रखडलेल्या तलाठी भरतीचा निर्णय लवकरच ; उमेदवारांना दिलासा

करिअरनामा ।जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने विविध प्रवर्गांतील रिक्‍त झालेल्या तलाठी पदासाठी भरती प्रक्रिया राबविली होती. मात्र त्यांचे निकाल लावले नव्हते.त्यामुळे उमेदवार चिंतेत होते.

विविध राखीव प्रवर्गांतील तलाठ्यांच्या जवळपास 80 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली होती. त्यामध्ये त्यांची लेखी परीक्षाही घेण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे त्यांचे अंतिम निकाल आणि नियुक्‍तीपत्रे राखीव ठेवण्यात आली होती.

गुणानुक्रमाने यादी ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, नियुक्‍तीपत्र कोणालाच मिळाले नाही. उमेदवार चिंतेत होते त्यामुळे रखडलेल्या तलाठी भरतीचा लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि “HelloJob”