Home Blog Page 1076

भावी IAS अधिकार्यांसोबत मुख्यमंत्र्यांचा मसुरी येथे संवाद

मसुरी | अमित येवले

भावी प्रशासकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मसूरी येथे संवाद साधला. प्रशासनासमोर जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान हे नेहमीच सनदी अधिकारी यांच्यावर असते. त्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणेची नाळ जनतेशी जोडण्यासाठी ‘नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून’ प्रयत्न करावे व त्याचप्रमाणे आज लोकशाहीचे चारही स्तंभ विश्वासार्हतेच्या कसोटीवर उतरण्यासाठी दररोज स्पर्धा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर संविधानाची भूमिका आणि त्यातून येणारे उत्तरदायित्त्व समजून घेऊन सर्वांच्या सहभागाने सनदी अधिकारी यांना काम करावे, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री यांनी केले.

उत्तराखंडमधील मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये ९३ व्या फाऊंडेशन कोर्समधील प्रशिक्षणार्थी आयएएस,आयपीएस आणि अन्य सेवांमधील अधिकारी तसेच मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्रामच्या चौथ्या फेजअंतर्गत प्रशिक्षणासाठी आलेल्या आयएएस अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. यावेळी नागरी प्रशासन, शेती क्षेत्रातील बदल, आयात-निर्यात धोरण, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम आणि इतरही विषयांवर त्यांनी सविस्तर माहिती व अनेक उत्तरे यावेळी दिली.

मोबाईल कंपन्यांमधील ६० हजार नोकर्या जाणार

मुंबई | स्मार्टफोन, स्मार्टवॉच या माध्यमातून मोबाईल क्षेत्रात रोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. त्यामुळे मार्च २०१९ पर्यंत मोबाईल कंपन्यांमध्ये काम करणाºया ६० हजार कर्मचाºयांना नोकरी गमवावी लागणार आहे. टीमलीज सर्व्हिसेसने केलेल्या सर्वेक्षणातही भीती व्यक्त झाली आहे. मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरणसुद्धा या स्थितीला कारणीभूत असेल.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात इंटरनेट आॅफ थिंग्स व आर्टिफीशीअल इंटेलिजन्स यांचा वापर सातत्याने वाढत आहे. यामुळे दूरसंचार क्षेत्रातील पारंपरिक नोकºयांचे दिवस आता गेले. आता आधुनिक कौशल्य प्राप्त युवक-युवतींना या क्षेत्रात नोकरीची संधी आहे. त्यामुळेच पुढील वर्षभरात या क्षेत्रातील ६० हजार ते ७५ हजार नोकºया संपुष्टात येतील.

नोकर्यांवरील हे संकट २०१९-२० या पुढील आर्थिक वर्षातही कायम असेल. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत आणखी १५ हजार ते २० हजार कर्मचाºयांना नोकºया गमवाव्या लागण्याची शक्यता आहे. आयडीया व व्होडाफोन या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणामुळे २०१७-१८ मध्ये जवळपास १ लाख नोकर्या संपुष्टात आल्या होत्या. आता एअरटेल कंपनी टाटा टेलिकॉम व टेलिनॉरची खरेदी करीत आहे. याखेरीज रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) व एअरसेल पूर्णपणे बंद पडले आहे. यामुळे मोबाइल क्षेत्रातील नोकर्या संकटात आहेत. ग्राहक सेवा, टॉवर व्यवस्थापन, ग्राहक सेवा, सीमकार्ड वितरक यांच्यासह दूरसंचार क्षेत्रात सध्या २५ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी ग्राहक सेवा व आर्थिक क्षेत्राशी संबंधित १५ हजार नोकर्या तात्काळ संपुष्टात येत आहेत.

स्पर्धापरिक्षेची तोंड ओळख | भाग १

नितिन ब-हाटे

स्पर्धापरिक्षांची तयारी करुन अधिकारी व्हायची स्वप्न पाहणार्या तरुणांची संख्या या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खाजगीत नोकरी करण्यापेक्षा सरकारी नोकरीत जाऊन समाजासाठी काहीतरी करु इच्छिणार्यांचा स्पर्धापरिक्षांकडे कल आहे. मात्र बर्याचवेळा स्पर्धापरिक्षांची तयारी कशी करावी, सिलेबस काय ते पुस्तके कोणती वाचायला हवीय अशा अनेक गोष्टींमधे विद्यार्थ्यांमधे द्विधा मनस्थिती होते. स्पर्धापरिक्षेची नव्याने तयारी करु इच्छिणार्या धेयवेड्या तरुणांसाठी स्पर्धापरिक्षेची तोंड ओळख करुण देणारा हा लेख.

इतर महत्वाचे  –

UPSC, MPSC परीक्षांचा अभ्यास कधी सुरू करावा | #भाग २

स्पर्धा परिक्षां‌च्या अभ्यासाचा आवाका, त्रिसुत्री आणि रणनीतीची चौकट | #भाग 3

स्पर्धा परीक्षा ही प्रामुख्याने दोन सेवांसाठी घेतल्या जातात. एक नागरी सेवेसाठी आणि दुसर्या म्हणजे व्यावसायिक सेवांसाठी. आपण नागरी सेवा साठीच्या स्पर्धापरिक्षाची तोंडओळख बघुया. देशाचा प्रशासकीय कारभार सांभाळण्यासाठी UPSC, MPSC, SSC इत्यादी आयोगामार्फत विविध पदांसाठी विशिष्ट परिक्षेमार्फत शासकीय कर्मचारी ते अधिकारी निवडले जातात. या पदांसाठी लाखोच्या पदवीधर गर्दीमधुन पदभार सांभाळण्यासाठीची कौशल्ये व गुण परिक्षार्थी मध्ये असावेत आणि योग्य अधिकारी निवडले जावेत म्हणुन स्पर्धापरिक्षांंचा अट्टाहास असतो. विविध अभ्यासक्रमाचे कोर्सेस पुर्ण केल्यानंतर नोकरी शोधण्यापेक्षा स्पर्धापरिक्षाची तयारी करुन‌ शासकीय सेवेत जाणार्यांचा कल सध्या वाढला आहे

पात्रता –

कोणत्याही विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी घेतल्यानंतर UPSC, MPSC इत्यादी स्पर्धा परिक्षा देता येतात. त्यासाठी विशिष्ट मार्क मिळविण्याची अट नसते. फक्त उत्तीर्ण असावे लागते, पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना‌ सुध्दा परिक्षा देता येतात.

वयोमर्यादा –

प्रत्येक परिक्षा देण्यासाठी कमीतकमी आणि जास्तीत जास्त अशी वयाची अट असते . UPSC मध्ये वया बरोबर परिक्षा प्रयत्नांचेही बंधन असते (२१ ते ३२ वयामध्ये खुला प्रवर्ग असलेल्या परिक्षार्थीस ६ वेळा प्रयत्न करता येतात )

भाषा –

स्पर्धा परिक्षा मध्ये इंग्रजी किंवा हिंदी आणि एक प्रादेशिक भाषा (मराठी) इत्यादीचे भाषाज्ञान तपासले जाते. सरासरी पातळीचे इंग्रजी येणे अपरिहार्य आहे.

प्रवृत्ती आणि कल तपासणारी परिक्षा –

स्पर्धा‌परिक्षा या परिक्षार्थींचा प्रवृत्ती (attitude) आणि कल(aptitude) तपासणार्या असतात त्यामुळे या परिक्षांना गणित, बुद्धिमत्ता चाचणी , उतार्यांचे आकलन, चालु घडामोडी आणि सामान्य अध्ययन हे विषय अनिवार्य असतात.

इतर महत्वाचे  –

तर मग UPSC /MPSC करू नका ???

विश्वास नांगरे पाटीलांचा ‘सिद्धिविनायक पे है विश्वास’, UPSC च्या प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्हिव्हचे काॅल सिद्धिविनायकाकडूनच गेले असल्याचा खुलासा

परिक्षेचे स्वरुप –

प्रत्येक स्पर्धा परिक्षेसाठी ठराविक अभ्यासक्रम आणि परिक्षापद्धती असते . बहुतेक परिक्षांना पुर्व , मुख्य आणि मुलाखत असे तीन टप्पे असतात , गट ब आणि क पदांसाठी आता मुलाखतीचा टप्पा काढुन टाकण्यात आला आहे .

१. पुर्व परिक्षा ही चाळणी परीक्षा असते तीचा उद्देश प्रामाणिक आणि योग्य दिशेने अभ्यास करणार्यांना मुख्य परिक्षेसाठी पास करणे किंवा नावाला परिक्षा देणार्यांना परिक्षा प्रक्रियेतुन गाळुन टाकणे हा असतो.

२. मुख्य परिक्षा ही पुर्व परिक्षा पास झालेल्यांसाठी असते . मुख्य परिक्षेत परिक्षार्थींचा कस लागतो कारण मुख्य परिक्षेचा अभ्यासक्रम मोठा असतो , प्रश्नपत्रिका विस्तृत असतात‌ , तसेच अंतिम गुणवत्ता यादीत हे मार्क धरले जातात त्यामुळे पद मिळविण्यासाठी “मुख्य” परिक्षा नावाप्रमाणेच “मुख्य” असते.

३. मुख्य परिक्षा पास झालेल्या परिक्षार्थीची व्यक्तिमत्त्व चाचणी घेतली जाते , त्याला सभोवतालच्या घडामोडींची असलेली जाण , समस्या सोडविण्याचे कौशल्य, निर्णय क्षमता इत्यादी बाबी मुलाखतीमध्ये तपासल्या जातात.

४.परिक्षार्थींना विशिष्ट परिक्षेस फोकस करुन अभ्यासक्रम, मागील वर्षी विचारलेले प्रश्न, चालु घडामोडी याआधारे पद मिळविण्यासाठी योग्य रणनीती आखणे आवश्यक आहे.

५.शासकीय यंत्रणेत जावुन समाजसेवा करण्यासाठी , प्रशासन गतिमान करण्यासाठी किंवा स्वत:च्या क्षमतांना सर्वोच्च न्याय देण्यासाठी स्पर्धा परीक्षा हा एक राजमार्ग आहे , स्वत:ला ओळखुन ज्याला जसा जमेल तसा तो निवडावा त्यासाठी प्रामाणिक मार्गदर्शक सोबत असावा.

IMG WA

नितिन ब-हाटे

9867637685

(लेखक ‘लोकनिती IAS, मुंबई’ चे संचालक/ मुख्य समन्वयक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत.)