Career Mantra : 12वी नंतर उघडतात सरकारी नोकऱ्यांचे दरवाजे; अनेक क्षेत्रांमध्ये आहे नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी कोणाला नको आहे? तुम्हाला (Career Mantra) माहित आहे का की आपल्या देशात 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर रेल्वे, राज्य पोलीस, भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना, रेल्वे, टपाल विभाग आणि इतर क्षेत्रात सरकारी नोकरी मिळू शकते. तुम्हीही या वर्षी बारावी उत्तीर्ण होणार असाल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भरतीसाठी तयारी सुरू करु शकता.

12 वी बोर्डाची परीक्षा संपली असून विद्यार्थी आता निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. यापैकी काही उमेदवार पुढील अभ्यासाला सुरुवात करतील तर काही उमेदवारांनी सरकारी नोकरीची तयारी सुरू केली आहे. तुम्हालाही बारावीनंतर सरकारी नोकरी हवी असेल तर तुमच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत; ज्याविषयी (Career Mantra) आज आपण इथे माहिती घेणार आहोत.
आपल्या देशात बारावी पास युवक तसेच युवतींसाठी लष्कर, रेल्वे, पोलीस विभाग यासह विविध सरकारी कार्यालयांमध्ये सरकारी नोकरी मिळण्याच्या संधी उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यानुसार तयारी करू शकता.

इंडियन रेल्वेत आहे बारावी पास उमेदवारांसाठी मागणी (Career Mantra)
रेल्वेमध्ये एएलपी, असिस्टंट लोको पायलट, आरआरबी एनटीपीसीसह इतर भरती उपलब्ध आहेत; ज्यामध्ये तुम्ही 12वी उत्तीर्ण झाल्यानंतरच भाग घेऊ शकता. रेल्वेत सरकारी नोकरी मिळण्यासोबतच तुम्हाला रेल्वेकडून मिळणाऱ्या इतर सुविधाही दिल्या जातात.

स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Comission)
दरवर्षी, स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे अशा अनेक नोकऱ्या जाहीर केल्या जातात ज्यामध्ये 12वी उत्तीर्ण झाल्यानंतरच सहभागी होता येईल. यामध्ये लष्करापासून स्टेनोग्राफरपर्यंतच्या पदांवर नोकऱ्या उपलब्ध आहेत. यासाठी बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. त्यामुळे बारावीनंतर या क्षेत्रात यायचे असेल तर आतापासूनच एसएससीच्या परीक्षेची तयारी सुरू करा.

पोलीस विभाग भरती
अनेक राज्यांमध्ये, पोलीस (Police) विभागाने कॉन्स्टेबल (Career Mantra) पदांसाठी अर्ज करण्यासाठी इंटरमिजिएट उत्तीर्ण पात्रता निश्चित केली आहे. अशा परिस्थितीत बारावी उत्तीर्ण होताच पोलीस खात्यातील नोकरीची तयारी करून तुम्ही सरकारी नोकरी मिळवू शकता.

भारतीय टपाल विभाग
या सगळ्याशिवाय भारतीय टपाल विभागात (Post Department of India) 12 वी उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला सरकारी नोकरी मिळू शकते. यामध्ये तुम्हाला जीडीएस, असिस्टंट, पोस्टमनसह (Career Mantra) इतर विभागांमध्ये सरकारी नोकरी मिळू शकते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com