Megabharati : तरूणांनो तयार रहा!! नोकऱ्यांचा पडणार पाऊस; ‘या’ कंपन्यांमध्ये होणार बंपर भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सर्व तरुणांनी त्यांचा रिझ्यूमे तयार (Megabharati) ठेवायचा आहे; कारण नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण उमेदवारांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. लवकरच देशात नोकऱ्यांचा पाऊस पडणार आहे. वर्कफोर्स सोल्युशन्स कंपनी मॅनपॉवर ग्रुपने जागतिक स्तरावर केलेल्या सर्वेक्षणानुसार चीन आणि अमेरिकेच्या तुलनेत भारतात जास्त नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याचा अहवाल दिला आहे. पुढील तीन महिन्यात रोजगाराच्या चांगल्या संधी निर्माण होणार आहेत तसेच आगामी काळात भारत नोकरभरतीबाबत जगात 6 व्या क्रमांकावर पोहोचू शकतो. असं देखील सर्वेक्षणात म्हटलं आहे.

देशातील 30 टक्के कंपन्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणार
मॅनपॉवर ग्रुपने केलेल्या सर्वेक्षणानुसार 2024 च्या जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत रोजगाराच्या दृष्टिकोनातून भारत जागतिक स्तरावर सहाव्या क्रमांकावर आहे. देशातील 30 टक्के कंपन्या (Megabharati) येत्या तीन महिन्यांत त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा विचार करत आहेत. सध्या देशात 16.6 लाख कंपन्या नोंदणीकृत आहेत आणि त्यातील 30 टक्के म्हणजे 4.98 लाख कंपन्या असं गणित आहे . याचा अर्थ या सर्व कंपन्या आता सक्रिय झाल्या तर आगामी काळात सुमारे 5 लाख कंपन्या देशात नोकरभरती करू शकतात.

42 देशांमध्ये करण्यात आले सर्वेक्षण (Megabharati)
30 टक्के कंपन्या पुढील तीन महिन्यांत त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा विचार करत असल्याचे यातून समोर आले आहे. मॅनपॉवर ग्रुपच्या अहवालानुसार; भारताचा नेट रोजगार आउटलूकची गणना करण्याची योजना असलेल्या कंपन्यांच्या संख्येतून कामगार कमी करण्याची योजना असलेल्या कंपन्यांची संख्या वजा करून काढण्यात आली आहे. रोजगाराच्या दृष्टिकोनातून भारत जागतिक स्तरावर सहाव्या क्रमांकावर आहे. हे स्थान जागतिक सरासरीपेक्षा आठ गुणांनी जास्त आहे. हे सर्वेक्षण 42 देशांमध्ये करण्यात आले.

निवडणुका आणि जागतिक मंदीचा भारतातील आयटी क्षेत्रावर परिणाम
देशातील 3150 कंपन्यांना त्यांच्या तिसऱ्या तिमाहीतील नोकरभरतीच्या नियोजनाबाबत मॅनपॉवर ग्रुपच्या एम्प्लॉयमेंट आउटलूक सर्वेक्षणाच्या नवीन आवृत्तीने विचारले असता यावर मॅन पॉवर ग्रुपचे भारत आणि पश्चिम आशियाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप गुलाटी म्हणाले की, जागतिक मंदीचा भारतातील आयटी क्षेत्रावर दीर्घकाळ परिणाम होत आहे. या सर्वेक्षणातील डाटा संकलनावेळी सार्वत्रिक निवडणुकांमुळे देशात राजकीय अनिश्चिततेचे वातावरण होते आणि कंपन्या त्यांच्या अल्पकालीन पायाभूत सुविधांच्या नियोजनात सावधगिरी बाळगून होत्या.

उत्तर भारतात सर्वाधिक नोकऱ्या
निवडणुकीच्या कालावधीत देखील रिअल इस्टेट क्षेत्रात (Megabharati) गुंतवणुकदारांचा कल वाढला आहे. निवासी क्षेत्रात 1.1 अब्ज डॉलर भांडवलाचा ओघ आला आहे. एकूणच उत्तर भारतात नोकरभरतीची शक्यता सर्वाधिक 36 टक्के होती. त्यानंतर पश्चिम भागात 32, दक्षिणेत 30 तर पूर्व भागात 21 टक्के कंपन्यांनी नोकरभरतीची इच्छा व्यक्त केली आहे. एका समजुतीच्या अगदी विरुद्ध, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय आणि मशीन लर्निंगचा अवलंब केल्यामुळे सुमारे 68 टक्के कंपन्या पुढील दोन वर्षांत कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची योजना आखत आहेत. याचे नेतृत्व दळणवळण सेवा क्षेत्र, आर्थिक आणि रिअल इस्टेट, उद्योग व साहित्य आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्र करेल.

या देशात होणार सर्वाधिक नोकर भरती
जागतिक स्तरावर कोस्टा रिका मध्ये जुलै-सप्टेंबरसाठी (Megabharati) सर्वाधिक 35 टक्के नोकरभरती अपेक्षित आहे. यानंतर स्वित्झर्लंडमध्ये 34, ग्वाटेमालामध्ये 32, मेक्सिकोमध्ये 32 तर दक्षिण आफ्रिकेतील 31 टक्के कंपन्या पुढील तीन महिन्यांत नोकरभरती करण्याचा विचार करत आहेत. दुसरीकडे, अर्जेंटिना आणि रोमानियामध्ये सर्वांत कमी म्हणजे तीन टक्के एनईओ नोंदवला गेला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com