यशोगाथा: दहावीत नापास झाले, पण जिद्द सोडली नाही; MPSC पास करून मिळवले राष्ट्रपती पदक

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षणाच्या प्रवासात अनेक विद्यार्थ्यांना अपयश येते पण नंतर ते त्यांच्या आयुष्यात खूप यशस्वी होतात. अशीच एक कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. १० वीत अपयश येऊन सूर्यकांत बांगर यांनी नंतर जोमाने अभ्यास करुन MPSC मधून पोलीस खात्यात रुजू झाले आणि आपल्या चांगल्या कामगिरीवरून त्यांनी राष्ट्रपतिपदक खेचून आणले. त्यांना पोलीस खात्यातील सिंघम अशी ओळखही मिळाली आहे. यांचे प्राथमिक शिक्षण, शेंडी तालुका अकोले, डहाणू येथे झाले. वडील प्राथमिक शिक्षक होते. तर मोठे भाऊ चंद्रकांत बांगर पोलिस खात्यात होते. दहावी नापास झाल्यानंतर ते त्यांच्या मूळगावी आले. त्यावेळी त्यांचे वडील म्हणाले, “तू नापास झाला आता औत धर शेती कर”. आणि आता आपला मुक्काम हा शेतीच होऊ शकतो असा विचारही त्यांना त्यांच्या मनात येऊन गेला.

गावी असलेली आपली शेती करायला कुणी नाही. वडीलही आता वय झाल्यामुळे शेतीत जात नव्हते. त्यामुळे, सूर्यकांत बांगर यांनी मनात पोलिस अधिकारी होण्याची इच्छा दाबून हो म्हटले. पण रात्रभर झोपले नाही. त्यादिवशी त्यांचे वडील बंधू चंद्रकांत बांगर आले. त्यांना वडिलांचा निर्णय मान्य झाला नाही. त्यांनी सूर्यकांत यांना आपल्या नोकरीच्या ठिकाणी उल्हासनगर येथे आणले. दहावीचा अभ्यास करण्यास सांगितले. जिद्दी सूर्यकांत यांनी अभ्यास करून चांगले मार्क मिळविले. मग मागे वळून पाहिलेच नाही. आर्ट शाखेतून पदवीधर होत असताना एमपीएससीचा अभ्यास करून १९९० पहिल्या प्रयत्नातच पास होऊन पोलिस विभाग अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यानंतर, रत्नागिरी,रायगड, ठाणे, बुलढाणा, धारावी, मुंबई या ठिकाणी अविरतपणे २९ वर्षेसेवा केली.

गुंड, दोन नंबरवाले, भाईगिरी करणारे, खंडणीखोर यांना वठणीवर आणण्याचे काम करताना अनेक संकटाशी त्यांनी सामना केला. मात्र डगमगले नाही. बुलढाणा येथे सिंगम म्हणून ते प्रसिध्य आहेत. बुलढाणा येथे तीन वर्षांपूर्वी गणपती उत्सव सुरू होणार तोच मंदिरातील मूर्ती चोरी झाली. त्यावेळी बुलढाणा शहरात हिंदू बांधवांनी संताप व्यक्त केला. जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी व मंत्री, यांनी याबाबत पोलिसांना विचारणा केली. पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. त्यावेळी सिंगम बांगर यांनी दिवसरात्र एक करून पाच दिवसात गणपती मूर्तीचा तपास करून चोरट्यांना जेरबंद करून मूर्तीची भव्य मिरवणूक काढून स्थापना केली.

अहमदनगर जिल्ह्यात असणाऱ्या अकोले तालुक्यातील अतिदुर्गम चिंचोडी गावतील मुंबईतील वरीष्ठ पोलिस निरीक्षक सूर्यकांत गणपत बांगर यांनी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वासचे त्रिसूत्री वापरून आपले कार्य कर्तृत्व पोलिस खात्यात दाखवून दिले. ४०० गुन्हाचा तपास योग्य पद्धतीने लावल्याबद्दल विशेष पदक प्राप्त करणारे पोलिस अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवत त्यानंतर अशियाखंडतील धारावी झोपडपट्टी पोलिस स्टेशनला वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. भारत सरकार व पोलिस विभागाने त्यांची २९ वर्ष गुणवत्तापूर्ण, उल्लेखनीय सेवा केली म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्रदान केला आहे.

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com