Police Bharti 2022 : मोठी बातमी!! राज्यात 15 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु होणार; 7 हजार पदे भरली जाणार

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात 50 हजार पोलीस पदे रिक्त आहेत. सध्या साडे 5 हजार मुलांची (Police Bharti 2022) भरती पूर्ण होत आली आहे. 7 हजार पदांची भरती काढली जाणार आहे. जूनच्या 15 तारखेपासून ही प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. यानंतर राज्य मंत्रिमंडळासमोर आणखी 15 हजार पदे भरण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे. ही मोठी भरती करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळ नक्कीच परवानगी देईल. पोलिसांवर खूप ताण आहे, तो कमी करण्यासाठी ही भरती गरजेची असल्याचे मंत्री वळसे – पाटील म्हणाले.

लवकरच पोलीस भरतीच्या अधिकृत तारखेची माहिती जाहीर केली जाणार आहे. त्यातच आता गृहविभागाने आतापर्यंत साडे 5 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर 7 हजार (Police Bharti 2022) जागांच्या भरतीच्या प्रक्रियेला 15 जूनपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने गृहखात्याची सगळी तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती मिळत आहे. तसेच पहिल्या टप्प्यात 7 हजार पदांच्या भरती प्रक्रियेनंतर राज्यात लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.

राज्यातील अनेक तरुण, तरुणी पोलीस भरतीची वाट पाहत आहेत. भरती प्रक्रियेत पात्र ठरण्यासाठी मैदानी चाचणी, लेखी परीक्षेची जोरदार तयारी करत आहेत. परंतू राज्य सरकार तारखा कधी जाहीर करणार, पोलीस भरती प्रक्रिया कधीपासून राबविली जाणार याबाबत काहीही माहिती मिळत नव्हती. यावर राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे पाटलांनी मोठे वक्तव्य केले आहे.

राज्यात मोठ्याप्रमात पोलीस भरती करण्यात येणार आहे. 7 हजार पदांसाठी 15 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. याबाबत राज्याच्या गृहविभागातून माहिती मिळत आहे. (Police Bharti 2022)

Maharashtra Police Bharti 2022

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com