GK Updates : छत्रपती संभाजी महाराजांनी कोणते ग्रंथ लिहले? भारताने सर्वात अगोदर कोणता उपग्रह प्रक्षेपित केला?

GK Updates 25 Sep.
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1: छत्रपती संभाजी महाराजांनी कोणते ग्रंथ लिहिले?
उत्तर : ‘बुधभुषण’, ‘नाइकाभेद’, ‘नखशिकांत’ हे ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिले आहेत.
प्रश्न 2: नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या प्रथम भारतीय महिला कोण आहेत?
उत्तर : मदर टेरेसा या नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या प्रथम भारतीय महिला आहेत.
प्रश्न 3: (GK Updates) भारताने सर्वात अगोदर कोणता उपग्रह प्रक्षेपित केला होता?
उत्तर : ‘आर्यभट्ट’ हा उपग्रह भारताने सर्वात अगोदर प्रक्षेपित केला होता.

प्रश्न 4: भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणाला म्हटले जाते?
उत्तर : दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हटले जाते.
प्रश्न 5: अन्न पचनाला सुरुवात (GK Updates) शरीराच्या कोणत्या भागात होते?
उत्तर : तोंड या भागातून अन्न पचनाला सुरुवात होते.
प्रश्न 6: महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो?
उत्तर : अंबोली या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो.
प्रश्न 7 : ‘आर्य समाजा’ची स्थापना कोणी केली होती?
उत्तर : दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com