माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार !

करिअरनामा । भारताला महासत्ता बनवण्यासाठी प्रयन्तशील असणाऱ्या ए पी जे अब्दुल कलाम यांनी मोठी स्वप्न पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्यासाठी धडपडण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना कायमचा दिला आहे. आजही भारत महासत्ता होऊ शकला नसला तरी कलामांचे हे विचार नाकारता येण्यासारखे नक्कीच नाहीत.

1 ) आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं, तर आपली झोप उडवतं ते खरं स्वप्न असतं.

2) देशात सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शक्यतो वर्गातील शेवटच्या बाकावरचं सापडतात.

3) तुमच्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका. कारण दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अयशस्वी झालात तर तुमचा पहिला विजय केवळ नशीबाचा भाग होता, असे म्हणायला अनेकजण सज्ज असतात.

4) जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा सर्व पक्षी घरट्यात आसरा घेतात. मात्र, गरूड पावसापासून बचाव करण्यासाठी ढगांवरून उडतो.

5) यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही.

6) यशाचा आनंद अनुभवण्यासाठी व्यक्तीला आयुष्यात अडचणींची सामना करणे आवश्यक असते.

7) स्वप्न खरी होण्यासाठी स्वप्नं पाहणं गरजेचं आहे.

8) एखाद्याचा पराभव करणे फार सोपे असते. मात्र, एखाद्याला जिंकणे खूपचं अवघड असते.

9) आपण आपल्या वर्तमानातील गोष्टींचा त्याग करून जेणेकरून आपल्या मुलांचं भविष्य उत्तम होईल.

10) स्वप्ने पहा, त्या दिशेने विचार करा व ती कृतीने सत्यात उतरवा.

11) संकुचित ध्येय बाळगू नका. महान विचारदृष्टी समोर ठेऊन परिश्रम केले तर आपला देश निश्चितपणे एक विकसित राष्ट्र बनेल.

12) य़शस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात.

नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”