अकरावी प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय होईल – वर्षा गायकवाड

करिअरनामा ऑनलाईन ।कोरोनाच्या संकटामुळे रखडलेल्या अकरावी प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून ऑनलाईन अॅडमिशन होऊनही अर्धी रखडलेली प्रवेश प्रक्रिया आता पूर्ण होण्याची शक्यता आहे.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, ऑनलाइन अभ्यासक्रमाबाबत सातत्याने प्रश्न विचारला जातोय की अभ्यासक्रम कधीपासून सुरु होणार आहे. कारण अकरावीचे काही प्रवेश बाकी आहेत. परंतू आपल्याला हे माहिती आहे की मधल्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली होती. याबाबत महाअधिवक्त्यांशी चर्चा करून  येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल.

अकरावीचे गेल्या दोन महिन्यांपासून ऑनलाइन-ऑफलाइन प्रवेश झाले आहेत. काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासाचा लाभ आणि प्रवेश घेता आला नाही. दरम्यान ऑनलाइन अभ्यासाचा लाभ  न झालेल्या विद्यार्थांनाही घेता येणार असल्याचे यावेळी गायकवाड यांनी सांगितले.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com