GK Updates : चिप्सच्या पुड्यात कोणता वायू भरला जातो? वाचा मुलाखतीत धांदल उडवणारे प्रश्न

GK Updates 17 July
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 : ऑस्कर पारितोषिक मिळवणारी पहिली महिला कोण आहे?
उत्तर : भानु अथेय्य
प्रश्न 2 : भारताचे राष्ट्रीय वाक्य कोणते आहे?
उत्तर : ‘सत्यमेव जयते’
प्रश्न 3 : चिप्सच्या पुड्यात कोणता वायू भरला जातो?
उत्तर : नायट्रोजन (GK Updates)

प्रश्न 4 : भारतातील कोणत्या राज्याची राजभाषा इंग्रजी आहे?
उत्तर : नागालँड
प्रश्न 5 : जागतिक दहशतवाद विरोधी दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो?
उत्तर : 11 सप्टेंबर
प्रश्न 6 : (GK Updates) भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर कोणते आहे?
उत्तर : बेंगलोर
प्रश्न 7 : शंभू महादेवाच्या डोंगर रांगा कोणत्या जिल्ह्यात आहेत?
उत्तर : सातारा
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com