Home Blog Page 1070

राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पदाच्या ५७१६ जागा

पोटापाण्याची गोष्ट|महाराष्ट्र आरोग्य समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी पदांच्या ५७१६ जागा ६ किंवा ८ महिन्यांकरिता कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

समुदाय आरोग्य अधिकारी पदांच्या ५७१६ जागा
अमरावती ४५५ जागा, यवतमाळ ४०२ जागा, सिंधुदुर्ग २०१ जागा, ठाणे १४५ जागा, रायगड २०२ जागा, सातारा ३१७ जागा, पुणे ५०३ जागा, जळगाव ३२२ जागा, अहमदनगर ४४५ जागा, नाशिक ४२९ जागा, नंदुरबार ११७ जागा, लातूर १६८ जागा, नांदेड १९६ जागा, उस्मानाबाद १०७ जागा, नागपूर ३१९ जागा, भंडारा ८९ जागा, पालघर २३८ जागा, गोंदिया १६८ जागा, चंद्रपूर २२५ जागा, वर्धा ८५ जागा, गडचिरोली २६३ जागा आणि सांगली ३२० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार युनानी मेडिसिन पदवी/ आयुर्वेदिक मेडिसिन पदवी/ नर्सिंग पदवीधारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

परीक्षा – दिनांक २१ जुलै २०१९ रोजी घेण्यात येईल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप संचालक, आरोग्य सेवा (संबंधित जिल्हा)

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – १ जुलै २०१९ आहे.

https://oac.co.in/wp-content/uploads/2019/06/NHM-MH-CHO-2019-Application.pdf

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना यांच्या आस्थापनेवर ५२७ जागा

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना यांच्या आस्थापनेवरील विविध तांत्रिक पदांच्या एकूण ५२७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध तांत्रिक पदांच्या एकूण ५२७ जागा
तांत्रिक डेटा असोसिएट पदाच्या १० जागा, व्यावसायिक सल्लागार पदाच्या ८ जागा, लेखा अधिकारी पदाच्या ७ जागा, पशुवैद्यकीय अधिकारी पदाची १ जागा, अभियंता पदाच्या २ जागा, ग्रंथपाल पदाच्या २ जागा, टेक्निकल डेटा असोसिएट पदाच्या ५७ जागा, कायदेशीर सल्लागार पदाची १ जागा, डाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या १३६ जागा, सिस्टम अनालिस्ट (आयटी) पदाच्या २ जागा, कार्यालय सहायक पदाच्या ३४ जागा, वरिष्ठ/ संशोधन शास्त्रज्ञ पदाच्या ३ जागा, वरिष्ठ तांत्रिक डेटा असोसिएट पदाच्या २० जागा, बायोस्टॅटियन पदाची १ जागा, लॅब सहाय्यक पदाच्या ३४ जागा, बेंच केमिस्ट पदाच्या १९३ जागा, सफाईगार पदाच्या ४ जागा, वरिष्ठ बेंच रसायनशास्त्रज्ञ पदाच्या ३ जागा आणि तांत्रिक डेटा असोसिएट्स पदाच्या ९ जागा

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार विविध पात्रता धारण केलेली असावी. (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

अर्ज पाठविण्याचे ईमेल[email protected], [email protected], [email protected], [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ जून २०१९ आहे.

गुण वाढले, पण गुणवत्तेचं काय ? – राजेंन्द्र मोहिते

करीयर मंत्रा|

नमस्कार, मी राजेंद्र मोहिते, १२ वी अकाउंटन्सी चे क्लासेस घेतो. तेही ग्रामीण भागात. पोरं प्राज्ञ भाषेत गावंढळ म्हणावी अशीच. पुढच्या वर्षी क्लासचा रौप्यमहोत्सव होईल. माझे विद्यार्थी अनेक उच्च पदांवर काम करताहेत. दोन, तीन सीए आहेत, काही मोठमोठ्या कंपन्यांत आहेत, उद्योगांत वेगवेगळ्या क्षेत्रांत आहेत, देशाच्या सीमेवर आणि सीमेपलीकडेही आहेत. मी पोरांवर (पोरं म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी) संस्कार करण्याचा माझ्या वकुबाप्रमाणे प्रयत्न केला, तो थोडाबहुत का होईना, पण यशस्वी झाल्याचं समाधान आज, मला मिळतंय खरं, पण पुढे मिळेल अशी गॅरंटी वाटत नाही.

पूर्वी साधी, फाटक्या फाटक्या पँटांतील मुलांची आणि सध्या सलवार कमीजच्या मुला-मुलींची जागा आता हाफ मॅनेला वुईथ जीन्स (दोघांनीही) घेतलीय. पूर्वी चालत किंवा सायकलवरून येणारी ही पोरं आता गाड्या ‘उडवत’ कलासवर येतात. (पूर्वीच्या शिकवणीची जागा आता क्लासनं घेतलीय म्हणा!) पिशव्यांची जागा आता ‘सॅक’ नी घेतलीय, डबा आता ‘टिफिन’झालाय, भाजी भाकरीच्या जाग्यावर आता नूडल्स आहेत. टाईमपास आठ आण्याच्या फुटण्याऐवजी एअरपॅक्ड कुरकुरे आलेत. पण ९ चा पाढा येत नाही, हेही तितकंच खरं. हातात असलेल्या फोनला ‘अँड्रॉईड पीस’ म्हणायचं हे त्यांना कळतं खरं पण त्या दोन्ही शब्दाचं स्पेल्लिंग नीट लिहिता येत नाही त्याला आपण काय म्हणणार, प्रगती की अधोगती?

मी फार जुन्या काळात जात नाही.पण माझे आई वडील दिडकी, पावकी चा पाढा सहज म्हणून दाखवायचे, अर्थात तो त्यांच्याएवढा मला येत नव्हता नव्हता आणि नाहीही. कारण ‘बीजगणित’ नावाचं भूत आमच्या मानगुटीवर कायम बसलेलं असायचं. (a+b) square = means what? उत्तर पुस्तकातील बघून लिहायचो खरा, पण प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा उपयोग फक्त ‘डिग्री मिळून नोकरी आणि छोकरी’ साठी होतो, हा शोध खूप उशीरा (!) लागला. तीच गोष्ट भाषेची, संस्कृत बापजन्मात जमलं नाही, पुस्तकातल्या हिंदीपेक्षा सिनेमातली हिंदी जास्त कळायची. आपली वाटायची, अजूनही वाटते. इतिहास आवडायचा खरा पण त्यातल्या सनावळ्या पाठ करता करता गड किल्ले चढण्याइतकी दमछाक व्हायची. त्यातच इंग्रजीचं व्याकरण डोस्क्यावर बसलं पण डोक्यात काही गेलं नाही आणि भूमितीच्या बाबतीत तर वाटोळंच! पण आज बाजारात गेलं की कोणती वस्तू कितीला घ्यायची हे ग्यान माझ्या आईबापाने दिलं. आज हे ‘knowledge’ माझी मुलं त्यांच्या मम्मी पप्पांकडून घेऊ शकतात का?

मूळ प्रश्न असा आहे की ती बाजारात जातात का? ते तर बझारमध्ये जातात! तिथं सगळंच लेबल्ड (आणि या जंजाळात मी पप्पा आणि बायको मम्मी ) कधी झालो हे कळलंच नाही. माझा मुलगा इंग्रजी माध्यमातून शिकतो. मोठ्या दोन्ही मुली मराठी माध्यमातून शिकल्या. तर इंग्लीश मिडीयमचा मुलगा ज्यावेळी ९ वी चा निकाल लागून १० वीत गेला (दोन तीन महिन्यापूर्वीची गोष्ट) त्यावेळी कराडातील कलासवाल्यांचे फोन सुरू झाले.

अशाच एका ‘सरांनी’ मला फोन केला..

क्लासचे सर – अश्वमेध चे पप्पा का?

मी – होय, आपण कोण?

क्लासचे सर – मी xxxx कलासमधून बोलतोय ,xxxx सर

मी – हां बोला.

क्लासचे सर – अहो तुमचा मुलगा खुप छान आहे, तो दहावीत जाणार आहे, नववीला चांगले मार्क्स आहेत. अबाव 90%. त्याला थोडं मार्गदर्शन करायचं होतं.

मी – बरं. काय मार्गदर्शन करायचं आहे ?

क्लासचे सर – आम्ही कौन्सिलिंग घेतो, तुमचा मुलगा पुढे स्टार होईल, आमच्या fees नाममात्र आहेत. एकदा पाठवून तरी बघा.

मी – सर धन्यवाद. फक्त मला एक सांगा तुम्ही बाजारात गेला आणि कोबीचा दर ५ रूपये किलो असेल तर तीन पावशेरचे किती द्याल तुम्ही?

क्लासचे सर – अहो हा काय प्रश्न आहे?

मी – मग सांगा ना?

क्लासचे सर – थांबा. (please wait)… (फोन कट होतो)

आजपर्यंत त्या प्रश्नाचं उत्तर आलेलं नाही.

मग मला प्रकर्षाने प्रश्न पडतो की माझ्या पोरांची किंमत काय? लेबल्ड बझारची की रोकड्या बाजारची?

पोरगं बाजारात जायला पाहिजे…दुनियेच्या ओपन मार्केटमध्ये. तरच त्याला त्याची खरी किंमत (म्हणजे त्यानं स्वतःची लावलेली, त्याला लागलेली आणि लादलेली नव्हे!) कळेल. असं वाटायला लागलं. आणि तेच खरं आहे.

राजेंन्द्र मोहीते
(लेखक कराड तालुक्यामधील रेठरे गावात अकांउंटचे क्लासेस घेतात)

एमपीएससी मधील अपयशामुळे तरुणाची आत्महत्या

बातमी |एमपीएससी मधील सतत अपयशामुळे वर्षीय तरुणाची केदारेश्वर बंधाऱ्यात उडी मारून आत्महत्या. रुपेश विष्णू बोऱ्हाडे रा. राजगुरुनगर असे आत्महत्या ग्रस्त तरुणाचे नाव आहे.

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश बोऱ्हाडे हा सुमारे तीन वर्षापासून एमपीएसीचा अभ्यास करत होता. तो परीक्षेचा अभ्यास करून चाकण येथील एमआयडीसीमधील एका कंपनीत नोकरी करत होता. परंतु,पूर्णवेळ अभ्यास करता यावा त्यामुळे रुपेश याने कंपनीतील नोकरी सोडून दिली होती. कंपनीतील नोकरी सोडून दिल्यापासून रुपेश पुन्हा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुणे येथे राहण्यास होता.सुमारे तीन ते चार महिन्यापूर्वी रुपेश यांनी दिलेल्या एमपीएससीच्या परीक्षेचा निकाल लागला होता. या परीक्षेत रुपेश नापास झाला होता. तेव्हापासून तो नाराज होता.सध्या तो अभ्यासासाठी रांजणगाव (ता. शिरुर ) सुरू येथे राहत होता.

मानसिकरित्या खचुन गेल्यामुळे रुपेश याने स्वत:च्या पाठीवरील बॅगमध्ये दहा किलोचा वजनाचा दगड टाकून शैक्षणिक कागदपत्रे यांच्यासह भीमानदीवरती असणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्याच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी १० वाजता नदीपात्रात एक मृतदेह तरंगत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी पाण्यात तरंगत असलेल्या बाहेर काढल्यावर  खिशात पासपोर्टवरील नावामुळे रुपेश ची ओळख पटली. नगर परिषदेच्या नगरसेविका रेखाताई श्रोत्रीय यांनी रुपेशच्या वडिलांना या घटनेची माहिती दिली.याबाबत रुपेशचे वडील विष्णू शिवराम बोऱ्हाडे (रा. तिन्हेवाडी रोड, राजगुरुनगर )यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे..

करीयरची निवड करत असताना

करीयर मंत्रा|

करीयरची निवड करणे हि आपल्या आयुष्यातील खूप मोठी गोष्ट असते, आपण आपल्या पूर्ण आयुष्यातील सर्वात मोठा काळ याच्यावर घालवणार असतो.करीयर किंवा व्यवसायाची निवड करणे सोप्पी गोष्ट नसते. आपला एक चुकीचा निर्णय आपल्या पूर्ण आयुष्यावर परिणाम करणार असतो.

एखादा विशिष्ट पेशा निवडताना किंवा करियर बदल करताना, आपल्या आवडी आणि महत्वाकांक्षा कशा आहेत हे काळजीपूर्वक शोधणे महत्वाचे आहे. आपण करियर ऍपिट्यूड टेस्टद्वारे हे करू शकता. अशा प्रकारचे परीक्षण आपल्याला आपल्या प्रतिभा आणि स्वारस्यांमधील स्पष्ट अंतर्दृष्टी देते. हे आपल्याला कोणत्या कौशल्याच्या क्षेत्रामध्ये आपल्याला कदाचित आपल्यासाठी उपयुक्त एक व्यवसाय सापडेल हे देखील सांगते.
व्यावसायिक करियरची निवड चाचणी घेण्याव्यतिरिक्त आपल्या पर्यायांबद्दल अधिक जाणून घेणे ही चांगली कल्पना आहे. तेथे कोणते व्यवसाय आहेत? ते कशासाठी उभे आहेत? लोकांना माहित आहे की त्यांचा व्यवसाय काय आहे आणि यात काय समाविष्ट आहे. त्यांना त्यांच्या नोकरीबद्दल काय आवडते आणि ते आपल्याला आवडेल असे काहीतरी आहे? इतरांच्या अनुभवामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायावर निर्णय घेण्यास मदत करू शकता. आपण करिअर मार्गदर्शन सल्लागार द्वारे व्यावसायिक सल्ला देखील मिळवू शकता.
आपण करियरची निवड करण्यास भाग पाडत नाही हे निश्चित करा.

 

लोकसेवा आयोगामार्फ़त संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-२०१९ जाहीर

नोकरी|संरक्षण विभागातील विविध अभ्यासक्रमाच्या प्रथम शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश देण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त घेण्यात येणारी प्रवेश पूर्व परीक्षा (संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-२०१९) दिनांक ८ सप्टेंबर २०१९ रोजी घेण्यात येणार असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II)-२०१९
भारतीय भूदल (मिलिटरी) ॲकॅडमी, डेहराडून मध्ये १०० जागा, भारतीय नौदल ॲकॅडमी, एझीमाला मध्ये ४५ जागा, हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद मध्ये ३२ जागा, ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष) चेन्नई मध्ये २२५ जागा आणि ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई मध्ये १५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर किंवा अभियांत्रिकी पदवी किंवा पदवी (भौतिकशास्त्र आणि गणित विषयासह) उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म २ जुलै १९९६ ते १ जुलै २००१ किंवा २ जुलै १९९५ ते १ जुलै २००१ दरम्यान झालेला असावा.

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेद्वारांकरिता २००/- रुपये आणि (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

परीक्षा – दिनांक ८ सप्टेंबर २०१९ रोजी लेखी परीक्षा घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ जुलै २०१९ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)

https://upsconline.nic.in/mainmenu2.php

बिकट वाट MPSC ची…

करीयर मंत्रा|सदर शोकांतिका का लिहावीशी वाटली… तर या चालू वर्षातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अर्थातच Mpsc च्या निघालेल्या कमी जागा त्या म्हणजे राज्यसेवा, एसटीआय, पीएसआय, असिस्टंट यांच्या आणि या स्पर्धा परीक्षा दुनियेच्या स्वप्ननात रंगलेली लाखों मुले यांसाठी… मी 2011-12 ला Mpsc चा अभ्यास चालु केला, काय केलं या 6/7 वर्षात याचा मनात जरा विचार केला तर सगळं आयुष्य चेहऱ्यासमोरच आलं. जवळपास 6 वर्ष mobile वापरला नाही. सगळया मित्रांपासून अलिप्त झालो. माझा ड्रेस कोड हा ‘ट्रॅक पँट आणि टी शर्ट’ झाला, महिन्यात 25 दिवस सकाळी 7 ते रात्री 10 पुर्ण वेळ अभ्यास केला, असं करत करत वर्षामागुन वर्ष गेले. डोक्याचे निम्मे केस पांढरे झाले, टक्कल पडलं त्याची शोकांतिका तर वेगळीच.

हे करत असताना चांगले-वाईट अनुभव आलेत. तेवढी प्रगल्भताही आलीच. कोणत्याही गोष्टीचा विचार करताना 10 angle ने विचार करायला शिकलो. आपले सन्माननीय पंतप्रधान पण वेड्यात काढु शकत नाही, एवढा जास्त सगळ्या विषयांचा अभ्यास झाला. माझ्या बुद्धीची जाहिरात करत नाहीये, अगदी जे खरं तेच बोलतोय. परंतु बऱ्यापैकी जास्त वाईट अनुभव आलेत हया क्षेत्रात, जे लोक अगोदर भाऊ-भाऊ करायचे तेच लोक आता भु-भु करायला लागलेत. खुपच जास्त वाईट वाटतं ज्या लोकांसाठी, ज्यांना कधी काळी आपण अंगावरचे कपडे काढुन द्यायचो व इतर वाटेल जे करायलाही तयार व्हायचो. त्यांना मात्र आता त्याची किंमत राहीलेली नाही. घरच्यांचे तर बरेच जास्त उपकार झाल्यासारखे वाटतात. जे एवढे वर्ष अविरहितपणे पैशांचा पुरवठा करत राहिले. माझ्या सारख्या पोराला एवढे वर्ष पोसले, फक्त एकाच अपेक्षेवर की आपला पोरगा अधिकारी होईल. अजुनपण पैसे देण्यासाठी थकत नाहीत ते, कधी कधी तर खुप जास्त एकटं पडल्यासारखं वाटत.

एकटं असताना विचार येतो की, आपले सगळे मित्र किती निवांत आयुष्य जगतात. सगळे settle झाले आहेत, निवांत फिरतात, मज्जा करतात, पार्ट्या करतात, आता तर बऱ्याच जणांची लग्न झाली आहेत. याबाबतीत आपण कुठे आहोत तर आपण कुठेच नाही. काही लोक तर ‘सुजित पोकळे’ हे नावपण विसरले असतील. असो, हे सगळं आपल्यालापण करता आलं असत. पण हे फक्त एकाच गोष्टीमुळे करता नाही आलं ते म्हणजे Mpsc…mpsc आणि mpsc. काही वेळेस डोळ्यातुन पाणी सुद्धा येत. ही शोकांतिका मात्र कोणीच नाही समजु शकत. माझ्या मते तर एका दृषिकोनातून विचार केल्यास, जगातले जे काही शोषण होत असतील ते सगळे mpsc च्या मुलांवर होत असतील. Mpsc मध्ये फक्त क्लासवाले, library (अभ्यासिका) वाले, room वाले, mess वाले, चहावाले मोठे होतात. थोडे फारच (0.1%) लोक यशस्वी होतात. त्यांचचं आयुष्य चांगलं होतं, पण जे अपयशी होतात त्यांचं जगणं खुप अवघड आहे. जमलं तर सदाशिव पेठेमध्ये एकवेळ येऊन नक्की पहा…

नवीन तयारी करण्याऱ्या मुलांना खुप कळ-कळीची विनंती आहे. एकतर इकडे येऊच नका आणि जरी आले तरी 2-3 वर्षापेक्षा जास्त दिवस तयारी करू नका. जगात मोठे होण्यासाठी खुप पर्याय आहेत. अधिकारी होणं म्हणजेच सगळं जग नाही, त्यांच्यापेक्षासुद्धा जगात भारी लोक आहेत आणि सध्या बनतही आहे. ह्या class वाल्यांनी तर हया क्षेत्राला एक वलय (आभासी दिवास्वप्न दाखवून) प्राप्त करुन दिलय. क्लासवाले आणि फक्त हे क्लासवाले मस्तपैकी पुणे शहरात चांगले settle झाले आहेत. ते पण ग्रामीण भागातल्या कुटुंबाचं , त्यांच्या मुलांना खोटी स्वप्ने विकून त्यांचे आर्थिक शोषण करून. त्यामुळे Mpsc कडे वळणाऱ्या मुलांनी नीट या क्षेत्रातल्या लोकांशी ( म्हणजे व्यावसायिक उद्देश् नसलेल्या लोकांशी ) चर्चा करूनच इकडे या. नाहीतर Mpsc च्या अपयशी मुलांचं जगणं खुप जास्त अवघड असत. जे मी स्वतः अनुभवतो आहे. न कारे बाबांनो स्वतःचा आयुष्याचा खेळ करू, खुप पोट तिडकीने लिहलं आहे हे, लोकांना दुसऱ्याचा संघर्ष चांगला वाटतो. मला नव्हतं रे कोणी सांगायला नाहीतर कधीच आलों नसतो या दलदलीत…

समर्पित :- संपुर्ण Mpsc च्या मुलांना

Sujit Pokale

सुजीत पोकळे, जुन्नर

72 हजार नव्हे, दीड लाख पदं भरणार! मेगाभरतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा केली आहे. विविध विभागांमध्ये दीड लाख पदं भरणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. विशेष म्हणजे यापूर्वी 72 हजार पदं भरण्याचं जाहीर करण्यात आलं होतं, ज्याची भरती प्रक्रिया सध्या सुरु आहे. त्यात वाढ करुन हा आकडा आता दीड लाखांवर नेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. प्रक्रिया सुरु असल्याने याविषयीची अधिक माहिती लवकरच जारी केली जाण्याची शक्यता आहे.
लाखो मुलं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. पण जाहिरातच न आल्याने दरवर्षी अनेकांची निराशा होता, तर काही जणांचं वय पात्रतेपेक्षा अधिक होऊन जातं. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून सरकारी नोकरीकडे डोळे लावून बसलेल्या तरुणाईच्या अपेक्षा यापूर्वीच्या घोषणेमुळे जाग्या झाल्या होत्या. शिवाय ग्रामविकास विभागाकडूनही विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या नव्या घोषणेनुसार भरती प्रक्रिया सुरु झाल्यास लाखो तरुणांचं सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी ज्या 72 हजार पदांच्या भरतीची घोषणा केली होती, त्याची प्रक्रिया याअगोदरच सुरु झालेली आहे. त्यामुळे नव्या घोषणेच्या अंमलबजावणीकडे आता लक्ष लागलंय. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने या विभागांची क्षेत्रीय स्तरावरील 72 हजार पदे भरण्यासाठी आवश्यक त्या कार्यवाहीचा आढावा राज्याच्या मुख्य सचिवांकडून घेण्यात येत होता.

मध्य रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी..

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक सेवा आहे. सर्वात मोठ्या सेवा देणाऱ्या या क्षेत्रात वेगवेगळ्या खात्याच्या जागा दरवर्षी भरल्या जातात.

एकूण जागा – ४२

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

१) डायलिसिस टेक्निशिअन ०७
२) स्टाफ नर्स ३४
३) ऑडिओलॉजिस्ट-कम-स्पीच थेरेपिस्ट ०१

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.१ –

(१) बीएससी (२) हेमोडायलिसिस मध्ये डिप्लोमा किंवा ०२ वर्षे हेमोडायलिसिस कामाचे प्रशिक्षण/अनुभव

पद क्र.३ –
जीएनएम किंवा बीएससी (नर्सिंग)
पद क्र.३ –
(१) बीएससी (२) ऑडिओ आणि स्पीच थेरेपी डिप्लोमा (३ ) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट –
पद क्र.१ – २० ते ३३ वर्षे
पद क्र.२ – २० मे २० ते ४० वर्षे
पद क्र.३ – १८ ते ३३ वर्षे

०१ मे २०१९ रोजी, [एससी / एसटी – ५ वर्षे सूट , ओबीसी – ०३ वर्षे सूट
नोकरी ठिकाण – मुंबई

फी – नाही

पद क्र. पदाचे नाव , मुलाखतीची ,तारीख ,वेळ

१) डायलिसिस टेक्निशिअन २७ मे २०१९
स. १०:०० ते दु.१:००

२) स्टाफ नर्स २८ मे २०१९
३) ऑडिओलॉजिस्ट-कम-स्पीच थेरेपिस्ट २९ मे २०१९

मुलाखतीचे ठिकाण – रिक्रुटमेंट सेक्शन सेंट्रल रेल्वे,पर्सनल ब्रँच, डिव्हिजनल रेल्वे.
मॅनेजर ऑफिस,तिसरा मजला अनेक्स बिल्डिंग,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – ४०० – ००१

अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/

एमपीएससी परिक्षेसाठी तारखा जाहीर..

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परिक्षांच्या तारखा जाहीर झाल्यात.

अ.क्र. परीक्षा आणि तारीख

१) वनरक्षक
तारीख – ०१ ते १२ जून २०१९

२) तलाठी
तारीख – १७ जून ते ०३ जुलै २०१९

३) पशुसंवर्धन विभाग
तारीख – ०५ जुलै ते २० जुलै २०१९

४) आरोग्य विभाग
तारीख – २५ जुलै ते १० ऑगस्ट २०१९