Talathi Bharti : तलाठी भरतीला वेग येणार; कोर्टाने स्टे उठवला

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरती प्रक्रियेवरील स्टे कोर्टाने (Talathi Bharti) उठवला आहे. त्यामुळे आता तलाठी भरतीचा पुढील टप्पा लवकरच सुरु होणार आहे. पेसा क्षेत्रातील जिल्ह्यांमधील पद भरतीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने 13 जिल्ह्यांमधील पदांबाबत निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

पेसा अर्थात आदिवासीबहुल क्षेत्रातील तलाठी पदांची नियुक्ती निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली आहे. निवडणूक आयोगाने तूर्तास लाल कंदील दाखवला आहे. मात्र, अन्य २३ जिल्ह्यांमध्ये (Talathi Bharti) एक हजारांहून अधिक तलाठ्यांची नियुक्ती झाली. गेल्या वर्षी जूनमध्ये ४ हजार ४६६ जागांसाठी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली.

या’ उमेदवारांची नियुक्ती रखडली (Talathi Bharti)
२३ जिल्ह्यांमधील २ हजार ४७९ निवड झालेल्या उमेदवारांपैकी १ हजार ४४९ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली होती. त्यातील १ हजार ४४ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. सर्वाधिक १४१ तलाठी रायगड जिल्ह्यात, त्याखालोखाल ११३ सोलापूर जिल्ह्यामध्ये, वर्धा येथे ६३, नागपूरमध्ये ५३ आहेत. अमरावती, यवतमाळ, पालघर, गडचिरोली, पुणे, नगर, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, चंद्रपूर, नांदेड व ठाणे या जिल्ह्यांमधील १ हजार ७०३ उमेदवारांची नियुक्ती रखडली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com