लाखो विद्यार्थ्यांना मिळू शकते नवीन वर्षाचे गिफ्ट, मानव संसाधन विकास मंत्रालयाने सादर केला प्रस्ताव

करिअरनामा । भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या हजारो विद्यार्थ्यांना आपलं शिक्षण अर्ध्यावरच सोडावं लागलं आहे. हे एका अहवालानुसार समोर आलं आहे. या विद्यार्थ्यांना फक्त आपल्या कोर्सची फी भरण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी हा कोर्स सोडला आहे. असं ही या संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे या समस्येचे निराकरण करण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाने आयआयटी विद्यार्थ्यांसाठी एक प्रस्ताव सादर केला आहे. तसेच लवकरच या प्रस्तावाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

वास्तविक पाहता लोकसभेत मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिलेल्या उत्तरानुसार, गेल्या पाच वर्षांत, देशभरातील आयआयटीच्या 7248 विद्यार्थ्यांना आपलं शिक्षण अर्ध्यावरच सोडावं लागलं आहे. यामागील सर्वात जबाबदार घटक म्हणजे कोर्समध्ये रस नसणे किंवा अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यास असमर्थता असणे. आयआयटी बीएचयू (आयआयटी बनारस हिंदू युनिव्हर्सिटी) च्या विद्यार्थ्यांशी या समस्येबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, ड्रॉप आउटची समस्या बीटेकमध्ये नसून एमटेक कोर्समध्ये आहे. सुमारे दोन ते तीन टक्के विद्यार्थी येथेच बाहेर पडतात. कारण त्यात शिकणारा विद्यार्थी, कोर्स पूर्ण करता-करता दुसर्‍या क्षेत्रात यशस्वी होतो. बरेचजण गेट, एमबीए किंवा कोचिंग घेण्यास सुरुवात करतात.

देशाच्या आयआयटीमध्ये अशी व्यवस्था आहे की बी.टेक करतांना मध्यभागी आपली शाखा बदलवावी लागेल तर पहिल्या सेमेस्टर नंतर आपण करू शकता. त्याशिवाय बी.टेकच्या तिसऱ्या वर्षामध्ये विद्यार्थ्याला हवे असल्यास त्याचे एकात्मिक ड्युअल डिग्रीमध्ये स्थानांतरण मिळू शकते. यात बी.टेक आणि एम.टेक या दोन्ही अभ्यासक्रमांचा समावेश आहे. जे विद्यार्थी बीटेक कोर्सला कंटाळले आहेत. त्यांना बीएससी अभियांत्रिकी किंवा इतर कोर्समध्ये प्रवेश मिळू शकेल, अशी व्यवस्था सरकार करत आहे.

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]