Home Blog Page 44

GK Updates : आपले हृदय दिवसातून किती वेळा धडधडते? सामान्य ज्ञान वाढवणारे भन्नाट प्रश्न

GK Updates

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1- कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे (GK Updates) रक्तातील अडथळे थांबत नाहीत?
उत्तर- जेव्हा शरीरात ‘व्हिटॅमिन K’ ची कमतरता असते तेव्हा रक्ताचा अडथळा थांबत नाही.
प्रश्न 2- मानवी शरीरातील कोणत्या ग्रंथीला ‘मास्टर ग्रंथी’ म्हणतात?
उत्तर- पिट्यूटरी ग्रंथीला ‘मास्टर ग्रंथी’ म्हणतात.
प्रश्न 3- भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण होते?
उत्तर- भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन होते. 1967 ते 1969 पर्यंत त्यांनी अध्यक्षपद भूषवले.

प्रश्न 4- भारतातील कोणते राज्य बांगलादेशने तीन बाजूंनी वेढलेले आहे?
उत्तर – त्रिपुरा राज्याच्या सीमा बांगलादेशने तीन बाजूंनी वेढल्या आहेत. त्याची उत्तर, दक्षिण आणि पश्चिम सीमा बांगलादेशशी जोडली आहे.
प्रश्न 5- क्रिप्टो करन्सीची 2 उदाहरणे सांगा.
उत्तर- बिटकॉइन आणि इथरियम (GK Updates)
प्रश्न 6- भारताचा कोहिनूर कोणत्या राज्याला म्हणतात?
उत्तर- आंध्र प्रदेशला देशाचा कोहिनूर म्हणतात. कोहिनूर हिरा इथे गोलकोंडा खाणीतून सापडला होता.

प्रश्न 7- आपला डोळा एका तासात किती माहितीवर प्रक्रिया करतो?
उत्तर- मानवी डोळा प्रति तास 36000 बिट माहितीवर प्रक्रिया करतो. आपली नजर एका सेकंदात 50 गोष्टींवर केंद्रित असते.
प्रश्न 8- आपले हृदय दिवसातून किती वेळा धडधडते?
उत्तर- हृदय हा शरीरातील एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. ते दिवसातून 1,00,000 वेळा धडधडते.
प्रश्न 9- क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे?
उत्तर- गोवा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य आहे.
प्रश्न 10 – (GK Updates) भारताच्या राष्ट्रध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर किती आहे?
उत्तर- तिरंग्याच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर 3:2 आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ZP Recruitment 2024 : शिक्षकांसाठी मोठी बातमी; ‘या’ जिल्हा परिषदेत भरती सुरू

ZP Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला जर ठाण्यात नोकरी (ZP Recruitment 2024) करायची असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ‘सेवानिवृत्त शिक्षक’ पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर..

संस्था – जिल्हा परिषद, ठाणे
भरले जाणारे पद – सेवानिवृत्त शिक्षक
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड व शहापूर या कार्यालयात (PDF पहा)

नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Minimum Bachelor’s degree in Technology or Science.
असा करा अर्ज – (ZP Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारले घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://zpthane.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IOCL Recruitment 2024 : 10 वी, ITI पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी बातमी!! इंडियन ऑईलमध्ये 476 पदांवर भरती सुरु

IOCL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी संदर्भात एक महत्वाची (IOCL Recruitment 2024) अपडेट हाती आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने मोठी भरती जाहीर केली आहे. या अंतर्गत नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांच्या एकूण 476 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे. जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहेत; अशा उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे. जाणून घ्या सविस्तर…

संस्था – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड
भरले जाणारे पद – नॉन-एक्झिक्युटिव्ह
पद संख्या – 476 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 22 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2024

अर्ज फी – ३००/- रुपये
वय मर्यादा – १८ ते २६ वर्षे
भरतीचा तपशील – (IOCL Recruitment 2024)

पदएकूण पद संख्या
नॉन-एक्झिक्युटिव्ह476
Post NameNo of Posts
Junior Engineering Assistant379 Posts
Junior Quality Control Analyst21 Posts
Engineering Assistant38 Posts
Technical Attendant29 Posts

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
नॉन-एक्झिक्युटिव्ह10th Class Pass, Engineering Diploma, or ITI
Post NameQualification
Junior Engineering AssistantDiploma, B.Sc
Junior Quality Control AnalystB.Sc
Engineering Assistant (IOCL Recruitment 2024)Diploma
Technical Attendant10th, ITI

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी (IOCL Recruitment 2024) उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचा.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.
4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://iocl.com/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : सरकारी नोकरीची मोठी संधी!! महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात होणार 289 पदावर भरती

Government Job

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि (Government Job) मूल्यनिर्धारण विभागात विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या पद, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर…

संस्था – महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग
पद संख्या – 289 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑगस्ट 2024

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. रचना सहायक (गट ब) – 261 पदे (Government Job)
पात्रता – स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य/नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा
2. उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) – 09 पदे
पात्रता – 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण, लघुलेखन 120 श.प्र.मि., इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
3. निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) – 19 पदे
पात्रता – 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण, लघुलेखन 100 श.प्र.मि., इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

वय मर्यादा (Government Job) –
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 29 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे
2. मागासवर्गीय/आ.दु.घ. 05 वर्षे सूट
परीक्षा फी –
1. खुला प्रवर्ग – ₹1000/-
2. मागासवर्गीय – ₹900/-
मिळणारे वेतन –
1. रचना सहायक (गट ब) – रु. 38,600/- ते 1,22,800/- दरमहा
2. उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) – रु. 41,800/- ते 1,32,300/- दरमहा
3. निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) – रु. 38,600/- ते 1,22,800/- दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://dtp.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC Recruitment 2024 : हिंदी ट्रान्सलेटर पदावर सरकारी नोकरी!! SSC अंतर्गत नवीन भरती सुरू

SSC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी निवड आयोग अंतर्गत विविध (SSC Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अनुवाद अधिकारी, कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ अनुवादक, वरिष्ठ हिंदी अनुवादक या पदांच्या एकूण 312 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर…

संस्था – कर्मचारी निवड आयोग
भरले जाणारे पद –
1. कनिष्ठ अनुवादक अधिकारी
2. कनिष्ठ हिंदी अनुवादक
3. कनिष्ठ अनुवादक
4. वरिष्ठ अनुवादक
5. वरिष्ठ हिंदी अनुवादक
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Diploma, Degree

मिळणारे वेतन – रु. 35,400/- ते 1,12,400/-
वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज फी (SSC Recruitment 2024) –
1. Women/SC/ST/PWD/Ex – Nill
2. इतर उमेदवारांसाठी – रु. 100/-
परीक्षेच्या तारखा –

Dates for submission of online applications02.08.2024 to 25.08.2024
Last date and time for receipt of online applications25.08.2024 (23:00 hours)
Last date and time for making online fee payment26.08.2024 (23:00 hours)
Date of”Window for Application Fonn  Correction” and online payment of Correction Charges.04.09.2024 to 05.09.2024 (23:00 hours)
Schedule of Computer Based Examination (Paper-I)October-November, 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT)/ज्युनियर ट्रांसलेटर (JT)
इंग्रजी विषयासह हिंदी (SSC Recruitment 2024) पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य, हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र
2. सिनियर हिंदी ट्रांसलेटर (SHT)/सिनियर ट्रांसलेटर (ST)
इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अपुर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://ssc.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Banking Job : ‘या’ सहकारी बँकेत नोकरीची संधी!! दरमहा 50 हजार पगार

Banking Job

करिअरनामा ऑनलाईन । दि पुसद अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, पुसद (Banking Job) अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शाखा व्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – दि पुसद अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, पुसद
भरले जाणारे पद – शाखा व्यवस्थापक
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Banking Job)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दि पुसद अर्बन को- ऑप बँक लि. पुसद मुख्य कार्यालय, तलाव ले-आउट पुसद जि. यवतमाळ पी. नं. 445204
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2024

नोकरी करण्याचे ठिकाण (Banking Job) – पुसद, जि. यवतमाळ
वय मर्यादा – 30 ते 55 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – Rs. 50,000/- दरमहा

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण (Banking Job) असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – https://pusadurbanbank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!! महागाई भत्त्यात होणार ‘एवढी’ वाढ

7th Pay Commission

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात (7th Pay Commission) मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी 2024 पासूनचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आला होता. यानुसार संबंधित नोकरदार वर्गाला 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एका वर्षात दोनदा सुधारित होत असतो. पहिल्यांदा जानेवारी महिन्यापासून आणि दुसऱ्यांदा जुलै महिन्यापासून महागाई भत्ता रिवाईज होत असतो.

जुलै महिन्यापासून DA किती वाढणार हे AICPI च्या जानेवारी ते जून या कालावधीमधील आकडेवारीनुसार स्पष्ट होणार आहे. पण, आतापर्यंत जानेवारी ते मे या कालावधीमधील AICPI ची आकडेवारी समोर आली आहे. अजून जून महिन्याची आकडेवारी समोर येणे बाकी आहे. यामुळे ही आकडेवारी कधी जाहीर होणार याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. आत्तापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार पुढील महागाई भत्ता वाढ किती टक्क्यांनी वाढणार याबाबत अंदाज वर्तवला जाऊ लागला आहे.

DA मध्ये किती वाढ होणार (7th Pay Commission)?
जानेवारीमध्ये AICPI इंडेक्सचा आकडा 138.9 वर होता. यात महागाई भत्ता वाढून 50.84 टक्के झाला. यानंतर फेब्रुवारीमध्ये इंडेक्स 139.2, मार्चमध्ये 138.9, एप्रिलमध्ये 139.4 आणि मेमध्ये 139.9 वर पोहचला आहे.
या पॅटर्ननुसार मे मध्ये महागाई भत्ता 52.91 इतका झाला आहे. विशेष म्हणजे जून महिन्याची आकडेवारी आल्यानंतर यामध्ये आणखी थोडीशी वाढ होणार आहे. मात्र असे असले तरी यावेळी महागाई भत्ता हा फक्त तीन टक्क्यांनी वाढणार अशी शक्यता आहे.

DA 4% होण्यासाठी….
DA 4% होण्यासाठी एआयसीपीआयचा इंडेक्स 143 पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. पण, सध्याची आकडेवारी पाहिली तर असे होणे अशक्य आहे. म्हणून जुलै महिन्यापासून (7th Pay Commission) महागाई भत्ता फक्त तीन टक्क्यांनी वाढणार असे बोलले जात आहे. खरेतर गेल्या दोन वर्षांच्या काळात सातत्याने महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढत राहिला आहे. पण जुलै महिन्यापासून महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढला तर दोन वर्षात पहिल्यांदाच महागाई भत्यामध्ये एवढी कमी वाढ होणार आहे.

कधी होणार निर्णय?
याबाबतचा निर्णय हा सप्टेंबर महिन्याच्या शेवटी किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेतला जाईल अशी शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये निर्णय झाला तर त्याच महिन्याच्या पगारासोबत महागाई भत्ता वाढ आणि महागाई भत्ता फरकाची रक्कम सदर नोकरदार वर्गाला मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Railway Jobs : रेल्वेची नोकरी सगळ्यात खास का आहे? भरघोस पगारासोबत मिळतात ‘या’ सुविधा

Railway Jobs

करिअरनामा ऑनलाईन । आजच्या काळात करिअरचे अनेक (Railway Jobs) पर्याय उपलब्ध आहेत, पण सरकारी नोकऱ्यांचे आकर्षण अजूनही कमी झाले नाही. सध्याच्या युगातही तरुण रक्त सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत. त्यातही रेल्वेच्या नोकरीची बाब वेगळीच आहे. काही खास कारणास्तव, दरवर्षी लाखो उमेदवार रेल्वेच्या काही हजार रिक्त जागांसाठी अर्ज करतात. रेल्वे हा असा विभाग आहे की ज्यामध्ये छोट्या पदासाठीही लोकांमध्ये स्पर्धा असते. रेल्वेच्या नोकऱ्या इतक्या खास का मानल्या जातात ते आज आपण जाणून घेऊया.

नोकरीची शाश्वती
रेल्वेत नोकरी मिळाली की आयुष्य कायमचे सेट होते असे समजले (Railway Jobs) जाते. येथे निवड झाल्यानंतर तुम्हाला चांगला पगार मिळतोच शिवाय तुम्हाला सेवा निवृत्तीनंतर चांगली पेन्शनही मिळते. रेल्वेची नोकरी सर्वात सुरक्षित नोकरी समजली जाते. कोणतीही मोठी समस्या सोडल्यास, तुम्ही रेल्वेतील तुमची नोकरी कधीही गमावत नाही. एखाद्या कर्मचाऱ्याला काही झाले तर त्याची बायको किंवा मुलांना अनुकंपा तत्वावर त्यांना नोकरीत रुजू करून घेतले जाते. या क्षेत्रात कधीच मंदी येत नाही.

आकर्षक पगार (Railway Jobs)
रेल्वेतील पगाराविषयी बोलायचे झाले तर येथे मुख्य अभियंता यांना सर्वाधिक पगार मिळतो, ते वार्षिक 50 ते 56 लाख रुपये कमावतात. तर टॉप 10 टक्के कर्मचाऱ्यांना 13 ते 14 लाख रुपये वार्षिक पगार मिळतो. त्याचवेळी, शीर्ष 1 टक्के 40 लाख रुपयांपर्यंत कमाई करतात. याशिवाय येथे रजा रोखीकरणाचीही सुविधा आहे.

मोफत प्रवास
रेल्वे कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळतात. या सुविधा बऱ्याच प्रमाणात आपल्या पोस्टवर देखील अवलंबून असतात. थोडक्यात, सर्व कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा मिळते किंवा कमी भाडे द्यावे लागते. याशिवाय अधिकाऱ्यांना निवासापासून घरभाड्यापर्यंतच्या सुविधा दिल्या जातात. जे कर्मचारी रेल्वे क्वार्टरमध्ये राहत नाहीत त्यांना एचआरए दिला जातो.

खेळांसाठीही मदत उपलब्ध
जे कर्मचाऱ्यांनी खेळात चांगले प्राविण्य मिळवले आहे; त्यांना (Railway Jobs) रेल्वेकडून खेळण्याची संधी मिळते. रजा घेणे आणि स्पर्धा खेळण्याव्यतिरिक्त, रेल्वे आपल्या कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारे मदत करते.

शिक्षणाचा खर्च
उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांना रेल्वे आर्थिक मदतही करते. रेल्वेची स्वतःची शाळा आणि रुग्णालये देखील आहेत. रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुलांना त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत ट्रेनमध्ये मोफत प्रवासाची सुविधा मिळते.

मोफत वैद्यकीय उपचार
रेल्वे आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोफत वैद्यकीय (Railway Jobs) सुविधा पुरवते. आपण उपचार घेण्यासाठी रेल्वे रुग्णालयात जाऊ शकता. तेथे काही रोगावर उपचार उपलब्ध नसल्यास बाहेरील उपचारांचा खर्चही रेल्वे प्रशासन देते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : वडिलांची हत्या.. UPSC चा कठोर अभ्यास.. सुरु होती तारेवरची कसरत; जिद्दीने बनला IPS

UPSC Success Story of IPS Bajrang Yadav

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC Success Story) दरवर्षी देशातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षा म्हणजेच सिव्हिल सर्व्हिसेसचे आयोजन करते. ही परीक्षा अशी आहे जीथे तुमच्या मेहनतीसोबतच तुमच्या चिकाटीची आणि सातत्याचीही कसोटी लागते. या परीक्षेसाठी लाखो तरुण अर्ज करतात. या परीक्षेत संयमाने तयारी करणाऱ्यांनाच यश मिळते. या परीक्षेत यशस्वी होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे हे तुम्हा आम्हा सर्वांनाच माहीत आहे. तरीही तरुण वर्ग वर्षानुवर्षे या परीक्षेची तयारी करत रात्रंदिवस मेहनत घेतात. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत अधिकारी म्हणून सामील होण्यासाठी, काहीजण आपल्या कुटुंबापासून लांब राहून अभ्यास करतात. तर काहीजण 9 ते 5 नोकरी आणि घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत तयारी करतात. नागरी परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर देशभरातील तरुणांच्या प्रेरणादायी आणि विलक्षण कथा आपल्याला वाचायला मिळतात. यातील एक कथा बजरंग यादव (IPS Bajrang Yadav) यांची आहे. त्यांच्या वडिलांची हत्या झाली होती आणि त्यानंतर त्यांना नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करण्याचे वेड लागले. आज या लेखाद्वारे आपण बजरंग यादवची कहाणी जाणून घेणार आहोत.

वडिलांची हत्या करणाऱ्या नाराधमांना शिक्षा देण्याची घेतली शपथ
अनेकदा एखाद्या वाईट अनुभवातूनही आपल्यासाठी चांगलं काहीतरी निर्माण होतं. असे अनेक खरे किंवा खोटे किस्से आपण याआधीही ऐकले किंवा चित्रपट, मालिकांच्या माध्यमातून पाहिले असतील. अशीच एक घटना काही वर्षांपूर्वी बजरंग यादव यांच्या वडिलांसोबत घडली. काही गुंडांनी त्यांची हत्या केली, त्यावेळी बजरंग यादव यांनी आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी वडिलांची हत्या करणाऱ्या नराधमांना एक दिवस (UPSC Success Story) शिक्षा करणार असल्याची शपथ घेतली आणि यूपीएससीची तयारी सुरू केली. या परीक्षेसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना मिळाले. ते यूपीएससी पास करून आयपीएस (IPS) अधिकारी बनले आहेत.

अशी झाली वडिलांची हत्या
बजरंग यादव यांचे वडील शेतकरी होते. बजरंग यांनी (UPSC Success Story) अधिकारी व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. वडिलांच्या इच्छेसाठी बजरंगने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. २०१९ च्या परीक्षेच्या तयारीसाठी बजरंग दिल्लीला गेले होते. त्याचवेळी बजरंग यांच्या वडिलांनी नेहमीप्रमाणे अनेक गरीब-गरजू लोकांना मदत केली म्हणून काही गुंडांनी त्यांची हत्या केली. बजरंग पहिल्या परीक्षेसाठी तयारी करणार असताना त्यांच्या वडिलांचा खूण झाला होता. त्यानंतर बजरंग हे खूप खचून गेले. वडिलांच्या निधनाच्या धक्क्यातून बजरंग यांना बाहेर यायला खूप वेळ लागला. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि यानंतर त्यांनी पुन्हा एकदा परीक्षेची तयारी सुरू केली.

दिल्लीत जावून केला UPSC चा अभ्यास
बजरंग यादव हे उत्तर प्रदेशातील बस्ती येथील धोभाट गावचे (UPSC Success Story) रहिवासी आहेत. त्यांचे वडील शेतकरी होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण बस्ती येथील बहादूरपूर येथे झाले. त्यांनी २०१४ मध्ये १०वी उत्तीर्ण केली असून २०१६ मध्ये १२वी उत्तीर्ण केली. तसेच बजरंग यांनी प्रयागराज विद्यापीठातून गणितात पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि ते यामध्ये अव्वल ठरले आहेत. यानंतर ते दिल्लीला गेले आणि यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

नागरी सेवेची आवड डोक्यात गेली
वडिलांच्या हत्येनंतर बजरंग पूर्णपणे तुटले होते. यानंतर त्यांना नागरी सेवा उत्तीर्ण होण्याचे वेड लागले. त्यासाठी त्यांनी रात्रंदिवस अभ्यास सुरू केला.

प्रिलिममध्ये फक्त दीड गुणांनी नापास (UPSC Success Story)
पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर बजरंग यांनी दुसरा प्रयत्न केला. पण यावेळी पूर्वपरीक्षा अवघ्या दीड गुणांनी ते नापास झाले. त्यांनी हार मानली नाही आणि तिसऱ्या प्रयत्नाची तयारी सुरू केली.

वयाच्या २१ व्या वर्षी प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण
बजरंग यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा पूर्व परीक्षा दिली तेव्हा ते फक्त 21 वर्षांचे होते; जे नागरी सेवांमध्ये सामील होण्याचे किमान वय आहे. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली होती हे विशेष म्हणावे लागेल. यानंतर त्यांच्याकडून कुटुंबाच्या अपेक्षा वाढल्या, पण ते मुख्य परीक्षेत यशस्वी होऊ शकले नाहीत.

तिसऱ्या प्रयत्नात UPSC मध्ये मिळाले यश
वडिलांच्या हत्येनंतर बजरंग यांनी IPS होण्याची चांगलीच जिद्द (UPSC Success Story) बाळगली होती. त्यांनी परीक्षेचा तिसरा प्रयत्न केला आणि यावेळी त्यांनी प्रिलिम्स, मेन आणि इंटरव्ह्यू पर्यंत मजल मारली. निकाल जाहीर झाल्यावर ते मित्रांसह निकालाची वाट पाहत होते. बजरंग यांच्या म्हणण्यानुसार निकालाच्या पीडीएफमध्ये त्यांच्या नावाची फक्त तीन अक्षरे लिहिली होती, त्यानंतर त्यांचे नाव आले. हे पाहून ते आणि त्यांचे सर्व मित्र रडू लागले. त्यांनी ही परीक्षा 454 व्या क्रमांकाने पास केली असून, त्यांना आयपीएस अधिकारी होण्याची संधी मिळाली आहे. बजरंग यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांना आयएएस अधिकारी बनून गरीब आणि असहाय लोकांना मदत करायची आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना समजले की, केवळ एक मजबूत अधिकारीच गरीब व्यक्तीला मदत करू शकतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

RBI Recruitment 2024 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘ग्रेड बी’ पदासाठी मोठी भरती सुरु; पटापट करा अर्ज

RBI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी (RBI Recruitment 2024) करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ‘ग्रेड बी’ उमेदवारांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकेने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार या वर्षी एकूण 94 पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड, मुंबई अंतर्गत ‘अधिकारी ग्रेड बी’ पदांच्या एकूण 94 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 25 जुलै 2024 पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड, मुंबई
भरले जाणारे पद – अधिकारी ग्रेड बी
पद संख्या – 94 पदे (RBI Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 25 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई


असा करा अर्ज – (RBI Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करायचा आहे.
3. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
4. भरतीविषयी सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
5. अर्ज प्रक्रिया 25 जुलै 2024 पासून सुरु होणार आहे.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.rbi.org.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com