Home Blog Page 27

UPSC Success Story : पहिलं लग्न तुटलं.. दुसऱ्याने 15 दिवसातच साथ सोडली.. शाळेत नोकरी करून कोमल बनली IRS अधिकारी

UPSC Success Story of IRS Komal Ganatra

करिअरनामा ऑनलाईन । “माझ्या घऱात लहानपणापासून (UPSC Success Story) कधीही मुलगा-मुलगी असा भेदभाव पाहण्यास मिळाला नाही. मुलगी होणं कमी किंवा चुकीचं आहे याची जाणीवही मला कधी झाली नाही. माझे वडील आणि दोन्ही भावांनी फक्त इतकंच सांगितलं की, ‘तू स्पेशल आहेस; महत्त्वाची आहेस. तू आयुष्यात हवं ते करु शकतेस. तुला आयुष्यात खूप पुढे जायचं आहे.’ हे बोल आहेत IRS अधिकारी कोमल यांचे.. संघर्ष करून त्यांनी UPSC मध्ये आपलं स्थान कसं पक्क केलं याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

पहिलं लग्न तुटलं (UPSC Success Story)
एखाद्याचं यश जेवढं दिसतं त्या तुलनेत त्याने केलेला संघर्ष दिसत नाही. प्रशासकीय सेवेत निवड झालेले असे अनेक तरुण-तरुणी आहेत त्यांनी संघर्ष करत हे यश मिळवलं आहे. आयआरएस अधिकारी कोमल गणात्रा (IRS Komal Ganatra) यांच्याही मार्गात अनेक अडथळे आले होते पण त्यांनी पराभव स्विकारला नाही आणि संघर्ष केला. पहिलं लग्न तुटल्यानंतर त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं होतं. पण यानंतर त्यांनी हार मानली नाही. कुटुंबापासून दूर राहत त्यांनी एका शाळेत शिक्षकेची नोकरी केली. इंटरनेट तसंच मुलभूत सुविधा नसतानाही कोमल यांनी सर्वात कठीण परीक्षांपैकी असणारी युपीएससीची (UPSC) परीक्षा उत्तीर्ण केली. सध्या त्या भारतीय महसूल सेवेत (IRS) अधिकारी आहेत. कोमल यांचं हे यश खचलेल्या अनेक तरुणींसाठी उदाहरण आहे.

सुखी संसाराचं स्वप्न अधुरंच राहिलं
कोमल गणात्रा यांचं वयाच्या 26 व्या वर्षी लग्न झालं होतं. लग्नानंतर प्रत्येक मुलीप्रमाणे त्यांनीही सुखी संसाराची स्वप्नं रंगवली होती. पण त्याचं हे स्वप्न अधुरंच राहिलं. कारण लग्नाच्या दोन (UPSC Success Story) आठवड्यातच त्यांचा पती त्यांना सोडून न्यूझीलंडला निघून गेला. कोमल यांचं एका एनआरआय मुलाशी लग्न झालं होतं. यानंतर मात्र कोमल फार खचल्या होत्या. त्यांना प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला होता. पण यावेळी त्यांच्या वडिलांनी मनोबल उंचावण्यास त्यांची मदत केली. तसंच शिक्षण हा एक त्यांच्यासाठी मोठा आधार ठरला.

UPSC ची तयारी आणि सतावणारा भूतकाळ
कोमल यांनी युपीएससीची तयारी सुरु केली. यावेळीही (UPSC Success Story) त्यांना संघर्ष चुकला नाही. आपला भूतकाळ सतावत असताना दुसरीकडे त्यांना युपीएससी परीक्षेत वारंवार अपयश येत होतं. पण त्यानंतरही त्यांनी प्रयत्न करणं थांबवलं नाही. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि चौथ्या प्रयत्नात त्यांनी युपीएससी परिक्षा उत्तीर्ण केली.

वडिलांचे ‘ते’ दोन शब्द प्रेरणादायी ठरले (UPSC Success Story)
कोमल सांगतात की, माझ्या घऱात कधीही मुलगा-मुलगी असा भेदभाव पाहण्यास मिळाला नाही. मुलगी होणं कमी किंवा चुकीचं आहे याची जाणीवही मला कधी झाली नाही. माझे वडील आणि दोन्ही भावांनी फक्त इतकंच सांगितलं की, ‘तू स्पेशल आहेस; महत्त्वाची आहेस. तू आयुष्यात हवं ते करु शकतेस. तुला आयुष्यात खूप पुढे जायचं आहे’. लहानपणासून आमच्या मनात हेच बीज रुजवण्यात आलं होतं. लहानपणापासून वडिलांची वागणूक आणि आईमुळे मिळणारा आत्मविश्वास वेगळाच होता असं त्या सांगतात.

नोकरी करून युपीएससी परीक्षेचा खर्च उभा केला
युपीएससी परीक्षेची तयारी करत असताना कोमल यांनी एका शाळेत शिक्षिकेची नोकरी केली. त्या आई-वडिलांपासून दूर 40 कि. मी. अंतरावरील एका गावात शिकवण्यासाठी जात होत्या. मला लोकांकडून कोणताही त्रास झला नाही; याउलट मला तिथे मान सन्मान मिळत होता. पण जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य (UPSC Success Story) मिळतं तेव्हा त्यासह काही जबाबदाऱ्याही येतात हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ध्येयावरुन आपलं लक्ष हटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जेव्हा तुम्ही भरकटता तेव्हाच समस्या सुरु होतात. पण जेव्हा तुम्ही यशस्वी होतात तेव्हा आपोआप टीका करणाऱ्यांचं तोंड बंद होतं असं कोमल सांगतात.
पुढे त्यांनी सांगितलं आहे की, जर एखाद्या (UPSC Success Story) मुलीला आई-वडील किंवा कुटुंबीयांकडून पाठिंबा मिळाला नाही तर आत्मविश्वास निर्माण करावा लागेल. मेहनतीशिवाय पर्याय नाही हे समजून घ्यावं लागेल. जर तुम्ही लक्ष्य समोर ठेवून वाटचाल केली तर यश मिळणार हे नक्की आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट… अभ्यासात टॉपर.. आता उडवणार बोईंग 777 जम्बो विमान

Success Story of Pilot Tina Singhal

करिअरनामा ऑनलाईन । राजस्थानची मुलगी टीना सिंघलने (Success Story) प्रथम आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि आता बोईंग 777 जंबो विमान उड्डाण करण्यासाठी ती सज्ज आहे. ही कथा एखाद्या चित्रपटासारखी वाटेल पण ही कथा खरी आहे. राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातील मुलगी टीना सिंघल (Tina Singhal) हिने केवळ आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले नाही तर आता ती एअर इंडियामध्ये कॅप्टन म्हणून काम करत आहे. देशातील सर्वात मोठ्या एअरलाइन्सपैकी एक असलेल्या बोईंग 777 (Boing 777) सारखे जंबो विमान उडवणारी ती राजस्थानमधील पहिली महिला पायलट ठरली आहे. हे विमान जगातील सर्वात मोठे ट्विन-जेट विमान मानले जाते आणि टीनाने ते उड्डाण करण्याचा महत्त्वपूर्ण अनुभव मिळवला आहे. ज्यामध्ये हज यात्रेसाठी उडणारी विमाने आणि लांब आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवणे यांचा समावेश आहे.

टीना सिंघलचा प्रवास (Success Story)
टीनाचा प्रवास अबू रोडच्या एका छोट्या शहरातून सुरू झाला आणि आज ती जगभर उडत आहे. टीनाचा जन्म अबू रोड येथे झाला. तिचे वडील वकील होते आणि त्यांचे पती देखील दिल्लीतील प्रसिद्ध वकील आहेत. टीनाने माउंट अबू येथील सोफिया हायस्कूल आणि एचजी इंटरनॅशनल स्कूलमधून 12वीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर ती अभ्यासासाठी अहमदाबादला गेली आणि त्यानंतर पायलट बनण्याच्या तयारीसाठी अमेरिकेला गेली.

कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट
टीना अभ्यासात टॉपर होती आणि तिने कराटेमध्येही उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. तिने कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. तिने मलेशिया आणि टोकियो येथे 2000 आणि 2002 मध्ये झालेल्या कराटे चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

पायलट होण्याचा प्रवास असा आहे
टीनाचा पायलट होण्याचा प्रवास सोपा नव्हता. एका छोट्या शहरातून पायलट होण्याचा प्रवास अवघड असला तरी अशक्य नसल्याचंही तिनं सांगितलं. तिच्या मते कोणतेही ध्येय (Success Story) साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम आणि संघर्ष आवश्यक असतो; यासाठी तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावं लागेल.

संघर्ष आणि आव्हानांनी भरलेलं असतं पायलटचं आयुष्य
पायलटचे जीवन संघर्ष आणि आव्हानांनी भरलेले असते, जिथे त्याला प्रवाशांच्या जीवनाची जबाबदारी सोबतच आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी लागते; असं टीना सांगते.

कोरोना काळात दिलं मोठं योगदान
कोरोना महामारीच्या काळातही टीनाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. जेव्हा लोक त्यांचे जीव वाचवण्यासाठी त्यांच्या घरात बंदिस्त होते, तेव्हा टीनाने इतर देशांतून औषधे आणि वैद्यकीय उपकरणे भारतात पोहोचवण्याचे काम केले. या काळात, फ्लाइट व्यतिरिक्त, कुटुंबातील कोणालाही या विषाणूची लागण होऊ नये म्हणून घरातही संपूर्ण सुरक्षा सुनिश्चित करावी लागली.

महिलांना दिला संदेश
हज यात्रेच्या उड्डाणाबद्दल टीना म्हणाली की, “प्रत्येक पायलटसाठी (Success Story) ही एक मोठी उपलब्धी आहे, कारण त्यात फक्त जबाबदार आणि अनुभवी वैमानिकांनाच पाठवले जाते. पायलट बनू इच्छिणाऱ्या महिलांना संदेश देताना टीना म्हणाली की, “हे क्षेत्र जेवढे दिमाखदार दिसते, तेवढेच त्यासाठी मेहनत आणि झोकून देण्याची गरज आहे. या क्षेत्रासाठी सतत अभ्यास आणि समर्पण आवश्यक आहे, परंतु हे क्षेत्र महिलांसाठी सुरक्षित आहे आणि त्यात चांगल्या संधी आहेत. या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी महिलांनी स्वत:वर विश्वास आणि संयम ठेवला पाहिजे, असे टीनाने सांगितले.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Mantra : करिअरमधील प्रगतीसह तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी ‘या’ सॉफ्ट स्किल्स शिकाच

Career Mantra

करिअरनामा ऑनलाईन । कामाच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता (Career Mantra) वाढवण्यासाठी आणि व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी सॉफ्ट स्किल्स विकसित करणे अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे तुम्हाला नवनवीन करिअरच्या संधीही मिळतात. ही कौशल्ये तुम्हाला केवळ नोकरी मिळवून देत नाहीत, तर कामाच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि तुमच्या व्यक्तिमत्वात विकास करण्यासाठी मदत करतात. तुम्हाला नवनवीन संधीही या सॉफ्ट सिक्ल्समुळे मिळू शकतात. जाणून घेऊया सविस्तर….

1. टीमवर्क –
– सहकाऱ्यांसोबत एकत्रितपणे काम करून उद्दिष्ट साध्य करणे.
– विविध प्रकारच्या लोकांसोबत कार्य करताना सुसंवाद ठेवणे.

2. संवाद कौशल्ये (Career Mantra) –
– स्पष्ट, प्रभावी आणि आत्मविश्वासाने बोलणे हे कौशल्य सहकारी, वरिष्ठ अधिकारी, किंवा ग्राहक यांच्याशी संवाद साधताना उपयुक्त ठरते.
– लेखी संवाद – ईमेल, रिपोर्ट्स, आणि अन्य दस्तऐवज प्रभावीपणे तयार करण्याची क्षमता असणे.
– ऐकून घेणण्याची क्षमता – इतरांचे विचार आणि भावना समजून घेऊन त्यांना प्रतिसाद देणे.

3. नेतृत्व –
– इतरांना प्रोत्साहित करून त्यांचा काम करण्याचा उत्साह वाढवणे.
– योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन त्याची जबाबदारी घेणे.
– कामाचे योग्य विभाजन करून वेळेत ध्येय साध्य करणे.
– समस्यांचे निराकरण करण्यासाठी योग्य उपाययोजना ठरवणे.

4. वेळेचे व्यवस्थापन –
– महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन वेळेचे नियोजन करणे.
– कमी वेळेत अधिक (Career Mantra) काम पूर्ण करणे.
– अंतिम मुदतींचे पालन करणे.

5. जुळवून घेण्याची क्षमता-
– बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेणे.
– सतत नवीन कौशल्ये शिकण्याची आणि स्वतःला अद्ययावत ठेवण्याची तयारी.

6. नवीन गोष्टी शिका –
-उद्योगातील बदलानुसार नवीन तंत्रज्ञान आणि प्रक्रिया शिकणे.

7. भावनात्मक बुद्धिमत्ता –
– आपल्या भावना आणि विचार ओळखणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे.
– इतरांच्या भावनांचा आदर ठेवणे आणि त्यांना योग्य प्रतिसाद देणे.
– तणावाखाली शांत राहून काम करणे.
– आपले विचार, अनुभव, आणि ज्ञान इतरांशी प्रभावीपणे शेअर करणे.

नेटवर्किंग (Career Mantra) –
– प्रभावी व्यावसायिक नेटवर्क तयार करणे आणि त्यांचे पोषण करणे.
– आपल्या नेटवर्कचा उपयोग करून नवीन करिअर संधी शोधणे.
हे सॉफ्ट स्किल्स तुमच्या करिअरच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहेत. या स्किल्समध्ये प्राविण्य मिळवल्यास केवळ नोकरीसाठीच नाही तर तुमच्या व्यक्तिमत्वाच्या संपूर्ण जडण घडणीत हे स्किल्स फायदेशीर ठरणार आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Update : UPSC परीक्षेसाठी उमेदवारांचे आधार कार्डच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन होणार

UPSC Update

करिअरनामा ऑनलाईन । यूपीएससी परीक्षे संदर्भात केंद्र सरकारने (UPSC Update) महत्त्वपुर्ण निर्णय घेतला आहे. सध्या सुरू असलेल्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यासंदर्भात झालेल्या वादानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने असे प्रकार रोखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने UPSCला पहिल्यांदाच नोंदणी आणि भरती परीक्षेसाठी वेगवेगळ्या टप्प्यामध्ये उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्डच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करण्यास परवानगी दिली आहे. आता युपीएससी उमेदवारांचे पहिल्यांदाच आधार कार्डच्या माध्यमातून व्हेरिफेकशन केले जाणार आहे.

आयोगाला आधार अधिनियम २०१६ मधील सर्व तरतुदी त्याच्या अंतर्गत बनवण्यात आलेले नियम आणि विनियम आणि भारतीय विशिष्ट्य ओळख प्राधिकरणाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे (UPSC Update) पालन करावे लागेल, असेही या अधिसूचनेमध्ये सांगण्यात आले आहे; त्यामुळे पुढील काळात UPSCकडून उमेदवारांचे वेगवेगळ्या टप्यावर आधार व्हेरिफिकेशन केले जाणार आहे.

केंद्र सरकारकडून आधार आधारित ओळख पटवण्याची (UPSC Update) परवानी मिळाल्यानंतर कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाने या संदर्भातील अधिसूचनाही प्रसिद्ध केली आहे. यामध्ये केलेल्या उल्लेखानुसार यूपीएससीला वन टाइम रजिस्ट्रेशन पोर्टलवर नोंदणी करत असताना आणि परीक्षा, भरती परीक्षेच्या विविध टप्प्यांमध्ये उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी ऐच्छिक आधारावर ऑथेंटिकेशन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी E-KYC ऑथेंटिकेशन सुविधेचाही उपयोग केला जाणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Educational Scholarship : आता शिक्षणाची चिंता सोडा!! विद्यार्थीनींना मिळणार 1 लाखांपर्यंत स्कॉलरशिप; ‘ही’ पात्रता आवश्यक

Educational Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थिनींच्या शिक्षणा संदर्भात (Educational Scholarship) एक अत्यंत महत्वाची अपडेट हाती आली आहे. गुणवंत विद्यार्थीनी, अपंग विद्यार्थीनी, कोविड-प्रभावित विद्यार्थीनी, LGBTQ विद्यार्थीनी, अनाथ विद्यार्थीनी आणि एक पालक असलेल्या विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य म्हणून ही लेग्रैंड एम्पावरिंग स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 प्रदान करण्यात येत आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

1 लाख रूपयांपर्यंत मदत केली जाणार
लेग्रैंड एम्पावरिंग स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून याद्वारे हुशार विद्यार्थीनींना 1 लाख रूपयांपर्यंत मदत केली जाणार आहे.

‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज (Educational Scholarship) –
या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज स्वीकारले जातील. त्यासाठी 5 सप्टेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्देश हा गुणवंत विद्यार्थीनी, अपंग महिला विद्यार्थी, कोविड-प्रभावित विद्यार्थी, LGBTQ विद्यार्थी, अनाथ विद्यार्थी आणि एक पालक असलेल्या विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य म्हणून ही स्काॅलरशिप दिली जाते.

कोणासाठी आहे शिष्यवृत्ती? काय आहे पात्रता?
हा शिष्यवृत्ती कार्यक्रम फक्त भारतातील गुणवंत विद्यार्थिनींसाठी आहे. अर्जदाराने भारतातील B.Tech, BE, B.Arch, BBA, B.Com किंवा B.Sc पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे (Educational Scholarship) आवश्यक आहे. अर्जदाराने 2023-24 या शैक्षणिक वर्षात 12 वी उत्तीर्ण केलेली असावी. अर्जदाराने 10 वी आणि 12 वी मध्ये किमान 70 टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेले असावेत. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे, असे निकष सामान्य श्रेणीतील विद्यार्थीनींसाठी आहेत.

सामान्य श्रेणीसाठी शैक्षणिक कामगिरीच्या आधारावर, विद्यार्थिनींना (Educational Scholarship) अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत 60 टक्के अभ्यासक्रम शुल्क, दरवर्षी कमाल 60 हजार रुपये दिले जातील. तर विशेष श्रेणीसाठी शेक्षणिक कामगिरीच्या आधारावर, विशेष श्रेणीतील विद्यार्थ्यांना 80 टक्के अभ्यासक्रम शुल्क, अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत प्रति वर्ष कमाल 1 लाख रुपये दिले जातील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Business Success Story : तंबाखू मळलेले घाणेरडे हात पाहून डोक्यात आली कल्पना; अन् उभारली हजारो कोटींची कंपनी; खूप रंजक आहे ही कहाणी

Business Success Story of Madan Paliwal

करिअरनामा ऑनलाईन । यशस्वी लोकं फक्त स्वप्न पाहत (Business Success Story) नाहीत; तर ते कठोर संघर्ष करतात. योग्य दिशेने संघर्ष केला तर यश प्रत्येक परिस्थितीत तुमच्या पायांचे चुंबन घेईल हे निश्चित. मिरज समूहाचे संस्थापक मदन पालीवाल यांनी ही म्हण पूर्णपणे खरी ठरविली आहे. आपले बालपण अत्यंत गरिबीत घालवलेल्या मदन पालीवाल (Madan Paliwal) यांनी सुरुवातीपासूनच ठरवले होते की, त्यांनी जे सोसलं आहे ते येणाऱ्या पिढ्यांना सोसावे लागू नये. हे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी जेवढी मोठी स्वप्ने पाहिली होती, त्यापेक्षा जास्त संघर्ष केला. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगणार आहोत…

मदन पालीवाल यांचा जन्म 1959 मध्ये राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यात झाला. जिल्ह्यातील नाथद्वारा शहरात श्रीनाथजींचे प्रसिद्ध मंदिर आहे, जिथे त्यांचे वडील दीपचंद पालीवाल हे मंदिरात बसवलेल्या पाणपोईसाठी घागरीतून पाणी भरत असत. कालांतराने त्यांच्या वडिलांचा एक पाय निकामी झाला. काम (Business Success Story) करताना त्यांना अडचणी येवू लागल्या तरीही कुटुंब चालवण्यासाठी ते विहिरीतून पाणी आणायचे आणि मंदिरात जाण्यासाठी डझनभर पायऱ्या चढायचे. या कामाच्या बदल्यात त्यांना महिन्याला 10 रुपये पगार मिळत असे; आणि हा पगार त्यांना 5-6 महिन्यातून एकदा मिळायचा. या पगारातूनही काही रक्कम कापून घेतली जायची.

मदन यांनी अभ्यासाची आवड जोपासली (Business Success Story)
मदन यांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींनी ग्रासले होते. त्यांची परिस्थिती अशी होती की 8 बाय 10 च्या भाड्याच्या खोलीत 6 लोकांचे कुटुंब राहत होते. इतकी गरिबी असूनही मदन पालीवाल यांनी अभ्यासाची आवड सोडली नाही. सुरुवातीचे शिक्षण संस्कृतमध्ये पूर्ण केल्यानंतर, त्यांनी आधुनिक शिक्षणाकडे वाटचाल केली आणि मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, ते उदयपूरच्या जवळच्या जिल्ह्यातील एका महाविद्यालयात लिपिक म्हणून काम करू लागले. पैसे मिळवण्याची प्रक्रिया इथून सुरू झाली.

घाणेरडे हात पाहून मिळाली व्यवसायाची कल्पना
मदन पालीवाल यांना व्यवसायाची पहिली कल्पना एका माणसाच्या घाणेरड्या हातातून मिळाली. वास्तविक, ही घटना त्यावेळची आहे जेव्हा ते एका शाळेत लिपिक म्हणून काम करत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत आणखी एक सहकारी होता आणि एके दिवशी संध्याकाळी तो त्याच्या मित्र आणि सहकाऱ्यासोबत शाळेबाहेर उभा होता. तेवढ्यात शाळेचा शिपाई तंबाखू मळत तिथे आला. मदनच्या सहकाऱ्याने त्याला तंबाखू खायला सांगितल्यावर त्याने तंबाखूचा काही भाग दोघांना दिला. शिपायाच्या हातातून तंबाखू घेतली पण त्याच्या घाणेरड्या हातातून तंबाखू खाण्याची हिंमत नव्हती, असे मदन सांगतात. मग तंबाखूचे सेवन करण्याचा सुरक्षित आणि स्वच्छ मार्ग शोधण्याचा विचार त्यांच्या मनात आला.

आणि व्यवसायाला सुरवात झाली….
मदन पालीवाल यांनी स्वतःच्या कल्पनेतून व्यवसाय (Business Success Story) सुरू केला. त्यांनी मोठ्या प्रमाणात तंबाखू विकत घेतली, त्यात चुना मिसळला आणि तो स्वत: ठेचून चोळला. अशाप्रकारे तासाभराच्या मेहनतीनंतर चुना आणि तंबाखू मिसळून खैनी तयार करण्यात आली. मग ही खैनी छोट्या पॅकेटमध्ये भरून त्यांनी दुकानांना पुरवल्या.

खैनीला असं मिळालं ब्रँड नेम
मदन पालीवाल सांगतात की, “मी माझ्या कल्पकतेतून खैनी पदार्थ तयार केला. आता या उत्पादनाला ब्रँड नेम देण्याची वेळ आली होती. त्यावेळी रशियातून मिराज लढाऊ विमान भारतात आले होते आणि या विमानाची वैशिष्ट्ये पाहून मी खूप प्रभावित झालो; म्हणून मी माझ्या पहिल्या उत्पादनाचे ब्रँड नेम ‘मिराज’ ठेवले आहे. अशा प्रकारे मिराज ग्रुपचा पहिला व्यवसाय सुरू झाला. हा खैनी धंदा सुरू झाला आणि शाळेतून मिळणाऱ्या पगारापेक्षा जास्त नफा या धंद्यातून होवू लागला.

कुटुंबीयांनी मृत समजून केली अंत्यसंस्काराची तयारी
तंबाखू आणि चुना मिसळून बाहेर पडणाऱ्या निकोटीनमुळे मदन पालीवाल यांच्या आतड्यांचे गंभीर नुकसान होऊ लागले तेव्हा व्यवसायाने स्वतःची स्थापनाही केली नव्हती. परिस्थिती अशी होती की त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता आणि कुटुंबीयांनी त्यांना मृत समजले आणि त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. नियतीच्या मनात काही वेगळे होते. उदयपूरच्या सरकारी रुग्णालयात महिनाभर मृत्यूशी झुंज देऊन ते परत आले आणि ते जोमाने काम करु लागले. नंतर त्यांनी तंबाखू आणि चुना मिसळण्यासाठी ब्लेंडिंग मशीन विकत घेतली आणि पॅकिंगसाठी शहरातील लोकांनाही सहभागी करून घेतले.

मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झाले
आता मदन पालीवाल यांच्याकडे दूरदृष्टी आणि मनुष्यबळ दोन्ही होते. ते तंबाखू आणि चुना मिक्स करून एक किलो दराने लोकांना द्यायचे आणि छोट्या पॅकेटमध्ये भरून आणायचे. या कामाच्या बदल्यात लोकांना दररोज 100 ते 500 रुपये मिळू लागले आणि त्यांचा व्यवसाय भरभराटीला येऊ लागला. एक व्यवसाय यशस्वी झाल्यानंतर त्यांनी नमकीन आणि रेडीमेड पराठे बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. परदेशात या उत्पादनाला मागणी वाढू लागली.

एकामागून एक व्यवसायात यश मिळत गेले (Business Success Story)
मदन पालीवाल सांगतात की आता माझ्यासमोर आकाश मोकळं होतं आणि मला उडण्याची स्वप्नं पडत होती. यानंतर मी मागे वळून पाहिले नाही. आज मिराज ग्रुपचे 6 पेक्षा जास्त यशस्वी व्यवसाय आहेत. यामध्ये मिराज प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, मिराज डेव्हलपर्स लिमिटेड, मिराज एंटरटेनमेंट लिमिटेड, मिराज मल्टीकॉलर्स प्रायव्हेट लिमिटेड, मिराज पाईप्स आणि फिटिंग्स प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे. कंपनीचे ब्रँड नाव पीव्हीसी पाईप्स खूप लोकप्रिय आहे.

मिराज समूहाचे 48 शहरांमध्ये 100 हून अधिक मल्टिप्लेक्स
मिराज समूहाने पायाभूत क्षेत्रातही मोठा वाटा उचलला आहे. या ग्रुपचे देशातील 48 शहरांमध्ये 100 हून अधिक मल्टिप्लेक्स आहेत. याशिवाय त्यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रातही काम केले आहे. मिराज समूह सध्या उदयपूरजवळ ५० हजार लोकांच्या क्षमतेचे आंतरराष्ट्रीय स्टेडियम बांधत आहे, जे जयपूरनंतर राज्यातील दुसरे स्टेडियम असेल. याशिवाय नाथद्वारामध्ये जगातील सर्वात उंच 369 फूट उंचीची शिवप्रतिमाही बांधण्यात आली असून, तिला ‘विश्वास स्वरूपम’ असे नाव देण्यात आले आहे. हे भारतीय अभियांत्रिकीची एक अनोखी कला सादर करते. आज मिराज समूह 10 हजार कोटींहून अधिक किमतीचा मोठा व्यवसाय बनला आहे आणि मदन पालीवाल यांची एकूण संपत्तीही हजारो कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UMED MSRLM Recruitment 2024 : ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अंतर्गत ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी; अर्जासाठी त्वरा करा

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (UMED MSRLM Recruitment 2024) उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून राज्य संसाधन व्यक्तींचे (एसआरपी) वर्गीकरण पदांच्या एकूण 394 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.

संस्था – उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका
भरले जाणारे पद – राज्य संसाधन व्यक्तींचे (एसआरपी) वर्गीकरण
पद संख्या – 394 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. पदवीधर/MSW/MBA (UMED MSRLM Recruitment 2024)
2. मराठी आणि MS ऑफिसचे ज्ञान आवश्यक
वय मर्यादा – 65 वर्षे

असा करा अर्ज (UMED MSRLM Recruitment 2024) –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://www.umed.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Swadhar Yojana 2024 : राज्य सरकारने सुरु केली स्वाधार योजना; ‘या’ विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 51 हजार

Swadhar Yojana 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील (Swadhar Yojana 2024) गरीब विद्यार्थ्यांसाठी ‘स्वाधार योजना’ सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून जे विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेवू शकत नाही त्यांना सरकारतर्फे आर्थिक मदत दिली जाणार आहे. या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थ्यांना 51,000 रुपये दिले जाणार आहेत. 11 वी, 12 वी, डिप्लोमा, व्यावसायीक आणि निम व्यवसायीक शिक्षण घेणाऱ्या तसेच राज्यातील गरीब व मध्यम वर्गीय अनुसूचित जाती व नव बौद्ध श्रेणीतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. सरकारकडून मिळणाऱ्या या आर्थिक लाभामधून विद्यार्थी आपल्या शिक्षणासाठी लागणाऱ्या गोष्टींसाठी खर्च करू शकतात. या उपक्रमामुळे विद्यार्थी आपले उच्च शिक्षण पूर्ण करून आपले भविष्य उज्ज्वल करण्याचे स्वप्न पूर्ण करु शकणार आहेत.

महाराष्ट्रात राज्य सरकारने सुरु केलेल्या ‘स्वाधार योजने’ अंतर्गत राज्यामधील अनुसूचित जाती (SC) आणि नव बौद्ध (NB) समुदायातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक स्वरूपात मदत केली जाणार आहे. सरकारतर्फे 10 वी, 12 वी, डिप्लोमा आणि व्यावसायीक कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. यामधून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दर वर्षी 51 हजार रुपये रक्कम देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या विविध सुविधांसाठी होणाऱ्या खर्चाचा विचार करून ही रक्कम ठरवण्यात आली आहे.

स्वाधार योजना काय आहे (Swadhar Yojana 2024) –
1. योजनेचे नाव – स्वाधार योजना
2. श्रेणी – महाराष्ट्र सरकारी योजना
3. सुरु कोणी केली – महाराष्ट्र राज्य सरकार (समाज कल्याण विभाग)
4. कधी सुरु केली – 2024
5. उद्देश – गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत
6. लाभार्थी – महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व नवं बौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी
7. आर्थिक लाभ – प्रतिवर्ष 51,000 रुपये
8. अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन
9. अधिकृत वेबसाइट – sjsa.maharashtra.gov.in

स्वाधार योजनेचा उद्देश काय आहे?
केंद्र सरकारने सुरु केलेल्या स्वाधार योजनाचे उद्देश राज्यामधील मध्यम व गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे तसेच चांगले शिक्षण प्राप्त करून त्यांचे भविष्य उज्ज्वल करणे; हा आहे. राज्यामध्ये गरीब वर्गातली काही मुले ज्यांना उच्च शिक्षण घ्यायची खूप इच्छा असते, परंतु घरची गरीब परिस्थिती आणि शिक्षणाला लागणार खर्च ते भागवू शकत नाही; यासाठी सरकार त्यांना उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत करते. यामधून मिळणाऱ्या रक्कमेतून अनुसुचित जाती व जमातींच्या परिवारातील मुलांना आपले शिक्षण न थांबवता ज्ञान प्राप्त करून भविष्यात चांगला रोजगार निर्माण करता येऊ शकतो.

स्वाधार योजनेचे फायदे
– महाराष्ट्र राज्यातील दुर्बळ व गरीब वर्गातील मुलांना शिक्षणासाठी Maharashtra Swadhar Yojana च्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाणार.
– या योजने अंतर्गत गरीब वर्गातील मुलांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी दरवर्षी 51 हजार रुपये बँक खात्यामध्ये पाठविले जाणार.
– सरकारने सुरु केलेल्या या योजनेमध्ये राज्यातील (Swadhar Yojana 2024) बारावी व अकरावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार.
– तसेच डिप्लोमा, व्यावसायिक व बिगर व्यावसायिक कोर्स करणारे सुद्धा यामध्ये अर्ज करून लाभ मिळवू शकतात.
– राज्यामधील अनुसूचित जाती व नव बौद्ध श्रेणीच्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजने अंतर्गत लाभ घेता येणार.
– विद्यार्थी प्रत्येक वर्षी भेटणाऱ्या आर्थिक लाभाचा त्यांच्या बोर्डिंग, लॉजिंग आणि इतर खर्चासाठी या रक्कमेचा उपयोग करू शकतात.
– राज्यातील सरकारने शारीरिक स्वरूपातील अपंगत्त्व असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
– विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी या योजनेमधून मिळणाऱ्या आर्थिक लाभाचा उपयोग करून घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

असं आहे स्वाधार योजनेमध्ये मंजूर केलेल्या आर्थिक लाभाचे वर्गीकरण
सुविधा खर्च –

1. बोर्डिंग सुविधा – 28,000 रुपये
2. लॉजिंग सुविधा – 15,000 रुपये
3. मेडिकल आणि इंजिनियरिंग अभ्यासक्रमासाठी – 5,000 रुपये (अतिरिक्त)
4. विविध खर्च – 8,000 रुपये
5. इतर शाखांसाठी – 2,000 रुपये (अतिरिक्त)
एकूण रक्कम – 51,000 रुपये

आवश्यक पात्रता अशी आहे (Swadhar Yojana 2024) –
1. महाराष्ट्र स्वाधार योजनेस पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.
2. या योजनेमध्ये फक्त गरीब व दुर्बल वर्गातील अनुसूचित जाती (SC), जमाती आणि नव बौद्ध (NB) श्रेणीतील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
3. ज्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, त्याच कुटुंबातील मुले या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
4. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी अकरावी, बारावी, डिप्लोमा, व्यावसायिक किंवा बिगर व्यावसायिक क्षेत्रामध्ये शिक्षण घेणारा हवा.
5. विद्यार्थ्यांला यामध्ये सहभागी होण्यासाठी मागील वर्गात कमीत कमी 60% मार्क असणे महत्त्वाचे आहे.
6. जे विद्यार्थी अपंग आणि दिव्यांग असतील त्यांना सहभागी होण्यासाठी त्यांना मागील वर्गात कमीत कमी 40% टक्केवारी असणे आवश्यक आहे.
7. यामध्ये अर्ज करून लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे बँक खाते असून ते आधारकार्ड सोबत लिंक असणे गरजेचे आहे.
8. महाराष्ट्राच्या बाहेरील स्थानिक विद्यार्थ्यांना या योजनेत सहभागी होता येणार नाही.
9. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्याकडे जातीचा दाखला असणे बंधनकारक आहे.
10. सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक लाभाचा उपयोग फक्त शैक्षणिक कालावधीनुसार जास्तीत जास्त 7 वर्ष घेता येईल.

स्वाधार योजनेच्या अटी –
1. विद्यार्थ्यांने अर्ज करताना फॉर्म अपूर्ण सोडू नये.
2. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे नसल्यास अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
3. अर्ज करण्यासाठी खोटी कागदपत्रे लावल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
4. एखाद्या विद्यार्थ्याचे मागील वर्गातील गुण 60% च्या खाली असतील तर तो विद्यार्थी अर्जसाठी पात्र राहणार नाही.
5. जे विद्यार्थी अनुसुचित जाती व नवं बौद्ध असून ते अपंग आहे त्यांना 40% गुणाप्रमाणे अर्ज करण्यास मान्यता आहे.

कोणकोणती कागदपत्रे आवश्यक –
1. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे आधारकार्ड (बँकेला लिंक असलेले)
2. जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate)
3. बँक खात्याचे पासबुकचे पहिले पान
4. ओळखपत्र
5. मोबाईल नंबर
6. पासपोर्ट आकाराचा फोटो
7. मागील वर्गातील गुणपत्रीका
8. अपंगत्व प्रमाणपत्र
9. रहिवासी दाखला
10. कुटुंबातील मुख्य सदस्याचे वार्षिक उत्पन्न दाखला
11. महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट
12. शपथपत्र

स्वाधार योजनेसाठी असं करा रजिस्ट्रेशन
1. स्वाधार योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी राज्य सरकारकडून ऑनलाइन अर्ज प्रकिया अजून सुरु करण्यात आली नाही. परंतु या योजनेमध्ये अर्ज करून लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकता.
2. सर्व प्रथम तुम्हाला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in/ अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
3. वेबसाइटवर गेल्यानंतर तुमच्या समोर होमपेज उघडेल.
4. त्या होमपेजमध्ये तुम्हाला Swadhar Yojana Form PDF ची लिंक प्राप्त होईल.
5. त्या लिंकवर क्लिक करून फॉर्म (Swadhar Yojana 2024) डाउनलोड करून प्रिंट करून घ्या.
6. फॉर्ममध्ये विचारली गेलेली सगळी माहिती काळजीपूर्वक भरा.
7. आवश्यक कागदपत्रे जोडा.
8. त्यानंतर तुम्हाला तो फॉर्म आणि कागदपत्रे तुमच्या जिल्ह्यामधील समाज कल्याण विभागामध्ये जाऊन जमा करायचा आहे.
9. कार्यालयाकडून तुमचे सगळे कागदपत्रे तपासले जातील आणि तुम्ही पात्र असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातील.
10. अशाप्रकारे तुम्ही या योजनेमध्ये अर्ज करून आर्थिक लाभाचा उपयोग करून घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

EPFO Recruitment 2024 : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत नोकरीची संधी; B.Com सह ‘ही’ पात्रता आवश्यक

EPFO Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. सरकारी नोकरीची ही मोठी संधी समजली जाते. या भरतीच्या माध्यमातून उपसंचालक (लेखापरीक्षण) आणि सहायक संचालक (लेखापरीक्षण) पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे.

संस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना
भरली जाणारी पदे –
1. उपसंचालक (लेखापरीक्षण)
2. सहायक संचालक (लेखापरीक्षण)
पद संख्या – 14 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 60 दिवस (21 ऑक्टोबर 2024)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री. दीपक आर्य, प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त-II (भरती/परीक्षा विभाग), प्लेट ए, तळमजला, ब्लॉक II, पूर्व किडवई नगर, नवी दिल्ली-110023

भरतीचा तपशील (EPFO Recruitment 2024) –

पदपद संख्या 
उपसंचालक (लेखापरीक्षण)09 पदे
सहायक संचालक (लेखापरीक्षण)05 पदे

मिळणारे वेतन –

पदवेतन
उपसंचालक (लेखापरीक्षण)Level-11
सहायक संचालक (लेखापरीक्षण)Level-10

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. उपसंचालक (लेखापरीक्षण) – Graduation (preferably B.Com), passed SAS exam, experience in audit/accounts, relevant service
2. सहायक संचालक (लेखापरीक्षण)– Graduation, experience in accounts/audit, relevant service

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी (EPFO Recruitment 2024) उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचा.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस (21 ऑक्टोबर 2024) आहे.
4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.epfindia.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BEML Recruitment 2024 : भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड येथे भरती सुरु; पात्रता फक्त ITI पास ते ग्रॅज्युएट

BEML Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (BEML Recruitment 2024) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ट्रेनी पदांच्या विविध जागांसाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. एकूण 100 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2024 आहे.

संस्था – भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड
पद संख्या – 100 पदे
भरली जाणारी पदे –
1. ITI ट्रेनी-(Fitter) – 07 पदे
2. ITI ट्रेनी-(Turner) – 11 पदे
3. ITI ट्रेनी-(Machinist)- 10 पदे
4. ITI ट्रेनी-(Electrician) – 08 पदे
5. ITI ट्रेनी-(Welder) – 18 पदे
6. ऑफिस असिस्टंट ट्रेनी – 46 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता (BEML Recruitment 2024 ) –
पद क्र.1 ते 5 – ITI (Fitter/Turner/Machinist/Electrician/Welder)
पद क्र.6 – कमर्शियल प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा/पदवी किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशनमधील प्रवीणता सह सेक्रेटरीयल प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 सप्टेंबर 2024

वय मर्यादा –
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 04 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 32 वर्षे
2. SC/ST – 05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट (BEML Recruitment 2024)
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.bemlindia.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com