Home Blog Page 265

NAAC Assessment : कौतुकास्पद!! NACC मूल्यांकनात महाराष्ट्र आघाडीवर; कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर 

NAAC Assessment

करिअरनामा ऑनलाईन । National (NAAC Assessment) Assessment and Accredited Council (राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाण परिषद) ही शैक्षणिक संस्थांचे मूल्यमापन करणारी संस्था आहे. भारतात NACCची स्थापना वर्ष १९९४ मध्ये करण्यात आली होती. उच्च शिक्षणाची पद्धत सुधारावी यासाठी उच्च शिक्षण संस्थांचे वेळोवेळी मूल्यांकन केले जाते. NACC कडून मिळणारे मूल्यांकन आणि मान्यता यावरुन शैक्षणिक संस्थांचा दर्जा ठरत असतो. शैक्षणिक संस्थेची कामगिरी कशी आहे, अभ्यासक्रमाची रचना आणि अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाते, विद्यार्थ्यांचा निकाल, संस्थेद्वारे केले जाणारे संशोधन कार्य, सभासदांचे प्रकाशन, प्रशासन, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुख सुविधा इत्यादी गोष्टींची नोंद घेत शैक्षणिक संस्थेचा दर्जा ठरवला जातो.

NACCच्या मूल्यांकनात महाराष्ट्र राज्य आघाडीवर (NAAC Assessment)
संस्थांचे मूल्यांकन <१.५० ते ४.०० या CGPA पट्टीत केले जाते. त्यानंतर D ते A++ अशी अक्षरात्मक श्रेणी निश्चित केली जाते. यानुसार शैक्षणिक संस्थेला मान्यता दिली जावी की नाही हे निश्चित करण्यात येते. १.५० पेक्षा कमी CGPA असलेल्या संस्थांना मान्यता दिली जात नाही.
सर्व शैक्षणिक संस्थांसाठी NACCचे मूल्यांकन करून घेणे महत्त्वाचे आहे. आणि उच्च शिक्षण विभागाव्दारे वेळोवेळी या गोष्टींचा पाठपुरावा केला जातो. अनेकवेळा आपल्या शैक्षणिक संस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी खोटं चित्र दाखवले जाते किंवा हे थोडे वेळखाऊ काम असल्यामुळे अनेक संस्था याकडे दुर्लक्ष करतात.

यावेळी महाराष्ट्रातील अनेक शैक्षणिक संस्था NACC (NAAC) मुल्यांकनात आघाडीवर आहेत. आत्तापर्यंत राज्यातील ३५ विद्यापीठे आणि १,९२२ महाविद्यालये आणि १,९५७ उच्च शिक्षण संस्थांनी NACCचे मूल्यांकन केले आहे. महाराष्ट्रानंतर कर्नाटक मधून‌ १०२८ शिक्षण संस्थांनी NACCचे मूल्यांकन केले आहे तर तिसऱ्या क्रमांकावर तमिळनाडू ९०४ मूल्यांकनांसह आहे.
त्याविषयी अधिक माहिती देताना उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर म्हणाले की राज्यातील शिक्षण संस्थांनी NACCचे मूल्यांकन करणे महत्त्वाचे आहे. शासनाद्वारे या गोष्टीचा सतत पाठपुरावा केला जातो. NACCचे नियम न पाळणाऱ्या शैक्षणिक संस्थेचे कार्य रोखण्याचा आदेश देण्यात आला आहे. म्हणूनच राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांनी NACCचे मूल्यांकन करून घेतले असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : ‘Police’ या शब्दाचा फुल फॉर्म माहितीये का? वाचून चाट पडाल!!

GK Updates 14 Aug

करिअरनामा ऑनलाईन । लहान मुलांपासून ते अगदी वृध्दांपर्यंत (GK Updates) असा कोणी नसेल ज्याने ‘पोलीस’ हा शब्द ऐकला नसेल. पोलीस हा सरकारचा कर्मचारी असून कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेच्या रक्षणाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली आहे. प्रसंगी बळाचा वापर करण्याचेही त्यास अधिकार आहेत. पोलिसांमुळे आज आपण सुरक्षित आहोत. पोलिसांचे नाव आणि काम आपल्या सर्वांना माहित आहे, पण तुम्हाला माहित आहे का की ‘पोलिस’ या शब्दाचा देखील एक पूर्ण फॉर्म आहे…? ऐकून विश्वास बसणार नाही; पण हे खरं आहे. पोलिस हा शब्द अनेक शब्दांनी तयार झाला आहे. जाणून घेवूया…

देशातील प्रत्येक प्रदेशातील गुन्ह्यांचा मुकाबला करताना पोलिसांचे काम किती महत्त्वाचे असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पोलिस विविध मार्गांनी नागरिकांचे गुन्हेगारांपासून संरक्षण (GK Updates) करतात. पोलीस हे एक सुरक्षा दल आहे जे आपल्या देशातील रहिवाशांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असते, जसे सैन्य परकीय शत्रूंपासून आपले संरक्षण करण्यासाठी सज्ज असते. त्याचप्रमाणे, अंतर्गत अनैतिक कृत्यांपासून सामान्य जनतेचे संरक्षण करणे आणि देशाच्या हितासाठी प्रत्येक गुन्हेगारी खटला चालवणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. एखाद्या व्यक्तीला एखाद्या गुन्हेगारी प्रकरणामुळे त्रास होत असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर तो पोलिसांची मदत घेऊन त्याच्या स्थानिक पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवू शकतो.

काय आहे ‘POLICE’ शब्दाचा फुलफॉर्म? (GK Updates)
भारतातील पोलीस खाते ब्रिटिशांनी सुरू केले होते. अनेक लोकांना पोलिसचा (Police) फुल फॉर्म माहित नाही, पोलिस म्हणजे ‘Public Officer for Legal Investigations and Criminal Emergencies’ असे पोलिस या शब्दाचे पूर्ण रुप आहे. भारतात कोलकाता (पश्चिम बंगाल) वगळला तर भारतातील सर्व राज्यांतील पोलीस खाकी वर्दी परिधान करतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Talathi Bharti 2023 : तलाठी भरती परीक्षा 17 ऑगस्टपासून होणार सुरु; आजपासून उपलब्ध होणार परीक्षेचे हॉल तिकीट

Talathi Bharti 2023 (17)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या महसूल (Talathi Bharti 2023) विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४३४४ पदांवर भरती होणार आहे. या भरतीसाठी जमावबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालय यांच्याकडून राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे.
तलाठी पदाच्या ४३४४ जागांच्या भरतीसाठी संपूर्ण राज्यातून तब्बल १३ लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेले आहेत. या अगोदर तलाठीसाठी परीक्षा फक्त एका दिवशी होणार होती परंतु आता ही परीक्षा तब्बल १९ दिवस चालणार आहे. काही दिवसांपूर्वी या परीक्षेचे वेळापत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे.

तलाठी भरती परीक्षेसाठी TCS कंपनीच्यावतीने तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी आवश्यक असणारी ही परीक्षा १७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत एकूण १९ दिवस होणार असून ही परीक्षा ३ सत्रांमध्ये घेतली जाणार आहे.

परीक्षेसंदर्भात महत्वाच्या तारखा –
1.
१७ ऑगस्ट २०२३ ते २२ ऑगस्ट २०२३
2. २६ ऑगस्ट २०२३ ते २९ ऑगस्ट २०२३
3. ३१ ऑगस्ट २०२३ आणि १ सप्टेंबर २०२३
4. ४ सप्टेंबर २०२३ ते ६ सप्टेंबर २०२३
5. ८ सप्टेंबर २०२३ आणि १० सप्टेंबर २०२३
6. १३ सप्टेंबर २०२३ आणि १४ सप्टेंबर २०२३

वरील सर्व तारखांना सत्राची वेळ अशी असेल –
सत्र १ : सकाळी ९.०० ते ११.००
सत्र २ : दुपारी १२.३० ते २.३०
सत्र ३ : सायंकाळी ४.३० ते ६.३०

आज मिळणार हॉल तिकीट – 
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४३४४ पदांच्या भरती परीक्षा आता तोंडावर आली आहे. TCS च्या वतीने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून, TCS आणि शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनांनुसार परीक्षेचे प्रवेश पत्र (Talathi Bharti Hall-ticket) उमेदवारांना परीक्षेपूर्वी ३ दिवस अगोदर अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार, तलाठी भरतीसाठी अर्ज करून पात्र ठरलेल्या उमेदवारांना आजपासून हॉलतिकीट (Talathi Bharti 2023) अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हॉल तिकीट संदर्भातील माहिती उमेदवाराच्या मोबाईल, ईमेल आयडी वर पाठवली जाईल. सर्व उमेदवारांनी त्यांचे ई मेल युजर आयडी एकदा चेक करून पाहावे की तुम्ही दिलेला मेल आयडी आणि मोबाईल नंबर बरोबर आहे का याची खात्री करावी.
तलाठी पदभरतीबाबत अधिक माहितीसाठी, आणि तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी  http://mahabhumi.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.

असं आहे परीक्षेचे स्वरूप – (Talathi Bharti 2023)
1. तलाठी पद भरतीसाठी घेण्यात येणारी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
2. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी/ अंकगणित या विषयांसाठी प्रत्येकी ५० गुण, अशी एकूण २०० गुणांची परीक्षा उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने द्यावी लागणार आहे.
3. प्रत्येक विषयाच्या विभागात २५ प्रश्न असून, प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी २ गुण असतील.
4. सदर परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या समान असेल. परंतु, मराठी आणि इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (बारावी) समान राहील.
5. निवडप्रक्रियेत पात्र होण्यासाठी उमेदवाराला किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य असेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MGNREGA Recruitment 2023 : पात्रता फक्त 8 वी ते 10 वी पास; मनरेगा अंतर्गत ‘या’ जिल्ह्यात नवीन भरती सुरु

MGNREGA Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण (MGNREGA Recruitment 2023) रोजगार हमी योजना, परभणी अंतर्गत ‘संसाधन व्यक्ती’ पदाच्या 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी र्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, परभणी
भरले जाणारे पद –  संसाधन व्यक्ती (Resource Person)
पद संख्या – 100 पदे
वय मर्यादा – 18 – 50 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपजिल्हाधिकारी (रोहयो ) जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 सप्टेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – परभणी

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 8वी/10वी पास असणे आवश्यक आहे.
असा करा अर्ज – (MGNREGA Recruitment 2023)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
3. अर्जासोबत आवशक कागद पत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
4. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
5. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

निवड प्रक्रिया – (MGNREGA Recruitment 2023)
1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीने होणार आहे.
2. मुलाखतीसाठी उमेदवाराने स्वखर्चाने उपस्थित राहावे.
3. मुलखातीस येताना आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी.
4. मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – mahaegs.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : राज्य शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 125 पदांवर भरती; पात्रता फक्त 10 वी पास

Government Job (2)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना (Government Job) आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभागातील रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून “शिपाई ” (गट-ड) संवर्गातील एकूण 125 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. २०/०९/२०२३ पासून उपलब्ध होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईल.

संस्था – नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग, महाराष्ट्र शासन
भरले जाणारे पद – शिपाई
पद संख्या – 125 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 20 सप्टेंबर 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभाग
वय मर्यादा – 18 ते 40 वर्षे
अर्ज फी –
अराखीव प्रवर्ग – रु. 1000/-
राखीव प्रवर्ग – रु. 900/-
अर्ज फी – (Government Job)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – Rs. 15,000/- ते 47,600/- दरमहा
वय मर्यादा –
1. उक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज करण्याच्या दिनांकास किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे व ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
2. (मागासवर्गीयांसाठी खेळाडूंसाठी / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी / अनाथांसाठी वयोमर्यादा ०५ वर्ष शिथिलक्षम राहील.)
3. तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी राहील. त्याचबरोबर अगोदरच शासनाच्या सेवेत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा १० वर्षांनी शिथिल राहील.
4. मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली वयो मर्यादेतील शिथिलतेची सवलत यांपैकी कोणतेही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक (Government Job) वरून अर्ज सादर करायचा आहे.
3. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. अर्ज २० सप्टेंबर २०२३ पासून सुरू होतील.
भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा (लिंक 20 सप्टेंबरपासून सुरु) – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : ITI पास उमेदवारांसाठी राज्याच्या ‘या’ संस्थेत नोकरी; त्वरा करा

Job Alert (45)

करिअरनामा ऑनलाईन । शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोंदिया (Job Alert) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिल्प निदेशक पदांच्या एकूण 77 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोंदिया
भरले जाणारे पद – शिल्प निदेशक (Craft Director)
पद संख्या – 77 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोंदिया, गोरेगाव रोड, गोंदिया – ४४१६०१
E-Mail ID – [email protected]

नोकरी करण्याचे ठिकाण – गोंदिया
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची (Job Alert) तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे.
4. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – dvet.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Jobs in Maharashtra : आता नोकऱ्यांचा पाऊस पडणार!! महाराष्ट्रात ‘ही’ कंपनी करणार 4 हजार कोटींची गुंतवणूक

Jobs in Maharashtra

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्रात ह्युंदाई (Hyundai) कंपनीकडून 4 हजार (Jobs in Maharashtra) कोटींची गुंतवणूक होणार असून पुण्यात पहिला प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या गुंतवणुकीतून 4500 बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. तसेच दक्षिण कोरीयातील लोट्टे ग्रुप, एलजी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीसुद्धा राज्यात गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंत्री सामंत यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री सामंत बोलत होते.

लोट्टे उद्योगसमूह पुण्यात करणार 475 कोटींची गुंतवणूक
मंत्री सामंत पुढे म्हणाले, जनरल मोटर्स कंपनीच्या कामगारांचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात ह्युंदाईच्या व्यवस्थापनासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. दक्षिण कोरीयामधील आईस्क्रीम बनविणारी आघाडीची कंपनी लोट्टे (Lotte) उद्योगसमूह सुद्धा पुण्यात 475 कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनीच्या हॅवमोअर (Havmor) ब्रँडचे उत्पादन या प्रकल्पात होणार आहे. हा प्रकल्प अनेक वर्षापासून रखडला होता, दक्षिण कोरीयाच्या दौऱ्यातील बैठकीत यावर सकारत्मक चर्चा झाली असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

राज्यात येणार ॲल्युमिनीअम झाकणीचा प्रकल्प
पाण्याच्या फिल्टरमध्ये असलेल्या ॲल्युमिनीअम झाकणीचा प्रकल्पही राज्यात येणार आहे. त्यासाठी 5 एकर जागेची मागणी कंपनीकडून करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी पायाभूत सुविधा पुरविण्यात येतील. त्यामुळे या प्रकल्पास चालना मिळेल. तसेच इलेक्ट्रॉनिक्स (Jobs in Maharashtra) क्षेत्रातील आघाडीच्या एल.जी (LG) कंपनीला महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यानुसार कंपनीने पुण्यातील प्रकल्पाचा विस्तार करण्याचे सांगितले असून कंपनी जवळपास 900 कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. जे उत्पादन कोरीयात होते, असे उत्पादन भारतात येऊन करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

राज्यात होणार विदेशी गुंतवणूक
भारतात 4 डोअर फ्रीजचे उत्पादन, ट्रान्सफरन्ट दूरचित्रवाणी संच, फोल्डेबल टिव्हीचे सेमीकंडक्टरचे उत्पादन करण्याची विनंती सॅमसंग (Samsung) कंपनीला करण्यात आली आहे, तसेच डिसेंबर महिन्यात कॉस्मेटीक उद्योजकांचे मंडळ भारतात भेट देणार असून लॅकमे (Lakme) कंपनी राज्यात आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे; अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली. ते पुढे म्हणाले; “द.कोरीया देशाचा दौरा यशस्वी झाला असून आघाडीच्या कंपन्यांसोबत बैठका घेण्यात आल्या आहेत. तेथील उद्योजकांना राज्यात गुंतवणूक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील जे नागरीक दक्षिण कोरीयात आहेत, त्यांना राज्यात गुंतवणूक करायची असेल, तर अशा उद्योजकांना नवीन सवलती देण्यात येतील, राज्यात उद्योगासाठी पोषक वातावरण असून विदेशी गुंतवणूक राज्यात होत आहे.”

यावर्षीपासून देण्यात येणार राज्यस्तरीय उद्योग पुरस्कार (Jobs in Maharashtra)
यावर्षीपासून राज्यात उद्योगरत्न, उद्योग मित्र, मराठी उद्योजक व महिला उद्योजक राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. राज्यातील हा पहिला सोहळा दि. 20 ऑगस्ट 2023 रोजी दु. 2 वाजता जिओ सेंटर, बीकेसी, मुंबई येथे होणार आहे. राज्यस्तरीय पहिला उद्योग रत्न पुरस्कार हा टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच उद्योग मित्र पुरस्कार युवा पिढीतील उद्योजक सिरम इन्स्टीट्युटचे अदर पुनावाला यांना देण्यात येणार आहे. मराठी उद्योजक पुरस्कार हा नाशिक येथील सह्याद्री समुहाचे विलास शिंदे यांना, तर महिला उद्योजक पुरस्कार हा किर्लोस्कर समुहाच्या गौरीताई किर्लोस्कर यांना प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध मंत्री, अधिकारी, उद्योजक उपस्थित राहणार असल्याची माहिती मंत्री सांमत यांनी यावेळी दिली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Succeess Story : गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून सुरु केला अभ्यास; 6 वी रॅंक मिळवून बनली IAS अधिकारी

UPSC Succeess Story of Vishakha Yadav IAS

करिअरनामा ऑनलाईन । विशाखा यादवच्या यशाची गाथा (UPSC Succeess Story) तिच्या दृढ निश्चयाचा आणि समर्पणाचा पुरावा आहे. एक चांगली नोकरी सोडण्यापासून ते UPSC परीक्षेत संपूर्ण भारतात 6 वी रँक मिळवण्यापर्यंतचा तिचा प्रवास चिकाटी आणि स्वप्नांचा पाठलाग करण्याच्या सामर्थ्याचे जीवंत उदाहरण देतो. अनोळखी वाटेवर चालण्याचं केलेलं धाडस आणि  संकटांवर मात करत यशापर्यंत पोहचण्याचा तिचा प्रवास देशातील तरुण उमेदवारांसाठी प्रेरणा देणारा आहे.

UPSC Succeess Story of Vishakha Yadav IAS

 

सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची घेतली डिग्री
1994 मध्ये दिल्लीच्या द्वारका येथे विशाखाचा जन्म झाला. ती लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणानंतर तिने 2014 मध्ये दिल्ली टेक्नॉलॉजिकल (UPSC Succeess Story) युनिव्हर्सिटीमधून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. या शिक्षणानंतर, तिने सिस्को सिस्टम्स, बंगलोर येथे सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून यशस्वीपणे नोकरी करण्यास सुरवात केली. या नोकरीत तिचं मन रमत नव्हतं. काहीतरी वेगळं करण्याच्या तळमळीने तिला तिची सुरक्षित नोकरी सोडून IAS अधिकारी होण्याच्या मार्गावर जाण्यास प्रवृत्त केले.

UPSC Succeess Story of Vishakha Yadav IAS

 

कुटुंबाचा मजबूत पाठिंबा
विशाखाची IAS होण्याची इच्छा तिच्या कुटुंबाने मजबूत केली होती. तिचे वडील राजकुमार यादव हे सहाय्यक उपनिरीक्षक आहेत तर तिची आई सरिता यादव या गृहिणी आहेत. या जोडीने विशाखाच्या आकांक्षा जोपासत तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला. तिला तिच्या आई-वडिलांकडून मिळालेले अतूट प्रोत्साहन तिच्या या खडतर प्रवासात आधारस्तंभ ठरले.

UPSC Succeess Story of Vishakha Yadav IAS

हा निर्णय ठरला टर्निंग पॉइंट (UPSC Succeess Story)
2017 मध्ये, विशाखाने तिची गलेलठ्ठ पगाराची आरामदायी नोकरी सोडून UPSC परीक्षेची तयारी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. हा निर्णय तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. UPSC परीक्षा क्रॅक करायचीच या निश्चयाने तिने अभ्यासासाठी स्वतःला वचनबद्ध केले. अभ्यासात अडथळा येवू नये यासाठी तिने सोशल मीडियापासून स्वतःला दूर ठेवले आणि पूर्णपणे तिच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले. यासाठी शहरातील लायब्ररीमध्ये तिने तासनतास अभ्यास केला.

UPSC Succeess Story of Vishakha Yadav IAS

संपूर्ण भारतात मिळवला 6 वा क्रमांक 
विशाखाचा प्रवास सोपा नव्हता. यावेळी तिला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. UPSC ची परीक्षा देताना पूर्व परिक्षेत तिला दोनवेळा अपयश आले. तिसर्‍या प्रयत्नात मात्र तिला यश मिळाले, कारण तिने केवळ UPSC परीक्षा उत्तीर्णच केली नाही तर संपूर्ण भारतात 6 वा क्रमांक मिळवला होता.

UPSC Succeess Story of Vishakha Yadav IAS

 

तरुणांसाठी संदेश
आपली सुरक्षित कारकीर्द सुरु असताना ती मध्येच सोडून UPSC परीक्षेत उल्लेखनीय रँक मिळवण्यापर्यंतचा विशाखाचा  प्रवास अधोरेखीत करण्यासारखा आहे. तिची (UPSC Succeess Story) कहाणी देशातील असंख्य इच्छुकांसाठी आशेचा किरण बनली आहे. ‘कठोर परिश्रम, समर्पण आणि अथक प्रयत्नाने कोणतेही ध्येय गाठता येते;’ हा संदेश ती देशातील तरुण पिढीला देते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ChatGPT Jobs : OpenAI मध्ये काम करायचे आहे का? ही नोकरी देते 3.7 कोटी रुपयांपर्यंत पगार; ‘या’ उमेदवारांना मिळणार संधी

ChatGPT Jobs

करिअरनामा ऑनलाईन । ChatGPT तसेच अन्य कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (ChatGPT Jobs) सॉफ्टवेअरच्या वाढत्या प्रभावाने अनेकाच्या नोकऱ्या जातील असे म्हटले जात आहे. परंतू ChatGPT ची निर्मिती करणारी कंपनी OpenAI ने काही नोकऱ्याही तयार केल्या आहेत. या पदासाठी कंपनीने 3.7 कोटी रुपयांपर्यंतच्या तगड्या पॅकेजच्या ऑफर दिली आहे. या पदाच्या भरतीसाठी कंपनी उमेदवारांच्या शोधात आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्यानेच ही माहीती दिली आहे.

कुत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत ChatGPT या सॉफ्टवेअरला OpenAI (OpenAI) कंपनीने गेल्यावर्षी लॉंच केले होते. तेव्हा पासून हे ChatGPT (ChatGPT) खूपच चर्चेत आहे. या सॉफ्टवेअरमुळे कवी, लेखक आणि कंटेट रायटर सारख्यांची नोकरीच जाईल असे म्हटले जात होते. परंतू या नव्या प्लॅटफॉर्मलाच आता नोकरांची गरज आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की आम्हाला नवीन टॅलेंट हवे आहे. या उमेदवारांना कोडींग, मशिन लर्निंग आणि अन्य बाबीची चांगली माहीती हवी आहे. यासाठी कंपनीने वर्षाला 3.7 कोटीचे पॅकेज देण्याची तयारी दाखवली आहे.

OpenAIचे सुपर अलाईनमेंट टीमचे हेड Jan Leike यांनी या नोकऱ्यांची माहिती दिली आहे. The 80,000 hours podcast मध्ये त्यांनी याबाबत खुलासा केला आहे. कंपनीला अनेक रिसर्च इंजिनिअर, रिसर्च मॅनेजर आणि रिसर्च सायंटिस्टची गरज आहे.

नोकऱ्या जाणार का? (ChatGPT)
सोशल मिडीया असो किंवा सर्वसामान्य नोकरी करणारी मंडळी आपल्या नोकऱ्या चॅटजीपीटी सारख्या प्लॅटफॉर्ममुळे जातील याची चर्चा सुरु आहे. काही लोक याचा वापर करुन चांगले कॉपी रायटर बनले आहेत. काही लोकांच्या नोकऱ्यांमुळे यावर संकट ओढवले आहे. कंटेट रायटर मंडळींचे चॅट जीपीटीने धाबे दणाणले आहेत.

इतके पॅकेज मिळणार
Open AIच्या सुपर अलाईनमेंट टीममध्ये रिसर्च इंजिनियर्सना सेफ्टी रिसर्च टीममध्ये काही एक्सपेरिमेंट आणि डीझाईन करण्यासाठी उमेदवारांची गरज (ChatGPT) आहे. या नोकरीत वार्षिक 2,45,000 अमेरिकन डॉलर ( सुमारे 2 कोटी रुपये ) ते 4,50,000 अमेरिकन डॉलर ( सुमारे 3.7 कोटी रु.) पर्यंत पगार आहे. याशिवाय एक्स्ट्रा अलाऊन्सचा देखील समावेश आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : विना परीक्षा थेट द्या मुलाखत; कोल्हापूरच्या ‘या’ कॉलेजमध्ये होणार प्राध्यापक भरती

Job Notification (76)

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत (Job Notification) शिक्षक पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 18 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, दसरा चौक, कोल्हापूर
भरले जाणारे पद – प्राध्यापक
पद संख्या – 06 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर
मुलाखतीचा पत्ता – श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, दसरा चौक, कोल्हापूर

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. शिक्षक – M.Com, B.A
निवड प्रक्रिया – मुलाखत
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
4. मुलाखतीची तारीख 18 ऑगस्ट 2023 आहे. (Job Notification)
5. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.unishivaji.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com