाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mumbai University Recruitment 2024 : मुंबई विद्यापीठाने जाहीर केली विविध पदांवर भरती; 2,16,600 इतका पगार

Mumbai University Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । मुंबईत नोकरी मिळवणं हे अनेकांचं (Mumbai University Recruitment 2024) स्वप्न असतं. शिक्षण पूर्ण होत असताना तरुण उमेदवारांचा नोकरीसाठी शोध सुरु होतो. शहरी तसेच ग्रामीण भागातील अनेक तरुण करिअर घडवण्यासाठी मुंबईकडे जाण्यास पसंती देतात. तुम्ही जर मुंबईत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे.

मुंबई विद्यापीठ मुंबई अंतर्गत कुलसचिव, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे. पाहूया सविस्तर….

संस्था – मुंबई विद्यापीठ, मुंबई
भरले जाणारे पद – कुलसचिव, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी
पद संख्या – 03 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, कक्ष क्रमांक २५, फोर्ट, मुंबई- ४०० ०३२
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – (Mumbai University Recruitment 2024)
कुलसचिव – 58 वर्षे
संचालक – 60 वर्षे

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
कुलसचिव01
संचालक01
मुख्य कार्यकारी अधिकारी01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदशैक्षणिक पात्रता
कुलसचिवPossess a Master’s Degree with at least 55% of the marks of any statutory University or its equivalent grade of B in the UGC 7 point scale;
संचालकBE / B Tech/ M. Sc. in Electronics/Computer/IT or MCA, and at least 10 plus years of experience in enterprise IT. (Mumbai University Recruitment 2024)
मुख्य कार्यकारी अधिकारीThe Candidate must hold Bachelor Degree in Engineering/ Science/ Pharmacy and Master Degree in Management/ Technology or its equivalent from a recognized Institution. He/she should be a seasoned Techno-Commercial person.

मिळणारे वेतन –

पदवेतन (दरमहा)
कुलसचिवRs.1,31,100 – 2,16,600
संचालकRs.1,31,100 – 2,16,600
मुख्य कार्यकारी अधिकारीRs. 1,00,000/- p.m

असा करा अर्ज – (Mumbai University Recruitment 2024)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
3. ऑफलाईन अर्ज भरताना उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्रांच्या प्रती जोडल्या पाहिजेत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://mu.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BEL Recruitment 2024 : इंजिनियर्ससाठी मोठी बातमी!! BEL मध्ये 517 जागांवर नोकरीची संधी

BEL Recruitment 2024 (4)

करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत (BEL Recruitment 2024) मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी अभियंता पदांच्या एकूण 517 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2024 आहे.

संस्था – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
भरले जाणारे पद – प्रशिक्षणार्थी अभियंता
पद संख्या – 517 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मार्च 2024
वय मर्यादा – 28 ते 30 वर्षे
अर्ज फी – Rs. /- 150 + 18% GST

भरतीचा तपशील – (BEL Recruitment 2024)

पदपद संख्या 
प्रशिक्षणार्थी अभियंता517 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी अभियंताB.E/B.Tech/M.E/M.Tech in Engineering (Electronics, / Electronics & Communication / Electronics & Telecommunication/ Telecommunication / Communication / Mechanical/ Electrical /Electrical & Electronics / Computer Science /Computer Science & Engineering / Information Science/ Information Technology)

मिळणारे वेतन –

पदवेतन
प्रशिक्षणार्थी अभियंताAn all-inclusive consolidated remuneration of Rs. 30,000/- per month for the 1st Year of engagement, Rs. 35,000/- per month for the 2nd year, Rs. 40, 000/- per month for the 3rd year respectively

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवश्यक (BEL Recruitment 2024) कागदपतत्राची प्रत जोडावी.
4. दिलेल्या मुदती अगोदर दिलेल्या लिंक वर अर्ज पाठवायचा आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2024 आहे.
6. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://bel-india.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : परीक्षा नाही… थेट द्या मुलाखत; उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘या’ पदावर नोकरीची संधी

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । कवयित्री बहिणाबाई चौधरी (Job Alert) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रोजेक्ट फेलो पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जातील. या पदासाठी पात्र उमेदवरांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 04 मार्च 2024 आहे.

या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसाह दिलेल्या तारखेस खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीस हजर रहायचे आहे.

संस्था – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
भरले जाणारे पद – प्रोजेक्ट फेलो
पद संख्या – 06 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – जळगाव
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 04 मार्च 2024
मुलाखतीचा पत्ता – स्कूल ऑफ सोशल सायन्सेस, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
मिळणारे वेतन – RS. 20,000/- p.m

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रोजेक्ट फेलोM.S.W (Social Work)
MSc. (Environment & Earth Sciences)

निवड प्रक्रिया –
1. उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
2. इच्छुक आणि पात्र (Job Alert) उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.
3. मुलाखतीची तारीख 04 मार्च 2024 आहे.
4. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://nmu.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Bombay High Court Recruitment 2024 : उच्च न्यायालय अंतर्गत औरंगाबाद खंडपीठासाठी ‘या’ पदावर भरती जाहीर; 2,08,700 एवढा पगार

Bombay High Court Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत (Bombay High Court Recruitment 2024) भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘माननीय न्यायाधीशांचे वैयक्तिक सहाय्यक’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या संधीचा फायदा घेत उमेदवारांनी नोकरीसाठी अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2024 आहे.

उच्च न्यायालयातील नोकरी प्रतिष्ठित नोकरी समजली जाते. तुम्ही जर कायद्यामध्ये डिग्री घेतली असेल तर या भरतीसाठी तुम्ही पात्र ठरू शकता. औरंगाबाद खंडपीठासाठी ही भरती असणार आहे. त्यामुळे विलंब न करता उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी 300 रु. अर्ज फी आकारण्यात आली आहे.

संस्था – मुंबई उच्च न्यायालय, मुंबई (Bombay High Court Recruitment 2024)
भरले जाणारे पद – माननीय न्यायाधीशांचे वैयक्तिक सहाय्यक (Personal Assistant)
पद संख्या – 15 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मार्च 2024
वय मर्यादा – 21 ते 38 वर्षे
अर्ज फी – Rs. 300/-

मिळणारे वेतन – Rs. 67,700 ते 2,08,700/-
नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Bombay High Court Recruitment 2024)

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
माननीय न्यायाधीशांचे वैयक्तिक सहाय्यकThe candidates who have completed five years LL.B. Course should mention ‘Graduate’ in Course/Degree Column, LL. B. (three years) in ‘Stream Column’ and mention the marks of the 3rd Year LL.B. Such candidates should again mention ‘Graduate’ in Course/Degree Column, LL.B. (Five Years) in ‘Stream Column’ and mention the marks of the 5th Year LL. B.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन अर्ज करायचा आहे.
3. मुदती नंतर आलेल्या (Bombay High Court Recruitment 2024) अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Exam Tips : बोर्डाचा पेपर वेळेत पूर्ण करण्यासाठी ‘या’ टिप्स ठेवा लक्षात

Exam Tips (1)

करिअरनामा ऑनलाईन । 12 वी बोर्डाच्या परीक्षांना सुरवात (Exam Tips) झाली असून आता येत्या 1 मार्चपासून 10 वीच्या परीक्षांना सुरवात होत आहे. 10 वी आणि 12वी बोर्डाची परीक्षा (Board Exam) ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे. मुलांचे पुढील भविष्य आणि करिअरची वाट बोर्डाच्या परीक्षांवर अवलंबून असते. बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळावेत म्हणून विद्यार्थी जिवतोडून मेहनत घेतात, पण काही वेळा छोट्या चुकांमुळे विद्यार्थी निकालामध्ये प्रभाव पाडू शकत नाहीत. म्हणूनच अभ्यासाबरोबरच पेपर सोडवताना कोणती खबरदारी घ्यावी; हे जाणून घेणे गरजेचे आहे. चला तर मग पाहूया सोप्या वाटणाऱ्या पण तितक्याच महत्वाच्या काही अभ्यासाच्या टिप्स….

1. मार्गदर्शक तत्त्वे वाचण्यास विसरू नका (Exam Tips)
प्रश्नपत्रिका हातात मिळताच सर्वप्रथम त्यावरील सर्व मार्गदर्शक तत्त्वे काळजीपूर्वक वाचा. कोणत्या विभागातून किती प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात तसेच कोणत्या दोन प्रश्नांमधून तुम्हाला सोपा वाटणार प्रश्न निवडण्याची संधी दिली जाते हे आधी समजून घ्या. अनेकवेळा मुले दोन्ही प्रश्नांची उत्तरे घाईघाईने लिहितात, त्यामुळे वेळ वाया जातो आणि ते अतिरिक्त प्रश्न सोडवण्यासाठी गुण मिळत नाहीत, त्यामुळे घाईघाईने पेपर लिहू नका. प्रश्न निवडण्याकडे विशेष लक्ष द्या.

2. वेळेचं नियोजन महत्वाचं
प्रश्नपत्रिकेत दिलेल्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि या दरम्यान वेळ पुरेल याची पूर्ण काळजी घ्या. अनेक विद्यार्थी दोन-तीन प्रश्नांची उत्तरे लिहिण्यात एवढा वेळ घालवतात की त्यांना उरलेले प्रश्न सोडवायला वेळ मिळत नाही, त्यामुळे वेळेचे व्यवस्थापन सांभाळणे अत्यंत गरजेचे आहे.

3. अतिशयोक्तीने उत्तरे लिहू नका
लिखानाचा वेळ वाचवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे; तुम्ही (Exam Tips) जेवढे विचारले आहे तेवढेच उत्तर लिहा. जसा प्रश्न आहे त्याप्रमाणे अचूक उत्तर लिहा, कारण केवळ अतिशयोक्तीने उत्तर लिहून चांगले गुण मिळू शकत नाहीत. विचारलेल्या प्रश्नाचे अचूक उत्तर दिल्याने परीक्षकही प्रभावित होतात आणि तुम्हाला चांगले गुणही देतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Business Success Story : IIT पास तरुणाने दोन मित्रांसोबत केला पराक्रम; आज आहे 5 अब्ज डॉलरची कंपनी; यांनी नेमकं काय केलं?

Business Success Story of Ankush Sachdeva

करिअरनामा ऑनलाईन । यश जेवढं मोठं संघर्षही तितकाच मोठा (Business Success Story) असतो. मोठं यश मिळवण्यासाठी मोठाच संघर्ष करावा लागतो. अंकुश सचदेव या तरुणाची गोष्ट अशीच आहे. अंकुशने आयआयटीमधून पदवी घेतल्यानंतर काम करायला सुरुवात केली आणि मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या कंपनीत तो इंटर्नशीप करू लागला. नोकरीत मन रमत नसल्यामुळे त्यानं स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं आणि त्याचा प्रवास सुरु झाला…

अंकुशने एकापाठोपाठ एक 17 कल्पनांवर काम केले. पण नशिबाने (Business Success Story) साथ दिली नाही आणि सुरवातीच्या 17 स्टार्टअपवर तो अपयशी ठरला. अखेर अंकुशला 18 व्या वेळेस यश मिळालं. आज अंकुश 40 हजार कोटी रुपयांच्या कंपनीचा मालक आहे. त्याने ही किमया कशी केली याविषयी आपण पाहणार आहोत….

दोन मित्रांसह केला पराक्रम (Business Success Story)
अंकुश सचदेवाने (Ankush Sachdeva) आपले काम सुरू करण्यासाठी वेगवेगळी स्टार्टअप सुरु केले. पण त्यामध्ये 17 वेळा अपयश आलं. पण अंकुशने कधी हार मानली नाही. अखेर 18व्या वेळेस त्याने आपल्या दोन मित्रांसह असा पराक्रम केला की आज हजारो कोटींची कंपनी स्थापन झाली. या कंपनीचा विस्तार व्यवसाय अमेरिका आणि युरोपसह जगातील अनेक देशांमध्ये पसरला आहे आणि त्यांचे लाखो वापरकर्ते आहेत.

अंकुश आणि त्याच्या मित्रांनी नेमकं काय केलं
अंकुशने नोकरी सोडून व्यवसायाकडे वळायचे ठरवले होते. यासाठी त्याने कंबर कसली. वेगवेगळे 17 स्टार्टअपवर त्याने काम केले. या श्रव प्रयत्नात तो अपयशी (Business Success Story) ठरला. पण अंकुशच्या अथक प्रयत्नांना नशिबाने आणि त्याच्या मित्रांनी साथ दिली. फरीद अहसान आणि भानू सिंग हे दोघे अंकुशचे IIT मधील मित्र. या मित्रांनी मिळून शेअरचॅट (Sharechat) अॅप तयार केले. या तिघांनी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर काही युजर्स शोधले ज्यांना काहीतरी नवीन करून बघायचे होते. यानंतर, जानेवारी 2015 मध्ये, शेअरचॅटची मूळ कंपनी मोहल्ला टेक प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना झाली. यानंतर ऑक्टोबर 2015 मध्ये शेअरचॅट लाँच करण्यात आले. सुरुवातीला हे हिंदी, मराठी, मल्याळम आणि तेलगू भाषांमध्ये लॉन्च करण्यात आले होते.

अमेरिका, युरोपसह अनेक देशांमध्ये विस्तारला व्यवसाय
ShareChat चे मुख्यालय बंगळुरू येथे आहे. परंतू, या कंपनीने आपला व्यवसाय अमेरिका आणि युरोपसह जगातील अनेक देशांमध्ये पसरवला आहे. आज या अॅपचे करोडो वापरकर्ते आहेत. कंपनीने (Business Success Story) जवळपास 1000 लोकांना थेट नोकऱ्याही दिल्या आहेत. शेअरचॅटला जून 2022 मध्ये निधी मिळाला होता. जेव्हा कंपनीचे मूल्य 5 अब्ज डॉलर म्हणजेच 40 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज होता.

IIT मधून घेतलं शिक्षण
अंकुश सचदेवाने 2015 मध्ये IIT कानपूरमधून पदवी प्राप्त केली. याआधी त्याने सोमरविले स्कूलमधून बारावी उत्तीर्ण केली होती. अंकुशने मे ते जुलै 2014 या कालावधीत मायक्रोसॉफ्टमध्ये इंटर्नशिपमध्ये काम केले आहे. अंकुश सध्या शेअरचॅटमध्ये कंपनीचा CEO म्हणून काम करत आहे. कंपनीचे मूल्यांकनही आता 50 हजार कोटींच्या पुढे गेले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : ARMY आणि NAVY चा फुलफॉर्म काय आहे? ‘संतोष ट्रॉफी’ कोणत्या खेळाशी संबंधित आहे? गोंधळात टाकणारे प्रश्न

GK Updates 27 Feb.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 – ‘संतोष ट्रॉफी’ कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर – संतोष ट्रॉफी फुटबॉलशी संबंधित आहे.
प्रश्न 2 – (GK Updates) अमीर खुसरो कोणत्या सम्राटाच्या दरबारातील कवी होता?
उत्तर – अमीर खुसरो हा अलाउद्दीन खिलजीच्या दरबारातील कवी होता. मात्र, त्याला 10 सुलतानांचे संरक्षण होते.
प्रश्न 3 – जगातील सर्वात उंच सरोवर कोणते आहे?
उत्तर – जगातील सर्वात उंच सरोवराचे नाव ‘टिटिकाका तलाव’ आहे.

प्रश्न 4 – श्रीमद भागवत गीतेचा फारसी भाषेत प्रथम अनुवाद कोणी केला हे तुम्ही सांगू शकाल का?
उत्तर – श्रीमद भागवत गीतेचे फारसीमध्ये भाषांतर सर्वप्रथम दारा शिकोह यांनी केले होते.
प्रश्न 5 – सार्कची स्थापना कोणत्या वर्षी झाली? (GK Updates)
उत्तर 3 – SAARC (South Asian Association for Regional Cooperation) ची स्थापना 1985 साली झाली.
प्रश्न 6 – ARMY आणि NAVY चा फुलफॉर्म काय आहे ते सांगा?
उत्तर – वास्तविक, ARMY चा फुलफॉर्म ‘Alert Regular Mobility Young’ आहे, तर NAVY चे पूर्ण रूप ‘Natical Army of Volunteer Yeomen’ आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Shikshak Bharti 2024 : ‘या’ जिल्ह्यातील शाळेला मिळणार 604 शिक्षक; यादी जाहीर

Shikshak Bharti 2024 (6)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यभरात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून (Shikshak Bharti 2024) शिक्षक भरती सुरु आहे. ती म्हणजे आता जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या 878 जागा भरवण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रक्रियेत आता 604 उमेदवारांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्याला 604 शिक्षक मिळणार आहेत. तरीही यातील 274 जागा रिक्तच राहिल्या आहेत .राज्याच्या शिक्षण विभागाने ही माहिती पवित्र पोर्टलवर देखील जाहीर केलेली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या 878 रिक्त जागा आहेत. याची जाहिरात पवित्र पोर्टलवर 5 फेब्रुवारी रोजी जाहीर केली होती. यासाठी माध्यमिकच्या 56 पदांसाठी, उर्दू भाषेच्या 24 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आता राज्याने रिक्त पदाच्या जवळपास 70 टक्के शिक्षकांची पदे (Shikshak Bharti 2024) भरण्याचा निर्णय घेतलेला आहे.
त्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा आणि उर्दू शाळा शिक्षक भरतीची यादी रविवारी रात्री शासनाने जाहीर केली. परंतु आता मुदत संपल्यावर पूर्ण राज्यात निवड यादी कधी जाहीर होणार. याकडे सगळ्यांचे लक्ष होते परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी यादी जाहीर होईल. अशी देखील माहिती देण्यात आलेली आहे. शासनाने ही यादी जाहीर केल्यानंतर यामध्ये राज्यभरातून 604 उमेदवारांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड केल्याचे समोर आलेले आहे.

काही उमेदवार TET परीक्षा नापास (Shikshak Bharti 2024)
पात्र ठरलेले काही उमेदवार टीईटी परीक्षा पास झालेले नाहीत. त्यामुळे आता त्यांची कागदपत्रे तपासताना शिक्षकांची चांगलीच कसोटी लागणार आहे. परंतु अजून कागदपत्रांची तपासणी कधी करायची हे निश्चित झालेले नाही. ही पडताळणी झाल्यावर जिल्ह्याला नेमके किती शिक्षक मिळणार, हे स्पष्ट होणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IIT Bombay Recruitment 2024 : IIT मुंबई येथे ‘या’ पदावर भरती; जाणून घ्या पात्रता

IIT Bombay Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथे (IIT Bombay Recruitment 2024) प्रकल्प सहाय्यक पदावर भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2024 आहे. या भरतीसाठी बीए / बीएससी / बीकॉम / बीबीए किंवा समकक्ष पदवी प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांसाठी सरकारी आणि सुरक्षित नोकरीची ही उत्तम संधी समजली जाते.

संस्था – इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई
भरले जाणारे पद – प्रकल्प सहाय्यक
पद संख्या – 01 पद (IIT Bombay Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवराकडे बीए / बीएससी / बीकॉम / बीबीए किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे.

परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 14,400/- रुपये ते 31,200/- रुपये.
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – (IIT Bombay Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.iitb.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com