Home Blog Page 117

Mahavitaran Recruitment 2024 : ग्रॅज्युएट्ससाठी महावितरणमध्ये 468 पदांवर नोकरीची संधी; त्वरा करा

Mahavitaran Recruitment 2024
xr:d:DAF2TZni6GE:1610,j:4808017451408473339,t:24041413

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण (Mahavitaran Recruitment 2024) कंपनी लि. अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदाच्या 468 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.
भरले जाणारे पद – कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
पद संख्या – 468 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (Mahavitaran Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 एप्रिल 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – B.Com/BMS/BBA/MSCIT किंवा समतुल्य शिक्षण

वय मर्यादा – (Mahavitaran Recruitment 2024)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 29 डिसेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत
2. मागासवर्गीय/आ.दु.घ. – 05 वर्षे सूट
परीक्षा फी –
1. खुला प्रवर्ग – ₹500/-
2. मागासवर्गीय/अनाथ – ₹250/-
मिळणारे वेतन – 19,000/- ते 21,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
www.mahadiscom.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Big News : सर्वात मोठी बातमी!! देशात निर्माण होणार 5 लाख नोकऱ्या; कंपनी कोणती?

Big News
xr:d:DAF2TZni6GE:1605,j:8937818301762448497,t:24041412

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी (Big News) आनंदाची बातमी आहे. देशातील युवकांसाठी एका कंपनीत मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आयफोन (iPhone) निर्माता Apple (Apple) या कंपनीमध्ये लाखोच्या संख्येत नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार पुढच्या तीन वर्षात Apple कंपनीमध्ये तब्बल पाच लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत.

Apple कंपनी भारतात मुसंडी मारणार
Apple कंपनीच्या माध्यमातून भारतात 5 लाख नोकरीच्या संधी (Big News) उपलब्ध होणार आहे. ही बातमी देशातील युवकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. यामुळं भारतातील नोकऱ्यांची संख्या तीन पटीनं वाढणार आहे. Apple कंपनी भारतात आपलं उत्पादन झपाट्यानं वाढवणार आहे. व्यवसायाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने हालचीलांना देखील वेग आला आहे. Apple सध्या भारतात अधिक गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे.

कर्मचाऱ्यांच्या संख्येत 3 टक्क्यांनी वाढ होणार (Big News)
Apple कंपनी पुढील तीन वर्षात भारतात पाच लाख नोकऱ्या देणार आहे. यामुळं Apple शी संबधीत कर्मचाऱ्यांच्या संख्येत तीन टक्क्यांनी वाढ होणार आहे. या निर्णयामुळं अप्रत्यक्ष रोजगारातही वाढ होणार आहे. सध्या जगातील एकूण iPhone उत्पादनापैकी 7 iPhone हे भारतात तयार होतात. 2030 पर्यंत याची संख्या 25 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. त्यामुळं देशात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. ही तरुणांसाठी मोठी संधी असणार आहे. ज्या युवकांना अॅपल कंपनीमध्ये काम करायचे आहे, त्यांची इच्छा आता पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : पदवीधारकांसाठी सरकारी नोकरी!! दरमहा 1 लाख ते 2 लाख 60 हजार पगार

Government Job
xr:d:DAF2TZni6GE:1599,j:580263291099581156,t:24041411

करिअरनामा ऑनलाईन । मुरगाव पोर्ट प्राधिकरण अंतर्गत रिक्त (Government Job) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सचिव पदाच्या रिक्त जागेवर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 आहे.

संस्था – मुरगाव पोर्ट प्राधिकरण
भरले जाणारे पद – सचिव (HOD)
पद संख्या – 01 पद
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 एप्रिल 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व अनुभव असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा फी – फी नाही (Government Job)
मिळणारे वेतन – 1,00,000/- रुपये ते 2,60,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – गोवा

काही महत्वाच्या लिंक्स – (Government Job)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
www.mptgoa.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : रॉकेलच्या दिव्याखाली केला अभ्यास; आधी IRS नंतर झाले IAS

UPSC Success Story of IAS Anshuman Raj
xr:d:DAF2TZni6GE:1595,j:3674236229291225666,t:24041410

करिअरनामा ऑनलाईन । कोणीतरी बरोबरच म्हटले आहे (UPSC Success Story) की, जर तुमच्यामध्ये एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल तर वाईट परिस्थिती देखील तुमच्या यशाच्या मार्गात अडथळा आणू शकत नाही. IAS अंशुमन राज (IAS Anshuman Raj) यांची कहाणी सुध्दा अशीच आहे. त्यांनी केवळ सेल्फ स्टडीच्या आधारावर भारतातील सर्वात कठीण समजली जाणारी UPSC (UPSC) नागरी सेवा परीक्षा पास केली आहे. ही परीक्षा ते एकदा नव्हे तर दोनदा उत्तीर्ण झाले आहेत. ते आधी आयआरएस (IRS) आणि नंतर आयएएस (IAS) अधिकारी झाले आहेत.

रॉकेलच्या दिव्याच्या प्रकाशात केला अभ्यास
आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी (UPSC Success Story) खेडे गावात राहून देशातील सर्वात कठीण अशी UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा पास केली आणि ते IAS अधिकारी बनले. त्यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. अंशुमन हे बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील एका छोट्या गावातील रहिवासी आहेत. गावातीलच नवोदय विद्यालयातून त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. रॉकेलच्या दिव्याच्या उजेडात त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. यानंतर ते 12 वीच्या अभ्यासासाठी JNV रांची येथे गेले.

कठोर परिश्रम आणि जिद्दीने स्वप्न पूर्ण केले (UPSC Success Story)
अंशुमन राज यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय सामान्य आहे. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यांना लहानपणापासून म्हणाव्या तशा मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. तरी हार न मानता मेहनतीने, जिद्दीने आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने त्यांनी UPSC परीक्षेत भरघोस यश मिळवले. त्यांनी केलेली कामगिरी तरुणांसाठी प्रेरणा ठरत आहे.

आधी IRS आणि नंतर झाले IAS (UPSC Success Story)
अंशुमन यांनी घरीच सेल्फ स्टडी करुन यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा विचार केला आणि पहिल्याच प्रयत्नात ती परीक्षा पासही केली. त्यावेळच्या निकालाच्या दर्जाप्रमाणे त्यांना आयआरएस (IRS) पद मिळाले. पण, हे पद मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा परीक्षा देण्याचा विचार केला कारण त्यांचे खरे उद्दिष्ट आयएएस (IAS) अधिकारी बनण्याचे होते. मात्र त्यानंतरच्या दोन प्रयत्नांत त्यांना यश मिळाले नाही. परंतु अपयश आले तरी न खचता त्यांनी परीक्षेची तयारी सुरूच ठेवली. 2019 साली ते परीक्षेच्या चौथ्या प्रयत्नात UPSC नागरी सेवा परीक्षा 107 व्या क्रमांकाने पास झाले आणि अखेर IAS होण्याचे त्यांचे ध्येय पूर्ण झाले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NTA Alert : मतदानाची शाई बोटावर असल्यास परीक्षा देता येणार की नाही? वाचा खुलासा…

NTA Alert
xr:d:DAF2TZni6GE:1590,j:6359507500681810293,t:24041408

करिअरनामा ऑनलाईन । देशातील विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत (NTA Alert) महत्वाची अपडेट आहे. ‘लोकसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत जे मतदान करतील आणि ज्यांच्या बोटांना मतदानाची शाई लागली असेल अशा विद्यार्थ्यांना नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही’; या मेसेज मुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

NTA ने केला खुलासा
NEET UG 2024, CUET UG 2024, JEE Mains किंवा नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाणारी इतर कोणतीही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी NTA कडून अलर्ट जारी करण्यात (NTA Alert) आला आहे. ज्याचा परिणाम देशातील 50 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांवर होणार आहे; त्यामुळे एनटीएने याबाबत मोठा खुलासा केला आहे.

व्हायरल मेसेजमुळे विद्यार्थी संभ्रमात (NTA Alert)
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर असे अनेक मेसेज पसरवले जात आहेत, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की लोकसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत जे मतदान करतील आणि ज्यांच्या बोटांना शाई लागली असेल त्यांना NTA द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी परीक्षा हॉलमध्ये (NTA Alert) प्रवेश दिला जाणार नाही. या मेसेज मुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, ही माहिती खरी आहे की खोटी याचे स्पष्टीकरण आता NTA ने स्वत: दिले आहे; त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

NTA ने दिले स्पष्टीकरण
NTA ने स्पष्ट केले आहे की; “सोशल मीडियावर असा (NTA Alert) दावा केला जात आहे; की लोकसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत जे मतदान करतील आणि ज्यांच्या बोटांना शाई लागली असेल त्यांना NTA द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांच्या परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.” मात्र हा संदेश पूर्णपणे मूर्खपणाचा आहे. याला कोणताही आधार नाही. NTA ने अशी कोणतीही मार्गदर्शक तत्वे जारी केलेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा अफवांकडे लक्ष देऊ नये व मतदानाचा हक्क बजावावा, मतदानामुळे परीक्षेसाठी तुमच्या पात्रतेवर कोणताही फरक पडणार नाही.” असे एनटीएने स्पष्ट केले आहे. तसेच एजन्सीने उमेदवारांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून आगामी परीक्षेची तयारी करण्याचा सल्ला दिला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Menstruation Leave : मोठी बातमी!! आता मासिक पाळी दरम्यान विद्यार्थिनींना मिळणार हक्काची सुट्टी

Menstruation Leave
xr:d:DAF2TZni6GE:1583,j:3822855005883796961,t:24041407

करिअरनामा ऑनलाईन । मासिक पाळी दरम्यान मुलींना (Menstruation Leave) होणारा शारीरिक त्रास लक्षात घेवून पंजाब विद्यापीठाने मोठा निर्णय घेतला आहे. मासिक पाळी दरम्यान विद्यार्थिनींना सुट्टी देण्याच्या प्रस्तावाला विद्यापीठाने मंजुरी दिली असून असा निर्णय घेणारे पंजाब विद्यापीठ (Punjab University) हे उत्तर भारतातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.

सुट्टीसाठी करावा लागणार अर्ज (Menstruation Leave)
विद्यापीठ प्रशासनाने सर्व विभागांना मासिक रजेबाबत परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार विद्यार्थिनींना शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून मासिक पाळी दरम्यान सुट्टी दिली जाणार आहे. या रजेसाठी विद्यापीठ प्रशासनाने काही अटीही ठेवल्या आहेत. या अंतर्गत रजा घेण्यासाठी विद्यार्थिनींना प्रथम विभागीय कार्यालयात (Menstruation Leave) उपलब्ध फॉर्म भरावा लागणार आहे. कॅलेंडरनुसार, विद्यार्थी मासिक पाळीमुळे एक दिवसाच्या रजेसाठी अर्ज करू शकतात.परंतु किमान 15 दिवस अभ्यासासाठी येण्याच्या अटीवरच ही रजा दिली जाईल. नियमानुसार प्रत्येक सेमिस्टरला चार दिवस सुट्टी दिली जाईल.

केरळमधील कोचीन विज्ञान आणि तंत्रज्ञान (Menstruation Leave) विद्यापीठाने जानेवारी 2023 मध्ये अशा पद्धतीची सुट्टी लागू केली होती. अशी सुट्टी लागू करणारे हे देशातील पहिले विद्यापीठ ठरले होते. आसामचे गुवाहाटी आणि तेजपूर युनिव्हर्सिटी, हैदराबादमधील नलसर युनिव्हर्सिटी ऑफ लॉ या मासिक पाळीच्या रजा मंजूर करणाऱ्या देशातील इतर संस्था आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : तुरूंगातून पळून जाण्यासाठी कोणत्या देशात शिक्षा दिली जात नाही? वाचा असे भन्नाट प्रश्न

GK Updates 13 Apr.
xr:d:DAF2TZni6GE:1576,j:6359507491013151070,t:24041406

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न – अशी कोणती वस्तू आहे ज्याला मान आहे पण डोके नाही?
उत्तर – बाटली
प्रश्न – कोणत्या शहराला 1 दिवसासाठी भारताची राजधानी करण्यात आलं होतं
उत्तर – प्रयागराज (अलाहाबाद) 1858 मध्ये 1 दिवसासाठी भारताची राजधानी घोषित करण्यात आले होते.

प्रश्न – पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदानासाठी कोणता आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो?
उत्तर – पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट (GK Updates) योगदान देणार्‍या पत्रकाराला ‘पुलित्झर पुरस्कार’ देण्यात येतो.
प्रश्न – तुरूंगातून पळून जाण्यासाठी कोणत्या देशात शिक्षा नाही?
उत्तर – जर्मनीत तुरूंगातून पळून जाणाऱ्या कैद्याला शिक्षा होत नाही.

प्रश्न – ज्या प्राण्याचे हृदय 1 मिनिटात 1000 वेळा धडकते त्या प्राण्याचे नाव आपल्याला माहित आहे काय?
उत्तर – पाल ही एक प्राणी आहे ज्याचे हृदय 1 मिनिटात 1000 वेळा धडकते.
प्रश्न – एखाद्या व्यक्तीला पॅराशूटशिवाय विमानातून फेकले गेले तरी तो कसा जगतो?
उत्तर – कारण त्यावेळी ती व्यक्ती विमान धावपट्टीवरच होती त्यामुळे ती व्यक्ती जगते.
प्रश्न – (GK Updates) तुम्ही 100 मधून किती वेळा 10 वजा करू शकता?
उत्तर – एक वेळा
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : प्राध्यापक ते शिक्षकेतर कर्मचारी पदावर मोठी भरती; इथे अर्ज करा E-MAIL

Job Alert
xr:d:DAF2w5xVX7c:281,j:1926839488977451304,t:24041314

करिअरनामा ऑनलाईन । झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 07 दिवस आहे.

संस्था – झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर
भरले जाणारे पद –
1. प्राध्यापक
2. सहयोगी प्राध्यापक
3. सहायक प्राध्यापक (Job Alert)
4. शिक्षकेतर कर्मचारी
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
E-MAIL ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 07 दिवस

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी दिलेल्या E-MAIL ID वर अर्ज करायचा आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी (Job Alert) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात बघावी.

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.jitnagpur.edu.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BMC Recruitment 2024 : पदवीधर उमेदवारांना मुंबई महापालिकेत नोकरीची संधी; तब्बल 92,300 पगार

BMC Recruitment 2024
xr:d:DAF2TZni6GE:1570,j:1176990146098239658,t:24041313

करिअरनामा ऑनलाईन । मुंबईमध्ये नोकरी करण्याची अनेकांची इच्छा (BMC Recruitment 2024) असते. अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘अनुज्ञापन निरीक्षक’ पदाच्या एकूण 118 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे.

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Recruitment 2024)
भरले जाणारे पद – अनुज्ञापन निरीक्षक
पद संख्या – 118 पदे (BMC Recruitment 2024)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज लिंक सुरू होण्याची तारीख – 20 एप्रिल 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले असावे.
वय मर्यादा – (BMC Recruitment 2024)
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षे
मागासवर्गीय – 43 वर्षे
परीक्षा फी –
1000/- रुपये.
मागासवर्गीय प्रवर्ग – 900/- रुपये
मिळणारे वेतन – स्तर M17 रु. 29,200/- 92,300/- (असुधारित वेतनश्रेणीनुसार 5200-20200+2800 श्रेणीवेतन)
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
शुध्दीपत्रक PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

National Credit Framework : शाळांमध्ये लागू होणार ‘क्रेडिट सिस्टीम’; अकॅडमी बँकेत जमा होणार विद्यार्थ्यांचं क्रेडिट

National Credit Framework
xr:d:DAF2TZni6GE:1567,j:8593292834797105343,t:24041313

करिअरनामा ऑनलाईन । मुलांच्या सर्वांगीण विकासाचा आणि (National Credit Framework) त्यांच्या गरजेचा विचार करून शिक्षणात नवनवीन बदल होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर शाळेमध्ये नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क (National Credit Framework) या अंतर्गत देखील विविध प्रयोग राबवले जात आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी महत्त्वाची पावले देखील उचलली जात आहेत. या धोरणानुसार आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने शाळांसाठी आणखी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने शाळांच्या नियमांमध्ये एक बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा बदल शैक्षणिक वर्ष 2024 -25 पासून लागू करण्यात येणार आहे. शाळेमध्ये आता क्रेडिट सिस्टम प्रणाली (National Credit Framework) लागू होणार आहे. हा प्रोजेक्ट शाळेमध्ये ‘पायलट प्रोजेक्ट’ म्हणून राबवला जाणार आहे.

काय आहे क्रेडिट सिस्टीम? (National Credit Framework)
ही क्रेडिट सिस्टीम इयत्ता 6 वी, 9 वी आणि 11 वीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. या प्रणालीमध्ये नवनवीन वर्षांत 210 तास प्रत्येक विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यास 40 ते 50 क्रेडिट गुण दिले जाणार आहेत. परंतु यासाठी दोन अटी देखील ठेवलेल्या आहेत. पहिली अट म्हणजे सर्व विषयात परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि दुसरी अट म्हणजे वर्षभरात वर्गात 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याने जर 5 विषय घेतले असते, तर 210 प्रति विषयाप्रमाणे 1050 तास अभ्यासाचे होतात. तसेच यामध्ये 150 तास अंतर्गत मूल्यांकन, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव आणि सामान्य अभ्यासासाठी असणार आहेत. प्रत्येक विषयासाठी सात क्रेडिट असणार आहेत. म्हणजेच सक्तीचे असणारे पाच विषय घेतले, तर त्याला 40 क्रेडिट मिळेल जर एखाद्या विद्यार्थ्याने सहा किंवा सात विषय घेतले, तर त्याला 47 ते 54 पर्यंत क्रेडिट मिळणार आहे.

अकरावीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील हे क्रेडिट मिळणार आहे. अकरावीमध्ये एक भाषा आणि चार विषय उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 40 क्रेडिट दिले जाणार आहेत. अकरावीमध्ये (National Credit Framework) अंतर्गत मूल्यमापन, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव आणि सामान्य अभ्यासासाठी दीड तास वेळ असणार आहे. विद्यार्थ्यांनी हे विषय घेतल्यास त्यांना 47 ते 54 एवढे क्रेडिट मिळणार आहे.

अकॅडमी बँकेत जमा होणार हे क्रेडिट
विद्यार्थ्यांना मिळणारे क्रेडिट हे अकॅडमी बँक ऑफ क्रेडिटमध्ये जमा होणार आहे. सीबीएसई (CBSE) बोर्डाने प्रत्येक शाळेला या प्रणालीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे या प्रोजेक्टमध्ये सहभागी होणाऱ्या शाळांना बोर्डाकडून मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com