करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेने पॅरा मेडिकल श्रेणी अंतर्गत विविध (Railway Recruitment) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या श्रेणी अंतर्गत, तुम्ही आहारतज्ज्ञ, नर्सिंग अधीक्षक, डेंटिस्ट, थेरपिस्ट, ईसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, फील्ड वर्कर यासह विविध पदांवर नोकऱ्या मिळवू शकता. तुम्हालाही जर रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असेल तर वैद्यकीय क्षेत्रातील सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम त्यासाठीची पात्रता आणि निवड प्रक्रियेची माहिती घेणं आवश्यक आहे; जेणेकरून नंतर कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवणार नाही.
पॅरामेडिकल पदांसाठी कोण अर्ज करू शकेल? या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त (Railway Recruitment) विद्यापीठ/संस्थेतून संबंधित क्षेत्रात 12वी/व्यावसायिक/तांत्रिक/पदवी/डिप्लोमा/ इ. प्राप्त केलेली असावी. या भरतीसाठी उमेदवाराचे वय 18/19/20/21/22 वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि पदानुसार कमाल वय 33/35/40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
पॅरा मेडिकल पदांसाठी अशी होते निवड (Railway Recruitment) तुम्हालाही रेल्वेमध्ये पॅरा मेडिकल पदांवर भरती व्हायचे असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला संगणक आधारित चाचणी (Computer Based Test) द्यावी लागेल. CBT मध्ये निर्धारित कटऑफ गुण प्राप्त करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी करावी लागेल. सर्व टप्प्यांत यशस्वी झालेल्या उमेदवारांना अंतिम गुणवत्ता यादीत स्थान दिले जाईल.
असा आहे परीक्षेचा नमुना 1. CBT परीक्षेत, उमेदवारांना 100 बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न विचारले जातील. 2. CBT परीक्षेत, उमेदवारांना 100 बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न विचारले जातील. 3. यापैकी 70 प्रश्न व्यावसायिक क्षमतेतून, 10 सामान्य जागरुकतेतून, 10 सामान्य अंकगणितातून, 10 सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कातून, 10 सामान्य विज्ञानातून (Railway Recruitment) विचारले जातील. 4. प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी उमेदवारांना 90 मिनिटे कालावधी दिला जाईल. अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
करिअरनामा ऑनलाईन । ही घटना आहे 2019 मधील. त्यावेळी (IPS Success Story) कोलकाताप्रमाणेच हैदराबादमध्येही एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर अवघ्या 4 दिवसांत या आयपीएस अधिकाऱ्याने त्या चार बलात्काऱ्यांना अशी शिक्षा दिली होती की, ती घटना सर्वांनाच आजन्म लक्षात राहील. या अधिकाऱ्याने या घटनेत सामील असलेल्या चारही बलात्काऱ्यांना एका चकमकीत ठार केले. यानंतर या आयपीएस अधिकाऱ्यावर प्रश्न उपस्थित केले जात असले तरी आता या आयपीएस अधिकाऱ्यासोबत झालेल्या क्रूरतेची आठवण होत आहे. जाणून घेऊया कोण आहेत हे IPS अधिकारी?
कोण आहेत हे धडाकेबाज IPS अधिकारी? व्हीसी सज्जनार असे या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आहे. व्ही. सी. सज्जनार (IPS V. C. Sajjanar) हे एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातात. IPS सज्जनार हे 1996 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. आंध्र प्रदेशच्या पोलीस खात्यात अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे. एवढेच नाही तर त्यांनी तेलंगणातील वारंगल आणि मेडकमध्ये एसपी पदही भूषवले आहे. एसपी असताना त्यांचा मेडकमध्ये एका अफू तस्कराशी सामना झाला होता. या तस्करावर पोलीस हवालदाराची हत्या केल्याचा आरोप होता. आयजी स्पेशल इंटेलिजन्स ब्रँचमध्ये काम करत असताना त्यांनी नक्षलवादी म्हणून वर्णन केलेल्या नईमुद्दीनचाही सामना केला होता. नंतर 2019 मध्ये हैदराबादमध्ये महिला डॉक्टरसोबत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या आरोपीच्या चकमकीतही त्याचे नाव पुढे आले. आयपीएस व्ही. सी. सज्जनार त्या टीमचे नेतृत्व करत होते.
हैदराबादमध्ये महिला डॉक्टर बाबत नेमकं काय घडलं होतं 6 डिसेंबर 2019 रोजी हैदराबादच्या चतनपल्ली भागात (IPS Success Story) हायवेजवळ एका मुलीचा जळालेला मृतदेह आढळला होता. नंतर त्यांची ओळख पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून झाली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, या डॉक्टरचे 27 नोव्हेंबर 2019 रोजी अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. हे क्रूर कृत्य केल्यानंतर नराधमांनी या महिला डॉक्टरची हत्या केली. तिची ओळख लपवण्यासाठी मृतदेह जाळण्यात आला. या घटनेची देशभरात चर्चा सुरू झाली. हैदराबाद बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती.
चार दिवसांत झालं एन्काउंटर (IPS Success Story) या प्रकरणाचा तपास आयपीएस व्ही. सी. सज्जनार यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यावेळी ते सायबराबादचे पोलीस आयुक्त होते. या घटनेनंतर चार दिवसांत पोलिसांनी चारही आरोपींचा सामना केला. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपींना गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार करण्यासाठी गुन्ह्याच्या ठिकाणी नेण्यात आले. तिथे महिला डॉक्टरचा फोन शोधण्यासाठी आरोपींना गाडीतून खाली उतरवण्यात आले, त्यानंतर आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दोन पोलिसांची शस्त्रे हिसकावून घेतली आणि त्यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी गुन्हेगारांना अनेकवेळा आत्मसमर्पण करण्याचा इशारा दिला, पण त्यांनी इशारा जुमानला नाही. पोलिसांनीही गुन्हेगारांना जोरदार प्रत्युत्तर दिले, ज्यामध्ये चारही आरोपी मारले गेले. या थरारक घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्याचे आणि पोलिस दलाचे देशभरात कौतुक झाले तर काहींनी त्यांच्यावर टीकाही केली. नंतर या चकमकीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. प्रकरण न्यायालयात पोहोचले आणि न्यायालयाच्या खंडपीठाने याला बनावट चकमक म्हटले होते.
व्ही. सी. सज्जनार यांचं सर्व स्तरातून कौतुक कोलकाता घटनेचा निषेध करण्यासाठी अनेक बॉलीवूड स्टार्सही समोर आले होते. याच क्रमात बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेलने सोशल मीडियावर 2019 च्या हैदराबाद प्रकरणाचा उल्लेख केला आणि बलात्कार करणाऱ्यांना गोळ्या घालण्याची मागणी केली. कोलकाता घटनेचा हैदराबाद बलात्कार प्रकरणाशी संबंध जोडत अमीषाने लिहिले की, हैदराबादमधील 27 वर्षीय डॉक्टरवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपींचा 4 दिवसांत खात्मा करण्यात आला. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलिसांनी फक्त एका आठवड्यात बलात्कार करणाऱ्यांना गोळ्या घातल्या. अमिषा व्यतिरिक्त, अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आयपीएस व्ही. सी. सज्जनार यांचं कौतुक करण्यात आलं.
बंगाल मध्ये डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि (IPS Success Story) त्यानंतर झालेली तिची हत्या आणि ही घटना ताजी असतानाच बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरून गेला आहे. महिला, तरुणी आणि अल्पवयीन मुलींवर वाढणाऱ्या अत्याचाऱ्याच्या घटना आणि या प्रकरणातील दोषींवर कारवाई होण्यात होणाऱ्या विलंबामुळे आज प्रत्येकाला हैदराबाद घटनेची आठवण होते; कारण जनसामान्यांची अशीच भावना आहे की, गुन्हेगारांचा फक्त 4 दिवसात खात्मा करणारे IPS व्ही. सी. सज्जनार यांच्या सारख्या धडाकेबाज अधिकाऱ्यांच्या हाती अशा सर्व केस सोपवाव्या; जेणेकरून गुन्हेगारांचा खात्मा तर होईलच आणि पीडित मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर नये मिळेल. अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
प्रश्न 1. दिल्लीची सुलतान रजिया सुलतान कोणाची मुलगी होती? उत्तर:शम्स-उद-दीन इल्तुतमिश प्रश्न 2. बिहारचे दु:ख कोणत्या नदीला म्हणतात? उत्तर: कोसी नदी प्रश्न 3. बुर्ज खलिफाचा (GK Updates) मालक कोण आहे? उत्तर: प.पू. शेख खलिफा बिन झायेद प्रश्न 4. कोणत्या प्राण्याला वाळवंटाचे जहाज म्हणतात? उत्तर: उंट
प्रश्न 5. प्रथम ट्रॅफिक सिग्नल कोणी सुरू केले? उत्तर:रेल्वे प्रश्न 6. भारतात राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो? उत्तर:१२ जानेवारी प्रश्न 7. जगातील सर्वात मोठा खंड कोणता देश आहे? उत्तर: आशिया (GK Updates)
प्रश्न 8. रेल्वे ट्रॅकच्या मीटर गेजची रुंदी किती आहे? उत्तर: 1 मीटर प्रश्न 9. बाणभट्ट हा कोणत्या सम्राटाचा दरबारी कवी होता? उत्तरःहर्षवर्धन (GK Updates) प्रश्न 10. वायुमंडलीय दाब मोजण्याचे प्रमाण काय आहे? उत्तर:बॅरोमीटर अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
करिअरनामा ऑनलाईन । इंजीनियर्स इंडिया लिमिटेड अंतर्गत (EIL Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अभियंता/अधिकारी/वैज्ञानिक अधिकारी/वास्तुविशारद, उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक पदांच्या एकूण 77 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2024 आहे.
संस्था – इंजीनियर्स इंडिया लिमिटेड भरली जाणारी पदे – अभियंता/अधिकारी/वैज्ञानिक अधिकारी/वास्तुविशारद, उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक पद संख्या – 77 पदे (EIL Recruitment 2024) अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 सप्टेंबर 2024
असा करा अर्ज – 1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (EIL Recruitment 2024) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. 3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2024 आहे. 4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात (Department of Space Recruitment 2024) असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकार अंतरिक्ष विभाग अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपसंचालक, सहायक संचालक आणि विभाग अधिकारी पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे. जाणून घ्या पद, पात्रता आणि अर्जाविषयी..
संस्था – भारत सरकार, अंतरिक्ष विभाग भरली जाणारी पदे – 1. उपसंचालक 2. सहायक संचालक 3. विभाग अधिकारी पद संख्या – 15 पदे अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 सप्टेंबर 2024 वय मर्यादा – 50 वर्ष
भरतीचा तपशील – (Department of Space Recruitment 2024)
पद
पद संख्या
उपसंचालक
04
सहायक संचालक
09
विभाग अधिकारी
02
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद
आवश्यकशैक्षणिक पात्रता
उपसंचालक
B.E. / B.Tech. OR M.Sc. with minimum 65% marks or 6.84 CGPA from a recognized University OR equivalent qualification.
सहायक संचालक
B.E. / B.Tech. OR M.Sc. with minimum 65% marks or 6.84 CGPA from a recognized University OR equivalent qualification.
विभाग अधिकारी
Degree in Law with 1st Class from recognised University or equivalent.
मिळणारे वेतन –
पद
वेतन
उपसंचालक
Rs. 2,46,780/per month (Level 13 A)
सहायक संचालक
Rs. 1,52,640/per month (Level 12)
विभाग अधिकारी
Rs. 91,080/per month (Level 8)
असा करा अर्ज – 1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. 2. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचा. 3. अर्ज सादर करण्याच्या (Department of Space Recruitment 2024) सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे. 5. मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
करिअरनामा ऑनलाईन । नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC Recruitment 2024) आरोग्य विभाग अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैदयकीय अधिकारी पदांच्या एकूण 54 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखत आठवड्यातील प्रत्येक बुधवारी होणार आहे.
संस्था – नवी मुंबई महानगरपालिका भरले जाणारे पद – वैदयकीय अधिकारी पद संख्या – 54 पदे नोकरी करण्याचे ठिकाण – नवी मुंबई वय मर्यादा – 70 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.1, से. 15 ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई – 400614 (NMMC Recruitment 2024) मुलाखतीची तारीख – आठवड्यातील प्रत्येक बुधवारी
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद
आवश्यकशैक्षणिक पात्रता
वैदयकीय अधिकारी
मान्यता प्राप्त विदयापीठाची एम.बी.बी.एस. पदवीमहाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी बंधनकारकशासकीय / खाजगी यांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक
वैदयकीय अधिकारी – Rs.60, 000 /- दरमहा निवड प्रक्रिया (NMMC Recruitment 2024) – 1. या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे. 2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहावे. 3. मुलाखतीला येताना उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहायचे आहे. 4. मुलाखत आठवड्यातील प्रत्येक बुधवारी होईल.
करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास प्रबोधिनी (Job Notification) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहसंचालक, केंद्रप्रमुख, व्यवस्थापक (खाते) पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर…
संस्था – महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास प्रबोधिनी भरले जाणारे पद – सहसंचालक, केंद्रप्रमुख, व्यवस्थापक (खाते) पद संख्या – 04 पदे अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL) E-MAIL ID – [email protected] अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 सप्टेंबर 2024 नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
भरतीचा तपशील (Job Notification) –
पद
पद संख्या
सहसंचालक
01 post
केंद्रप्रमुख
02 post
व्यवस्थापक (खाते)
01 post
आवश्यक शैक्षणिक पात्रता (Job Notification) –
पद
आवश्यकशैक्षणिक पात्रता
सहसंचालक
Post Graduate in any discipline
केंद्रप्रमुख
Post Graduate in any discipline
व्यवस्थापक (खाते)
Post graduate in Commerce/CA/ICWA or any related discipline with minimum 07 years’ experience in Accounting as Manager, Accounting supervisor or Finance Manager
मिळणारे वेतन –
पद
वेतन
सहसंचालक
Rs. 1,75,000/– to Rs. 2,50,000/- per month
केंद्रप्रमुख
Rs 1,00,000/– to Rs. 1,50,000/- per month
व्यवस्थापक (खाते)
Rs.75,000 plus per month to commensurate with experience and role fit
असा करा अर्ज – 1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. 2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. 3. अर्ज शेवटच्या तारखे (Job Notification) अगोदर सादर करायचा आहे. 4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2024 आहे. 5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
करिअरनामा ऑनलाईन । प्राध्यापकांसाठी नोकरीची उत्तम संधी (Job Alert) निर्माण झाली आहे. राजगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट, धनकवडी, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2024 आहे.
संस्था – राजगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट, धनकवडी, पुणे भरली जाणारी पदे – 1. प्राध्यापक (Job Alert) 2. सहयोगी प्राध्यापक 3. सहायक प्राध्यापक पद संख्या – 07 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL) E-MAIL ID – [email protected] अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑगस्ट 2024 नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
भरतीचा तपशील – (Job Alert)
पद
पद संख्या
प्राध्यापक
01
सहयोगी प्राध्यापक
02
सहायक प्राध्यापक
04
असा करा अर्ज – 1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. 2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचा. 3. अर्ज करण्याची शेवटची (Job Alert) तारीख 27 ऑगस्ट 2024 आहे. 4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. 5. उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या वरील संबंधित ई-मेल पत्त्यावर अर्ज सादर करावे.
करिअरनामा ऑनलाईन | UPSC उमेदवारांच्या यशोगाथा (Success Story) अतूट दृढनिश्चय, जिद्द, चिकाटी आणि त्यागाच्या कथांनी भरलेल्या आहेत. महिला IAS अधिकारी अनु कुमारीचा (IAS Anu Kumari) प्रवास म्हणजे प्रबळ इच्छाशक्ती आणि अतूट दृढनिश्चयाचे एक चमकदार उदाहरण आहे. हरियाणाच्या सोनीपत येथील रहिवासी असलेल्या अनु कुमारी यांनी नोकरी मिळवल्यानंतर 9 वर्षांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. परीक्षेच्या दुस-या प्रयत्नात यश मिळवून त्यांनी हे दाखवून दिले की तुमची मेहनत ही कशावरही अवलंबून नसते. प्रशासकीय सेवेत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनु कुमारी यांनी आपल्या मुलाला दोन वर्षे स्वतःपासून दूर ठेवले होते. जाणून घ्या IAS अनु कुमारीची यशोगाथा….
अशी आहे कौटुंबिक पार्श्वभूमी IAS अनु कुमारी यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1986 रोजी हरियाणातील सोनीपत येथे हिंदू जाट कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बलजीत सिंग आणि आईचे नाव संट्रो देवी आहे. अनु कुमारीला (IAS Anu Kumari) एक लहान बहीण आणि दोन भाऊ देखील आहेत. अनु कुमारी लहानपणापासून तिच्या अभ्यासाबाबत खूप जगरुक होत्या. त्यांनी चांगल्या शैक्षणिक संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले आहे.
किती शिकल्या आहेतअनु कुमारी IAS अनु कुमारी यांनी आपले प्राथमिक शिक्षण शिव शिक्षा सदन, सोनीपत येथून पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून भौतिकशास्त्रात B.Sc ऑनर्स पदवी मिळवली. त्यांचा शिक्षणाचा प्रवास इथेच थांबला नाही. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आयएमटी नागपूरमधून (IMT Nagpur) एमबीए शिक्षण पूर्ण केले आहे.
ICICI बँकेत 9 वर्षे नोकरी (Success Story) एमबीए केल्यानंतर IAS अनु कुमारी यांनी मुंबईतील ICICI बँकेच्या शाखेत काम करायला सुरुवात केली. 2012 मध्ये त्यांनी गुरुग्राम येथील नामांकित व्यापारी वरुण दहिया यांच्यासोबत लग्न केले. लग्नानंतर अनु गुरुग्रामला स्थायिक झाल्या. जवळपास 9 वर्षे नोकरी केल्यानंतर अनु यांनी प्रशासकीय सेवेत (Success Story) सामील होण्यासाठी तयारी सुरू केली. नोकरी मिळवून त्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाल्या असल्या तरी सार्वजनिक सेवेत काम करण्याची त्यांची दीर्घकाळापासून इच्छा होती. म्हणूनच 2016 मध्ये त्या पहिल्यांदा UPSC परीक्षेला बसल्या होत्या.
अभ्यासासाठी मुलाला स्वतःपासून लांब ठेवले UPSC परीक्षेची तयारी करत असताना अनु कुमारी यांचा मुलगा अवघ्या 4 वर्षांचा होता. मुलाचा सांभाळ करत यूपीएससी परीक्षेची तयारी करणे तसे अवघड होते. म्हणून त्यांनी आपल्या (Success Story) मुलाला दोन वर्षांसाठी स्वतःपासून दूर त्यांच्या माहेरी आईकडे पाठवले. अनु यांनी स्वतःला अभ्यासात झोकून दिले. 2017 मध्ये, अनु कुमारी यांनी दुसऱ्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास केली. यामध्ये त्यांनी संपूर्ण भारतात दुसरा क्रमांक पटकावला.
टॉपर होण्याचा मार्ग सोपं नव्हता ICICI बँकेतील नोकरी सोडून ते UPSC मध्ये पास होण्यापर्यंतचा प्रवास अनु यांच्यासाठी सोपा नव्हता. या मार्गात अनेक अडथळे आले. अभ्याससाठी जवळपास दोन वर्षे आपल्या मुलाला स्वतःपासून दूर ठेवून त्यांनी मोठी हिंमत दाखवली. मुलापासून दूर राहण्याचे दु:ख सहन करणाऱ्या अनु कुमारीने अभ्यासात येणाऱ्या अनेक आव्हानांचा धैर्याने सामना केला. या अडथळ्यांना न जुमानता त्यांनी त्यांची तयारी सुरू ठेवली. पण दुर्दैवाने (Success Story) परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले. या अपयशामुळे खचून न जाता त्या शिकत राहिल्या. त्यांनी पुन्हा एकदा परीक्षेचा फॉर्म भरला. यावेळी त्यांनी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा मोठ्या मार्कने पास केली. यावेळी त्यांना संपूर्ण भारतात दूसरा क्रमांक मिळाला आणि त्या IAS अधिकारी बनल्या. अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
करिअरनामा ऑनलाईन । रियालन्स फाउंडेशनने विद्यार्थ्यांच्या (Education Scholarship) हितासाठी एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. रियालन्स फाउंडेशन विद्यार्थ्यांना तब्बल 6 लाखांपर्यंत Scholarship देणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी कुठे आणि कसा अर्ज करायचा याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
5100 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी रिलायन्स फाऊंडेशनने ही शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. सुमारे 5100 विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. देशभरातील ज्या (Education Scholarship) विद्यार्थ्यांना कोणत्याही पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश हवा आहे, ते यासाठी अर्ज करू शकतात. पदवी अभ्यासक्रमात प्रत्येक विषयात शिष्यवृत्ती दिली जात आहे. प्रत्येक पदवीधर विद्यार्थ्याला 2 लाख रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
आवश्यक पात्रता (Education Scholarship) – – जे विद्यार्थी पदवीपूर्व किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेणार आहेत ते या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. पदवी अभ्यासक्रम करत असलेले विद्यार्थी कोणत्याही विषयात अर्ज करू शकतात. त्यांना गुणवत्ता आणि कौटुंबिक उत्पन्नाच्या आधारे शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. – पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि जीवन विज्ञान विषयांमध्ये शिष्यवृत्ती दिली जात असून ती केवळ गुणवत्तेच्या आधारावर दिली जाईल. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 6 लाख रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
6 ऑक्टोबर पर्यंत करता येणार अर्ज रिलायन्सने आतापर्यंत 23 हजारहून अधिक (Education Scholarship) विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी रिलायन्स फाउंडेशनच्या www.scholarships.reliancefoundation.org अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 ऑक्टोबर 2024 आहे. अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com