Home Blog Page 1075

आॅफिसला जातानाही दिसा फॅशनेबल!

सौंदर्यसाधना | आॅफिसला काय घालून जावं? असा प्रश्न अनेकजणींना रोजच पडतो. आॅफिसला जाताना साधे सुधे जरा कमी फॅशनचे कपडे घालण्याकडेच अनेकींचा कल असतो. आॅफिस म्हणजे कॅज्युअल लुक इतकं हे समीकरण घट्ट झालं आहे. पण कधीकधी कंटाळा आणणारं हे समीकरण ब्रेक करता येतं. तशी सोय ‘आॅफिस वेअर फॅशन’नं दिली आहे. आता ही कुठली नवी फॅशन? असा प्रश्न पडला असेल तर नेटवर जावून शोधा. शोधलं की फॅशनच्या जगात आॅफिस लूकसाठीही फॅशनचे कपड्यापासून त्यावर घालायच्या दागिन्यांपर्यंत असंख्य फॅशन उपलब्ध आहे. फॅशन म्हणजे चमकढमक, चंकीफंकी लूक नसून आपलं नैसर्गिक रूप उठावदार दिसेल यासाठी कपड्यांपासून मेकअपपर्यंत उपलब्ध असलेले पर्याय म्हणजेच फॅशन. आॅफिस म्हणजे कामाची जागा. दिवसभरात कामानिमित्त अनेक लोकांना आपण भेटत असतो. कामानिमित्त बाहेर वावरत असतो. त्यामुळे आपला लूक कसाही ठेवून चालत नाही. आपल्याला आणि आपल्याला भेटणा-यालोकांना आपल्याकडे पाहून छान वाटावं यासाठी आपण काही प्रयत्न करायला हवेत. यासाठी आॅफिस वेअर फॅशननं अनेक पर्याय तुमच्यासमोर ठेवले आहेत. त्यातला तुम्हाला कोणता आवडतो ते पाहा!

. आॅफिसमध्ये घालून जाण्यासाठी फुलांचे आकर्षक डिझाइन असलेले कपडे उठावदार रंगात बाजारात उपलब्ध आहे.

. इनकॉर्पोरेटिंग प्रिण्टस हा प्रिण्टसचा नवा प्रकार उपलब्ध आहे. भडक आणि मोठ्या आकारातल्या प्रिण्टसमुळे आॅफिसमध्ये व्यक्तिमत्त्व खुलून दिसतं. शिवाय आॅफिसमध्ये अचानक एखादा कार्यक्रम निघाला किंवा छोटी मोठी मीटिंग असली तर या प्रिण्टसचे कपडे घालणं हा उत्तम पर्याय ठरतो.इनकॉर्पोरेटिंग प्रिण्टसचे टॉपस घातलेले असतील तर त्यावर ब्लेझर घालावं हेच कपडे घालून आॅफिसच्याच कामासाठी कुठे संध्याकाळी जायचं असेल तर ब्लेझर काढून गळ्यात एखादा नाजूकसा दागिना घालावा. आॅफिससाठी ही फॅशन उत्तम

. पेस्टल रंगाचे टॉप्स, त्यावर काळ्या पांढ-या रंगाचं ब्लेझर, गडद रंगाची फ्लेअर्ड पॅण्ट, कमीत कमी दागिने ही फॅशन आॅफिससाठी अनेकजणी फॉलो करता आहेत. फारच घाई असली तर पांढ-या आणि काळ्या रंगाचं कॉम्बिनेशनही उठून दिसतं.

. पूर्वी स्कर्ट हे आउटिंगसाठी किंवा कार्यक्रमासाठीच वापरले जायचे. पण आता आॅफिसला जाताना पायाच्या घोट्यापर्यंतचे पेन्सिल स्कर्टस, त्यावर शोभेल असा टॉप आणि त्यावर पॉलिश्ड् दागिनेही घालता येतात. शुक्रवार-शनिवार या दिवशी आॅफिसमध्ये काम असलं तरी सर्वजण येणा-या रविवारमुळे रिलॅक्सड मूडमध्ये असतात. तेव्हा शुक्रवार पाहून अशी फॅशन करायला काहीच हरकत नाही.

. गळ्यातल्या स्कार्फवजा स्कार्व्हसमुळेही आॅफिसमध्ये हटके लूक मिळू शकतो. यासाठी कमी डार्क शेडचे कपडे आणि त्यावर जरा भडक रंगाचे स्कार्व्हस उठाव आणतात.

. एखाद्या महत्त्वाच्या कॉर्पोरेट मीटिंगमध्ये जायचे असेल , तिथे आपलं व्यक्तिमत्त्व जरा रूबाबदार दिसायला हवं असं वाटत असेल तर केप्स आणि लॉंग जॅकेटस घालावेत.

प्रेम आणि करिअर

लव्हगुरु | गौरी नारायण मोरे

श्रावणातल्या सरी नुकत्याच सुरु झाल्या होत्या, तो मातीचा खरपूस वास जिभेला पाणी आणून सोडत होता. रूमवर जाऊन गरमागरम चहा आणि कुरकुरीत कांदाभजी चा बेत करावा म्हणून ऑफिस मधून लवकरच पाय काढला. मुंबईच ट्राफिक म्हणजे जणू तारेवरची कसरतच. ती करत करत रूमवर पोहचले. आलिशाने दरवाजा उघडायला खूप वेळ लावला. माझ्या जिभेवरची चव विरुनच गेली होती. रागाने माझा चेहरा एकदम लालबुंद झाला होता. दार उघडताच माझ्या शब्दाचे मार तिच्यावर होण्याआधी तिच्या चेहऱ्यावरचे निस्तेज भाव तिची ढाल बनून माझ्यासमोर उभे राहिले. मी माझ्या शब्दांचा आवंढा तिथेच गिळला. खूप प्रयत्नांनी मी तिच्या भावनांना वाट मोकळी करून देऊ शकले. तिच्या बोलण्यावरून इतकाच कळलं होतं की तिझ ब्रेकअप झालंय.

बघायला गेलं तर आलिशा माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहानच. तिचा स्वभाव एकदम वेगळा हट्टी, बिनधास्त, जगाशी अपडेटेड, 24 तास ऑन लाईन राहून फेसबुक, व्हाट्स अप, इंस्टा ला पिक अपडेट करणार. गेल्या महिन्यातच ती मला सुजय बद्दल सांगत होती. सुजय तिचा फेसबुक वरचा फ्रेंड. Hii hello नंतर मैत्री वाढत गेली, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि आता ब्रेकअप.

मग असा प्रश्न पडतो प्रेम करायचाच नाही का? आयुष्यात नक्की कशाला प्रायोरिटी द्यायची? मला वाटत प्रेम हे भावनांशी जोडलं गेलं आहे तर करिअर हे तत्वांशी. आयुष्य जगताना भावना आणि तत्व दोन्ही महत्वाची असतात. या धावपळीच्या जगात दोन क्षण सुखाचे घालवण्यासाठी आपुलकीची माणसं हवीतच. आपल्यावर प्रेम करणारी, जीवाला जीव लावणारी, हक्काने रागावणारी, आपल्यावर रुसणारी मानस तर नक्कीच हवी आहेत. त्यामुळं आयुष्यात प्रेम हे केलंच पाहिजे. पण प्रेमाच्या ओघात वाहून न जाता जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टींची अावश्यकता आहे त्या पूर्ण केल्या पाहिजेत आणि यामध्ये पहिला नंबर लागतो तो करिअरचा. आयुष्य जगताना प्रेमाला आणि करिअर ला एकाच तागाड्यात तोलायला काही हरकत नाही. प्रेमाचा करिअर वर आणि करिअरचा प्रेमावर शून्य मात्र परिणाम पडता कामा नये. प्रेमात कोणत्याही टर्म्स आणि कंडिशन नसल्या पाहिजेत. कोणत्याही नात्याचं बंधन नसावं, हक्काची भाषा नसावी, ज्याची त्याला स्पेस असावी तरच नातं खोलवर आणि घट्ट रुजत.

आयुष्यात करिअर हे भरल्या ताटाप्रमाणे असावं आणि प्रेम हे ताटातल्या लोणच्याप्रमाणे असावं. जेवढं मुरेल तेवढं त्याची चव खुलवणार. अस्तित्व छोटं पण जाणीव मोठी, त्यामुळं प्रेम भरभरून ओसंडून केलं पाहिजे ना फक्त माणसावर नाही तर करिअर वर, गुरा ढोरांवर, वाहत्या पाण्यावर, निसर्गावर, निर्जीव दगडावर आणि सर्वांत महत्वाचं स्वतःवर…

गौरी मोरे

तुमच्या प्रमोशन ने ऑफिसमधील लोक जळत आहेत? मग त्यांना असे सांभाळा..

लव्हगुरु | ऑफिसमध्ये असे अनेक लोक असतात ज्यांना दुसऱ्यांचं यश पचणी पडत नाही. तुमच्या बॉसने तुमचं कौतुक केलं तर काहींच्या पोटात जोरात दुखायला लागतं. अशात तुमच्या जर हे लक्षात आलं तर ते तुम्हाला त्रासदायक ठरतं. अशावेळी काही टिप्स फॉलो केल्यास तुम्हाला होणारा त्रास तुम्ही कमी करू शकता.

१) बॉसने एखाद्याचं कौतुक केल्यास काहींना याचा त्रास होतो आणि त्यामुळे ते लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागतात. काहींच्या अशा वागण्यामुळे ऑफिसमधील वातावरण बिघडतं. यामुळे होणारा त्रास कमी करायचा असेल तर तुम्ही स्वत: एक टीम म्हणून त्यांच्यासोबत काम करण्याचा प्रयत्न करा. कामासंबंधी बोलणं करा. त्यांना तुमचा सकारात्मकपणा दाखवा. काही दिवसांनी परिस्थिती बदलेल.

२) जर आधीपासूनच काही लोक तुमच्यावर ‘जळतात’, तुमच्यावर राग धरून असतात तर अशावेळी परिस्थिती कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला संयमाने काम करावं लागेल. आपल्या शब्दांवर कंट्रोल ठेवायला हवा. तुमचा एक चुकीचा शब्द तुमच्या विरोधात त्यांच्यासाठी शस्त्र ठरू शकतो. याने ऑफीसमध्ये तुमची इमेज बिघडण्यास कुणीच रोखू शकणार नाही.

३) जर तुमच्या काही लोक ‘जळत’ असतील आणि यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर अशांसोबत तुम्ही केवळ कामापुरतं बोला. पण जर तुमचा सिनिअरच तुमच्यावर ‘जळत’ असेल तर इथे परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. अशावेळी काही गैरसमज असतील तर संवाद साधून ते दूर करावेत.

४) तुमचं जर बॉसने भरभरून कौतुक केलं किंवा तुम्हाला इतरांपेक्षा अधिक बोनस दिला किंवा प्रमोशन दिलं तर ही गोष्ट ओरडत कुणाला सांगण्याची गरज नाही. तुम्हाला जरी याने आनंद झाला असला तरी तुमच्या या वागण्याला काही लोक गर्व समजू शकतात. यामुळे काही लोक तुमच्या विरोधात जाऊ शकतात.

५) ऑफीसमध्ये जर तुमच्या सहकाऱ्याची काम करण्याची पद्धत किंवा त्यांची एखादी कल्पना आवडली नाही तर तुमच्या डोक्यातील कल्पना त्यांच्यासमोर ठेवा. त्यांना काही सजेशन्स द्या. पण त्यांना सल्ला देण्याचा प्रयत्न करू नका.

स्पर्धा परिक्षां‌च्या अभ्यासाचा आवाका, त्रिसुत्री आणि रणनीतीची चौकट

स्पर्धापरिक्षा अभ्यासनिती | नितिन ब-हाटे

कोणताही खेळ जिंकण्यासाठीच खेळला पाहिजे, आणि जिंकण्यासाठी त्या खेळाचे सर्व नियम आणि डावपेच माहीती पाहिजेत, मागील लेखात आपण स्पर्धापरिक्षांचा अभ्यास कधी सुरू करावा याबद्दल जाणुन घेतले, आता स्पर्धा परिक्षां‌च्या अभ्यासाचा आवाका, त्रिसुत्री आणि रणनीतीची चौकट समजुन घेऊ

“सुर्य आणि सुर्याखालचे सर्व काही” असा अभ्यास असलेली परिक्षा म्हणुन या परिक्षांकडे पाहिले जाते, या परिक्षांचा आवाका मोठा आहे आवाका समजण्यासच प्रथम काही काळ जातो त्यानंतर हा अतिप्रचंड अभ्यासक्रम आवाक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातो. हा प्रयत्न वस्तुनिष्ठ आणि नियोजनबद्ध असावा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा परिक्षार्थींनी अट्टाहास कायम ठेवावा परंतु वेळ आणि वेगाच्या मर्यादा लक्षात घेऊन कमी वेळेत जास्त अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी योग्य रणनीती कायम उपयोगी ठरते.

स्पर्धापरिक्षा वेळ, वेग आणि आक्रमकता या त्रिसुत्री मध्ये पार करणारा उमेदवार लवकर यशस्वी होऊ शकतो, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त वेगाने अभ्यासक्रम पूर्ण करणे, जास्तीत जास्त उजळणी करणे, सराव चाचण्या देणे, अपयश आले तरी त्याचं आक्रमकतेने पुन्हा लढत राहणे हेच यशाचे गमक आहे.

स्पर्धा परीक्षांची योग्य रणनीती आखण्यासाठी पुढील चौकट आहे

. आयोगाचा अभ्यासक्रम(UPSC, SSC, MPSC)

. मागील वर्षी विचारलेले प्रश्न आणि चालु घडामोडी

. सराव चाचण्या

. स्वतःच्या क्षमता आणि मर्यादा ओळखुन मार्गक्रमण

आयोगाचा अभ्यासक्रम आणि मागील वर्षी विचारलेले प्रश्न या आधारे स्वतःच्या क्षमता आणि मर्यादा ओळखुन सध्या घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी याआधारे रणनीती बनवायची असते

उदाहरणार्थ जी परिक्षा टार्गेट करावयाची आहे तीचा प्रथम अभ्यासक्रम पाठ करुन घ्यावा ,मग या परिक्षेच्या आधी झालेल्या प्रश्नपत्रिका बारकाईने अभ्यासाव्यात त्यानुसार प्रत्येक घटकाची पुस्तके/अभ्याससाहित्य निवडावे आपल्याला समजणारे आणि न समजणारे यानुसार प्रत्येक घटकाला कमी जास्त (आपल्या क्षमता आणि मर्यादा नुसार) महत्त्व देऊन अभ्यास करावा. सर्व अभ्यास मागील वर्षी विचारलेल्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषण करता करता चालु घडामोडी वर लक्ष ठेवीत करीत रहावा.

स्पर्धापरिक्षांमध्ये चालु घडामोडीनां विशेष महत्व असते त्यामुळे चालु घडामोडी आणि त्याची बेसिक संकल्पना अशा जोडीत अभ्यास असावा

अशारीतीने तीनवेळा व्यवस्थित वाचन आणि बर्याचदा रिव्हीजनस् झाल्यावर जमेल तेवढ्या स्वतःवेळ लावुन सराव चाचण्या दयाव्यात, चाचणी झाल्यावर बरोबर/ चुक प्रश्नांचे पर्यायाने त्या घटकांचे विश्लेषण करावे चुकत असलेले घटक सुधारण्याचा प्रयत्न करीत रहावा. बरोबर घटकांची उजळणी करीत रहावे.

वरील चौकटीमध्ये स्पर्धापरिक्षाच्या अभ्यासाची रणनीती असावी.

“सध्या स्पर्धा परिक्षां मध्ये अभ्यासाच्या विषयानुरूप खोली पेक्षा अभ्यासाचा परिघ विस्तार अधिक आहे म्हणजे तुम्हाला एखाद्या विषयाच्या खोलवर ज्ञाना पेक्षा अधिकाधिक विषयांचे विश्लेषणात्मक ज्ञान असणे अपेक्षित आहे”

“Patience, Persistence and Perspiration make an unbeatable Combination for Success – Nepolean Hill.”

तुमच्या प्रवासात तुमची स्वत:च्या अभ्यासावरील आणि मार्गदर्शकावरील निष्ठा कायम असावी , म्हणजे स्पर्धापरिक्षेतील यश लवकर मिळते.

 

नितिन ब-हाटे.
9867637685
(लेखक ‘लोकनीति IAS, मुंबई’ चे संचालक/ मुख्य समन्वयक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत.)

UPSC, MPSC परीक्षांचा अभ्यास कधी सुरू करावा

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती | नितिन ब-हाटे

स्पर्धापरिक्षांची तयारी करावी आणि शासकीय सेवेत सिलेक्ट व्हावे अशी अनेकांची इच्छा असते परंतु नेमकी तयारी कधी सुरू करावी याबद्दल स्पष्टता नसते. हा अभ्यास कधी सुरू करावा याची माहिती स्पर्धापरिक्षा लेखमालेच्या या दुसर्या लेखात घेऊ. स्पर्धापरिक्षांचा द्यायच्या आहेत असा ठाम निर्धार झाला कि,

१.स्वत:च्या क्षमता आणि कमतरता , 
२. UPSC/MPSC आयोगाच्या अपेक्षा 
३. अधिकारी होण्यासाठी लागणारी प्रवृत्ती आणि कल

इत्यादी गोष्टींचे बारकाईने विश्लेषण करावे. त्यातील अंतर आणि मेहनतीची आवश्यकता लक्षात आली की लगेच अभ्यास सुरू करावा. “अर्ली बर्ड, रीचेस अर्ली” या उक्तीप्रमाणे ‌जेवढ्या लवकर अभ्यास सुरू कराल तेवढ्या लवकर यशोशिखर गाठाल.

) १० वी नंतर – हा टप्पा स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी खुप लवकर होतो, या टप्प्यावर स्पर्धापरिक्षांची तोंडओळख करुन घेता येईल त्यानुसार विस्तृत वाचनाची सवय लावणे, स्वतःच्या सवयींवर काम करणे, भोवताल आणि स्व: समजुन घेणे इत्यादी गोष्टी करता येतील. त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपल्याला काय आवडते आणि काय चांगले जमेल याचा शोध घेऊन आपला सक्षम शैक्षणिक आलेख तयार करणे अपेक्षित आहे

) १२ वी नंतर – स्पर्धापरिक्षाच्या अभ्यासाची सुरुवात करण्याचा हा सर्वात उत्तम काळ आहे. ज्यात पदवी मिळताना तुमच्याकडे पोस्ट असण्याची संधी आहे. बारावी नंतर अभ्यास सुरू केल्यावर आपणास 3/4 वर्ष मिळतात परिक्षा न देता फक्त अभ्यास करता येतो(पदवी अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता). हे 3/4 वर्षे रणनीती आखुन नियोजनबद्ध अभ्यास पुर्ण करता येतो .सामान्य अध्ययनातील सर्व संकल्पना समजुन घेणे. या पहिल्या ते तिसर्या वर्षांपर्यंत अनुक्रमे बेसिक, NCERTs आॅप्शनल/‌HRD, निबंध,Ethics , मेन्स, प्रिलिम असा सर्वांंगीण आणि संपुर्ण अभ्यास करता येतो .स्वत:च्या विकासावर लक्ष देता येते तसेच आपापल्या क्षेत्रात आपण तज्ज्ञ होणेही येथे अपेक्षित आहे.

) पदवीच्या शेवटच्या वर्षाला- हा अभ्यास आव्हानात्मक असतो. पदवीला उत्तम मार्क्स मिळवून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा असतो. या स्टेज वर दोन्ही आघाड्यांवर लढत रहावे लागते, अभ्यासाचे योग्य नियोजन आवश्यक आहे.

) पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर – सर्वाधिक परिक्षार्थी या स्टेजवर अभ्यास करतात. घरची आर्थिक परिस्थिती ठिक असल्यास पुर्ण वेळ अभ्यास करता येतो . पण तो कमी वेळेत ,अधिक वेगात समान आक्रमकतेने पुर्ण करावयाचा असतो . कारण या स्टेज वर लवकरात लवकर आपलं करिअर सेट करण समाजाकडुन अपेक्षित असतं. हा पुर्ण वेळ वापरुन सुरवातीच्या काही प्रयत्नातंच पोस्ट मिळवुन घ्यावी.

) नोकरी करुन – नोकरी करूनही पोस्ट मिळवता येते पण त्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास, मानसिक स्थैर्य आवश्यक असते कारण या स्टेज वर आपली स्पर्धा पुर्ण वेळ अभ्यास करणार्यांशी असते .आपण उत्कृष्ट विश्लेषक आणि निरीक्षक असणे आवश्यक आहे.

UPSC/MPSC आयोगाला वर्षोनवर्षे पुस्तकात डोकं घालून बसणार्या परिक्षार्थीं ऐवजी कमी वेळेत अधिकाधिक आकलन कौशल्ये असणारी तसेच, कामामध्ये नाविन्य शोधणारे चिकित्सक अष्टपैलू परिक्षार्थी अपेक्षित आहेत. ही अपेक्षा पूर्ण केलीत तर मग तुम्ही पदवी दरम्यानच्या कोणत्याही वर्षी तयारी केली तरी निश्र्चित यश मिळवता.

या अभ्यासप्रवासात प्रामाणिक मार्गदर्शक असणे अपरिहार्य आहे कारण, कुठे पोहचायचे हे जरी माहित असले तरी कसे पोहचायचे हे अनुभवी मार्गदर्शकच सांगु शकतो. स्पर्धा परीक्षा ही प्रचंड स्पर्धात्मक असल्याने योग्य दिशा आणि अभ्यास याशिवाय पद मिळविणे अशक्य आहे. सातत्यपूर्ण मेहनत आणि योग्य दिशेने नियोजन असेल तर वरील पैकी कोणत्याही स्टेज वरील परिक्षार्थी UPSC/MPSC मधुन क्लास वन पदवी मिळवु शकतो.

Something don’t just happen,they happen because somebody decided to make them happen

नितिन ब-हाटे
9867637685
(लेखक ‘लोकनिती IAS, मुंबई’ चे संचालक/ मुख्य समन्वयक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत.)

“मी कोणत्या सरकारी परिक्षेची तयारी करु…?”

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीति, भाग 11 | नितिन बऱ्हाटे

शाळेमध्ये असताना रुबाब करणारे तलाठी भाऊसाहेब, भीती वाटणारे पोलिस काका, “साहेब ” आले, ”साहेबांना विचारुन सांगतो” असं म्हणणारे सरकारी आॅफिसातील क्लर्क यांना पाहिल्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ताफ्यात दिव्याच्या गाडीमध्ये मागच्या सीटवर बसलेले मोठे साहेब व्हायला काय करावं लागतं बरं ? असा प्रश्र्न पडायचा. टि.व्ही. वर पिक्चर पाहताना त्यातील डॅशिंग आॅफिसर पाहून अधिकारशाही बद्दल आपसुकच वर्दी किंवा शासकीय रुबाबाचे आकर्षण सुरु व्हायचे. पण तेव्हा कोणती परिक्षा दिल्यावर कोणता अधिकारी होता येते याची माहिती नव्हती. या लेखात आपण हेच समजून घेणार आहोत.

प्रशासन, पोलिस, राजस्व, टपाल, वित्त, आरोग्य,वीमा अशा विविध सरकारी खात्यांमध्ये किमान बारावी किंवा पदवीच्या पात्रतेवर वर्ग 3 , वर्ग 2 आणि वर्ग 1 चे अधिकारी स्पर्धापरिक्षांद्वारे निवडले जातात. सर्वप्रथम आपण विविध आयोग आणि त्याद्वारे मिळणारी पदे (सेवा) पाहुया.

UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) –

A. 12 वी नंतर नॅशनल डिफेन्स अकॅडमी साठी प्रवेश परिक्षा,

B. पदवी नंतर

१) अखिल भारतीय सेवा (IAS, IFS (forest), IPS) साठी परिक्षा घेतली जाते, तसेच या परिक्षेतुन परदेश सेवा, राजस्व, रेल्वे, टपाल, ऑडिट अकांऊट, माहीती, काॅर्पोरेट अॅड लाॅ, नागरी वित्त इत्यादी विविध पदांसाठी (सेवा) परिक्षा घेतली जाते. भारतीय वन सेवा आणि यु.पी.एस.सी.ची पुर्व परिक्षा एकत्रच होते. पुर्व, मुख्य (विस्तृत लिखाण) आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत ही परिक्षा वर्ग 1 चं पद मिळवुन देते,
२) Assistant commandant – परिक्षा आणि शारीरिक चाचणी यांच्या आधारावर CAPF, CISF, ITBP, SSB इत्यादी निमलष्करी दलांसाठी वर्ग 1 ची वर्दी मिळवुन देणारी परिक्षा‌ आहे तसेच Combine Defence service ही परिक्षा ही सैन्य,नौदल आणि हवाई दलामध्ये अधिकारी होण्यासाठी घेतली जाते.
‍३) विविध अभियांत्रिकी सेवांसाठी परिक्षा
४) वैद्यकीय सेवांसाठी परिक्षा इत्यादी.
यु.पी.एस.सी‌. मधुन निवडलेल्या अधिकार्यांची नेमणुक भारतात कोठेही संबधित राज्यशासनाच्या अखत्यारीत होते.

MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) –

A. पदवी नंतर

वर्ग 1 पदांसाठी MPSC कडुन UPSC च्या‌ धर्तीवर तीन टप्प्यांत म्हणजे पुर्व , मुख्य (वस्तुनिष्ठ) आणि मुलाखतीद्वारे उपजिल्हाधिकारी, उप पोलिस अधिक्षक, कक्ष अधिकारी, तहसीलदार,महाराष्ट्र वित्त सेवा, परिवहन अधिकारी, निबंधक,नायाब तहसीलदार, कौशल्य विकास अधिकारी इत्यादी पदांवर स्पर्धापरिक्षांद्वारा निवडले जातात,महाराष्ट्र राज्य मध्ये कुठेही नेमणूक केली जाते.

वर्ग 2 (अराजपत्रित) साठी पोलिस उपनिरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी (मंत्रालय), राज्य(विक्री)कर निरीक्षक इत्यादी तीन पदांसाठी पुर्व आणि मुख्य दोन टप्प्यांत संयुक्त परिक्षा घेतली जाते (PSI साठी शारीरिक चाचणी आणि मुलाखत आहे) वर्ग 3‌ साठी कर सहायक, मंत्रालय क्लर्क यांची संयुक्त परिक्षा,
महीला बाल कल्याण,‌उत्पादन शुल्क, अभियांत्रिकी सेवा किंवा इतर राज्य शासन विभागांसाठी मागणीनुसार ‌पदे भरली जातात

SSC (स्टाफ सिलेक्शन कमिशन) द्वारे बारावी नंतर क्लर्कीकल पदांसाठी आणि पदवीच्या पात्रतेवर केंद्र शासनाच्या विविध विभागांमध्ये वर्ग 2 चे अधिकारी तसेच कर्मचारी स्पर्धापरिक्षांद्वारे निवडले जातात, नेमणूक ‌संपुर्ण भारतात कोठेही होते, कार्यालयीन कामकाजासाठीचे सर्व कर्मचारी हा आयोग निवडते , परिक्षा पुर्व आणि मुख्य (गणित आणि इंग्रजी) अशा दोन टप्प्यांत घेतली जाते.

BANK(IBPS) भारतातील प्रत्येक बॅंक “प्रोबेशनरी अधिकारी” आणि “क्लर्क” या दोन सेवांसाठी जागांच्या मागणी नुसार परिक्षेची जाहीरात देते ही परिक्षा IBPS हा आयोग आयोजित करते . या परिक्षेत गणित , बुध्दिमत्ता चाचणी, जनरल अवेअरनेस, फायनान्स आणि इंग्रजी या विषयांवर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतात.
RBI – बॅकांची बॅंक असलेली RBI, Grade B अधिकारी आणि असिस्टंट या पदांसाठी पुर्व‌ आणि मुख्य (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी) अशा दोन टप्प्यांत परिक्षा घेते‌.

विविध शासकीय, निमशासकीय वीमा कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रिय कंपन्या विविध ‌पदवी आणि अनुभव या निकषांवर वेळोवळी पदे भरत असतात त्याततही अनेक संधी आहेत.

तलाठी, ग्रामसेवक या परिक्षा(वस्तुनिष्ठ) संबंधित जिल्हा आयुक्तालय कडुन जागांच्या आवश्यकतेनुसार घेतल्या जातात. तसेच बारावी च्या आधारावर संबंधित पोलिस शहाराकडुन पोलिस/शिपाई सेवेसाठी शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा अशा दोन टप्प्यांत परिक्षा घेतली जाते.

वरील सर्व आयोगांच्या वेबसाइटवर जाऊन संबंधित परिक्षांचा अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका आणि परिक्षापद्धती इत्यादी संबधी विस्तृत मध्ये माहीती काढुन योग्य मार्गदर्शन घेऊन तुम्हाला

1. जमणारी

2. आवडणारी आणि

3. समजणारी परिक्षा मेहनत घेऊन द्यावी.

सर्वांकडे समान शाररीक आणि मानसिक क्षमता असते ,” ज्याचा संघर्ष मोठा त्याचे पद मोठे” ही एकच गोष्ट तुम्हाला इतरांपेक्षा वेगळी ठरवते.
पदवी पर्यंत तुम्हाला किती मार्क मिळाले? , तुम्ही कोठुन आलात ?, तुमच्या घरातले शासकीय सेवेत आहेत का ? तुम्ही अस्सलिखित इंग्रजी बोलता का ? इत्यादी गोष्टी तुमचा वर्ग 3 ते वर्ग 1 पदाचा प्रवास ठरवु शकत नाही, मात्र परिक्षा देण्याचे ठरविल्यानंतर तुम्ही किती जीव ओतुन तयारी करताय ती मेहनत तुम्ही पोलिस शिपाई बनणार की IPS बनणार हे नक्की ठरवते.

Nitin Barhate UPSC MPSC

नितिन ब-हाटे
9867637685
(लेखक’लोकनीति IAS, मुंबई’ चे मुख्य समन्वयक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत)

हॉटेलिंगमधील संधी

घरचं खाऊन कंटाळा आला की, अथवा एखाद्या विशिष्ट प्रसंगाला, हॉटेलमधले चमचमीत खाण्यासाठी आपण हॉटेलमध्ये जातो. आपल्यामध्ये खवय्ये नावाची एक जात आहे, ती अशा अनेक ठिकाणी फिरून विविध ठिकाणच्या चवी घेऊन जिभेचे चोचले पुरवीत असते. काही वर्षांपासून जेव्हा लोकांच्या उत्पन्नाचा स्तर वाढला, लोकांची हॉटेलिंगची हौस वाढली, तसे हॉटेल या व्यवसायाला विशेष महत्त्व प्राप्त झालं. स्पर्धा वाढली आणि यातून ‘हॉटेल मॅनेजमेंट’ या करिअरचा जन्म झाला.

हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग खरंतर अनुभवसिद्ध करिअर आहेत. यात तुमचं वेगळंपण सिद्ध करावं लागतं आणि त्यावर तुमचं यश अवलंबून आहे. बऱ्याच लोकांना चांगलं जेवण करून लोकांना खायला घालायला आवडतं. त्यामुळे खरंच जर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंटसंबंधित क्षेत्रात करिअर करायचे असेल तर त्याचा शास्त्रीय अभ्यास करणं गरजेचं आहे.

आपल्या देशात उत्पन्नाची वाढती पातळी पाहता, येथे हॉटेल या व्यवसायाला खूप संधी आहे. या क्षेत्रात साधा ढाबा उघडून पुढे स्वत:चे पंचतारांकित हॉटेल किंवा हॉटेलची चेन उघडल्याचीही अनेक उदाहरणं आहेत. यातून प्रेरणा घेऊन मराठी मुलांनी हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात स्वयंरोजगारासाठी उतरण्यास हरकत नाही.
हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी मिळविण्याकरिता दोन अभ्यासक्रम असतात.

१. बॅचलर इन हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी (चार वर्षे) : या अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनतर्फे होणारी कॉमन मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन टेस्ट (सीमॅॅट) देणे आवश्यक असते. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपही मिळते.
२. बॅचलर इन हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी (तीन वर्षे) : या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याकरिता कोणतीही प्रवेश परीक्षा देण्याची बंधने नाहीत. या अभ्यासक्रमात प्रत्यक्ष प्रवेश घेता येईल. याशिवाय, हॉटेल मॅनेजमेंटमध्ये दीड वर्षाचा डिप्लोमा कोर्स करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.

विद्या शाखा व अभ्यासक्रम

फ्रंट आॅफिस मॅनेजमेंट : या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना हॉटेलमध्ये येणाºया पाहुण्यांचे प्रवेश होण्यापासून तर बाहेर जाईपर्यंत दिल्या जाणाºया सर्व सेवा शिकविल्या जातात. चेक-इन, चेक-आउट, रूम प्रोव्हायडिंग, बिलिंग या सर्व घटकांच्या व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते.

हाउसकीपिंग : या अंतर्गत हॉटेल क्लीनिंग, हॉटेल मेंटनन्स याबद्दल शिकविले जाते; शिवाय ग्राहकांना लंच, डिनर व त्यांच्या इतर गरजा व सुविधा देण्याबाबत शिकवले जाते.

फूड अ‍ॅण्ड ब्रेवरेज प्रॉडक्शन : या विद्या शाखेत प्रथमत: बेसिक फूड आणि ड्रिंक्स बनविणे, नंतर कॉन्टिनेन्टल फूड आणि ड्रिंक्स बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या दोन विषयांचे प्रशिक्षण दिल्यानंतर क्वांटिटी फूड बनविणे शिकविले जाते. फूड अ‍ॅण्ड ब्रेवरेज सर्व्हिस : या अभ्यासक्रमात हॉटेलमधील ग्राहकांकडून फूड आणि ड्रिंक्स यांच्या आॅर्डर्स घेणे व सर्व्ह करण्याची योग्य पद्धत हे घटक त्यात येतात.

मागच्या वर्षी प्रिलिम्स निघाली होती..यावर्षी ती पण नाही ?? मग हे वाचाच

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीति, भाग ७| नितिन ब-हाटे 

“हारने वालो का भी, अपना एक रुदबा होता हैं,
अफसोस तो वो करे, जो दौड मैं शामील ना थे “

या‌ थाटात तुम्ही रममाण असाल तर आत्मपरीक्षण(self-introspection) करण्याची नितांत गरज आहे, कारण आपण ज्या दौड मध्ये शामील झालो आहोत तिथं आपण नेमके कुठे आहोत, आपल्या पुढे किती स्पर्धक आहेत?, आपण आधीपेक्षा किती प्रगल्भ झालो आहोत ?, या‌ वयात आपण कुठे असणार होतो?, ही दौड कधी संपणार आहे?, आपले अटेम्ट का राहतायत?, पोस्ट निघणारं‌ वर्ष नेमके कोणते आहे? या सर्वांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला तरच रुदबा(पद) मिळेल. नाहीतर जिदंगीभर अफसोस करावा लागेल, हारणं कधीच वाईट नाही पण “का हारलो…?” हे न शोधणं खुप वाईट आहे. या लेखात ते शोधण्याचा प्रयत्न करु…

स्पर्धापरिक्षेची दौड सामुहिकरित्या भासत असली तरी वैयक्तिकच आहे, “जागा कितीही येऊ दे मला एकचं पोस्ट पाहिजे….”, “यावर्षी आपली पोस्ट फिक्स….”असं सामुहिकरित्या चहाच्या कट्ट्यावर बोलुन वैयक्तिक पातळीवर कृतीत आणलं नाही तर चहाचा कट्टा बदलावा लागतो. याउलट पोस्ट मिळवणारे वैयक्तिक पातळीवर चालु घडामोडी अपडेट्स करीत असतात, वाचलेल्या गोष्टी रिव्हाईस करीत राहतात, स्वतःच्या चुकांवर आणि कमतरतांवर काम करीत राहतात. त्यांचा प्राधान्यक्रम ठरलेला असतो,‌ विचारांची स्पष्टता, कामातील सातत्य, अभ्यासाचे नियोजन, निर्णयातील समतोलपणा, विचार(thought) आणि कृती(action) मधील कमी करत गेलेलं अंतर त्यांना पोस्ट मिळवुन देतं, आणि नंतर तेच चहाच्या कट्ट्यावर चर्चेचा विषय ठरतात, “तो आमच्या अभ्यासिकेत होता, आज IAS/DC आहे.”

इतर महत्वाचे –

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-2019 जाहीर

तुम्ही सुंदर डान्स करता? मग त्यातच करिअर करा

आता तुम्ही परिक्षेच्या कोणत्या टप्प्यावर आहात आणि का आहात ….? मागच्या वेळेस प्रिलिम निघाली होती यावर्षी तर तीपण का नाही निघाली……? काहीतरी चुकतंय…? याचं कारण तुमच्या आतापर्यंतच्या केलेल्या अभ्यासात, वाचलेल्या पुस्तकात आणि घेतलेल्या निर्णयात आहे. मार्गदर्शक निवडीपासुन रुम, मेस, जागा, अभ्यासमित्र, पुस्तके, विषय आणि पदापर्यंत…..या सर्वांच्या निवडीत आहे. स्वतःच्या स्वभाव, सवयी, अभ्यासपद्धती इत्यादीचं आकलन होणं गरजेचं आहे

UPSC/MPSC मध्ये 3/4 वर्षे गुंतवणूक केल्यानंतर वेळोवेळी स्वःताचे आत्मपरीक्षण(SWOT analysis) केले पाहिजे कारण आपल्या प्रयत्नाच्या दिशेत धोलपुर हाऊस किंवा यशदा लागणार नसेल तर प्रवास व्यर्थ आहे,
रिझल्ट येतं नाही म्हणजे अपुरे प्रयत्न, कमी मेहनत, नकोत्या गोष्टीमध्ये वेळेचा अपव्यय, चुकीची अभ्यासशैली, संकल्पनांची अस्पष्टता, बेसिक माहितीचा अभाव, कामातील आळस, पेपर सरावातील चालढकल, चुकीच्या वेळेत चुकीचा विषय, अभ्यासाची चुकीची दिशा, योग्य मार्गदर्शकाचा अभाव, एकाच वेळी दोन दगडांवर पाय, आणि अनियमितता ही कारणं स्पष्ट आहेत. बाकी यावर्षी जागा आलेल्या नाहीत, नोटीफिकेशन आले नाही, मन लागत नाही, घरुन फोन आला होता, पैशाचा प्राॅब्लेम चालु आहे, पेपर कठिण काढला होता ही सगळी कारणं दुय्यम आहेत. कारण यश‌ फक्त त्यांनाच मिळते ज्यांना त्याची खरचं गरज आहे.

आता हे चक्रव्यूह भेदायचंय, यशाचा गुलाल उधाळायचाय..?…..नेमके काय शोधता येईल…?? काय करता येईल..??

१) “प्रथम आपलं चुकतंय हे स्विकार/मान्य करणे आणि काय चुकतंय ते शोधुन त्यांच्यावर लगेच काम करणे” म्हणजेच उपलब्ध वेळ, राहिलेला अभ्यास, प्राधान्य, ‘य’ पोस्ट मिळण्याची शक्यता इत्यादी चौकटीत नियोजन करणे. वेग , वेळ आणि आक्रमकता यानुसार काम करावे लागेल.

२) स्वतःचं चिकित्सक विश्लेषण(Critical Analysis) करुन संकल्पनांची स्पष्टता, तथ्यांचे पाठांतर, वाढलेला बुध्द्यांक , प्रगल्भतेचा स्तर इत्यादीचा अंदाज घेऊन कमकुवत विषय सरासरी पातळीवर आणणे आणि स्ट्राॅन्ग विषय अधिक पक्के करणे .

३) सावध‌ ऐका पुढल्या हाका….- स्पर्धापरिक्षामध्ये परिक्षा आणि स्वतःला समजुन घेतल्या शिवाय यश मिळणार नाही, आयोगाला अपेक्षित काय आहे माझी ते द्यायची किती तयारी झाली आहे ?अजुन किती द्यावं लागेल ? त्यासाठी आयोग आणि मी यांच्या अपेक्षांमधील अंतर कमी केलं पाहिजे.

४) भावनात्मक मजबुत – यश अपयश दुय्यम आहे, या प्रवासात तुम्ही स्वतःला सादर कसे करता, अपयश आलं तरी तुमच्यातला लढण्याचा आत्मविश्वास किती परिपक्व आहे , कौटुंबिक किंवा खाजगी आयुष्यातील समस्या कुशलतेने हाताळण्याच कसब तुमच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे, मानसिक आणि भावनात्मक दृष्टीने सक्षम असणे आवश्यक आहे.

५) कुछ नया चाहिऐ- रटाळ आणि चाकोरीबद्ध दिनक्रमामुळे अभ्यासात तोचतोचपणा आलाय का?? त्याच त्याच गोष्टी दिल्या की त्याचं गोष्टी रिटर्न मिळतात, दररोजच्या कामात नाविन्य शोधलं पाहिजे, वेळेनुसार लवचिक राहता आलं पाहिजे त्यामुळे पुर्ण प्रक्रिया एन्जाॅय करता येते.

६) आर्थिक चणचण – “२५ पर्यंत क्लासवन ,नंतर मिळेल ती पोस्ट” असे मार्गक्रमण असेल तर उपलब्ध वेळेनुसार काम झालं नाही त्यामुळे प्राधान्यक्रम बदलला हे सिद्ध होते, त्यात आर्थिक पेच आला तर लवकर जाग येणं आवश्यक आहे कारण या दुखण्याला इलाज म्हणजे एक वर्षाच्या खर्चाची सोय करणे, बचत करुन ठेवणं किंवा स्वतः कमवणे‌ आणि अपेक्षित कालावधी मध्ये पोस्ट मिळवुन मोकळं होणं. ठराविक वेळेनंतर नोकरी करुन अभ्यास करता येतो.

७) अधिकारीपणाच भुतं – अधिकारी होण्याआधीच बडेजाव करत हिडंण, मोठी पुस्तक घेऊन मिरवणं, रात्ररात्र भाषणांची तयारी करणं, विविध चर्चासत्रामध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा अतिरेक करणं इत्यादी भुतं उतरणे खुप अगत्याचे आहे. दहावी ला बोर्डात येण्यासाठी जसा जीवतोडुन अभ्यास केला होता तसा आता ही परिक्षा पास करण्यासाठी अभ्यास केला की पोस्ट मिळते.

८) मन रमत नाही(Isolation vs social)- लग्नसोहळा, पार्टया, कार्यक्रम इत्यादींमध्ये वाववरणं कठिण वाटतयं, करिअरसंबंधी प्रश्र्नांची उत्तर देता येत नाही तर मग काही काळ भुमिगत व्हा, पण मग त्यात तुमचा सोशल आत्मा हरवु देऊ नका, तुम्ही नेमके सोशल राहिलात की अभ्यास एन्जाॅय करता कि अलग(Isolate)होऊन ते शोधायला पाहिजे. मी नेमका बहिर्मुख (extrovert)व्यक्ति आहे की अंतर्मुख (Introvert) व्यक्ति आहे हे माहिती पाहिजे.

९) व्यक्तिगत दोष(Personality Error) – स्पर्धापरिक्षांचा संघर्ष व्यक्तिगत दोष दुरु केल्या शिवाय लढता येणार नाही, चुकीची जडलेली सवय, अहंकेद्री वृत्ती, बेजबाबदारपणा आणि इतर दोष दुर करण्यासाठी दररोज स्वतःवर काम करावं लागेल. निवड झालेला एक व्यक्ति एक “संस्था” म्हणुन घडलेला असतो ज्याच्या मनगटात आयुक्तालय, संपुर्ण जिल्हा सांभाळण्याची ताकद असते.

१०) स्वांन्त सुखाय(Psudo self entertainment)- वरील कोणत्याच पैलुवर काम केलं‌ नाही तर आपण आपल्या भोवती निर्माण केलेल्या स्वांन्त सुखाय रिंगणात स्वमनोरंजन करीत बसतो तयारी चालु आहे, एवढं संपलं एवढं राहिलं, यावर्षी नक्की पोस्ट निघेल असं वाटतंय ……इत्यादी मनकल्पना आखित बसतो याउलट ठोस आणि स्पष्ट दिसणारा अभ्यासाची ब्लु प्रिंट तयार असेल तर आपल्याच विश्वात रममाण फुग्याला वास्तवाची टाचणी टोचुन फोडता येते.

या रिंगणातुन लवकर बाहेर पडणे अपेक्षित आहे कारण या प्रक्रियेत‌ तुमचा वेळ निघुन जात असतो, इथे तुम्ही एकटे नसता, तुमच्या सोबत तुमचे आई-वडिल, बहिण, भाऊ ‌, जोडीदार, कुटुंब ,तुमचा समाज, आणि पुर्ण गाव गुंतलेला असतो, तुमच्या यशाचा फायदा तुमच्या गावतील शेवटच्या वेशीवरील लहान लेकराला होणार असतो. नंतर ठरविलेल्या गोष्टींना खुप अंतर असते, आज स्वतःवर काम केलं‌‌ नाही तर उद्या समाजावर काम करता येणार नाही, आज तुम्ही पोस्ट साठी अभ्यास करीत नसाल तर उद्या पोस्ट मिळणार नाही हे नक्की आहे.

अब हवाएँ ही करेंगी रौशनी का फ़ैसला
जिस दिए में जान होगी वो दिया रह जाएगा- महशर बदायुनी

Nitin Barhate UPSC MPSC

नितिन ब-हाटे

9867637685
(लेखक ‘लोकनीति IAS, मुंबई ‘ चे मुख्य समन्वयक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत)

भाषांतरातही करिअर आहे..!

करिअरमंत्रा | जागतिकीकरणामुळे संपूर्ण जग कवेत आले आहे. त्यामुळे सध्याच्या काळात भाषांतराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. वेगवेगळ्या देशांच्या संस्कृतीच्या किंवा सामाजिकतेच्या सीमा ओलांडून नवनवीन ज्ञान प्राप्त करणे, हा कुठेतरी सर्वांसाठी उत्सुकतेचा किंवा ज्ञानाचा विषय ठरला आहे. एखाद्या विशिष्ट भाषेमधून दुसऱ्या भाषेमध्ये जो काही आशय किंवा मजकूर असेल, त्याला त्या विशिष्ट भाषेतील लोकांना कळेल, अशा शब्दांमध्ये गुंफून त्या आशयाची बांधणी करणे, म्हणजेच भाषांतर होय. एका भाषेमधून दुसºया भाषेमधील आशय किंवा मजकूर, त्याच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता दुसºया भाषेत अनुवादित करणे, म्हणजेच भाषांतर होय. मात्र, यासाठी दोन्ही भाषांचे सर्वांगीण ज्ञान भाषांतरकाराला असायला हवे. यामध्ये जर तुम्ही प्रावीण्य मिळवले तर तुमच्यासाठी संधीचे भांडार खुले आहे.

प्रशासकीय कार्य हे एका विशिष्ट भाषेतून चालते मात्र, इतर भाषांमध्येसुद्धा त्याचे भाषांतर करण्याची गरज भासते. भारताचाच विचार केला, तर भारतात विभिन्न राज्यांमध्ये भिन्न भिन्न भाषा बोलल्या जातात आणि त्या त्या राज्याचे कार्य त्या त्या भाषेतून होत असते. केंद्र सरकारचे काम हिंदी किंवा इंग्रजी या भाषांमधून होते, तर राज्य सरकारचे काम स्थानिक भाषेमधून होते (उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर शासकीय कार्य हे मराठीतून होते). मग अशा वेळेला वेगवेगळे कागदपत्र, दस्तावेज यांचे भाषांतर करण्याची गरज भासते. अनेक वेळा सरकारी कचेरीमधून म्हणजेच कोर्टकचेरीमधूनही भाषांतराची गरज भासत असते.
विविध कायद्यांची अंमलबजावणी करत असताना त्या कायद्यांचे रूपांतर त्या विशिष्ट भाषेमध्ये करून मगच ते लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे शासकीय अनुवाद हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याला प्रशासकीय अनुवादाची जोड आहे.

जाहिरातीचे भाषांतर

बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतामध्ये प्रवेश केल्यापासून त्यांच्यासाठी बाजारपेठ विस्तारण्यासाठी किंवा स्वत:चे उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचे एक महत्त्वाचे माध्यम म्हणजे जाहिरात होय. त्यामुळे जाहिरातींमध्ये सुद्धा भाषांतराची नवीन संधी उपलब्ध झाली आहे. जाहिरातींचे भाषांतर करत असताना त्यात त्या त्या कल्पना म्हणजे जाहिरात जशी मुळात सर्जनात्मक असते, ती सर्जनशीलता दुसºया भाषेमध्ये जशीच्या तशी येणे आवश्यक असते. त्यामुळे पटकन लोकांच्या मनाचा ठाव घेणारी, लोकांना चटकन उच्चारता येणारी, त्यांना पाठ होणारी अशी जाहिरात तयार करावी लागते.

वेगवेगळ्या जाहिरातींच्या टॅगलाइन किंवा कॅचलाइन यांचे इतर भाषांमध्ये भाषांतर करत असताना खूप कसरत करावी लागते. खाद्या जाहिरातीसाठी जे काही मसुदा लेखन केले जाते. त्या मसुदा लेखनाचे भाषांतर आजकाल आवश्यक झाले आहे.

हे भाषांतर करत असताना त्यामध्ये खूप जास्त सावध राहणे आवश्यक आहे. भारताचा विचार केला तर इंग्रजीमधील जाहिराती या मराठी, गुजराथी, हिंदी, पंजाबी, तामिळ, बंगाली, कानडी ,तेलुगू, मल्याळम, ओरिया अशा भाषांमध्ये भाषांतरीत कराव्या लागतात, त्यामुळे भाषांतरकाराला मसुदा लेखनाचे भाषांतर हे एक महत्त्वाचा पर्याय उपलब्ध आहे. विभिन्न प्रादेशिक भाषांमध्ये ज्यांनी आपली पदवी घेतली आहे. त्यांना भाषांतराची संधी उपलब्ध असते, अर्थात त्यासाठी त्यांना ज्या भाषेतून भाषांतर करायचे ती भाषा आणि ज्या भाषेत भाषांतर करायची ती भाषा, यावर प्रभुत्त्व असणे आवश्यक असते. महाराष्ट्राचाच विचार केला तर मराठीतून बीए, बीएमएम करणारे अशा पदवीधारकांना भाषांतराचे हे माध्यम उपलब्ध आहे. इतर भाषांवर असलेले प्रभुत्त्व, संगणकीय ज्ञान, इतर कौशल्य, इतर भाषांमधील पुस्तकांचे वाचन हे जर व्यवस्थित असेल, तर ती व्यक्ती आणखीन जास्त चांगल्या
पद्धतीने भाषांतर करू शकते. एकूणच भाषांतरासाठी अशी बरीचशी दालने आता उपलब्ध आहेत.

पुस्तकाचे भाषांत

भाषांतरामधला सर्वात जास्त चर्चित व लोकांना माहीत असलेले भाषांतर म्हणजे पुस्तकांचे भाषांतर होय. गेल्या दोन दशकांमध्ये विभिन्न देशांतल्या गाजलेल्या पुस्तकांचे किंवा गाजलेल्या लेखकांच्या प्रसिद्ध साहित्यकृतींचे भाषांतर करण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे. असे बाजारात असलेल्या एकूण पुस्तकांमधून दिसते. भारताचा विचार केला तर अमेरिका, युरोप, रशिया, जर्मनी इथल्या पुस्तकांचे अनुवाद आपल्याकडे उपलब्ध होताना दिसतात. याखेरीज भारतीय भाषांमधले भिन्न भिन्न भाषांमधल्या गाजलेल्या कादंबर्या, कथासंग्रह, कविता यांचेसुद्धा भाषांतर होताना आपल्याला दिसते. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त पुस्तकांचे भाषांतर तर हमखासच होते. याखेरीज अत्यंत गाजलेल्या आणि चर्चेत असलेल्या पुस्तकांचेसुद्धा भाषांतर होताना आपल्याला दिसते आणि त्यामुळे भाषेची मर्यादा ओलांडून त्या त्या विषयातील साहित्यप्रेमींना हा पुस्तकांचा ठेवा प्राप्त होतो. यात वेगवेगळ्या प्रकाशन संस्था लेखकाला मानधन देतात. विविध माध्यमे लोकरुचीनुसार त्यांना मजकूर पुरवीत असतात. यामध्ये वृत्तपत्रे, सिनेमा, रेडिओ , टेलिव्हिजन या सर्वच माध्यमांचा समावेश होतो. यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आशय, त्याचे बिनचूक भाषांतर करावे लागते. मात्र, त्याच बरोबर त्या त्या मालिका किंवा चित्रपटाप्रमाणे त्यात काही बदल केले जातात, म्हणजेच मूळ इंग्रजीतल्या किंवा दक्षिण भारतीय भाषेतल्या चित्रपटांसाठी सबटायटल्स किंवा डबिंग ज्या वेळेला हिंदीमध्ये केले जाते, तेव्हा त्यात हिंदीतील काही गाजलेली उदाहरणे टाकावी लागतात, हा याच्यातील फरक आहे.

८३३ सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची निवड न्यायालयाकडून रद्द

नागपूर | परिवहन विभागातील ८३३ सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारा करण्यात आलेली उमेदवारांची निवड उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्दबातल ठरवली. या आदेशामुळे निवड झालेल्या उमेदवारांना मोठा फटका बसला असून केंद्र सरकारने पदासाठी घालून दिलेली अर्हता शिथिल केल्याने हा प्रकार घडला आहे.

राज्याच्या परिवहन विभागात रिक्त ८३३ सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ३० जानेवारी २०१७ ला जाहिरात प्रसिद्ध करून या पदासाठी अभियांत्रिकीच्या पदवीसह उमेदवारांना अवजड माल वाहन व अवजड प्रवासी वाहन चालवण्याचा परवाना आणि विशिष्ट वर्कशॉपमध्ये एक वर्ष कामाचा अनुभव अशी अर्हता केंद्र सरकारने घालून दिली आहे. त्या अर्हतेत राज्य सरकारने बदल केला. राज्य सरकारने जाहिरातीमध्ये हलके मोटार वाहन व गिअर असलेली मोटार सायकल चालवण्याचा परवाना आणि निवड झाल्यानंतर कामाचा अनुभव घेण्याची मुभा दिली होती. त्यामुळे राजेश फाटे या उमेदवाराने उच्च न्यायालयात धाव घेत राज्य सरकारच्या अर्हता शिथिल करण्याला आव्हान दिले.

या प्रकरणाची सुनावणी न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. झका हक यांच्यासमक्ष झाली. यावेळी राज्य सरकारच्या जाहिरातीनुसार उमेदवारांची ३० एप्रिल २०१७ मध्ये परीक्षा घेतली व उमेदवारांची निवड केली. त्यावेळी न्यायालयाने निवडीवर सद्यस्थिती ठेवण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते.

आता या प्रकरणात केंद्र सरकारने विशिष्ट पदासाठी तयार केलेले नियम राज्य सरकारला शिथिल करता येणार नाही, असे स्पष्ट करीत केंद्र सरकारच्या नियमानुसार अर्हता धारण करणाऱ्यांची निवड वैध असून त्यांनाच नियमित करण्यात यावे, असे न्यायालयाने नमूद केले. या आदेशामुळे सरकारच्या जाहिरातीनुसार अर्हता धारण करणाऱ्यांची निवड रद्द होते, असे स्पष्ट झाले आहे.